राहुल गांधींचे देशविघातक विचार
राहुल गांधींचे देशविघातक विचार
- काँग्रेसचे भंपक युवराज देशात गुजरात मॉडेल नव्हे तर बिहार मॉडेलची गरज असल्याचे वक्तव्य करत आहेत. यावरून काँग्रेसची प्रवृत्ती किती गुंडगिरीची, भ्रष्टाचाराची आहे याचीच ही कबूली आहे. काँग्रेसचा खरा चेहराच उघड करण्याचे काम राहुल गांधींनी केलेले आहे. यावरूनच राहुल गांधींच्या अकलेचे दर्शन होताना दिसते. काँग्रेसचे सगळे नेते आपण केलेली पापे झाकायचा प्रयत्न करत आहेत तर हे युवराज काँग्रेस नेत्यांनाच नागवण्याचा आणि त्यांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करीत आहेत हे यातून दिसत आहे.
- या देशात बिहार मॉडेलची अपेक्षा करणे म्हणजे देशात यादवी माजवणे, अंदाधुंदी माजवणे, भ्रष्टाचार माजवण्याची अपेक्षा आहे. ज्या गुजरातला नरेंद्र मोदींनी उंचीवर नेऊन ठेवले, ज्या बिहारला नितिशकुमार यांनी एका विशिष्ठ उंचीवर नेऊन ठेवले त्या दोनही सक्षम अशा मोदी आणि नितिशकुमार यांच्यावर टिका करून राहुल गांधींनी आपण किती देशद्रोही आहोत, दहशतवाद्यांचे पाठिराखे आहोत हेच सिद्ध केलेले आहे. त्यामुळे या देशातून काँग्रेसला हटवले नाही तर देशात इथून पुढे अनागोंदी, अनाचार माजेल हे निश्चित झालेले आहे.
- या देशातील 1980 नंतरचा नरक अशी ज्याची अवस्था आहे ते राज्य म्हणजे बिहार. या बिहारमध्ये काँग्रेसच्या राजवटीत, लालूप्रसाद यादव यांच्या राजवटीत कायदा आणि सुव्यवस्था कधीही अस्तित्वात नव्हता. दिवसाढवळ्या खून पडायचे. चोरी,लूटमार, भ्रष्टाचार याशिवाय या बिहारमध्ये काहीच नव्हते. त्यामुळे बिहारमधील तरूण देशात सर्वत्र रोजगारासाठी बाहेर पडताना दिसत होता. बिहारमधून लोंढेच्या लोंढे महाराष्ट्राच्या दिशेने, मुंबईच्या दिशेने येत होते. आजही येत आहेत. पण गेल्या काही वर्षात म्हणजे भाजप आणि संयुक्त जनता दलाची सत्ता आल्यापासून येथून लोंढे बाहेर जाण्याचे प्रमाण कमी झाले होते. दुर्दैवाने नितिशकुमार यांनी भाजपची साथ सोडून आत्मघात करून घेतला. पण चांगल्या लोकांना नावे ठेवून हे महामूर्ख राहुल गांधी मोदी-नितिशकुमारांचे राज्य नको, त्यांच्यासारखा विकास नको तर लालू यादव सारखा भ्रष्टाचार या देशात असला पाहिजे, तोच पॅटर्न असला पाहिजे असे म्हणतात, यासारखे यादेशाचे दुर्दैव ते काय? आज काँग्रेसला कोणी जवळ करत नसताना त्यांना लालू यादव यांचाच आधार आहे. भ्रष्टाचारामुळे तुरुंगवास भोगत असलेले आणि निवडणुकीपुरते बाहेर आलेले लालूप्रसाद यादव हे राहुल गांधींचे आदर्श असतील तर या राहुल गांधींचे पार्सल इथल्या जनतेने इटलीत फेकले पाहिजे. या देशात कायद्याचे राज्य येण्याची गरज असताना राहुल गांधी अराजकता आणण्याचे बोलत असतील तर या राहुल गांधींचा सर्वस्तरावर निषेध व्हायला पाहिजे.
- या राहुल गांधींना बिहारचे प्रेम नेहमीच वाटत आलेले आहे. अर्थात बिहारमधून त्यांना तेवढेच हद्दपार केले जाते हा भाग वेगळा. बिहार विधानसभा निवडणुकीत हे महाशय बरळले होते की, महाराष्ट्राचा विकास, मुंबईचा विकास हा बिहारी लोकांनी केलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रात पन्नास वर्ष काँग्रेसचे नेते राज्य करत आहेत त्यांना काहीच अक्कल नव्हती असे म्हणून महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना निष्क्रिय ठरविण्याचे काम राहुल गांधींनी केले होते. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, वसंतराव नाईक, शरद पवार , विलासराव देशमख यांच्यासारखे दिग्गज नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून या राज्यात होवून गेले. त्यांना नालायक ठरविण्याचे काम या राहुल गांधींनी केलेले आहे. देशभरात बिहार पॅटर्न आणण्यासाठीच त्यांनी आदर्श भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिलेली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पण मराठी जनतेने काही झाले तरी महाराष्ट्राचा बिहार करण्याचे राहुल गांधींचे स्वप्न पूर्ण होवू देता कामा नये. राहुल गांधी ही एक वाईट प्रवृत्ती या देशात संचारते आहे. या प्रवृत्तीचा जाहीर निषेध केला पाहिजे. कारण या देशात बिहार पॅटर्न राबवण्याचे स्वप्न ते पहात आहेत. या देशात दहशत निर्माण करण्याचा सल्ला ते देत आहेत. हे देशाचे दृष्टीने अत्यंत घातक आहे.
- उत्तर प्रदेशातील दहशतवादी की जो नरेंद्र मोदींची खांडोळी करण्याची भाषा करतो, त्याला तुरुंगात जावे लागल्यामुळे राहुल गांधींचे डोके फिरले आहे. आता बिहारमध्ये कोणी गुंड, दहशतवादी मिळतात का ते पाहायला हे महाशय तिथे जातात आणि देशात बिहार पॅटर्नची गरज असल्याचे वक्तव्य करतात. पंतप्रधानपदाचे काँग्रेसचे उमेदवार म्हणून काँग्रेसने त्यांना पुढे केलेले आहे. अशा नेत्यांपासून देशाला किती धोका आहे हे यातून दिसून येते.
- आज बिहारी गेली अनेक दशके स्थलांतर करत आहेत. त्यांना कोणताही रोजगार नसल्यामुळे महाराष्ट्रात येवून ते जगत आहेत. इथे ते मोठे होत आहेत. त्यांचे राहणीमान सुधारत आहे. इथून पैसा कमवून जातात आणि गावाकडे पाठवतात. कारण त्यांना त्यांच्या गावात, राज्यात कुठेही रोजगार मिळत नाही. अशी परिस्थिती देशभर निर्माण झाली पाहिजे हे राहुल गांधींचे वक्तव्य म्हणजे इथल्या तरूणांना देशोधडीला लावण्याचे स्वप्न आहे. इथल्या तरूणांनी राहुल गांधींच्या या विधानाचा निषेध करून त्यांना साफ नाकारले पाहिजे. या देशात बिहारप्रमाणे बेरोजगारी वाढली पाहिजे, देशातील तरूण रोजगारासाठी वणवण हिंडले पाहिजेत. त्यांची कुटुंबापासून ताटातूट करण्याची इच्छा राहुल गांधींची आहे. माणसाला दु:खी करण्याचा हा बिहार फॉर्म्युला इथला मतदार कदापिही या देशात येवू देणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
- बिहारमध्ये कोणता आदर्श राहुल गांधींना दिसला? महाराष्ट्रात बिहारी लोकांनी काय केले? राहुल गांधी आणि त्यांचे लुच्चे,लाचार, लोचट हुजरे याचे उत्तर देतील काय? बिहारची भ्रष्ट संस्कृती या देशात येण्यासाठीच महाराष्ट्रीतील नेत्यांना काँग्रेसने तिकीटे दिली आहेत काय? विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्राचा बिहार करण्याचे स्वप्न राहुल गांधी यांचे असणार आहे काय? या सगळ्याची उत्तरे मिळाली पाहिजेत.
- बिहारमध्ये रस्ते नाहीत, कसल्या सुविधा नाहीत. रोजगार नाही, कायदा सुव्यवस्था नाही. एखाद्याची गाडी पार्क केलेली असेल तर ती जागेवर राहील याची खात्री नसते. लालूप्रसाद यादव यांनी आपल्या प्रचारासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी वर्हाडींना नेण्यासाठी शोरूममधल्या गाड्या बाहेर काढल्या होत्या. ही फार मोठी दहशत होती. अशी दहशत राहुल गांधींना या देशात हवी आहे काय? यासाठीच पाकीस्तानी, तालिबानी, तमिळी दहशतवाद्यांना ते पाठिशी घालत आहेत काय? आपल्या वडिलांचा खून करणार्यांना फाशी होवू नये यासाठी प्रयत्न करण्यामागचा राहुल गांधी यांचा हाच हेतु आहे काय? या देशात खून पडावेत, अत्याचार व्हावेत, महिला असुरक्षित रहाव्यात यासाठीच देशात बिहार पॅटर्न राहुल गांधींना हवा आहे काय?
- समलिंगी संबंधांचे समर्थनही राहुल गांधींनी, सोनिया गांधींनी केले होते. सध्या देशात सर्वात जास्त समलिंगी संबंध बिहारमध्ये आहेत. हीच संस्कृती भारतात राहुल गांधीना आणायची आहे काय? त्यासाठीच राहुल गांधींनी लग्न केलेले नाही काय? याचे स्पष्टीकरण त्यांच्या नेत्यांनी दिले पाहिजे.
- एकंदरीत राहुल गांधींचे विचार या देशाला अत्यंत घातक असे आहेत. बुथकॅप्चरींग, निवडणुकीतील हिंसाचार, दहशत ही बिहारची संस्कृती आहे. बिहारमधील राजकीय गुंडगिरीचे वातावरण अनेक हिंदी चित्रपटातून आलेले आहे. प्रकाश झा याने काढलेला गंगाजलसारखा चित्रपट, एन चंद्राचा प्रतिघात हा चित्रपट बिहारी संस्कृतीचे दर्शन घडविणारे चित्रपट आहेत. हीच संस्कृती हा या देशाचा पॅटर्न बनविण्याचे राहुल गांधींचे स्वप्न कदापिही पूर्ण होवू देता कामा नये. देशाच्या दृष्टीने ते घातक आहे. त्यासाठी राहुल गांधींनाच आता देशविघातक शक्ती म्हणून जाहीर करण्याची वेळ आलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा