रविवार, २० एप्रिल, २०१४

जाहीरातीतून फसवणूक करणार्‍यांवर कारवाई करा

  • काँग्रेसकडून गेल्या काही दिवसांपासून एक जाहीरात टिव्हीवरच्या विविध वाहिन्यांवर दाखवली जात आहे. काही तरूणी आपण गुंडांना घाबरत नाही, आम्ही सक्षम आहोत. आम्हाला भिती दाखवणारे तुम्ही कोण? भितीवर मात करू या काँग्रेसला मत देवू या. ही जाहीरात गेल्या चार दिवसातच दाखवण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर आणखी एक जाहीरात आहे की 50 वर्षांपूर्वी माझ्या आजीला काही पर्याय नव्हता पण आता महिला सक्षमीकरणामुळे माझी आई बँकेत मॅनेजर झाली. हे काँग्रेसमुळे झाले आहे. या जाहीराती काँग्रेस करते हा सरळसरळ महिलांचा अपमान  आहे. आणखी एक जाहीरात आहे ती एक सरदारजी दाखवला आहे. त्या जाहीरातीत जिसने कभी किसान के साथ ना इन्साफी नही होने दी उसी काँग्रेस को मेरा व्होट.
  • या जाहीराती पाहिल्या तर काँग्रेस किती खोटे बोलते हे यातून स्पष्ट होताना दिसते. खरं तर या जाहीरातीतील मुलींनी ही जाहीरात केलीच कशी? जी काँग्रेस महिलांची बेइज्जती करते, जी काँग्रेस महिलांना संरक्षण देवू शकत नाही त्याच काँग्रेसची या मुली केवळ पैशासाठी जाहीरात करावी हाच फार मोठा भ्रष्टाचार आहे. महिलांना सुरक्षित जगायचे असेल तर काँग्रेसला मत द्या असे या तरूणी सांगतात. पण या महिला आणि काँग्रेस विसरली आहे की देशात गेली दहा वर्ष काँग्रेसचेच सरकार आहे. काँग्रेसचे सरकार असताना काही केले नाही, तेव्हा महिला अत्याचारात प्रचंड वाढ झाली आणि आता जाहीरात करावी लागते की महिलांच्या  सुरक्षेसाठी काँग्रेसला मत द्या. याचा स्पष्ट अर्थ आहे की काँग्रेसच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत म्हणून अशी जाहीरात करावी लागते. काँग्रेसची सलग 15 वर्ष सत्ता असलेल्या दिल्लीतच निर्भया सामुहीक बलात्कार प्रकरण घडले होते. याच काँग्रेसने ज्या बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा ठोठावली होती त्या गुन्हेगारांची फाशीची शिक्षा माफ केली. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्याची कबूलीही दिलेली आहे. असे असताना काँग्रेस किती खोटे बोलू शकते याचा हा दाखला आहे. आम्हाला  भिती   दाखवणारे तुम्ही कोण? आमचे मत काँग्रेसला असे या जाहीरातीतील युवती बेधडकपणे म्हणत आहेत. आम्ही आयटी क्षेत्रात काम करतो, आम्ही उच्चशिक्षित आहोत, आम्ही तुम्हाला घाबरत नाही असे गुंडांना या मुली धमकावत आहेत असे जाहीरातीत दाखवले आहे. पण पुण्याच्या आयटीपार्कमधल्या तरूणीवर झालेला कारमधला बलात्कार हा काँग्रेसच्या राज्यातलाच आहे हे विसरून चालणार नाही. हा काँग्रेसच्या निर्लज्जपणाचा कळस आहे. स्वत:च निष्क्रिय सरकार द्यायचे आणि सरकार काही करत नसताना ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्याला दोषी ठरवायचे. त्या घडू नये म्हणून मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी फसव्या जाहीराती करायच्या. या जाहीराती करणार्‍या मुलींना भरघोस पैस मिळाले म्हणून त्यांनी वाटेल त्या जाहीराती करणे हा समाजावरचा फार मोठा बलात्कार आहे. काँग्रेसच्या राजवटीतच महिला असुरक्षित आहेत आणि तरी या जाहीरातीतील मूर्ख मुली म्हणत आहेत की महिलांच्या सुरक्षेसाठी काँग्रेसला मत द्या. जाहीरातीतल्या या मुलींनी आपली अक्कलच नाही तर अब्रूही गहाण ठेवली आहे. ज्या काँग्रेसचा प्रचार या मुली करत आहेत त्या काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी यांच्यावरही बलात्काराचा आरोप आहे. सुकन्यादेवी नावाच्या मुलीवर सामुहीक बलात्कार केल्याचे प्रकरण गाजते आहे. असे असताना केवळ पैसा मिळतो म्हणून या जाहीरातीतील मॉडेल मुलींनी महिलांच्या सुरक्षेसाठी काँग्रेसला मत द्या असे सांगणे म्हणजे देशातील महिलांना बलात्कार करून घेण्यासाठी सामोरे जा असे केलेले आवाहन आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे की महिलांचा अपमान करणारी जाहीरात महिला करत आहेत ही. महिलांना मूर्ख बनवण्याची काँग्रेसची खेळी ही महिलांचा अपमान करणारी आहे. दिल्लीतील निवडणुकीत केजरीवाल यांच्या प्रचारात निर्भया हा फार मोठा मुद्दा होता. मोठमोठी बॅनर्स दिल्लीत लावलेली होती, त्यात महिलांच्या सुरक्षेसाठी आम आदमी पार्टी असा प्रचार केला होता. त्या काळात दिल्लीतील प्रत्येक रिक्षाच्या पाठीमागे निर्भया आणि महिला सुरक्षेची जाहीरात केलेली होती. पण प्रत्यक्षात सत्ता मिळाल्यावर केजरीवाल पाय लावून पळाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एका रिक्षावाल्याने केजरीवाल यांना थोबाडीत मारली ती याच कारणाने. आता थोबाडायची वेळ काँग्रेसची आहे. सत्ता तुमच्याकडे असताना तुमच्याच राज्यात महिलांवर बलात्कार  घडत आहेत. दिल्लीत सत्ता काँग्रेसची, केंद्रात सत्ता काँग्रेसची तिथेच घडले निर्भया सामुहीक बलात्कार प्रकरण. असे असतानाही महिलांच्या सुरक्षेसाठी काँग्रेसला मत द्या अशी मागणी करता? थोबाडा त्या राहुल गांधीला, थोबाडा त्या सोनिया गांधींना. थोबाडून काढा सगळ्या काँग्रेसला. महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार आहे. पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचेच मुख्यमंत्री आहेत. इथेच शक्ती मिल सामुहीक बलात्कार प्रकरण घडले. तेच महिलांच्या सुरक्षेसाठी काँग्रेसला मत द्या असे सांगतात हा निर्लज्जपणाच नव्हे का? केजरीवालप्रमाणे अशा नेत्यांना आता थोबाडायची वेळ आलेली आहे.
  • दुसर्‍या एका जाहीरातीत माझ्या आजीला काही पर्याय नव्हता पण माझी आई आज बँकेत मॅनेजर आहे. हे सगळं घडलं गेल्या दहा वर्षात कारण देशात काँग्रेसचे सरकार आहे म्हणून महिला या पदावर पोहोचू शकल्या. किती खोटी जाहीरात आहे ही? दहा वर्षांपूर्वी महिला उच्चपदावर पोहोचल्या नव्हत्या का कधी? आणि पन्नास वर्षांपूर्वी आजीला पर्याय नव्हता हे सांगतानाही तेव्हा सरकार काँग्रेसचेच होते हे कसे विसरून चालणार आहे? आई वडिलांनी मुलींना शिकवायचे, स्वत:च्या पैशाने उच्च शिक्षण द्यायचे आणि त्यांनी मोठ्या पदावर पोहोचायचे. फुकटचे श्रेय काँग्रेसने घ्यायचे. हा खोटेपणा आहे. महिलांच्या फसव्या आणि खोट्या जाहीराती करणार्‍यांना न्यायालयात खेचण्याची वेळ आलेली आहे. काँग्रेसने या महिलांचा केलेला दुरूपयोग हा सामाजीक अन्याय आहे.
  • आणखी एका जाहीरातीत शेतकर्‍यांची फसवणूक केलेली आहे. त्या जाहीरातीत ‘जिसने कभी किसान के साथ नाइन्साफी नही होने दी उसी काँग्रेस को मेरा व्होट.’ अशी जाहीरात करताना काँग्रेसला लाज वाटायला पाहिजे. या देशात शेतकर्‍यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. विदर्भात हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्रात मागच्या महिन्यात गारपिटीने 55 शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. सरकार शेतकर्‍यांना न्याय देवू शकत नाही म्हणूनच त्यांना आत्महत्या करावी लागलेली आहे. असे असताना किसानोंके साथ ना इन्साफी नही होने दी हे म्हणणे हीच फार मोठी  नाइन्साफी आहे. काँग्रेसचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान अशी घोषणा दिली होती. शास्त्रींच्या निधनानंतर ही घोषणा संपुष्टात आली. तेव्हापासून मर किसान, मर जवान अशी घोषणा काँग्रेसने सुरू केलेली आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. नापिकीने, उपासमारीने, कर्जबाजारीपणामुळे देशोधडीला लागत आहे अशा परिस्थितीत त्याला कोणत्याही प्रकारचे संरक्षण दिलेले नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकारला अपयश आलेले असताना अशी फसवी जाहीरात काँग्रेस कशी काय करू शकते? आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याची विधवा पत्नी कलावती हिला भेटण्याचे काम स्टंटबाज राहुल गांधींनी केले होते. त्यावेळी तिच्या झोपडीत भाकरी खाण्याचे दृष्य दाखवले गेले. पण प्रत्यक्षात ती रोटी बाहेरून आणलेली होती, आधीच घराची पाहणी करून सर्व सुविधा केलेल्या होत्या हे उघड झाले. त्या कलावतीला आजपर्यंत काँग्रेसने कसलीही मदत दिलेली नाही. तीचीही फसवणूक केली गेल्याचे उघड झाले आहे. ज्या शेतकर्‍यांना, शेतमजूरांना रोजगार हमीची कामे दिली जातात त्यांची काँग्रेसने फसवणूक केलेली आहे. राहुल गांधी दुुष्काळी दौर्‍यावर आले होते तेव्हा रोजगार हमीच्या मजूरांना भेटतील  आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतील या भितीने काँग्रेसच्या नेत्यांनी सगळ्या मजूरांना एका शाळेत कोंडून ठेवले आणि त्यांच्या जागी काँग्रेस कार्यकर्त्यांना उभे केले गेले. ही शेतकर्‍यांची केलेली फसवणूक काँग्रेसच्याच राजवटीत होती. त्यामुळे फसव्या जाहीराती करून मतदारांची फसवणूक करण्याचे काम काँग्रेसकडून होत असेल तर जनता या नेत्यांना थोबाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच फसव्या जाहीराती करून जनतेची दिशाभूल करणार्‍यांवर कारवाई केली पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: