सर्व आघाड्यांवर सध्याचे काँग्रेस सरकार हे अपयशी ठरलेले आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त करण्याची आणि पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुका घेउन जनहिताचे सरकार स्थापण्याची गरज निर्माण झाली आहे. 2004 साली सत्तेवर आल्यापासून काँग्रेस सरकारने आपली निष्क्रियताच पणाला लावली आहे. 2009 ला दुसर्यांदा काँग्रेस आघाडी निवडून आली तेव्हा त्यांची ही निष्क्रियता अधिकच वाढत गेली. कोणतीही गोष्ट आमच्या हातात नाही असे सांगून हात झटकून द्यायचे एवढेच काम काँग्रेस करताना दिसत आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग म्हणतात महागाई आटोक्यात आणणं आमच्या हातात नाही. काँग्रेसचे युवराज म्हणतात दहशतवाद रोखणं आमच्या हातात नाही. हेच युवराज म्हणतात भ्रष्टाचार रोखणं आमच्या हातात नाही. म्हणजे काँग्रेसचे आणि सरकारचे उच्चपदस्थ लोक सरळ सरळ म्हणतात की आमच्या हातात काहीच नाही याचा अर्थ सरकारची या देशाला गरज राहिलेली नाही. सरकार काहीही करू शकत नाही. सरकार नामक यंत्रणा कशी चालवायची असते याचे ज्ञान आणि भान राज्यकर्त्यांना राहिलेले नाही. अशा निष्क्रिय सरकारला खाली खेचण्यासाठी आता जनतेने पुढे आले पाहिजे. सतत वस्तुंच्या किमती वाढत आहेत. जीवनावश्यक वस्तु खरेदी करणेसुद्धा अवघड झाले आहे. पेट्रोल आणि दुधाचे भाव सातत्याने वाढत आहेत. भाज्यांपासून धान्यापर्यंत सगळ्या वस्तु अफाट महाग होत आहेत. सोन्याचे दर वाढत आहेत. सगळ्या गोष्टी या सरकारच्या हाताबाहेर आहेत. अशा परिस्थितीत या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकारच नाही. त्यामुळे आता जनतेने रस्त्यावर उतरून सरकारच्या राजीनाम्याची, काँग्रेस हटावची मागणी करण्याची वेळ येउन ठेपली आहे. जनता रस्त्यावर उतरू शकते हे मागच्याच महिन्यात अण्णांच्या आंदोलनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे महागाई आटोक्यात आणता न येणार्या या सरकारला बाजूला करण्यासाठी जनतेने रस्त्यावर उतरले पाहिजे. ठिकठिकाणच्या काँग्रेस नेत्यांना गल्ली बोळातल्या कार्यकर्त्यांना बांगड्यांचा अहेर करून लुगडी नेसवून घरात बसवलं पाहिजे. ज्यांचे कोणत्याही गोष्टीवर नियंत्रण नाही त्यांना सत्तेवर राहण्याचा कसलाही अधिकार नाही. सरकारच्या प्रत्येक गोष्ट हातात असली पाहिजे. सरकार हे जनहित आणि देशहिताचे काम करणारे असले पाहिजे. पण यातील कोणाचेच हित पाहणारे हे सरकार नाही तर केवळ स्वार्थ पाहणारे, स्वार्थ जपणारे हे सरकार आहे. या सरकारला हटवणे हाच यावर उपाय आहे. महागाई नियंत्रणात आणता येत नाही हे सांगणे म्हणजे सरकारच्या हतबलतेचे लक्षण आहे. असे हतबल आणि कमजोर सरकार काही कामाचे नसते. या सरकारला फक्त भ्रष्टाचार करता येतो. त्यामुळे अँटीकाँग्रेस भूमिका या देशात घेउन काँग्रेसच या सर्व संकटांचे, समस्यांचे कारण आहे हे लक्षात घेउन काँग्रेसला हाकलण्यासाठी सर्वांनी एक झाले पाहिजे. एकीकडून आमचा शेतकरी वर्ग या काँग्रेसने मारायचे ठरवले आहे. शेतकर्यांना विविध प्रकल्प गावागावात राबवून त्यांच्या जमिनी काढून त्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचे षडयंत्र हे सरकार रचत आहे. तर दुसरीकडे सर्वसामान्य माणसाला महागाईने मारून टाकायचे काम चालवले आहे. शेतमालाच्या किमती प्रचंड वाढत आहेत पण शेतकर्याच्या हातात मात्र काहीच येत नाही. अन्नधान्यांच्या किमती वाढल्या तरी त्याचा फायदा हा दलालांना मिळतो आहे. त्यामुळे सध्या या देशावर दलालांचे राज्य आहे असे चित्र आहे. सोन्याच्या किमती आजच का वाढत आहेत याचा विचार केला पाहिजे. सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 28 हजारांपेक्षा जास्त झाला आहे. तो 30 हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामागचे कारण नक्की काय आहे हे समजले पाहिजे. सोन्याची मागणी वाढली, किमती वाढल्या याचा अर्थ असा आहे की पैसा कोठे गुंतवणूक करायचा आहे याची शाश्वती वाटेनाशी झालेली आहे. आपला पैसा सुरक्षित गुंतवता येईल अशा कोणत्याही सुविधा सरकारने सुरक्षित ठेवलेल्या नाहीत. बँकींग धोरण चुकीचे चालले आहे. शेअर बाजारात अनिश्चितता आहे. म्युचवल फंड, विमा कंपन्यांमधील गुंतवणूक अशाश्वत आहे. एनएव्ही इतके डाउन झाले आहेत की पैसा गुंतवला तर त्यावर व्याज किती मिळेल, डिव्हीडंड काय मिळेल याची खात्री नाही. त्यामुळे सोन्याची खरेदी वाढली. सोन्याची किंमत वाढली याचा अर्थच सरकारची किंमत कमी झाली हे लक्षात घेतले पाहिजे. सोन्याची किंमत वाढली याचा अर्थ सरकारची विश्वासार्हता कमी झाली हे लक्षात घेतले पाहिजे. सरकारी योजना, विमासंस्था आणि गुंतवणुकीचे सरकारने दिलेले सर्व पर्याय हे कुचकामी ठरल्याचे ते लक्षण आहे. त्यामुळे सोन्याचा भाव वाढला याचा अर्थ सोनियांचा भाव कमी झाला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अशा काँग्रेसला हाकलण्यासाठी आता जनतेने रस्त्यावर उतरले पाहिजे. महागाई नियंत्रणात आणता येत नाही? मग खुर्ची खाली करा असे आव्हान सरकारला देण्याची वेळ येउन ठेपली आहे. भाज्या महाग, सिलेंडर महाग, धान्य महाग, दुध महाग अशा परिस्थितीत या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाही. कोणत्याही समस्येवर उपाय हा असतोच. उपाय नाही म्हणून हात झटकून चालत नाही. आमच्या हातात नाही म्हणून हात झटकून चालणार नाही. अशा हात झटकणार्या सरकारला हाटवण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. वस्तुच्या किमती गगनाला भिडत आहेत पण त्या किमती मूळ उत्पादकाला मिळत नसतील तर त्याची क्रयशक्ती कशी वाढणार? आज आमचा शेतकरी उत्पादक आहे पण त्या उत्पादनापासून त्याची क्रयशक्ती वाढत नाही कारण त्याच्या हातात पैसा येत नाही. हा पैसा येउ दिला जात नाही कारण शेतकर्यांच्या जमिनी सरकारला हडप करायच्या आहेत. आज उरलेला हा शेतकरी भूमिहीन होण्यापुर्वीच या सरकारला हाकलण्याची वेळ येउन ठेपली आहे. या महागाईमुळे माणसांची बचत होणे कमी झाले आहे. त्यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम होत आहे. महागाई हा एकच मुद्दा घेउन जनतेने विरोधकांनी एक होउन काँग्रेस हटावची मोहीम हातात घेतली पाहिजे. हात झटकणार्या या काँग्रेसचे हात छाटायची हीच वेळ आहे. जबाबदारी झटकणार्या काँग्रेसला हटवण्याची हीच वेळ आहे हे लक्षात घेउन काँग्रेसला चले जाव करण्यासाठी आता जनतेने सिद्ध व्हावे.(सप्टेंबर 2011)
शनिवार, १२ एप्रिल, २०१४
सोन्याचा भाव वाढला सोनियांचा उतरला
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा