भ्रष्ट कारभार, लाचलुचपतीचा कारभार, घोटाळे यामुळे काँग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सध्या जनतेच्या मनातून उतरली आहे. भ्रष्टाचार हाच शिष्ठाचार झालेल्या काँग्रेसला उपरोधीकपणे सुनावताना सर्वोच्च न्यायालयाने म्टहले होते की आता लाच, भ्रष्टाचार कायदेशिर करा. त्याचे दर ठरवून घ्या. कोणत्या कामासाठी किती लाच घ्यायची याचे दरपत्रक ठरवा. पण भ्रष्ट कारभार, घोटाळे हा काँग्रेसच्या कारभाराचा अविभाज्य भाग आहे. इतके दिवस तो जनतेला समजत नव्हता. आता समजायला लागला आहे इतकेच आहे. अगदी पहिले पंतप्रधान पंडीत नेहरूंपासून चालू पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यापर्यंत प्रत्येकाच्या कारकिर्दीत असंख्य महाघोटाळे झाले आहेत. 2010 या वर्षात काँग्रेसने सर्वाधिक म्हणजे 10 घोटाळे केलेले निष्पन्न झाले आहे. या देशाचे नुकसान करणारे असे 31 चुकीचे निर्णय आणि घोटाळे काँग्रेसच्या ताब्यात सत्ता गेल्यापासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून घडले आहेत. याशिवाय अन्य घोटाळे आणि देशाचे वाटोळे करणारे निर्णय यांची संख्या 50 पेक्षा अधिक आहे. हा आकडा शंभरी पार करण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे काँग्रेस रूपी शिशुपालाची शंभरी पूर्ण होत असताना त्यांना हटवण्याची तयारी देशातून होणे गरजेचे आहे. मागच्या महिन्यात अण्णा हजारेंनी निर्माण केलेले जनमत हे काँग्रेसला हादरवून टाकणारे असेच होते. एकदम निवडणुका आल्यावर हे मुद्दे काढण्यापेक्षा आता उठवू सारे रान म्हणत हे काँग्रेसचे गवत उपटून टाकण्याची तयारी आत्तापासूनच सर्व विरोधी पक्षांनी केली पाहिजे. यासाठी काँग्रेसने या देशाचे वाटोळेच कसे केले आहे हे पहावे लागेल. या देशाचे वाटोळे करणार्या या घोटाळा सरकारचा इतिहास आणि वर्तमान पाहणे गरजेचे आहे. युवापिढीने याकडे लक्ष दिले पाहिजे. भावी पिढीच्या मनावर कोरले पाहिजे आणि यांच्या हातात सत्ता देण्यासाठी का या देशाला स्वातंत्र्य मिळवले याचे उत्तर शोधले पाहिजे. या देशातून ब्रिटीशांना हाकलण्यासाठी त्यांच्या काळ्या कारभारावर, अत्याचारी प्रवृत्तीवर बोट ठेवले तेव्हा ते पळाले. तीच कृती या काँग्रेसविरोधात करण्याची वेळ आली आहे. म्हणूनच आता नेहरू ते मनमोहनसिंग यांच्या भ्रष्टाचाराने बरबटलेला देश समजून घेणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यापासून घोटाळे आणि भ्रष्टाचाराची काँग्रेसची परंपरा आहे. या घोटाळ्यातील फक्त 31 घोटाळ्यांचा उहापोह इथे केला जाणार आहे. खरं तर या घोटाळ्यांची संख्या इतकी आहे की त्या सगळ्यांची चर्चा करणे म्हणजे आधुनिक महाभारताचे ते महाकाव्य ठरेल. एकापेक्षा एक भयानक घोटाळ्यातून निवडक 31 घोटाळे निवडणे तसे कठीणच. सामान्य ते असामान्य अशा सगळ्यांना पडू शकेल असा हा काँग्रेसच्या घोटाळ्यांचा प्रश्न आहे. या घोटाळ्यांच परिणाम आपण आजही भोगत आहोत म्हणून हीच वेळ आहे विचाराची. हीच वेळ आहे चिंतनाची. या घोटाळ्यांना सुरवात झाली ती देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच. देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू. यांचा तसा गरिबी सामान्य माणूस यांच्याशी तसा दुरान्वयानेही संबंध नाही. चांदीचा चमचा तोंडात घेउन जन्माला आलेले हे नेते कायम छाताडावर गुलाबाची फुलं घेउनच मिरवत असत. गुलाबाचे काटे चुकवून खुडलेली फुले गांेंजारणार्याना ज्यांच्या आयुष्यात बाभळीचे काटे पसरले आहेत अशा जीवांशी त्यामुळेच काही देणेघेणे नव्हते. आपण स्वतंत्र झालो म्हणजे या देशाचे राजे झालो. या देशात अजूनही सोन्याचा धूर निघतो आहे अशा थाटात त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरवात केली. अशा या नेहरूंनी सर्वात मोठी घोडचूक आणि करून ठेवलेला घोटाळा म्हणजे आजचा काश्मिर प्रश्न. या प्रश्नासाठीच सध्याचे काँग्रेस सरकार अफझल गुरूला फाशी देण्याचे टाळते आहे. परवाच्या बाँम्बस्फोटाचा संबंधही याच घोटाळ्याशी आहे. त्यामुळे देशातील भ्रष्टाचार आणि दहशतवादाचे बीज सर्वात प्रथम पेरले ते नेहरूंच्या कारकीर्दीत. गेल्या काही दशकांपासून जो प्रश्न चिघळला आहे असे आपण समजतो त्या प्रश्नाचे जनक देशाचे पहिले पंतप्रधान, काँग्रेसचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू हे आहेत. काश्मिरच्या नियंत्रण रेषेचा गुंता पंडीत नेहरूंनी निर्माण केला. आतंरराष्टीय स्तरावर त्यांनी हा गुंता करून ठेवला. याबद्दल सरदार वल्लभभाई पटेल यांची मते स्पष्ट होती. आपण पाकव्याप्त काश्मिर ताब्यात घेउ असे त्यांचे म्हणणे होते. त्यासाठी भारतातील लष्कराचीही तयारी होती. स्वातंत्र्यानंतर काही दिवसातच ही घटना घडली होती. पण नेहरूंनी स्वत:चे साध्य करण्यासाठी पटेल यांचा मुद्दा बाजूला सारला. ही गोष्ट चुकीची करत असल्याची जाणिव सरदार वल्लभभाई पटेल यांनी नेहरूंना करून दिली आणि त्याचा निषेध करण्यासाठी 23 डिसेंबर 1947 रोजी सरदार पटेल यांनी आपला राजिनामा नेहरूंकडे सोपवला होता. पोलादी पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे ऐकले असते तर तेव्हाच हा प्रश्न सुटला असता. आज काश्मिर प्रश्न केवढा चिघळला आहे की तेथे भारतीय नागरिक आहेत हे सांगणेच धाडसाचे होईल. त्या अतिरेक्यांचे चोचले पुरवण्याचे काम सध्याचे मनमोहनसिंगांचे सरकार करते आहे. मनमोहनसिंग सरकार सत्तेवर आल्यापासून अफझल गुरूला फाशीची शिक्षा देण्याचे प्रलंंंबित राहिलेले आहे. राष्ट्रपती त्यावर सही करीत नाहीत. ती करू नये म्हणून काँग्रेस सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी दबाव टाकण्यासाठी बाँम्बस्फोटासारखे प्रकार या देशात घडवले जातात. अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ले चढवले जातात. एकेकाळचे भारताचे नंदनवन अशी ख्याती असलेल्या काश्मिरचा आज नरक झाला आहे. याला कारण आहेत पंडीत जवाहरलाल नेहरू. हे तमाम भारतीयांनी लक्षात घेतले पाहिजे. याला जबाबदार आहे ते काँग्रेसचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू हे लक्षात ठेवले पाहिजे. पंडीत नेहरूंनी आणखी फार मोठे केलेले नुकसान म्हणजे 1950 सालची घटना. भारत आणि चीन यांच्यातील सीमारेषा स्पष्ट करण्याबाबत नेहरूंनी घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची होती. त्यामुळे देशाचे फार मोठे नुकसान झाले. म्हणजे ब्रिटीशांनी जाताना भारत पाक असे देशाचे दोन तुकडे केले. उरलेले तुकडे करण्याचे काम नेहरूंनी केले. हे तुकडे असे की छोटे छोटे तुकडे करून भुंगा लागावा त्याप्रमाणे या देशाला काँग्रेसने पोखरायला सुरवात केली. तीच काँग्रेस जी या देशात ब्रिटीश कायम सत्तेवर राहतील याची अपेक्षा करत होती तीच ही काँगे्रस. इंग्लंडमध्ये जसे दोन पक्ष आहेत हुजूर आणि मजूर त्याप्रमाणे या देशातही दोन पक्ष असावेत या हेतुने ब्रिटीशांना सत्तेवर ठेेवून लोकशाही मार्गाने त्यांना विरोध करणारा आणि देशात पारतंत्र्यच असावे, ब्रिटीशांचेच राज्य असावे या हेतुने स्थापन झालेला पक्ष म्हणजे हा काँग्रेस पक्ष. सत्ताधारी ब्रिटीश हा देश सोडून गेले. उर्वरीत देशाचे वाटोळे करायची सत्ता आपल्या विरोधकांकडे म्हणजे ब्रिटीश विचारांच्याच असलेल्या काँग्रेसकडे सोपवून ब्रिटीश येथून गेले. त्यामुळे खर्या अर्थाने या देशाला स्वातंत्र्य मिळालेच नव्हते. बिळातून बाहेर पडलेल्या सापाने आपली अंडी आत टाकून जावे त्याप्रमाणे हा प्रकार घडला. ब्रिटीश बाहेर पडले पण त्यांची अंडी असलेला काँग्रेस पक्ष मात्र इथेच सोडून गेले. ती अंडी एकेक करून फुटून त्यातून गेल्या साठ वर्षात एकेका सापाने या देशाला दंश केला आहे. त्या विषाने सर्व देश भिनला आहे. या विषाला उतारा पाडण्यासाठी या सरकारला, या पक्षाला येथून चले जाव म्हणणे हेच एक तत्त्व या देशातील तमाम भारतीयाच्या मनात रूजवण्याची गरज आहे. नेहरूंमुळे या देशाचा 10 हजार चौरस किलोमीटरचा तुकडा चीनला बहाल करावा लागला. लडाखचा पूर्व भाग हा चीनला गिळंकृत करायला कारणीभूत पंडीत जवाहरलाल नेहरू आहेत हा इतिहास आता वर्तमान पिढीने जाणून घेतला पाहिजे. आपण खरोखरच स्वातंत्र्यात आहोत का? कोणाच्या हातात आपण गेलो आहोत याचा विचार करण्याची हीच वेळ आहे. एक वैचारीक मंथन या देशात होण्याची गरज आहे. चीनचा सीमाप्रश्न सोडवण्याची अनेकवेळा संधी येउनही ती संधी नेहरुंनी डावलली. गेल्या साठ वर्षांपासून हासुध्दा एक प्रश्न नेहरूंनी निर्माण करून ठेवला आहे. आज साठ वर्षांनी पुन्हा एकदा भारत चीन सीमेवर सैन्याची जमवाजमव होत आहे. भारत पाक कायमच सीमा अशांत आहेत. या दोन्ही सीमा अशांत ठेवायचे काम नेहरूंनी केले. ही घोटाळ्याची परंपरा काँग्रेसच्या पहिल्या पंतप्रधानांनी केली. तीच परंपरा मनमोहनसिंग यांच्याकडून पाळली जात आहे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. चीन आणि भारत, सीमेवर आणि व्यापारी पातळीवरही स्पर्धक आहेत. त्यांच्या स्पर्धेला युद्धाचे स्वरूप देण्याचे स्वप्न अमेरिका पहात आहे. त्यामुळे अमेरिकेला स्वत:ची अर्थव्यववस्था सावरणे सोयीचे होणार आहे. ती अमेरिकेची दलाली करण्याचे काम सध्याचे सरकार करते आहे. नेहरूंनी पेरलेले हे विषारी बीज आता चांगलेच फोफावले आहे. ते खोडून, खुरटून टाकण्यासाठी आता जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल. नाहीतर ही काँग्रेसी जनता इथले उद्योग, कारखानदारी, आर्थिक संस्था बुडवण्यास मागे पाहणार नाही. (- सप्टेंबर 2011)
शनिवार, १२ एप्रिल, २०१४
घोटाळ्यांची परंपरा काँग्रेसची
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा