सोमवार, १४ एप्रिल, २०१४

दुबळ्या नेतृत्वाचा परिणाम

अनवर अल अवलाकी या ओसामा बिन लादेनच्या उत्तराधिकार्‍याने लंडनमध्ये आणि भारतात दहशतवादी हल्ले घडवण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेने ओसामा बिन लादेनला ठार केल्यानंतर त्याचे सहकारी पेटून उठणार हे निश्‍चितच आहे. पाकीस्तानने या सर्वांना आपल्या देशात स्थान देउन सर्व जगाला विशेषत: भारताला त्रास देण्याचे धोरण आखले आहे. पाकीस्तानचा दहशतवाद या देशात चालतो याला कारण या देशात पाकीस्तानचे फाजिल लाड करणारा काँग्रेस सारखा पक्ष आहे. भांडवलदार प्रवृत्तीने अमेरिका आणि पाकीस्तान यांचा लाभ कसा होईल हे लक्षात घेताना काँग्रेस सरकार भारताच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करते आहे हा खर्‍या अर्थाने काँग्रेस पक्षाचा देशद्रोह म्हणावा लागेल. नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांनी देशवासियांच्या भावना दुखावणार्‍या काँग्रेसच्या दिग्वीजयसिंगानेही पाकीस्तान आणि लादेनचीच बाजू घेतली आणि सोनिया गांधींनी त्याबद्दल किंचीतही खंत वाटून घेतली नाही यातच काँग्रेसची प्रवृत्ती दिसून आली आहे. केवळ सत्तेसाठी, मतांच्या राजकारणारणासाठी देशद्रोह्यांना चुचकारणारा काँग्रेस हा पहिला या देशाचा शत्रू आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अमेरिकेने लादेनला ठार मारून भारताला नुकसान पोहोचवण्याचा विडा उचलला आहे. त्याला काँग्रेस सरकार मदत करते आहे. कुठे गेली एकेकाळची काँग्रेस की ज्या काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांनी भारत पाकीस्तानच्या युद्धात, बांग्लादेशच्या निर्मितीवेळी अमेरिकेचीही गय केली नव्हती. अमेरिकेचा दबाव इंदिरा गांधींनी झिडकारला होता. त्याच काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचा काँग्रेस पक्ष या देशाचे अहित करायला टपला आहे. अर्थात त्यांना भारताबद्दल प्रेम वाटायचे काहीही कारण नाही. पण त्यांच्या पदराखाली लाचार झालेल्या काँग्रेसने हे नवे संकट भारतावर लादण्याचा प्रकार जो आहे तो अत्यंत हिन आहे. लादेनला मारून अमेरिकेने आपली जखम भरून काढली तर दुसरीकडे झालेल्या जखमेमुळे घायाळ होणार आहेत ते भारतासारखे देश. या देशाची परिस्थिती बदलण्यासाठी, सुरक्षित सरकार येण्यासाठी काँग्रेसला हद्दपार करण्याशिवाय आता कोणताही पर्याय या देशाला उरलेला नाही. अर्धी ताकद भारताची दहशतवादाशी सामना करण्यात जाते आणि अर्धी ताकद या देशाची भ्रष्टाचाराशी सामना करण्यात जात आहे. कधी भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढते तर कधी दहशतवादाचे. दहशतवादाला प्रोत्साहन देणारीही काँग्रेसच आणि भ्रष्टाचारामध्ये  सहभाग असणारीही काँग्रेसच. दहशतवाद्यांना पाठीशी घालण्यासाठी भ्रष्टाचाराचे भूत उभे करायचे. यामुळे संपूर्ण देश या काँग्रेसने नासवला आहे. त्याचा फायदा पाकीस्तान घेते आहे. आज पाकीस्तानने जी पावले उचलली आहेत ती फक्त भारताला त्रास देण्याचीच उचलली आहेत. अमेरिकेशी फाजील  जवळीक करणार्‍या काँग्रेस सरकारने अमेरिकेप्रमाणे आपल्या देशाचे वर्चस्व राहावे यासाठी मात्र प्रयत्न केले नाहीत. पाकीस्तानात अतिरेकी आहेत की जे भारतात दहशत माजवतात याचे पुरावे असुनही भारत गप्प बसतो यात काँग्रेसचे जे लांगुलचालनाचे धोरण आहे त्यामुळे आज या देशाला कायम दहशतीच्या सावटाखाली वावरावे लागत आहे. अफझल गुरूने या देशाच्या लोकशाहीच्या मंदीरावर हल्ला केला. त्यात अनेक निरपराध लोक मृत्यूमुखी पडले. न्यायालयाने त्या अफझल गुरूला फाशीची शिक्षा ठोठावूनही काँग्रेस सरकार त्याला गेली सात वर्षे पाठिशी घालत आहे. एकीकडे अमेरिका आपल्या शत्रूला ठार मारण्यासाठी सर्व शक्तीला पणाला लावते आणि दुसरीकडे भारत त्याच प्रकारच्या शत्रूंचे लाड करते. यामुळे या देशाचा खरा शत्रू हा पाकीस्तान नसून काँग्रेसच आहे हे सिद्ध होते आहे. जर दुबळे नेतृत्व या देशाला लाभले नसते तर अल कैदाची काय हिम्मत झाली असती या देशाकडे वाईट नजरेने पाहण्याची?( 6 मे 2011)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: