मराठी माणूस पराभूत करायचा असेल तर तो विभाजनाने सहज करता येतो हे तत्त्व बिगर महाराष्ट्रीयन लोकांनी सातत्याने जपले आहे. मराठी माणसाच्या विरोधात तमाम अमराठी लोक आपले पक्षभेद विसरून एकत्र येतात हे मराठी माणसांनी लक्षात घेतले पाहिजे. अगदी आपले पाप लपवण्यासाठी त्या मराठी माणसाला बदनाम करण्यासाठी सगळे एक होतात ही चिंतेची बाब आहे. यासाठीच तमाम मराठी माणसांनी या लोकांना धडा शिकवायला एकत्रित येण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. अस्वच्छ काम करून पाणी पुरी विकणार्या पाणीपुरी वाल्याचे ठाण्यातल्या अंकिता राणे या मुलीने चित्रीकरण केले. त्यामुळे सगळीकडे पाणीपुरी विक्रेत्याविरोधात संतापाची लाट आली. पाणी पुरी आणि अन्य पदार्थ विक्रेत्यांना व्यावसायिक फटका बसू लागला. त्यामुळे या परप्रांतिय विक्रेत्यांचा कनवळा इथल्या तमाम परप्रांतियांच्या नेत्यांना आला. पण एकालाही असे वाटले नाही की आपल्या प्रांताची लाज राखण्यासाठी स्वच्छता पाळण्याचा संदेश आपण द्यावा. भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष राज पुरोहीत यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर या पाणीपुरी विक्रेत्यांचा मेळावा घेतला. त्यात या विक्रेत्यांची मते आणि मने जिंकण्यासाठी ज्या मुलीने चित्रिकरण केले त्या अंकीता राणेबद्दल वाईट शब्द वापरले. त्यामुळे या परप्रांतियांची महाराष्ट्राला मुलींबद्दल, माणसांबद्दल काय भावना आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आज अनेक दशके या मुंबईने आणि महाराष्ट्राने संपूर्ण देशातील परप्रांतियांना पोसले आहे. आसरा दिला आहे. पण ज्या ताटात खातो त्याच ताटात घाण करण्याच्या या परप्रांतियांच्या प्रवृत्तीला तिथेच ठोकले नाही तर आज आपल्याला घाण खायला लावणारे उद्या आपली घरे लुटायला कमी करणार नाहीत याची जाणिव ठेवावी लागेल. का नाही राज पुरोहीतांना वाटले की मी तमाम फेरीवाल्यांच्या वतीने महाराष्ट्राची माफी मागतो पण त्यांच्या हातून पुन्हा गैरकृत्य होणार नाही असा निर्वाळा देण्याचे धाडस राज पुरोहीतांना का झाले नाही? याचा अर्थच असा आहे की हे परप्रांतीय रस्त्यावरचे विक्रेते कधी स्वच्छ होणे शक्य नाही. शेणातल्या किड्यांना शेणाचीच गोडी वाटते त्याप्रमाणे ते शेणातच राहणार. त्यामुळे त्यांनी शिजवलेले शेण आपण खायचे नाही याचा निर्धार तमाम मराठी माणसाने केला पाहिजे. या लोकांना पोटाला चटके बसल्याशिवाय सुधारणार नाहीत. आज आमच्याच खिशातला पैसा काढून आमच्यावरच कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणार असतील तर त्यांना त्यांच्या राज्यात परत जाण्यास प्रवृत्त करणे ही महाराष्ट्राची गरज आहे. महाराष्ट्राचा तो स्वभावधर्म असला पाहिजे. इथे वागायचे असेल तर सन्मानाने वागा पण आमचा सन्मान राखा, महाराष्ट्राचा सन्मान राखा अन्यथा गाशा गुंडाळा असा सल्ला आपण द्यायला शिकले पाहिजे. मतांच्या राजकारणासाठी भांडवलदार पक्षांनी माणसं घुसवायचा प्रकार चालवला आहे. इथल्या लोकांना बेरोजगार ठेवायचे, स्थानिकांना न्याय द्यायचा नाही आणि बाहेरचे आणायचे. मतांचे गठ्ठे तयार करण्याची ही निती भांडवलदार पक्षांची आहे. हीच निती काँग्रेस वापरते, हीच निती वापरून भाजप त्याचे अनुकरण करू पहात आहे. मराठी माणसाला परावलंबी बनवण्याचे धोरण या लोकांचे चालले आहे, त्यामुळेच ते आपली पिळवणूक करत आहेत. यासाठी सर्वात प्रथम या भैय्यांना येथून हाकलावे लागेल. स्वच्छ वागायचे नसेल तर भैय्या चलेजाव असे म्हणावेच लागेल. या देशातून, महाराष्ट्रातून काँग्रेसला सत्तेवरून दूर करण्याचा एकमेव फॉर्म्युला आहे, तो म्हणजे हे भय्ये आणि परप्रांतीय मतदार घुसवून, बोगस मतदान करून जो निवडून येण्याचा काँग्रेसचा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला रद्द करणे हेच याला चोख उत्तर असणार आहे. यासाठी प्रत्येक मराठी माणसाने आपल्या आवडी निवडी बदलल्या पाहिजेत. आपल्या आवडी निवडीत मराठीपण असले पाहिजे. ते मद्रासी आणि दाक्षिणात्य लोक कुठेही गेले तरी आपल्या सवयी सोडत नाहीत. भाताचे मुटके करून, समोरच्याला किळस वाटेल असे जेवतील पण त्यांच्याच पद्धतीने जेवतील. मग आम्ही आमचे पदार्थ का आमच्या पद्धतीने खाउ शकत नाही? खर्या अर्थाने समृद्ध अशा पाककृती आणि अन्नपदार्थ आमचे असताना त्यांना डावलून आम्ही या लोकांना कशासाठी मोठे करत आहोत. आम्हाला घाण खायला लावणार्यांना इथून हाकलले पाहिजे. लावा उधळून त्या अस्वच्छ आणि रोगराईला, साथीच्या रोगांना कारणीभूत ठरणार्या पाणीपुरी, भेळपुरीच्या गाड्या. तीथे टाका आमचा कांदेपोह्यांचा गाडा. येउ देत आमचे वडा पाव आमच्याच माणसांच्या कढईतून बाहेर. टाका एखाद्या ठिकाणी शिरा, उप्पीट आणि दडपे पोह्यांचा गाडा. उचला तो इडली सांबार, इडली चटणीचा, आंबोळी, डोसेवाल्याचा स्टॉल. टाकी तीथेच आपले खमंग थालिपीठ आणि त्यावर द्या लोण्याचा गोळा. येउ देत आमचे कैरीचे पन्हे, कोकमचे सरबत रस्त्यावर. मिळू देत मराठी माणसांचे पदार्थ मराठी माणसांना. खायचेच असतील इतर प्रांतीयांचे पदार्थ तर ते आपल्या घरातील गृहीणींना आपल्याच घरात बनवायला सांगा. त्यानिमित्ताने नवनवे पदार्थ मराठी महिलांना येतील. कशाला हवे आपल्याला परावलंबीत्व. आपला पाकखाना स्वयंपूर्ण असताना ती भैय्याची कुबडी टाकून द्या. त्या कुबड्या आपल्याला आहेत, तशाच सरकारला आहेत. त्यांच्या जिवावर तर सरकार निवडून येत आहे. टाका मराठी माणसांचा गाडा रस्त्यावर. ठेवा तयारी पोलिसांना हप्ता देण्याची. ठेवा तयारी स्थानिक गुंड नामक कार्यकर्त्यांना पोसायची. हे सगळे केल्याशिवाय दुसर्याच्या जागेवर कब्जा करण्याची ताकद आपल्यात येणार नाही. आज आमच्याच जागेत, आमच्याच घराबाहेर, आम्हाला न विचारता घुसखोरी होते. त्याबाबत आपण कोठेही तक्रार करू शकत नाही. कारण अतिक्रमण हटवणारे पथक येणार असल्याची बातमी त्या कार्यालयातूनच आधी येते आणि त्यांना सहीसलामत सोडवते. हे सगळे संघर्ष करण्याची तयारी मराठी माणसाने ठेवली तर काहीच अवघड नाही. नाही खाणार आम्ही परप्रांतीय विक्रेत्यांचे पदार्थ असा निर्धारच आम्हाला केला पाहिजे, तरच हे पुरोहीतांसारखे नेते आमच्या डोक्यावर मिरे वाटणार नाहीत. आज या पुरोहितांसारख्या उपर्यांना मराठी माणसाच्या आरोग्याची काळजी करण्याचे कारण नाही. त्यांचे हित फक्त त्यांच्या माणसांशी आहे, त्यांच्या सत्तेच्या मार्गाशी आहे.(7 मे 2011)
सोमवार, १४ एप्रिल, २०१४
पुरोहीतांचे हीत कशात?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा