शनिवार, २६ एप्रिल, २०१४

महाराष्ट्रात मतदार दाखवणार काँग्रेसला कात्रजचा घाट

  • महाराष्ट्रातील निवडणुकीचा मतदानाचा संपूर्ण कार्यक्रम पार पडला आहे. आता प्रत्येकाला ओढ असणार आहे ती 16 मे या दिवसाची. सोळाव्या लोकसभेच्या निकालाचा हा दिवस कधी उगवतो आहे याकडे ज्याचे त्याचे लक्ष लागलेले आहे. देशभरात असलेल्या काँग्रेसविरोधी संताप आणि नरेंद्र मोदी समर्थनाची लाट यांच्यातील या निवडणुकीत मतदार आणि प्रसारमाध्यमांची फार मोठी भूमिका राहिलेली आहे.
  • महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 35 पेक्षा जास्त जागा विरोधकांना मिळून त्या जागांवर शिवसेना-भाजप महायुती, शेतकरी कामगार पक्ष, मनसे यांची निवड झालेली असणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला दहापेक्षा कमी जागांवर रोखण्याचे आव्हान या निवडणुकीत आहे. 
  • खरं तर महाराष्ट्रात 2009 मध्येच परिवर्तनाची लाट होती. परंतु अपघातानं काँग्रेस राष्ट्रवादीला त्याचा फायदा होत गेला. मतविभाजनाचा फायदा मिळवून महाराष्ट्रात 10 जागा काँग्रेस राषट्रवादीला मिळालया. महाराष्ट्रात सेना भाजपचे उमेदवार फार कमी फरकाने पराभूत झालेले होते. किरीट सोमयया तर अवघया 1200 मतांनी पराभूत झाले होते. महाराषट्र नवनिर्माण सेनेचे अनेक उमेदवारांनी राजन राजे, श्‍वेता परूळेकर,दरेकर अशांनी एक एक लाखांपेक्षा जासत मते मिळवली होती. पुण्यातही कलमाडी फार फरकाने निवडून आलेले नवहते. त्यामुळे विरोधी मतविभागणीचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला झाला होता. तो याखेपेला होणार नाही अशी अपेक्षा होती.
  • परंतु याखेपेला विरोधकांची मते विभाजीत करण्यासाठी काँग्रेसने आम आदमी पार्टीचया लोकांना उभे केले आहे. आम आदमी पार्टी ही काँग्रेसच्या पैशावरच, सहकार्यावरच उभी राहिलेली पार्टी आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात विरोधकांची मते खाण्यासाठी आपचे उमेेदवार काँग्रसने उभे केलेले आहेत.
  • आम आदमी पार्टीचा उद्देश हा देशाचे भले करण्याचा नाही. लोकांची फसवणूक करण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यांचा उद्देश चांगला असता तर टीम अण्णांमधील महत्त्वाच्या नेत्या किरण बेदी या ज्याप्रमाणे नरेंद्र मोदींचे समर्थन करतात त्याप्रमाणे आम आदमी पार्टी मोदींच्या समर्थनार्थ उभी राहिली असती. दिल्लीचे राज्य आम्ही चालवू, केंद्रातील सत्ता मोदींना चालवू द्या असा विचार करून केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून राहिले असते. पण त्यांना लिडर होण्याऐवजी डॅमेजर होण्यात जास्त रस होता. हे काम ते काँग्रेसच्या भल्यासाठी करत होते. या निवडणुकीत काँग्रेसला आशीर्वादाचा हात देण्यासाठी कोणी गुरू, महाराज, बुवा नसल्यामुळे याखेपेला केजरीवाल यांची मदत त्यांनी घेतली असावी.
  • या आम आदमी पार्टीने फक्त नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करण्यात धन्यता मानली. म्हणजे त्या टिकेला उत्तर देण्यात भापपचा वेळ जाईल आणि काँग्रेसची निष्क्रियता झाकली जाईल ही काँग्रेसची रणनीती होती. पण भाजपने नरेंद्र मोदींच्या उत्तम धोरणानुसार या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आपले काम, विकासकाम दाखवण्यास सुरूवात केली.
  • भ्रष्टाचाराविरोधात लढतो म्हणणार्‍या आम आदमी पक्षाला काँग्रेसचा भ्रष्टाचार दिसत नाही. केंद्रात आणि राज्यात, अनेक राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. पण त्या भ्रष्ट नेत्यांवर आरोप करण्याऐवजी केजरीवाल मोदींना प्रश्‍न विचारत बसले आहेत. हा निव्वळ मूर्खपणा आहे. जनतेची फसवणूक करण्याचा प्रकार आहे. जनतेची फसवणूक केल्यामुळेच जनतेच्या थपडा खाण्याची वेळ केजरीवाल यांच्यावर येत राहिली आहे.
  • काँग्रेसने आपल्याला जी मते मिळणार नाहीत ती डॅमेज कंन्ट्रोलर अशा आम आदमी पार्टीकडे जातील आणि विरोधकांना ती मते मिळणार नाहीत याची योजना आधीच करून ठेवलेली होती. आता नागपूरात अंजली दमानिया या बाई नितीन गडकरींच्या विरोधात लढायला जातात. काही संबंध आहे काय या बाईंचा तिथे? त्यांनी कधी नागपूर अगोदर पाहिले होते का? त्यांना राहायचे होते निवडणुकीला उभे तर रायगडमधून का राहिल्या नाहीत? तर इथे कर्जतमध्ये केलेले जमिनीचे घोटाळे सर्वांना माहिती आहेत. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या नावावर पैशाचा चुराडा करून सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी या तिकडे गेल्या. झाडू आणि टोपीमुळे मेंढरासारखे मागे धावणारे लोक आम आदमी पार्टीत आहेत. पाच पंचवीस हजार मते खालली तरी विलास मुत्तेमवार आणि नितीन गडकरी यांच्यातील अंतर कमी होईल. निवडणूक घासून होईल. या हेतुने या बाई नागपूरात आल्या. यांना देशाचे भले करायचे असते, देशप्रेम राष्ट्रप्रेम असते तर रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या जमिनींचा गैरव्यवहार त्यांनी केला नसता. त्याबाबत त्या बोलत नाहीत. नितीन गडकरींच्या भ्रष्टाचाराबाबत लोकांना टोप्या घालायल्या त्या गेल्या आहेत. हे सगळं काँग्रेसच्या मदतीने होत आहे हे न कळण्याइतकी जनता आता मूर्ख नाही. पण जनता आता शहाणी झालेली आहे हे लक्षात आल्यावर प्रत्येक मतदारयादीतील हजारो लाखो नावे गायब करण्याचे काम निवडणूक आयोगाचे मतदीने काँग्रेसने केलेले आहे.
  • मुंबईत किरीट सोमय्या यांच्याविरोधात मेधा पाटकर उभ्या राहिल्या आहेत. केजरीवाल यांनी त्यांना टोपी घालून गुंडाळून ठेवले आहे. मागच्या निवडणुकीत किरीट सोमय्या कमी मतांनी पराभूत झाले त्यामुळे या खेपेला ते जोर लावणार हे निश्‍चित होते. किरीट सोमय्यांनी काढलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे, केलेली कामे यामुळे त्यांचे वजन वाढले होते. त्यापुढे संजय दिना पाटील खूप कमी पडणार होते. याखेपेला मनसेचा उमेदवार तिथे असणार नाही असा अंदाज घेवून मेधा पाटकर यांना काँग्रेसने आम आदमी पार्टीच्या माध्यमातून उभे केले. हा निव्वळ खोटारडेपणा आहे. त्यामुळे मेधा पाटकर यांची प्रतिमा आणखीच बदनाम झालेली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख न राहता काँग्रेसच्या समर्थक, भ्रष्टाचाराच्य समर्थक अशी त्यांची ओळख आता निर्माण झालेली आहे.
  • प्रकल्पग्रस्तांचे, गोरगरीबांचे प्रश्‍न कोण सोडवणार आहे याची जाणिव जर मेधा पाटकरांना नसेल तर त्यांचे तीस वर्षांचे कार्य हे थोतांड आहे.  आज या देशावर गरीबी, दारिद्य्र काँग्रेसची दीर्घकाळ सत्ता असल्यामुळे ओढवलेली आहे. त्या काँग्रेसला हटवून सगळे प्रश्‍न सुटण्याची शक्यता असतानाच काँग्रेसला समर्थन देण्यासाठी आम आदमीची टोपी मेधा पाटकर  घालतात हे फार वाईट आहे. म्हणजे ज्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी राम ठाकूर काँग्रेसमध्ये जातो असे म्हणाले. प्रत्यक्षात सिडकोचे ठेके घेण्यासाठी ते काँग्रेसमध्ये गेले होते. काँग्रेसमध्ये गेल्यावर एकदाही प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नावर त्यांनी सरकारकडे, कोणत्याही मंत्र्याकडे, मुख्यमंत्र्यांकडे विषय काढला नाही. फक्त सिडकोचे ठेके कसे मिळतील यासाठी प्रयत्न केला. सिडकोचे भूखंड कसे लाटता येतील ते पाहिले. त्याचप्रकारे मेधा पाटकर आम आदमी, झोपडपट्टीधारक, प्रकल्पग्रस्त यांची फसवणूक करण्यासाठी आम आदमी नावाचा काँग्रेसचा बुरखा घालत आहेत. मेधा पाटकर यांचे प्रश्‍न कोण सोडवू शकणार आहे? त्याची उत्तरे  नरेंद्र मोदींकडे आहेत. ते पंतप्रधान झाल्यावर त्यांना न्याय मिळू शकेल. पण मेधा पाटकर यांना तसले काहीच करायचे नाही. आम आदमीच्या बुरख्याखाली चालवलेली ही फसवणूक फार भयानक आहे. जनतेला पाजले जाणारे हे स्लो पॉयजनींग आहे.
  • नाशिकमधून विजय पांढरे हे निवृत्त अधिकारी आम आदमी पार्टीतून उभे आहेत. अजित पवार यांच्याशी मतभेद झाल्यामुळे राष्ट्रवादीला टार्गेट करण्यासाठी आम आदमी पार्टीतून ते उभे आहेत. यांचा विषय काय? तर भ्रष्टाचार. तीस पस्तीस वर्ष शासकीय सेवेत असताना समोर दिसत असताना भ्रष्टाचार रोखण्याचा प्रयत्न केला नाही. उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहिला आणि भ्रष्टाचाराला विरोध करायला निघाले आहेत. कोणी विश्‍वास  ठेवायचा यांच्यावर? पण विरोधकांना जाणारी मते रोखण्यासाठी हे भूत उभे केले आहे.
  • पण या भूतांचा किंवा हडळींचा काहीही उपयोग होणार नाही. बदलाचे वारे इतके जोरात वाहिले आहे की युतीचे, शेकापक्षाचे, मनसेचे, स्वाभीमानी संघटनेचे उमेदवार या निवडणुकीत विजयी होतील आणि महाराष्ट्रात काँग्रेस विरोधातील, मोदी समर्थनातील 35 पेक्षा अधिक खासदार निवडून जातील. कारण प्रत्येकाच्या मनात एकच विचार आहे, अब की बार, मोदी सरकार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: