महाराष्ट्रातील दुसर्या आणि देशातील सर्वात मोठ्या अशा पाचव्या टप्प्याचे मतदान गुरूवारी संपन्न झाले. एकूण पाच टप्प्यांमध्ये मिळून जवळपास दोनशे पन्नास लोकसभा मतदारसंघासाठी मतदान संपन्न झाले आहे. लोकसभा निवडणुकीचा निम्मा टप्पा आत्तापर्यंत पूर्ण झालेला आहे. या निम्म्या टप्प्याच्या मतदानात वाढलेली टक्केवारी ही परिवर्तनाची लाट दाखवून देत आहे.देशात नरेंद्र मोदी नावाची लाट जशी आहे तशीच ती परिवर्तनाची फार मोठी लाट आहे. परिवर्तनाच्या या लाटेबरोबरच काँग्रेस विरोधी लाट आहे. ही लाट मोठी करून काँग्रेसचे अस्तित्व संपवणे आज काळाची गरज आहे. आज या देशाची गरज, देशाच्या भवितव्यासाठी काँग्रेसला सत्तेवरून हाकलण्याची गरज आहे.पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे एखादा क्रूर राजा असेल आणि तो आपल्या प्रजेवर अन्याय करीत असेल तर शेजारी सर्व राजे एक होवून ती राजवट संपुष्टात आणत. तेतील जनतेला सुखी करण्यासाठी प्रयत्न करत असत. त्याचप्रमाणे काँग्रेसची जुलमी आणि भ्रष्ट राजवट संपुष्टात आणणे अत्यंत आवश्यक आहे. या युद्धाचे सेनापतीपद या देशाने नरेंद्र मोदींकडे दिलेले आहे. यासाठीच सगळ्या काँग्रेसविरोधी पक्षांनी आता नरेंद्र मोदींचे सेनापतीपद मान्य करण्याची गरज आहे.निम्म्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर उरलेल्या अडीचशे पावणेतीनशे मतदारसंघातील महत्त्वपूर्ण मतदानात हा उत्साह वाढलेला दिसला पाहिजे. कारण निम्म्या टप्प्यापर्यंत मजल जोरात मारली जाते आणि नंतर काहीतरी अशी गडबड होते की चित्र बदलून जाते. 1991 च्या निवडणुकीत दोन टप्प्यात मतदान झाले होते. पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंंंतर दुसर्या टप्प्याच्या अखेरच्या सभेपूर्वी राजीव गांधींची हत्या झाली. त्यामुळे उर्वरीत निवडणुका महिनाभर पुढे ढकलल्या गेल्या. त्या महिनाभरात काँग्रेसने राजीव हत्येची लाट आणली आणि त्या जागांंवर मोठ्या संख्येने काँग्रेसचा विजय झाला. पहिल्या टप्प्यातील मतदानात भारतीय जनता पक्ष 117 जागांपर्यंत पोहोचला होता. दुसर्या टप्प्यातही याच गतीने भाजप 1991 मध्ये 225 पर्यंत पोहोचू शकत होता. मित्र पक्षांना बरोबर घेवून सरकार बनवू शकला असता. पण महिनाभर पुढे गेलेली निवडणूक, राजीव गांधी हत्येची निर्माण झालेली लाट, महिनाभर निवडणुकीचा वाढलेला खर्च यामुळे विरोधक कमी पडले. पुढचा सगळा डाव काँग्रेसने साधला. जी सत्ता विरोधकांना 1996,1998,1999 मध्ये मिळाली ती 1991 मध्ये मिळाली असती. म्हणजे 1989 ला काँग्रेसकडून हिसकावून घेतलेली सत्ता 1991 ला परत काँग्रेसकडे गेली नसती.1991 मध्ये सत्तेवर आलेले काँग्रेस सरकार हे अल्पमतातले सरकार होते. पण नरसिंहराव यांचे हे सरकार पाडण्यात कोणाही विरोधकाला फारसा रस नव्हता. कुठल्याही टेकूशिवाय हे सरकार पाच वर्ष आरामात टिकले. पण आजच्याप्रमाणेच त्याकाळातही भ्रष्टाचार टिपेला पोहोचला होता. हर्षद मेहतासारखे घोटाळे याच सरकारच्या काळात झाले होते. हर्षद मेहतांनी एक कोटी रूपये नरसिंहराव यांना दिल्याचे जाहीर केल्यावर नरसिंहरांव यांचे तोंड, गालाच्या पुर्या एवढ्या टम्म फुगल्या होत्या की त्या नंतर नरसिंहरावांच्या निधनापर्यंत बसल्याच नाहीत. या हर्षद मेहताच्या घोटाळ्यामुळे बँक ऑफ कराड या महाराष्ट्रातील मोठ्य शेड्युल्ड बँकेसहे गुजरातमधील दोन ते तीन बँका बुडाल्या. हे फार मोठे आर्थिक घोटाळे काँग्रेसला या काळात करता आले. 1991 साली राजीव गांधींच्या मृत्यूमुळे जीवदान मिळालेल्या काँग्रेसने आपल्या पुढच्या पिढीची सोय या काळात केली. देशभरात पैशाचे आणि भ्रष्टाचाराचे राजकारण सुरू करण्याचा प्रकार काँग्रेसने केला. आज त्याचीच भिती वाटते आहे. अडीचशे पर्यंतचा मतदानाचा टप्पा झाला आहे. आता अत्यंत निर्णायक असा टप्पा आलेला असताना काँग्रेसकडून असाच काही प्रकार होण्याची शक्यता आहे. काँग्रेसची ती शैली आहे. म्हणून विरोधकांनी आणि मतदारांनी अत्यंत सावध झाले पाहिजे. कसलीही सहानुभूतीची लाट काँग्रेसने निर्माण केली तरी मतदारांनी आता त्याला फसता कामा नये. 1991 साली झालेली राजीव गांधी यांची हत्या हा तसा संशयास्पद प्रकार आहे. राजीव गांधी हे प्रचारसभेसाठी व्यासपिठावर जाण्यासाठी येतात. व्यासपिठावर त्यांच्याबरोबर अन्य कोणी तिथले स्थानिक नेते, मंत्री असत नाहीत. ज्या व्यासपिठावर बाँम्बस्फोट होवून राजीव गांधी यांचा मृत्यू होतो त्यावेळी अन्य कोणाला इजा होत नाही. कारण सगळे लांब लांब असतात. त्यामुळे या हत्येमागे काँग्रेसच्याच कोणाचा हात आहे काय असाही संशय आल्याशिवाय रहात नाही. एरवी आपल्या नेत्यांबरोबर व्यासपिठावर बसण्यासाठी गर्दी करणारे लोचट कार्यकर्ते ही काँग्रेसची खरी ओळख आहे. प्रेक्षकांत कमी पण व्यासपिठावर जास्त अशीही अवस्था होते. व्यासपिठावर बसायला खुर्ची नसेल तर बाजूला, पाठीमागे उभे राहून आपला व्यासपिठावरचा हक्क दाखवणारे पहिल्या, दुसर्या फळीतील कार्यकर्ते नेत्याच्या आजूबाजूला असतात. परंतु राजीव गांधींची एवढी मोठी सभा असताना सभेकडे जाण्याच्या निम्म्या मार्गापर्यंत तेथील कार्यकर्ते येतात, ते पुढे येत नाहीत. तिथून पुढे राजीव गांधी एकटे जातात आणि तिथे एक महिला हार घालायला येते आणि स्फोट करते. हे अत्यंत संशयास्पद आहे. तशा काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे मृत्यू हे संशयास्पदच आहेत. विलासराव देशमुख यांचा मृत्यू एकाएकी कशाने झाला? माधवराव सिंधीया यांचा अपघाती मृत्यू संशयास्पद आहे. राजेश पायलट यांचा झालेला मृत्यू हाही संशयास्पद असा आहे. त्यामुळे महत्त्वाच्या फळीतील नेत्यांचा संशयास्पद मृत्यू ही काँग्रेसला तारून नेणारी गोष्ट आहे. असे प्रकार घडले तरी भावनेच्या आहारी न जाता काँग्रेसला मतदान न करणे हे मतदारांचे कर्तव्य आहे. जे गेले त्यांचे दु:ख आहे. पण जे येणारे असतील ते गेलेल्यांच्या नावाने भांडवल करून येत असतील तर हे काँग्रेसचे लोक आहेत हे लक्षात घ्यावे लागेल. काँग्रेसच्या प्रवृत्तीत ना कधी बदल होईल ना झाला आहे. निम्मा टप्पा पार केल्यावर विरोधकांना खात्री वाटू लागलेली आहे. नरेंद्र मोदी नावाची लाट जोराने उसळी मारत आहे. त्यामध्ये विरोधकांनी मतविभाजन होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडे राज ठाकरेंसारख्या काही विचारवंतांनी अत्यंत सांभाळून बोलले पाहिजे. आपल्या वैयक्तीक अहंकाराचा फायदा काँग्रेसला होणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. खरोखरच राज ठाकरे यांना नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान व्हावे आणि या देशाचे कल्याण करावे असे वाटत आहे तर आपल्या भूमिका त्यांनी स्पष्ट केल्या पाहिजेत. एबीपी माझावरील कट्ट्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की अनधिकृत बांधकामाबाबत माझा पाठिंबा मी मावळच्या उमेदवाराला देवू शकत नाही. मी कोणा एकासाठी माझी भूमिका बदलू शकत नाही, आपल्याला हे माहित असते तर मी सभेला गेलोच नसतो. राज ठाकरेंसारख्या नेत्याच्या तोंडी हे न शोभणारे वक्तव्य आहे. एकदा तुम्ही समर्थन दिलेले आहे तर मागाहून असे कसे बोलू शकता? तुमच्यात आणि काँग्रेसमध्ये काही फरक आहे की नाही? लक्ष्मण जगताप हे पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर लढत आहेत हे राज ठाकरे यांना माहित नाही असे म्हणणे निव्वळ खोटेपणाचे आहे. अनधिकृत बांधकामे नियमीत करण्याबाबत सरकारने ठोस भूमिका घेतली नाही म्हणून त्यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात राजीनामा दिला होता. मनसेच्या आमदारांनी ही माहिती राज ठाकरे यांना दिली नव्हती का? जगताप यांनी त्यासाठी राष्ट्रवादीचे तिकीट नाकारले होते हेही जर राज ठाकरे यांना माहित नसेल तर परदेशातील उदाहरणे देवून आपण खूप अभ्यासू आहोत हे दाखवणे म्हणजे राज ठाकरे यांचे थोंतांड म्हणावे लागेल. अशी दुटप्पी भूमिका राज ठाकरे यांनी जर घेत राहिले तर त्यांचा मनसेही वाढणार नाही आणि विरोधकांनाही लाभ न होता मतविभाजनाचा फायदा काँग्रेसला होत राहिल. अशा कोणत्याही चुका करून काँग्रेसचा लाभ होईल अशी संधी राज ठाकरे यांनी देता कामा नये. पुढचा टप्पा आणखी महत्त्वाचा आहे. या काळात देशाचा कौल निश्चित करणारा टप्पा आहे. त्याग टप्प्यात आपल्याला काँग्रेसला हद्दपार करायचे आहे. यासाठी सावध राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
शुक्रवार, १८ एप्रिल, २०१४
आता सावध होण्याची गरज
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा