शनिवार, १२ एप्रिल, २०१४

दिल्लीतील बाँम्बस्फोट का झाला?

  दिल्ली हायकोर्टाबाहेर बुधवारी सकाळी बाँम्बस्फोट झाला. हा बाँम्बस्फोट कोणत्याही दहशतवादी संघटनेने केला आहे याचा पुरावा लगेच उपलब्ध झालेला नाही. मात्र, दिल्लीतच यावेळी का झाला याचा विचार करावा लागेल. तसे दिल्लीत यापुर्वी अनेकवेळा हल्ले झालेले आहेत. पण वारंवार होणार्‍या स्फोटांमुळे एका नव्या संशयाला वाव मिळाला आहे. तो म्हणजे या स्फोटामागे काही राजकीय कारण आहे काय? आपल्याकडे जेव्हा भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात वाढीस लागतो. त्या विरोधात जेव्हा जनमत तयार होते त्याचवेळी नेमके बाँम्बस्फोट का होतात याचा तपास करावा लागेल. त्यामुळे या स्फोटांमागे काँग्रेसने पाळलेल्या काही गुंडांचा, दहशतवाद्यांचा सहभाग आहे काय याचा विचार करावा लागेल. सरकार ज्या ज्या वेळी भ्रष्ट कारभाराने बरबटते तेव्हा असा दहशतवादी हल्ला आपल्या देशात होत असतो. त्यामुळे आता या तपासामागे नवी यंत्रणा लावून त्याचा शोध घ्यावा लागेल. काँग्रेसचेच कोणी लोक खलनायकाची भूमिका बजावत आहेत काय याचा तपास करावा लागेेल. गेल्या महिन्यात अण्णा हजारेंनी केलेल्या उपोषणामुळे सरकारचे खरे स्वरूप उघड झाले आहे. भ्रष्टाचार लपवण्यासाठी काँग्रेसला सहानुभूतीची लाटच आणायला लागते. त्याप्रमाणे काँग्रेस विरोधात जनमत झाल्यावरच हे बाँम्बस्फोट झालेले आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. दिल्लीत अण्णांनी उपोषण केले होते. त्यामुळे संपूर्ण जगात अण्णा हजारे हे एकाएकी हिरो झाले होते. काँग्रेसचा माणूस म्हणजे भ्रष्टाचारी माणूस अशीच ख्याती सर्वात जास्त झाली होती. त्यात सोनिया गांधींच्या आजारपणाचे फारसे मार्केटींग करता आले नाही. सोनिया गांधींच्या आजाराचे भांडवल आणि सहानुभूती काँग्रेसला मिळवता आली नाही. अण्णांच्या मागे उभ्या असलेल्या लोकशक्तीच्या पाठींब्यापुढे सोनिया गांधींचे आजारपण सगळेजण विसरून गेेले. त्यामुळे काँग्रेसला काहीच सुचेनासे झाले. अण्णांचे उपोषण संपल्यावर अण्णांना बदनाम करण्याची मोहिम काँग्रेसने आपल्या प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने सुरू केली. तरीही या प्रसारमाध्यमांवर कोणीही विश्‍वास ठेवला नाही. त्यामुळे अशा एखाद्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिक्षेत काँग्रेस होतेच. त्याप्रमाणे हा स्फोट दिल्लीत झाला आहे काय याचा शोध घ्यावा लागेल. दिल्लीतच स्फोट होण्याचे कारण अण्णा हजारे यांनी दिल्लीतच उपोषण केले होते. त्यामुळे बदनाम झालेल्या काँग्रेसला दिल्लीतील अण्णांची लाट घालवण्यासाठी तिथे अशा स्फोटाची प्रतिक्षा होती. त्याप्रमाणेच हा स्फोट झाला आहे. आपल्याकडच्या स्फोटांची मालिका आणि त्याचा राजकीय संबंध जोडायचा विचार केला तर प्रत्येक खेपेला असे काही ना काही तरी घडलेले दिसून येते. 1992 मध्ये मुंबईत सर्वात मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी बाँम्बस्फोट झालेले होतेे. त्या काळात काँग्रेसचा भ्रष्टाचार हा टीपेला पोहोचलेला होता. नुकतेच हर्षद मेहताचे प्रकरण घडलेले होते. हर्षद मेहताच्या प्रकरणामुळे बँक ऑफ कराडसारखी फार मोठी बँक काँग्रेसने बुडवली. बँका बुडवणे हे तर काँग्रेसचे पहिल्यापासूनच धोरण आहे. हर्षद मेहताने नरसिंहराव यांच्यावरही एक कोटी लाच दिल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे काँग्रेस पूर्णपणे बदनाम झाली होती.  त्यानंतर डिसेंबरमध्ये बाबरी मशिदीचे प्रकरण घडले. त्यामुळे संपूर्ण देशात काँग्रेस विरोधात लाट निर्माण झाली. मशिद पाडण्याच्या बाजूने होते ते सगळे भाजप आणि मित्रपक्षांच्या बाजूने उभे राहिले. मशिद पाडण्यास विरोध करणारे होते ते काँग्रेसने मशिदीला सुरक्षा दिली नाही म्हणून काँग्रेसच्या विरोधात गेले. त्यामुळे काँग्रेसचा नैतिक पराभव जनमतात त्यावेळी झाला होता. अशा परिस्थितीत ही सगळी प्रकरणे हर्षद मेहता, शेअर मार्केट घोटाळा हा मुंबईत घडल्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी बाँम्बस्फोट झाले. त्या लाटेचा फायदा उठवण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला होता. त्यानंतर महाराष्ट्रात फार मोठा बनावट मुद्रांक घोटाळा झाला. शेकडो कोटींचे बनावट स्टँप तेलगी नामक काँग्रेस कार्यकर्त्याने राजकीय नेत्यांच्या मदतीने केला होता. 2006 मध्ये हे प्रकरण उघडकीस आले. त्या स्टँप घोटाळ्याची चौकशी करावी यासाठी अण्णा हजारेंनी मागणी केली होती. त्यात एक सुई काँग्रेस नेत्यांकडे राजकीय शक्तीकडे होती. वेगवेगळ्या चाचण्यांमध्य तेलगीने काही राजकीय नेत्यांची नावेही घेतली होती. त्यामुळे बदनाम झालेल्या सरकारला वाचण्यासाठी बाँम्बस्फोटाची गरज भासली असावी. जुलै 2006 मध्ये मुंबईच्या अनेक रेल्वेस्थानकांवर संध्याकाळी सहाच्या सुमारास स्फोट झाले होते. 11 जुलैच्या स्फोटानंतर महाराष्ट्रातील बनावट स्टँप पेपर हे प्रकरण जनता विसरून गेली. सुरेश कलमाडी यांचे राष्ट्रकूल घोटाळा प्रकरण गेल्या वर्षीपासून खूपच गाजते आहे. त्याचे नियोजन आधी दोन ते तीन वर्षे सुरू होते. या काळात राष्ट्रकूलच्या नियोजनात फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे याची कुणकूण सर्वांनाच लागली होती. पण त्याचा उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला तो गतवर्षी जून जुलैमध्ये. कारण काही महिन्यांवर स्पर्धा येउन ठेपल्या होत्या. अशा परिस्थितीत कामे अपूर्ण झाले होते. प्रचंड प्रमाणात खर्च झाला होता. रूपयाच्या ठिकाणी दहा रूपये खर्च केला होता. त्यामुळे भ्रष्टाचार करून पैसा कमावण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी काही देशांना लाच देण्याचे प्रकारही काँग्रेस नेत्यांकडून झाले होते. त्यामुळे काँग्रेसची आणि देशाची संपूर्ण जगात बदनामी झाली होती. काँग्रेस विरोधात संपूर्ण देशात चीड उत्पन्न झाली होती. या घटनेनंतर काहीच दिवसांत पुण्यात जर्मन बेकरीजवळ बाँम्बस्फोट झाले होते. राष्ट्रकूलचे भ्रष्टाचारी संयोजक हे काँग्रेसचे पुण्याचे खासदार होते. म्हणून पुण्यात स्फोट झाले. तेलगी घोटाळ्याचा संबंध मुंबई आणि महाराष्ट्राशी होता त्यामुळे मुंबईत स्फोट झाले होते. अण्णांच्या आंदोलनामुळे काँग्रेसच्या विरोधात जे जनमत तयार झाले होते ते दिल्लीत झाले होते. अण्णांची उचलबांगडी बाबा रामदेव प्रमाणे करणे काँग्रेसला जमले नाही. त्यामुळे काँग्रेसला झुकावे लागले. त्यामुळे अण्णांच्या बाजूने पर्यायाने विरोधकांना पोषक असे वातावरण देशभर तयार झाले. त्यामुळे आत्ता नेमके दिल्लीत स्फोट झाले आहेत. कोणत्या वेळी कोणत्या शहरात स्फोट करायचे हे अतिरेक्यांना दहशतवाद्यांना कसे समजते हा संशोधनाचा विषय होईल. पण दहशतवाद्यांची, अतिरेकी हल्ल्याची, बाँम्बस्फोट मालिकांची घटना ही नेहमीच काँग्रेसला अनेक प्रकरणांतून विषयांतर करायला लावून सहानुभूती निर्माण करून देणारी ठरलेली आहे. म्हणूनच एखादे वेळी हा योगायोग आहे असे म्हणता येईल. पण प्रत्येक खेपेला हा योग कसा जुळून येतो हे तपासावे लागेल. चित्रपटसृष्टी आणि गुन्हेगारी जगत जसे अनेक वर्षांपासून हातात हात घालून चाललेले दिसते तसेच गुन्हेगारी जगत आणि काँग्रेसचे राजकारण हातात हात घालून चालले आहे काय याचा तपास करावा लागेल. कोणत्याही बाँम्बस्फोटांनंतर काँग्रेसचे नेते कधी दहशतवाद्यांचा निषेध करत नाहीत. त्याबाबत काही बोलत नाहीत. बोलतात ती फक्त काँग्रेसमधील विदूषक माणसे. या देशातले हल्ले, दहशतवाद कधीच थांबणार नाही हे राहूल गांधींनी मुंबईतील 13 जुलैच्या स्फोटानंतर मत व्यक्त केले होते. पण ते वाक्य चुकीचे नव्हतेच मुळी. जोपर्यंत या देशात काँगे्रेसचे सरकार आहे तोपर्यंत या देशातील दहशतवाद कधीच संपणार नाही असाच त्याचा अर्थ आहे. खूनाला वाचा फुटते अशी आपल्याकडे म्हण आहे. त्याप्रमाणेच राहूल गांधींच्या तोंडून नकळत ते वाक्य मुंबई स्फोटानंतर बाहेर पडले असावे. पण प्रत्येक दहशतवादी हल्ल्याशी काँग्रेसचा कुठेतरी संबंध आहे हे मात्र राहून राहून वाटते. राजीव गांधींच्या मारेकर्‍यांची फाशी स्थगित केली जाते. एकाची फाशी रद्द व्हावी म्हणून राजीव गांधींच्या पत्नी सोनिया गांधी सरकारला विनंती करतात. त्या खूनातील आरोपी असलेल्या नलीनीची भेट घेण्यासाठी प्रियांका गांधी जातात. या गोष्टींचा कुठेतरी दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचा संबंध असावा असेच वाटते. कोणीही माणूस आपल्या नवर्‍याचा खून करणार्‍याला माफ करा असे म्हणू शकणार नाही. त्या व्यक्तीने कोणाच्या तरी सांगण्यावरून हे कृत्य केले असेल तरच त्याला माफ करा असे म्हणता येईल. त्यामुळे सततचे बाँम्बस्फोट आणि काँग्रेसची त्यामागची भूमिका एकदा तपासून पाहण्याची गरज आहे. जनतेने खरे दहशतवादी कोण आहेत ते ओळखण्यास शिकले पाहिजे.
सप्टेंबर 2011

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: