- गांधीशाहीचा अस्त आता दूर नाही
- 2014 ची लोकसभा निवडणूक ही भारतीय लोकशाहीच्या इतिहासात आणखी एक मैलाचा दगड ठरणार आहे. कारण या निवडणुकीत प्रत्येकजण सर्वशकतीनीशी लढण्यासाठी उतरला आहे. या निवडणुकीत उत्साह आणि उत्सुकता अत्यंत शिगेला पोहोचलेली आहे. पहिल्यांदाच सर्वपातळीवर मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले जात आहे. ही खरी परिवर्तनाची लाट म्हणावी लागेल.
- वर्षानुवर्षे, दशकानुदशके निवडणुका होत होत्या. पण मतदानाची टककेवारी दिवसेंदिवस कमी होत चालली होती. प्रत्येक निवडणुकीत अमूक इतके हजार मतदार वाढले. तमूक इतके टकके मतदार वाढले. अशा बातमया येत होत्या. पण ज्या प्रमाणात मतदारांची संख्या वाढत होती, मतदार याद्या वाढत होत्या त्याप्रमाणात मतदान करण्यासाठी मतदार बाहेर पडत नव्हते. त्यामुळे मतदानाचा टकका घसरत चालला होता. लोकसभा निवडणुकीला 35 ते 52 च्या दरमयान मतदान झालेले दिसत होते. हे असे का होत होते?
- तर मतदान करणारी मंडळी तीच ती होती. मतदानाची टक्केवारी घसरायची. पण मतदान करणारे लोक पूर्वीचे जे होते तेच करत होते. नवमतदार मतदान करत नव्हता. नवमतदारांना मतदानापासून रोखले जात होते. त्यांची नावे यादीत असूनही त्याची जाणिव करून दिली जात नव्हती. त्यामुळे तीच माणसे, नेहमीचीच माणसे मतदान करत होती.
- महाराष्ट्रातला मोठा मतदारसंघ म्हणून ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नाव घेतले जाते. फार पूर्वीपासून या मतदारसंघात सर्वात जास्त मतदार होते. 2004 च्या निवडणुकीत या मतदारसंघात 48 टक्केच्या आसपास मतदान झाले होते. 2008 ला या मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली तेव्हा 37 टक्केच्या आसपास मतदान झाले होते. या तीन वर्षात जवळपास 15 टक्केंनी मतदार वाढले होते. 2007 ला झालेल्या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने नवमतदार नोंदवले गेले होते. परंतु लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का पुन्हा कमी झाला. 48 टक्केच्या हिशोबाने 2004 मध्ये साधारण 8 लाख मतदारांनी मतदान केले होते. मतदार वाढल्यावरही पोटनिवडणुकीत 2008 मध्ये 8 लाखाच्या आसपासच मतदान झाले होते. त्यामुळे चित्र असे होते की मतदारयादीतील नावे वाढत आहेत. पण मतदान करणारे ठराविक लोकच आहेत. त्यामुळे तेच लोक पुन्हा पुन्हा मतदान करतात आणि तेच लोक पुन्हा पुन्हा निवडून येतात.
- म्हणूनच ही निवडणूक अत्यंत परिवर्तनाची अशी आहे. प्रस्थापित अशा काँग्रेसने नवमतदारांना मतदानापासून रोखण्याचे विविध फंड हाताळले. त्यावर निर्बंध आल्यामुळे आता परिवर्तन अटळ आहे. काँग्रेस कशाप्रकारे मतदारयादीत फेरफार करते, मतदानापासून मतदारांना अंधारात ठेवते याचे उदाहरण आपण खारघरमध्ये पाहिले आहे. खारघर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पनवेल काँग्रेसने बरीच हेराफेरी केली होती त्यामुळे जागृत नागरिकांनी आक्षेप घेतले. त्यामुळे महिनाभर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. मतदारांना फसवण्याचे काँग्रेसचे षडयंत्र धुळीस मिळाले. त्यामुळे खारघरमधून काँग्रेस हद्दपार झाली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीत काहीतरी घोटाळा करण्याच्या हेतुने राम ठाकूर यांनी कट केला. तहसिलदार कार्यालयातील काही कर्मचार्यांना हाताशी धरून मतदारओळखपत्र वाटपाचे काम आपल्या शाळेकडे घेतले. इथल्या शिक्षकांना ऐन परिक्षांच्या काळात हे काम करायला लावले. हे करताना यादीतील अनेकांची नावे गायब केली. आपल्या गुंडांना या शाळेत बसवले आणि अनेकांची ओळखपत्रे आणि नावे गायब केली. जी नावे इंटरनेटवर आहेत, तहसिलदार कार्यालयातील यादीत आहेत ती नावे राम ठाकूर यांच्या यादीतून गायब होतात. मतदारांना तुमचे नावच यादीत नाही असे सांगून मतदानापासून रोखण्याचे कारस्थान काँग्रेसमध्ये सुरू आहे. साधारण जी मते आपल्याला मिळणार नाहीत असे वाटते ती नावे गायब करायची, त्यांची ओळखपत्रे गायब करायची हे प्रकार सुरू केले आहेत. या प्रकारांना आळा बसल्याशिवाय कसे परिवर्तन घडणार? कशी मतदानाची टक्केवारी वाढणार? सामान्य माणसाने मतदान केंद्रावर जावून भांडत बसायचे का? माझे नाव यादीत आहे, निवडणूक आयोगाच्या यादीत आहे, पण मतदानकेंद्रावरच्या यादीत नाही म्हणून त्याने मतदानापासून वंचित रहायचे का? राम ठाकूर यांच्यासारखे दुष्ट लोक मतदान यादीत फेरफार करत असताना सामान्य माणसांनी गप्प बसायचे का? पवन चांडक यांच्यासारख्या तहसिलदारपदावर असलेल्या अधिकार्यांनी कसलीही शहानिशा न करता राम ठाकूर यांचे महणणे बरोबर आहे असे जाहीर वकतव्य करणे हे अत्यंत चुकीचे आहे. मतदानाची टककेवारी वाढवण्यासाठी असे गैरप्रकार रोखले गेले पाहिजेत. एकीकडे मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे प्रशासनापुढे आव्हान असताना पवन चांडक यांच्यासारखे अधिकारी राम ठाकूरांसारख्या गैर प्रवृत्तीला पाठीशी घालत असतील, गुंडशाहीला पाठीशी घालत असतील तर ते लोकशाहीला मारक आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
- पनवेल काँग्रेसची गुंडगिरी रोखण्यात प्रशासनाला अपयश येत असले तरी देश पातळीवर प्रशासनाने मतदान जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले आहेत. बहुतेक सरकारी कार्यालयातून मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. वेगवेगळ्या सामाजिक संस्था, संघटना, आस्थापना मतदान करा असा प्रसार आणि प्रचार करताना दिसत आहेत. भित्तीपत्रके, फलक लावून, प्रचारफेरी काढून मतदान करण्याबाबत जनजागृती करीत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढणार आहे हे निश्चित. जी टक्केवारी 50 च्या आसपास घुटमळत होती तीचे प्रमाण 60 ते 65 च्या पुढे नेले म्हणजे परिवर्तन निश्चित आहे.
- आज सत्ताधार्यांचा त्रास हा प्रत्येक घटकाला होत आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे ती काँग्रेस एक देशविघातक शक्ती आहे याची जाणिव सर्व स्तरातून होताना दिसत आहे. त्यामळे अगदी डॉक्टर आणि हॉटेलचालकही यासाठी आव्हान करत आहेत. मुंबईतील एका हॉटेलमध्ये मतदान केल्याची खूण दाखवा, बोटावरची शाई दाखवा आणि हॉटेलच्या बिलात 25 टक्के सूट मिळवा असे आवाहन केले आहे. तर अनेक हॉस्पिटलमधून तपासणी फी मध्ये सवलत देण्याचे जाहीर केले आहे. मतदारांमध्ये वेगवेगळ्या पातळींवरून होणारे हे प्रयत्न अत्यंत स्वागतार्ह आहेत. फक्त मतदार मतदान करण्यासाठी मतदानकेंद्रावर आला आणि राम ठाकूर यांच्यासारख्या गैरप्रवृत्तींनी त्यांना तुमचे नावच यादीत नाही सांगून रोखले तर प्रशासन काय बंदोबस्त करणार आहे हा खरा प्रश्न आहे. आज या देशात परिवर्तनाची लाट आहे. पण ती लाट थोपविण्यासाठी गैरमार्गांचा अवलंब करणे हेच काँग्रेसकडून होणार आहे.
- दारू आणि पैशाचा, बळाचा वापर करून मतदारांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न काँग्रेसमधून होत आहे. गेल्या चार दिवसात किती रककम पोलिसांनी पकडली आहे? किती दारूचा साठा पकडला गेला आहे याकडे लक्ष दिले पाहिजे. नागपूरात काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार यांची मतदारांना वाटण्यासाठी घेवून चाललेल्या पैशाची गाडी पकडली. कोट्यवधी रूपयांच्या नोटा या गाडीत सापडल्या. या गाडीची चावी देण्यास मुत्तेमवार तयार नव्हते त्यामुळे निवडणूक आयोगाने ही गाडीच ताब्यात घेतली होती. असाच प्रकार पंढरपूर, सांगली अनेक ठिकाणी घडला. दारूच्या बाटल्या आणि पैशाचा ढीग याचा वापर करून, बळाच्या वापराने निवडणुका जिंकण्याचे काँग्रेसचे मनसुबे आहेत. पण यावर मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडणे हाच उपाय आहे.
- या निवडणुका सत्ताधारी, विरोधक यांच्याबरोबरच प्रसारमाध्यमे, सोशल मिडीया, प्रशासन यांच्यातही होत आहेत. सर्व पातळीवरून होणार्या या निवडणुकीत नवमतदारांनी मतदानाला निर्भयपणे बाहेर पडण महत्त्वाचे आहे. मतदानाचा टक्का वाढवून या देशात खर्या लोकशाहीची स्थापना होणार आहे. काँग्रेसच्या गांधीशाहीचा अस्त आता दूर नाही.
बुधवार, ९ एप्रिल, २०१४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा