- लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात केल्या जाणार्या घोषणा मतदारांना कशाप्रकारे आकर्षीत करतात यावरही निवडणुकांचे भवितव्य ठरत असते. गेल्या सहा महिन्यापासून नमोनम: नावाची घोषणा देवून नमो मधील नरेंद्र मोदी या घोषणेने देशभर लोकप्रियता मिळवली आहे. त्या तुलनेत काँग्रेसला प्रभावी घोषणा करता आलेली नाही. राहुल गांधींनी मै नही हम ही घोषणा देवून पाहिले. पण ती यापूर्वीच नरेंद्र मोदींनी घोषणा दिलेली होती. यावरून काँग्रेसवर चोरीचा आरोप आला. काँग्रेस साफ या घोषणेने आपटली. पण निवडणुकीतील घोषणा या निवडणुकीत महत्त्वाचे काम करत असतात हे निश्चित.
- 1996 मध्ये जेव्हा काँग्रेसचे पानीपत झाले तेव्हा काँग्रेसला वाचवण्यासाठी ‘ सोनिया लाओ, देश बचाओ’ अशी घोषणा दिली गेली होती. वास्तविक पाहता सोनिया गांधी येवून देश वाचणार नव्हता. पण सोनिया गांधींच्या नावाच्या घोषणेने काँग्रेसला जीवदान मिळणार होते. त्यामुळे खर्या अर्थाने ती घोषणा सोनिया लाओ काँग्रेस बचाओ अशीच ठरली. पण काही का असेना सोनिया गांधींना आणल्यानंतर काँग्रेसला जीवदान मिळाले हे मात्र खरे. नाहीतर 2004 मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली नसती. कारण सोनिया गांधींव्यतिरीक्त काँग्रेसकडे एकही चेहरा नव्हता.
- घोषणाबाजी खर्या अर्थाने गाजली ती देशाच्या लोकशाहीच्या इतिहासात ज्याला आपण मैलाचा दगड असे वर्णन करतो त्या 1977 च्या आणिबाणीच्या काळातील निवडणुकांमध्ये. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्त्वाखाली जनता पक्षाची स्थापना झाली तेव्हा काँग्रेसला संपवण्यासाठी दिलेली घोषणा अत्यंत प्रभावी ठरली होती. ही घोषणा होती,‘अंधेरे में एकप्रकाश, जयप्रकाश जयप्रकाश’. जयप्रकाश नारायण हे फार महत्त्वाचे नेते होते. ते निवडणुकीला उभे नव्हते किंवा पंतप्रधानपदाचे उमेदवारही नव्हते. पण जनता पक्षाचे खर्या अर्थाने ते कवच होते. त्यामुळेच या घोषणेने चांगली लोकप्रियता मिळवली होती.
- जनता पक्षात फूट पडल्यानंतर जनता पक्षाचे सरकार कोसळले तेव्हा झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष उतरला नव्हता. पण त्याकाळात अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पक्षाचे नेते असल्यामुळे अटलजींच्या नावाची घोषणा भाजपाने दिली होती.‘ अंधेरे में एक चिंगारी, अटलबिहारी, अटलबिहारी’. पण ही घोषणा मात्र त्या काळात भाजपला तारु शकली नव्हती. भाजपने पहिली निवडणूक लढवली ती 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत. पण यामध्ये भाजपला यश मिळाले नव्हते. घोषणा ऐकायला मतदार तयार नव्हता. कारण राजीव गांधींची लाट होती.
- आणीबाणीच्या काळात गाजलेली आणखी एक घोषणा म्हणजे ‘इंदिरा तेरा खतम खेल, सस्ता होगा आटा तेल.’ आणीबाणीच्या काळात असलेल्या प्रचंड महागाई, टंचाईच्या काळात या घोषणेने विरोधकांनी चांगलीच भावनिक साद घातली होती. त्या घोषणेलाही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिलेला होता. त्यामुळे येत्या निवडणुकीत नेमक्या काय घोषणा कोणत्या पक्षाकडून येतात यावरही बरेच चित्र तयार होणार आहे.
- 1971 च्या निवडणुकीत काँग्रेसने ‘इंदिरा गांधी आयी है, नयी रोशनी लायी है’ अशी घोषणा दिलेली होती. या घोषणेचा मतदारांवर चांगला प्रभाव झालेला होता. इंदिरा गांधींनी त्यापूर्वी काँग्रेस अंतर्गत राजकारण करून जे स्वत:चे स्थान मिळवले होते त्यामुळे अंतर्गत विरोधकांना त्यांनी नामोहरम केले होते. त्यामुळे ही रोशनी जोरदार आहे असा विश्वास पटवण्यात काँग्रेस यशस्वी झाली होती.
- 1957 च्या निवडणुकीतही नवनव्या घोषणा आल्या होत्या. त्याकाळात काँग्रेसची खूण ही बैलजोडी होती. त्याकाळात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात याठिकाणी भाषावाद रंगला होता. संयुकत महाराष्ट्राची चळवळ जोर धरत होती. संयुकत महाराष्ट्राला काँग्रेसचा असलेला विरोध आणि दाक्षिणात्यांना झुकतं माप देण्याची प्रवृत्ती. यामुळे महाराष्ट्रात त्या विषयावरून घोषणा आल्या होत्या. ‘ महाराष्ट्राच्या सिंहांनो, काँग्रेसच्या बैलांना उधळून लावा’, ‘काँग्रेसची मतपेटी हुतात्मयांच्या रक्ताने भरलेली आहे’, ‘मुंबईच्या मराठ्यांनो या राक्षसी कत्तलीचा सूड घ्या’ अशा घोषणा त्यावेळी महाराष्ट्रात भावनीक साद घालत होत्या. ‘मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे’ ही घोषणा तर ठासून दिली जात होती. पण या घोषणा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र, मुंबईत चालल्या. त्या प्रमाणात विदर्भ, मराठवाड्यात या घोषणा प्रभावी ठरल्या नाहीत.
- निवडणुका या आपल्याकडे जातीय समिकरणे, गट-तट, धार्मिक वसाहती यावर लढल्या जातात. धर्मनिरपेक्ष भारत असे फक्त सांगायचे. प्रत्यक्षात जातीपातीच्या आधारावरच निवडणूका आजही लढल्या जातात. पहिल्या 1951-52 च्या लोकसभा निवडणुकीत तर या जातीपातींचा उल्लेख थेट केला जात होता. आज जे बिहारमधील राजद, संजद हे पक्ष धर्मनिरपेक्षतेचा आव आणत आहेत. त्यांच्याच बिहारमध्ये ‘ मुलगी आणि मत जातीबाहेर देवू नका’ अशी घोषणा दिली होती. ही घोषणा त्याकाळात गाजली आणि प्रभावीही ठरली होती. जात आणि भाषावाद ही राजकारण्यांची अत्यंत प्रभावी अस्त्रे आहेत हे पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून चालत आलेले समिकरण आहे.
- डॉक्टर राममनोहर लोहीया यांनी जेव्हा समाजवादी पक्षाची स्थापना केली तेव्हा ‘ मागास जातींना सत्ता द्या’ अशी घोषणा केली होती. या घोषणांचा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये प्रचंड प्रभाव पडला होता. बिगर काँग्रेस पक्षांना आजही तो मूलमंत्र ठरत आहे. काशीराम-मायावतींनी त्यातूनच प्रेरणा घेतली आहे.
- राजकारणात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढल्यावर नेत्यांची नावे उघडपणे घेवून त्यांच्या विरोधी घोषणा येवू लागल्या होत्या. त्यामध्ये ‘गली गली में शोर है, अमूक तमूक चोर है’ ही दीवार मधील घोषणा सर्वच पक्ष एकमेकांविरोधात करु लागले होते. त्यामुळे राजकारण हा फक्त चोरांचा खेळ आहे काय, चोरांचा बाजार आहे काय असा प्रश्न सामान्य माणसांना पडू लागला.’
- 1986 मध्ये राजीव गांधींनी अयोध्येतील राम मुक्त केल्यानंतर हाच राम आपल्याला तारणहार ठरेल याची खूणगाठ काँग्रेसने बांधली. पण त्याच रामाचे राजकारण अतिशय नियोजनबद्धपणे भारतीय जनता पक्षाने केेले. ‘मंदीर वही बनायेंगे’ ही दिलेली घोषणा भारतीय जनता पक्षाला तारक ठरली. देशाच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारी ठरली. जो राम राजीव गांधींनी राजकारणासाठी बाहेर काढला होता, त्याच रामाने काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम केले होते.
- 1996 साली झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा सिंगल लार्जेस्ट पार्टी महणून सर्वात मोठा पक्ष होता. या पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केला. पण बहुमत सिद्ध करता न आल्यामुळे त्यांना अवघ्या तेरा दिवसात सत्ता सोडावी लागली होती. त्यानंतर 1998 साली झालेल्या निवडणुकीत भाजपने सरकार बनवले. पण ते सरकार तेरा महिन्यानंतर कोसळलेे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने 1999 च्या लोकसभा निवडणुकीत ‘ पहली बार तेरह दिन, इस बार तेरह महिने, अगली बार तेरह साल’ अशी घोषणा दिली. या घोषणेला भाजपला बर्यापैकी यश मिळाले आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर आला. पण त्यांचे सलग तेरा वर्षांचे स्वप्न मात्र पूर्ण होवू शकले नाही.
- बिहारमधील भारतीय जनता पक्षाचे नेेते अभिनेते शत्रूघ्न सिन्हा यांनी आपल्या खास फिल्मी स्टाईलमध्ये,‘ अब की बारी, अटलबिहारी’ ही घोषणा दिली होती.
- निवडणुकीत घोषणांमुळे मतदारांवर चांगला प्रभाव पडतो. परंतु त्या घोषणा यशस्वी तेव्हाच होतात जेव्हा त्यात बिभत्सता आणि खोटेपणा नसतो तेव्हा. राम मंदीराच्या मुद्यांना आघाडीमुळे बाजूला ठेवल्यावर अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘ भूक, भय, भ्रष्टाचारमुक्त भारत’ ही घोषणा दिली होती. त्या घोषणेचा चांगला प्रभाव मतदारांवर पडला होता. आता भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि भ्रष्टाचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे दाखवत ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही घोषणा केलेली आहे. त्या घोषणेला मतदार किती प्रतिसाद देतात याचे उत्तर येत्या काही आठवड्यात मिळेल.
- लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात केल्या जाणार्या घोषणा मतदारांना कशाप्रकारे आकर्षीत करतात यावरही निवडणुकांचे भवितव्य ठरत असते. गेल्या सहा महिन्यापासून नमोनम: नावाची घोषणा देवून नमो मधील नरेंद्र मोदी या घोषणेने देशभर लोकप्रियता मिळवली आहे. त्या तुलनेत काँग्रेसला प्रभावी घोषणा करता आलेली नाही. राहुल गांधींनी मै नही हम ही घोषणा देवून पाहिले. पण ती यापूर्वीच नरेंद्र मोदींनी घोषणा दिलेली होती. यावरून काँग्रेसवर चोरीचा आरोप आला. काँग्रेस साफ या घोषणेने आपटली. पण निवडणुकीतील घोषणा या निवडणुकीत महत्त्वाचे काम करत असतात हे निश्चित.
- 1996 मध्ये जेव्हा काँग्रेसचे पानीपत झाले तेव्हा काँग्रेसला वाचवण्यासाठी ‘ सोनिया लाओ, देश बचाओ’ अशी घोषणा दिली गेली होती. वास्तविक पाहता सोनिया गांधी येवून देश वाचणार नव्हता. पण सोनिया गांधींच्या नावाच्या घोषणेने काँग्रेसला जीवदान मिळणार होते. त्यामुळे खर्या अर्थाने ती घोषणा सोनिया लाओ काँग्रेस बचाओ अशीच ठरली. पण काही का असेना सोनिया गांधींना आणल्यानंतर काँग्रेसला जीवदान मिळाले हे मात्र खरे. नाहीतर 2004 मध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली नसती. कारण सोनिया गांधींव्यतिरीक्त काँग्रेसकडे एकही चेहरा नव्हता.
- घोषणाबाजी खर्या अर्थाने गाजली ती देशाच्या लोकशाहीच्या इतिहासात ज्याला आपण मैलाचा दगड असे वर्णन करतो त्या 1977 च्या आणिबाणीच्या काळातील निवडणुकांमध्ये. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्त्वाखाली जनता पक्षाची स्थापना झाली तेव्हा काँग्रेसला संपवण्यासाठी दिलेली घोषणा अत्यंत प्रभावी ठरली होती. ही घोषणा होती,‘अंधेरे में एकप्रकाश, जयप्रकाश जयप्रकाश’. जयप्रकाश नारायण हे फार महत्त्वाचे नेते होते. ते निवडणुकीला उभे नव्हते किंवा पंतप्रधानपदाचे उमेदवारही नव्हते. पण जनता पक्षाचे खर्या अर्थाने ते कवच होते. त्यामुळेच या घोषणेने चांगली लोकप्रियता मिळवली होती.
- जनता पक्षात फूट पडल्यानंतर जनता पक्षाचे सरकार कोसळले तेव्हा झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष उतरला नव्हता. पण त्याकाळात अटलबिहारी वाजपेयी हे भारतीय जनता पक्षाचे नेते असल्यामुळे अटलजींच्या नावाची घोषणा भाजपाने दिली होती.‘ अंधेरे में एक चिंगारी, अटलबिहारी, अटलबिहारी’. पण ही घोषणा मात्र त्या काळात भाजपला तारु शकली नव्हती. भाजपने पहिली निवडणूक लढवली ती 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत. पण यामध्ये भाजपला यश मिळाले नव्हते. घोषणा ऐकायला मतदार तयार नव्हता. कारण राजीव गांधींची लाट होती.
- आणीबाणीच्या काळात गाजलेली आणखी एक घोषणा म्हणजे ‘इंदिरा तेरा खतम खेल, सस्ता होगा आटा तेल.’ आणीबाणीच्या काळात असलेल्या प्रचंड महागाई, टंचाईच्या काळात या घोषणेने विरोधकांनी चांगलीच भावनिक साद घातली होती. त्या घोषणेलाही मतदारांनी चांगला प्रतिसाद दिलेला होता. त्यामुळे येत्या निवडणुकीत नेमक्या काय घोषणा कोणत्या पक्षाकडून येतात यावरही बरेच चित्र तयार होणार आहे.
- 1971 च्या निवडणुकीत काँग्रेसने ‘इंदिरा गांधी आयी है, नयी रोशनी लायी है’ अशी घोषणा दिलेली होती. या घोषणेचा मतदारांवर चांगला प्रभाव झालेला होता. इंदिरा गांधींनी त्यापूर्वी काँग्रेस अंतर्गत राजकारण करून जे स्वत:चे स्थान मिळवले होते त्यामुळे अंतर्गत विरोधकांना त्यांनी नामोहरम केले होते. त्यामुळे ही रोशनी जोरदार आहे असा विश्वास पटवण्यात काँग्रेस यशस्वी झाली होती.
- 1957 च्या निवडणुकीतही नवनव्या घोषणा आल्या होत्या. त्याकाळात काँग्रेसची खूण ही बैलजोडी होती. त्याकाळात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात याठिकाणी भाषावाद रंगला होता. संयुकत महाराष्ट्राची चळवळ जोर धरत होती. संयुकत महाराष्ट्राला काँग्रेसचा असलेला विरोध आणि दाक्षिणात्यांना झुकतं माप देण्याची प्रवृत्ती. यामुळे महाराष्ट्रात त्या विषयावरून घोषणा आल्या होत्या. ‘ महाराष्ट्राच्या सिंहांनो, काँग्रेसच्या बैलांना उधळून लावा’, ‘काँग्रेसची मतपेटी हुतात्मयांच्या रक्ताने भरलेली आहे’, ‘मुंबईच्या मराठ्यांनो या राक्षसी कत्तलीचा सूड घ्या’ अशा घोषणा त्यावेळी महाराष्ट्रात भावनीक साद घालत होत्या. ‘मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे’ ही घोषणा तर ठासून दिली जात होती. पण या घोषणा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र, मुंबईत चालल्या. त्या प्रमाणात विदर्भ, मराठवाड्यात या घोषणा प्रभावी ठरल्या नाहीत.
- निवडणुका या आपल्याकडे जातीय समिकरणे, गट-तट, धार्मिक वसाहती यावर लढल्या जातात. धर्मनिरपेक्ष भारत असे फक्त सांगायचे. प्रत्यक्षात जातीपातीच्या आधारावरच निवडणूका आजही लढल्या जातात. पहिल्या 1951-52 च्या लोकसभा निवडणुकीत तर या जातीपातींचा उल्लेख थेट केला जात होता. आज जे बिहारमधील राजद, संजद हे पक्ष धर्मनिरपेक्षतेचा आव आणत आहेत. त्यांच्याच बिहारमध्ये ‘ मुलगी आणि मत जातीबाहेर देवू नका’ अशी घोषणा दिली होती. ही घोषणा त्याकाळात गाजली आणि प्रभावीही ठरली होती. जात आणि भाषावाद ही राजकारण्यांची अत्यंत प्रभावी अस्त्रे आहेत हे पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून चालत आलेले समिकरण आहे.
- डॉक्टर राममनोहर लोहीया यांनी जेव्हा समाजवादी पक्षाची स्थापना केली तेव्हा ‘ मागास जातींना सत्ता द्या’ अशी घोषणा केली होती. या घोषणांचा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये प्रचंड प्रभाव पडला होता. बिगर काँग्रेस पक्षांना आजही तो मूलमंत्र ठरत आहे. काशीराम-मायावतींनी त्यातूनच प्रेरणा घेतली आहे.
- राजकारणात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढल्यावर नेत्यांची नावे उघडपणे घेवून त्यांच्या विरोधी घोषणा येवू लागल्या होत्या. त्यामध्ये ‘गली गली में शोर है, अमूक तमूक चोर है’ ही दीवार मधील घोषणा सर्वच पक्ष एकमेकांविरोधात करु लागले होते. त्यामुळे राजकारण हा फक्त चोरांचा खेळ आहे काय, चोरांचा बाजार आहे काय असा प्रश्न सामान्य माणसांना पडू लागला.’
- 1986 मध्ये राजीव गांधींनी अयोध्येतील राम मुक्त केल्यानंतर हाच राम आपल्याला तारणहार ठरेल याची खूणगाठ काँग्रेसने बांधली. पण त्याच रामाचे राजकारण अतिशय नियोजनबद्धपणे भारतीय जनता पक्षाने केेले. ‘मंदीर वही बनायेंगे’ ही दिलेली घोषणा भारतीय जनता पक्षाला तारक ठरली. देशाच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारी ठरली. जो राम राजीव गांधींनी राजकारणासाठी बाहेर काढला होता, त्याच रामाने काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम केले होते.
- 1996 साली झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा सिंगल लार्जेस्ट पार्टी महणून सर्वात मोठा पक्ष होता. या पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केला. पण बहुमत सिद्ध करता न आल्यामुळे त्यांना अवघ्या तेरा दिवसात सत्ता सोडावी लागली होती. त्यानंतर 1998 साली झालेल्या निवडणुकीत भाजपने सरकार बनवले. पण ते सरकार तेरा महिन्यानंतर कोसळलेे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने 1999 च्या लोकसभा निवडणुकीत ‘ पहली बार तेरह दिन, इस बार तेरह महिने, अगली बार तेरह साल’ अशी घोषणा दिली. या घोषणेला भाजपला बर्यापैकी यश मिळाले आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर आला. पण त्यांचे सलग तेरा वर्षांचे स्वप्न मात्र पूर्ण होवू शकले नाही.
- बिहारमधील भारतीय जनता पक्षाचे नेेते अभिनेते शत्रूघ्न सिन्हा यांनी आपल्या खास फिल्मी स्टाईलमध्ये,‘ अब की बारी, अटलबिहारी’ ही घोषणा दिली होती.
- निवडणुकीत घोषणांमुळे मतदारांवर चांगला प्रभाव पडतो. परंतु त्या घोषणा यशस्वी तेव्हाच होतात जेव्हा त्यात बिभत्सता आणि खोटेपणा नसतो तेव्हा. राम मंदीराच्या मुद्यांना आघाडीमुळे बाजूला ठेवल्यावर अटलबिहारी वाजपेयी यांनी ‘ भूक, भय, भ्रष्टाचारमुक्त भारत’ ही घोषणा दिली होती. त्या घोषणेचा चांगला प्रभाव मतदारांवर पडला होता. आता भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि भ्रष्टाचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे दाखवत ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही घोषणा केलेली आहे. त्या घोषणेला मतदार किती प्रतिसाद देतात याचे उत्तर येत्या काही आठवड्यात मिळेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा