काँग्रेसरूपी रावणाचा नाश करण्याचा
निर्धार करण्याचा दिवस रामनवमी
भारतीय संस्कृतीत रामायण अत्यंत महत्त्वाचे आहे. आदर्श आणि न्याय राज्यव्यवस्थेसाठी रामायणातील रामराज्य अत्यंत महत्त्वाचे आहे. या देशात रामराज्य यावे असे प्रत्येकाला वाटते. आजही या देशात रामराज्य यावे असे वाटण्याचे कारण आज रामराज्य नाही म्हणून तसे वाटते आहे. कारण राम हा एक विचार होता. या विचारानेच राज्य करून हे राष्ट्र बलवान होईल याचा प्रत्येकाला विश्वास आहे. आजचा दिवस रामनवमीचा. तो आपण साजरा करतो कारण राम पुन्हा जन्माला यावा म्हणून. आजही या देशाला रामाच्या विचारांची गरज आहे कारण, प्राण जाय पर वचन न जाय अशा विचाराने हे रघुवंशी या देशाचे रक्षण करत होते.राम हा सगळ्या देशभक्तांनी, देशाचे हीत चिंतणार्या लोकांनी मिळून घडवलेला एक अविष्कार होता. तो केवळ दशरथपुत्र नव्हता. तो केवळ कौसल्येचा नव्हता. तो सर्वसमावेशक आणि सर्व जनतेचा होता. असे एकत्रित बळ त्याला देवून तो घडवला गेला होता. कारण सर्वत्र रावणाचे राज्य होते. रावणाची दहशत होती. रावण म्हणजे पौलत्स्य वधासाठी केलेली निर्मिती म्हणजे राम. तत्कालीन अशा वसिष्ठ, विश्वामित्र, ऋष्यशृंग, अत्री, अग्नी असे असंख्य ऋषी मुनी, दशरथ, जनक, दाक्ष असे अनेक राजे, कौसल्या, कैकयी आदी महाराण्या यांच्या संयुक्त प्रयत्नांनी राम घडवला होता. कारण रावणाची दहशत आणि ताकद एवढी मोठी होती की भारतातील कोणताही एक राजा रावणाचा बंदोबस्त करू शकत नव्हता. रावणाचा बंदोबस्त करण्यासाठी एखादी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच उभी करणे आवश्यक आहे असा विचार त्यावेळी मांडण्याचे काम ऋषी मुनींनी केले. अनेक मित्रपक्ष जोडून रावणवधासाठी एक आघाडी निर्माण करण्याचे काम ऋषिमुनींनी केले होते. जसे आज या देशावर काँग्रेसचे संकट आहे, तसेच संकट तेव्हा रावणाचे होते. रावण दहातोंडी होता. आजही काँग्रेसची अशीच दहा तोंडे आहेत. महागाई, भ्रष्टाचार, अत्याचार, बेरोजगारी, शेतकर्यांच्या आत्महत्या, घोटाळेबाज, चारित्र्यहीन नेते, महिलांची सुरक्षा, व्यसनाधिनतेला प्रोत्साहन देणे, गुन्हेगारी ही काँग्रेसच्या दहा तोंडाची ओळख आहे. ही दहा तोंडे फोडून त्याचे पोट फोडून त्याला संपविणे हे फार मोठे आव्हान होते. जसे आज काँग्रेसचे एकापेक्षा एक भयानक असे चेहरे आहेत. तसेच स्वरूप तेव्हा रावणाचे होते. त्यामुळे रावणाला संपविण्यासाठी रामाकडे एकमुखाने नेतृत्त्व दिले गेले. ज्यांनी रामाच्या नेतृत्त्वाला विरोध केला असे यामध्ये संपुष्टात आले. आज ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींकडे काँग्रेस संपविण्यासाठी नेतृत्त्व दिले गेले आहे तसेच तेव्हा रामाकडे दिले गेले होते. म्हणून राम विचार हा रामनवमीच्या दिवशी समजून घेणे आवश्यक आहे.
रामापूर्वीही अनेक शकती रावणावर मात करू शकतील अशा होत्या. पण रावणाने कौशल्याने त्यांना आपलेसे केले. रावणाला मारू शकेल असा एक राजा या देशात होता. तो म्हणजे सहस्त्रार्जून. या सहस्त्रार्जूनाने रावणाला पकडून आणून बंदी केला होता. परंतु रावणाचे वडील पुलत्स्य हे सहस्त्रार्जूनाचे पुरोहीत होते. त्यांनी भिक्षा महणून रावणाला मागितले. दिलेले दान कोणताही क्षत्रिय परत घेवू शकत नाही. त्यामुळे सहस्त्रार्जूनापासून रावणाला अभय मिळाले.
दुसरा राजा होता तो वनपाल. वननरांचा महणजे वानरांचा राजा वाली. हा महाशकतीमान होता. त्याने रावणाला पकडून आणून आपला मुलगा अंगद याच्या पाळण्यावर बाहुला महणून खेळण्यासाठी बांधला होता. पण कालांतराने रावणाने गोड बोलून वालीशी संधी करार केला. तुझ्या सीमांचे रक्षण माझे सैन्य करेल, तुझा सैन्यावरचा खर्च वाचेल, तुझे राज्य सदैव सुरक्षित राहील असे सांगून संधीकरार केला. सीमेवरच्या सुरक्षेची चिंता मिटल्यामुळे वाली व्यसनाधीन झाला आणि सीमा रक्षणाची जबाबदारी रावणाकडे दिली. रावणाकडे सीमेच्या आता वालीला ठेवल्यामुळे तो बंदीवान झाला. वाली फसला. त्यामुळे रावणाचा बंदोबस्त करू शकेल अशी नवी ताकद निर्माण करणे अत्यंत आवश्यक होते. त्यासाठी विविध राजे, महाराजे, ऋषि-मुनी यांनी एकत्रित येवून स्वतंत्र आघाडी निर्माण केली आणि रावणवधाचा इतिहास रचला. याच्या नियोजनाप्रमाणे रामाचा जन्म होण्याचा हा दिवस म्हणजे राम नवमी.
आज या देशावर काँग्रसचे संकट आहे. काँग्रेसची दहशत आहे. या काँग्रेसच्या संकटापासून सोडविणारे विचार या देशात येवून गेले. पण ते काँग्रेसने कपटाने खोडून काढले. सोनिया गांधी- राहुल गांधी या विचारापासून देशाला वाचविण्यासाठी चौदा वर्षांपूर्वी शरद पवारांनी काँग्रेसविरोधी भूमिका घेतली होती. ती भूमिका शरद पवारांनी कायम ठेवली असती तर आज जी जागा नरेंद्र मोदींची आहे ती जागा त्यांना मिळाली असती. पण ज्याप्रमाणे पुलत्सांनी सहस्त्रार्जूनाला फसवले, त्याप्रमाणे काँग्रेसच्या जुन्या नेत्यांनी शरद पवारांना काँग्रेसमध्ये येणे भाग पाडले. काँग्रेसच्या आघाडीसोबत गेल्यामुळे शरद पवार हे सतत टिकेचे लक्ष होत गेले. काँग्रेसच्या पापाचे पातक हे शरद पवारांच्या माथ्यावर फोडले जावू लागले.
त्यामुळे आता काँग्रेसचा नाश करण्यासाठी नरेंद्र मोदी हा पर्याय आपल्यापुढे उभा आहे. सर्व देशाने त्यांच्या पाठीशी उभे राहून या देशाचे रक्षण करण्याची हीच वेळ आहे. कौसल्येच्या मोहपाशातून, राज्याच्या मोहपाशातून रामाला बाहेर काढून रावणवधाच्या कर्तव्यासाठी त्याला प्रवृत्त करण्यासाठी कैकयीसारखी कठोर भूमिका घेण्याची हीच वेळ आहे. कैकयीने स्वार्थासाठी रामाला वनवासात धाडला हा विचार खोडून टाकला पाहिजे. कारण तिचे जेवढे भरतावर प्रेम होते त्यापेक्षा काकणभर जास्तच प्रेम रामावर होते. पण आपल्यावर टिका होईल याची तमा न बाळगता तीने ते कठोर कृत्य केले महणून राम वनवासात गेला. रामालाही त्याची जाणिव होती त्यामुळे त्याचा कैकयीवर कधीच राग नवहता. राम येईपर्यंत भरताने एका विश्वस्ताप्रमाणे रामाचे राज्य सांभाळले होते. कारण राम देशकार्यासाठी चालला होता.
आज सोनिया गांधींनी इथली युवापिढी व्यसनाधीनतेत गुंतवली आहे. डान्सबारची संस्कृती या देशावर लादली आहे. या डान्सबारला विरोध करून निरोगी आणि कर्तव्यदक्ष पिढी तयार करण्याच्या शेतकरी कामगार पक्षाचे आमदार विवेक पाटील यांच्या भूमिकेला विरोध केेलेला आहे. सोनिया काँग्रेसने गावागावात दारूची दुकाने, बिअरशॉपी पोहोचवल्या आहेत. शहरात डान्सबार, लेडीज बार सुरू केले आहेत. त्यावर बंदी आणली तरी न्यायालयात जावून काँग्रेसने ती बंदी उठवली. आज आपल्या मुलाबाळांचे भवितव्य डान्सबारमध्ये आणि दारूच्या प्याल्यात नष्ट व्हावे असे आपणास वाटते काय? आपली मुलं तशीच सर्वांची मुलं. आपला मुलगा व्यसनी होवू नये आपणास वाटते तसेच या देशातील तरूण व्यसनमुक्त झाला पाहिजे हा विचार केला पाहिजे. मग त्यासाठी काँग्रेसची ही सोनिया गांधींची डान्सबार संस्कृती संपुष्टात आणली पाहिजे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर सर्वांनी जाण्याची हीच वेळ आहे. काँग्रेसच्या या दहातोंडी रावणाचा नाश करण्यासाठी काँग्रेसविरोधी मतदान केले पाहिजे. हाच रामनवमीचा निर्धार असला पाहिजे. राम नवमी हा सुट्टी साजरा करण्याचा दिवस नाही. तर या देशात रामराज्य यावे याचा संकल्प दिन आहे.
रावणाची आई कर्कशा, केकसा किंवा कैकया नावाने ओळखली जाते. तिचा विचार होता की सगळीकडे असूरशक्तीचा धाक असला पाहिजे. राक्षसी प्रवृत्ती सगळीकडे संचारली पाहिजे. तिच्या आज्ञेने साक्षात शिवशंकरालाही हिमालयातून आपल्याकडे घेवून जाण्यासाठी रावणाने भोळ्या शंकराला आपल्या भकतीने वश केले होते. देवगणांनी ते कारस्थान गणपतीच्या मदतीने उधळून लावले. आता रावणाच्या आईप्रमाणेच सोनिया गांधी राहुल गांधी नामक पुत्राला काँग्रेसचा प्रचार करण्याचे सांगत आहेत. त्या राहुल गांधींना रोखणे हे आज आपले कर्तव्य आहे.
2014 च्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात होतानाच नरेंद्र मोदींनी दक्षिणेकडे यशस्वी मोहीम सुरू केलेली आहे. चंद्राबाबू नायडू यांच्यासारखा मित्र मिळवला आहे. रामाची आणि सुग्रिवाची जशी मैत्री जमली तशीच ही मैत्री काँग्रेसरूपी रावणाचा नाश करण्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे आता लक्ष एकच ते म्हणजे काँग्रेसरूपी रावणाच्या विचारांचा नाश करून या देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आणले पाहिजे. त्याचा निर्धार आणि निश्चय करण्याचा हा दिवस आहे.
आज गल्ली ते दिल्ली या देशात राम नाम जपना पराया माल अपना अशी संस्कृती काँग्रेसने चालवली आहे. रामाचे नाव लावून हरामखोरी करणारे काँग्रेसचे नेते रायगडात आहेत. अशा रावणाच्या वंशजांना धडा शिकवण्यासाठी अंतुलेंसारखे बिभिषण आपल्या पाठीशी आहेत याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे आजच्या रामनवमीचा हाच विचार आहे की या देशात रामराज्य आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा हा दिवस आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा