काँग्रेसला नाकारण्यासाठी मतदान करा
काँग्रेसला नाकारण्यासाठी मतदान करा
- राज्यातल्या पहिल्या टप्प्यातील मतदान संपले. आता पुढचा टप्पा 17 तारखेला आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडून या परिवर्तनाच्या लढयात उतरले पाहिजे. ही निवडणूक म्हणजे नवा स्वातंत्र्य लढा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. इंग्रजांच्या जोखडातून भारत मुक्त झाला आणि तो काँग्रेसच्या ताब्यात गेला. आगीतून फुफाट्यात म्हणतात तशीच ही अवस्था होती. आता काँग्रेसच्या ताब्यातून देश सोडविण्यासाठी मतदारांनी मतदान केले पाहिजे. काँग्रेस विरोधी मतदान करून परिवर्तन घडवायचे आहे.
- मतदानाला जाताना प्रत्येकाने मनात एकच विचार करायचा आहे, की गेल्या दहा वर्षात आभाळ भेदून गेलेल्या महागाईला विरोध करण्यासाठी हे मतदान करत आहोत. रास्त किमतीत जीवनावश्यक वस्तू मिळण्यासाठी हे मतदान आपण करणार आहोत. माझे एक मत काँग्रेसने केलेल्या महागाईच्या विरोधात असणार आहे. काँग्रेसने या खेपेलाही 2009 च्या जाहीरनाम्या प्रमाणे 100 दिवसात महागाई कमी करू असे फसवे आश्वासन दिलेले आहे. पण शंभर दिवसांची वाट पाहण्याची गरज नाही. एका दिवसात आपण महागाई कमी करू शकू. तो दिवस म्हणजे मतदानाचा. काँग्रेस विरोधी मतदान करून महागाईचे समर्थन करणार्या, किंमती स्थीर ठेवण्यात अपयश आलेल्या काँग्रेसला सत्तेपासून दूर करायचे आहे.
- आज देशात महिला सुरक्षित नाहीत. महिलांचे संरक्षण करण्यात काँग्रेसला अपयश आलेले आहे. याचे कारण महिलांचे संरक्षण केले पाहिजे, त्यांचा सन्मान केला पाहिजे ही काँग्रेसची इच्छाच नाही. महिलांची बेअब्रू करण्याचीच काँग्रेसची प्रथा राहिलेली आहे. लातूरमध्ये काँग्रेसच्या युवक अध्यक्षाने आपल्याच महिला कार्यकर्तीची हत्या केली. जो प्रकार दिल्लीत होता तोच प्रकार आता गल्लीतही होताना दिसत आहे. एका बहुजन समाजातल्या युवा कार्यकर्तीला गायब करून तिची हत्या करण्याचे दुष्कर्म काँग्रेसचा कार्यकर्ता करतो. ही काँग्रेसमध्ये सर्वत्र रूजलेली प्रवृत्ती आहे. महिलांकडे पाहण्याची काँग्रेस नेत्यांची दृष्टी ही अत्यंत वाईट असते. म्हणूनच महिलांनी आत्मसन्मानासाठी काँग्रेस विरोधी मतदान करायचे आहे. काँग्रेसच्या राजवटीत देशभर बलात्कारांचे, महिलांवरील हल्ल्यांचे, त्यांच्या हत्यांचे प्रमाण वाढलेेले आहे. निर्भयासारख्या सामुहीक बलात्काराचे प्रकरण काँग्रेसच्या राजवटीत घडलेले आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून गेल्यावर्षी दिल्लीत निवडणुका होण्याआधीपासुन आम आदमी पक्षाने निर्भयाला न्याय अशा नावाची पोस्टर्स संपूर्ण दिल्लीत लावली. महिलांच्या संरक्षणाचा मुद्दा केजरीवाल यांनी उचलून धरला. त्यामुळे निर्भया घटनेने संतापलेली तरूणाई मतदानाला उतरली. काँग्रेसची सत्ता खेचून घेण्यासाठी मतदान केले. निर्भयाचा मुद्दा केजरीवाल यांनी उचलल्यामुळे मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहिला. पण त्याच केजरीवाल यांनी सामान्य माणसांचा विश्वासघात केला. काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. काँग्रेसचा पाठींबा नाकारण्याची धमक केजरीवाल यांच्याकडे नव्हती. पुढे 49 दिवसात त्यांनी राजीनामा दिला. देशाचे 49 दिवस वाया घालवले. सामान्य जनतेची फसवणूक करण्याचे काम केजरीवाल यांनी केले. त्यामुळे आम आदमीची संतप्त प्रतिक्रीया बाहेर पडली. लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला बाहेर पडल्यावर एका रिक्षाचालकाने केजरीवाल यांना थोबाडीत मारली. वाईट वागणार्या राज्यकर्त्यांना असे थोबाडले पाहिजे ही सामान्य माणसाची प्रतिक्रीया होती. ज्या विश्वासाने दिल्लीची सत्ता आम आदमी पार्टीकडे सोपवली होती त्या विश्वासाचा केलेला घात होता. त्यामुळे सामान्य माणसाची उमटलेली ती प्रतिक्रीया होती. पण प्रत्येकाला काँग्रेसला किंवा त्यांच्या समर्थकांना थोबडून काढणे शक्य होणार नाही. अगदी इच्छा असली तरी असल्या नेत्यांना थोबाडणे शक्य होणार नाही. तर जनतेचा विश्वासघात करणार्या नेत्यांना थोबाडण्यासाठी एकच बटण दाबा. मतदान करा आणि अशा काँग्रेस, आम आदमी पार्टी नावाची गुप्त काँग्रेस यांना हद्दपार करा. केजरीवाल यांना थप्पड खाल्ल्यानंतर थोडा पश्चाताप झाला. त्यामुळे ते राजघाटावर चेहरा पाडून बसले. आपण जनतेचा विश्वासघात करत आहोत याची त्यांना जाणिव झाली. त्यामुळे त्यांनी पुढचे नाटक केले ते त्या रिक्षाचालकाला घरी जावून भेटण्याचे. पण केजरीवाल यांनी दिल्लीच्या मतदारांची माफी मागायला पाहिजे होती. राज्य चालवण्यास आम्ही नालायक आहोत, केवळ काँग्रेसच्या पैशावर भाजपला दिल्लीच्या सत्तेपासून रोखण्यासाठी हे केले होते हे त्यांनी जाहीर कबूल करण्याची ही वेळ होती. पण सुंभ जळला तरी पिळ सुटत नाही त्याप्रमाणे काँग्रेसला वाचवण्यासाठी केजरीवाल यांनी गांधीगिरी करण्याचा आव आणला. अशा ढोंगी पुढार्यांना नाकारण्यासाठी मतदान करणे हेच आपले कर्तव्य आहे.
- तरूणांना दारूच्या, डान्सबारच्या नादी लावून अवैध धंदे करणार्यांना प्रोत्साहन देण्याचे काम काँग्रेस करते आहे. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार विवेक पाटील यांनी डान्सबार विरोधात लढा दिला होता. महाराष्ट्रात डान्सबारवर बंदी आणली होती. आया बहिणींच्या डोळ्यातील अश्रूंनी ते विरघळून गेले होते. त्यांनी आपल्या विवेक बुद्धीप्रमाणे महिलांचा मोर्चा काढला, विधानसभेत आवाज उठवला. गृहमंत्री आर आर पाटील यांच्यावर दबाव आणून डान्सबारवर बंदी घालण्याचे महत्त्वपूर्ण काम केले होते. पण या नराधम काँग्रेसने न्यायालयात जावून ही बंदी उठवली आणि डान्सबार सुरू केले. मुलांना लहान वयातच दारू पिण्याचे ट्रेनिंग मिळावे यासाठी गल्ली बोळातील चिल्लर काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न केले. राम ठाकूर-प्रशांत ठाकूर यांनी तर हरामखोरीचा कहर केला. डान्सबार, दारूचे अड्डे चालवणार्या संतोष शेट्टीला शिक्षण सभापती केले. आया बहिणींच्या डोळ्यातील अश्रू पुसणारे आमदार विवेक पाटील महिलांचे संसार उद्धवस्त होवू नयेत म्हणून डान्सबारवर बंदी आणतात तर राम ठाकूर-प्रशांत ठाकूर यांच्यासारखे वाईट विचारांचे लोक शिक्षण सभापतीपदावर बार मालकाला बसवतात. हा फरक मतदारांनी लक्षात घेतला पाहिजे. केंद्रात काँग्रेस सरकार असल्यामुळे, राज्यात काँग्रेस सरकार असल्यामुळे ही डान्सबारवर बंदी घालता आली नाही. त्यामुळे दररोज असंख्य संसार दारूपायी उजाड होताना दिसत आहेत. कायदे करण्याचे काम विधीमंडळाचे, सभागृहाचे आहे.
- तोच कायदा न्यायालयात येतो. आपली बाजू सरकारने भककमपणे मांडली असती तर त्या कायद्यात पळवाट निघाली नसती. डान्सबारवरची बंदी कायम राहीली असती. पण निष्क्रिय सरकार, निष्क्रिय नेते केंद्रात असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. दारूमुळे अकाली मरण, अपघात आणि पैशाचा नाश या प्रकारातून तरूणांना वाचवायचे असेल, आया बहिणींचे उजाडणारे संसार वाचवायचे असतील तर सक्षम लोकप्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत. आमदार विवेक पाटील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लक्ष्मणभाऊ जगताप यांना लोकसभेत पाठवले पाहिजे. सक्षम कायदे करून महिलांना न्याय देण्यासाठी असे लोकप्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत. प्रत्येकाने मतदानाला जाताना हाच विचार करायचा आहे की माझे मतदान हे डान्सबारला विरोध करण्यासाठी आहे. इटालियन महिलेच्या तालावर नाचणार्या देशाला वाचवण्यासाठी मी हे मतदान करत आहे. काँग्रेसने निवडणुकीत तिकीटे सगळ्या भ्रष्ट लोकांना दिलेली आहेत. भ्रष्टाचाराचा आदर्श घालून दिलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काँग्रेसने तिकीट दिलेले आहे. काय चालले आहे हे?
- बॉम्बस्फोट खटल्यातील गुन्हेगार म्हणून शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तला सहा सहा महिने रजा मिळते आणि तुरूंगात न राहता तो घरी येतो. काय अर्थ आहे अशा शिक्षेला? अशा गुन्हेगारांना पाठीशी घालणार्या काँग्रेसने संजय दत्तची बहिण प्रिया दत्त यांना तिकीट दिले आहे. आपल्या पदाचा वापर प्रिया दत्त फक्त संजय दत्तला वाचवण्यासाठी करणार. अशा लोकांना आपण निवडून देणार आहोत? त्यांना हटवण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने मतदान करायचे आहे. मतदान करताना बाहेर पडताना या सगळ्या दुष्ट प्रवृत्तींना आपण विरोध करण्यासाठी मतदान करणार आहोत हा विचार करून बाहेर पडायचे आहे. म्हणजे योग्य बटण दाबले जाईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा