मागच्या आठवड्यात अमेरिकेने लादेनला ठार मारल्याबरोबर भारतात चर्चा सुरू झाली ती आता दाउदचे काय? ही चर्चा कारण नसताना प्रसारमाध्यमांनी वाढवली आणि भारताचा अपमानच करण्याचा प्रकार केला आहे. प्रसारमाध्यमे विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स प्रसार माध्यमे, वाहिन्या अशा बातम्या आणि चर्चासत्र कशासाठी घेतात याचाच खरा प्रश्न आहे. अशा चर्चांमध्ये येणारे कुणी फार अभ्यासू असतात अशा प्रकारची बाबही नाही. कोणी विचारवंत किंवा तोडगा देउ शकेल असे कोणी या चर्चांमध्ये असत नाही. या मध्ये एकतर नकारात्मक चर्चा करणारे किंवा कसल्याही निर्णयापर्यंत येणारे नसतात. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी आपली अशी एरंडाची गुर्हाळे बंद करावीत आणि प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याची गरज आहे. अमेरिकेने पाकीस्तानात जाउन लादेनला मारल्याची घटना अमेरिकेने जाहीर करेपर्यंत पाकीस्तानला नव्हती. कोणत्याही प्रसारमाध्यमांनीही अमेरिकेच्या या ऑपरेशनची ऑपरेशन सुरू होण्यापुर्वी माहिती दिली नव्हती. पण अमेरिकेने जाहीर केल्यानंतर भारतही अशी कार्यवाही दाउदचे बाबतीत करू शकतो असा उगाचच आगाउ विषय चर्चेत आणला गेला. एका वाहिनीने तर चक्क दाउदला पकडण्यासाठी ऑपरेशन एम आय सुरू झाल्याचेही जाहीर केले. त्यानंतर काही वर्तमानपत्रांमधून दाउदने आपले निवासस्थान बदलल्याचे जाहीर करण्यात आले. हा काय फालतूपणा प्रसारमाध्यमांनी चालवला आहे याचे आकलन होत नाही. पण अशा प्रकारच्या माध्यमयंत्रणेमुळे देशाला अधिक धोक्यात टाकण्याची प्रवृत्ती वाढीस लागत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अमेरिकेने हाती घेतलेली मोहिम यशस्वी झाल्यानंतरच त्याची वाच्यता केली गेली. पण भारतात मात्र अजून कसलीही कार्यवाही केली नसतानाच असे मिशन सुरू झाल्याचे जाहीर करून दाउद सारख्या भारताच्या शत्रूंना सावध करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे अशा प्रसारमाध्यमांवर बंदी घालण्याची गरज आहे. कारण अशा कारवाया भारताने हातात घेतलेल्या नसताना त्याबाबत बातम्या पसरवून त्याचा फोलपणा सिद्ध झाल्यावर अफवा पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा अशा प्रसारमाध्यमांविरोधात नोंदवला गेला पाहिजे. किंवा देशाची गुपीते फोडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल दंडात्मक कारवाई कण्याची नितांत गरज आता निमार्ंर्ंण झाली आहे. अमेरिकेच्या कार्यवाहीची राखलेली कमालीची गुप्तता हेच त्या राष्ट्राच्या विकसीत मनोवृत्तीचे दर्शन घडवून आणते. पण आपण मात्र यातून काहीच शिकत नाही, शिकलो नाही याच्यासारखे दुर्दैव ते कोणते म्हावे लागेल? याच दरम्यान पाकीस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यानंी एक पत्रकार परिषद घेउन पाकीस्तानची भूमिका स्पष्ट केली होती. त्यावेळी एका आगाउ भारतीय पत्रकाराने अमेरिकेप्रमाणे भारताने कार्यवाही केली तर काय होईल असे विचारले. त्यावर मुशर्रफने स्पष्ट शब्दात सांगितले की, अमेरिका ती अमेरिका. भारत काय तशी कार्यवाही करू शकणार? सरळ सरळ भारताच्या अकार्यक्षमतेबद्दल मुशर्रफने मत व्यक्त केले. कारण नसताना मुशर्रफकडून त्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीने भारताचा अपमान करून घेतला. आमच्याकडे स्वातंत्र्याचा अनावश्यक वापर केला जात आहे. स्वातंत्र्य मिळवले म्हणण्यापेक्षा आम्ही स्वैराचार मिळवला. गेल्या 63 वर्षात काँग्रेसने या देशात स्वैराचार माजवला. त्या स्वैराचाराचा कधी अनाचार झाला आणि कधी त्याचा भ्रष्टाचार झाला हेच आम्हाला कळले नाही. भ्रष्टाचार हा काँग्रेसच्या राजवटीत शिष्टाचार बनला. काँग्रेसला त्याची कसलीही खंत वाटणे नाही, लाज वाटणे नाही तर भ्रष्टाचारानेचे आपण राजे होउ शकतो असा गोड गैरसमज काँग्रेसने करून घेतला. आपल्या शिवाय देशाला कोणी वाचवू शकत नाही असा समज काँग्रेसने करून घेतला आहे. आम्ही ज्या गोष्टी पारदर्शक करायच्या त्या गोष्टींचे भांडवल करून त्या झाकूून ठेवतो ही वस्तुस्थिती आहे. माहितीच्या अधिकारात मागवलेली माहिती या ना कारणाने नाकारली जाते आणि उगाचच नको ती माहिती पब्लिश करते. भारत पाकीस्तानवर हल्ला करेल अथवा नाही करणार. दाउदसंबंधी पुरावे मिळाले आहेत तर त्वरीत कार्यवाही करा. पाकीस्तानला सळो की पळो करून सोडा. कशासाठी काम होण्यासाठीच त्याची वाच्यता केली जाते आहे. या वार्च्ंयता प्रकारांनी शत्रूला सावध करणे हासुद्धा देशद्रोहच आहे असे सांगावे लागेल. हा सगळा प्रकार काँग्रेसच्या नाकर्तेपणाचा, भ्रष्टाचार झाकण्याचा प्रकार आहे. पाकीस्तानविरोधात काही वक्तव्य केले की तमाम भारताच्या लोकांच्या मुठी आवळणार आणि त्यामुळे आमचे पाप लपणार ही काँग्रेसची निती आहे. कार्यवाही आणि कारवाई करणारे अमेरिकेची किंवा अन्य कोणाची परवानगी घेत बसले नसते. 1992 पासून एक दहशतवादी पाकीस्तानच्या आश्रयाला आहे, आणि आमचे सरकार त्यावर काहीही कार्यवाही करत नाही यातच सरकारचा नाकर्तेपणा सिद्ध झालेला आहे. पाकीस्तानतले राहू द्या पण जे कैदी आपल्या ताब्यात आहेत. ज्यांनी गन्हे कबूल केलेले आहेत आणि ते सिद्धही झालेले आहेत, अशांना फाशी देण्यासाठी आम्ही कार्यवाही करु शकत नाही. अफझल गुरू आमच्या ताब्यात आहे. सर्व न्यायालयांनी त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. पण केवळ राष्ट्रपतींच्या सहीसाठी तो कागद पुढे सरकवला जात नाही. याचे कारण आमचे सरकार हे नाकर्ते सरकार आहे. सहज पडे अन दंडवत घडे अशाप्रकारचे काम होणे सरकारल अपेक्षित आहे. हीच गत कसाबच्या बाबतीत होणार आहे. हेच पाणी मुशर्रफने ओळखले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात काय फरक आहे हे सांगून भारताला चक्क डिवचले आहे. पण आम्ही मात्र षंढासारखे गप्प राहण्याशिवाय काहीही करू शकत नाही यासारखे दुर्दैव ते काय असणार आहे? यासाठी अशा संवेदनशील विषयांवर भाष्य करण्यापासून प्रसारमाध्यमांना रोखले पाहिजे. देशद्रोह्यांना मदत करणारे लिखाण आणि प्रसारण सर्वच प्रसारमाध्यमांनी थांबवले पाहिजे. सरकारने अश्वासनांऐवजी कृतीवर भर अधिक वेगाने दिला पाहिजे. (10 मे 2011: काही बदललं नाही, परिस्थिती जैसे थे आहे. )
सोमवार, १४ एप्रिल, २०१४
कृतीवर भर देणे आवश्यक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा