दादांनी करंगळी दाखवली तर, साहेबांनी लोटा घेतला...
दादांनी करंगळी दाखवली तर,
साहेबांनी लोटा घेतला...
- युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं. निवडणुका हे युद्धच. त्यामुळे एरव्ही आपल्या पक्षकार्यकर्त्यांचे कान उपटणारे शरद पवार यातून वाचले आहेत. नाहीतर त्यांनी हातात लोटा घेतला असताना तशी टिका त्यांच्यावर झाली असती.
- धरणात पाणी कुठून आणायचं हे सांगताना करंगळी वर करून दाखवणारे अजित पवार यांनी आपल्या भाषणातून आपल्या असमर्थतेची कबुलीच दिली होती. कारण धरणात करंगळी वर करून पाणी भरायचं असं महाराष्ट्रातल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं असतं तरी धरण भरणं सोडा, पण जमिन ओलीही झाली नसती. धरण मोठं आहे म्हणून नाही तर राष्ट्रवादी खूप छोटा आहे म्हणून. मात्र धरण भरणाची, पाणी अडवण्याची आणि जनतेला पाणी पाजण्याची ताकद गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात निश्चित आहे.
- साहजिकच सगळे लोक देशभरात नमो नमो करताना दिसतात. या मोदींचे कौतुक शरद पवारांना सहन झाले नाही आणि त्यांनी आपली प्रचाराची पाळी घसरवली. आता शरद पवारांकडून हे वक्तव्य अपेक्षित नाहीच. पण तरीही युद्धात आणि निवडणुकीत सगळं क्षम्य असतं म्हणून सोडून द्यावे लागेल. अन्यथा अन्य कोणी असे वक्तव्य केले असते तर शरद पवारांनी त्याच कान उपटले असते. पण पवारांचे कान कोण उपटणार?
- मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे सगळेजण मोदी मोदी करतात त्यावर शरद पवारांनी वक्तव्य केले की, सकाळ दुपार संध्याकाळ लोक तेच नाव घेतील. म्हणजे सकाळी उठल्यावर जाताना( इथे हातात लोटा धरून) खूण करून शरद पवारांनी हशा मिळवायचा प्रयत्न केला. पण लोटापरेडची आठवण मोदींमुळे शरद पवारांना व्हावी हे त्यांच्यातील हरल्याचे लक्षण आहे.
- काही केल्या काँग्रेसचे सरकार सत्तेवर येणार नाही. राष्ट्रवादीला फारसे यश मिळण्याची चिन्ह नाहीत. 21 जागा लढविणारी राष्ट्रवादी आणि 400 जागा लढविणारा भाजप. यांच्यात तुलनाच होवू शकत नाही. त्यामुळे मानसिक पराभवाने आलेल्या नैराश्यातून पवारांकडून मोदींवर टिका केली आहे. पण याच मोदींचा लोटा उचलून नेण्याची वेळ भविष्यात पवारांवर येवू नये म्हणजे मिळवली म्हणावे लागेल.
- नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी जे आपत्ती निवारण महामंडळ उभे केले होते, तेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी मोठ्या मनाने या मंडळाचे अध्यक्षपद शरद पवारांना दिले होते. याचा फायदा शरद पवारांना होईल असा कधी विचार वाजपेयींनी केलेला नव्हता. पण आज गुजरात भूकंपानंतर शरद पवारांनी मोदींना मदत दिली म्हणून सोशल मिडीयावरून अपप्रचार केला जात आहे. ज्या मंडळाचे अध्यक्षपद शरद पवारांना भाजपमुळे मिळाले त्याचा कसला टेंभा मिरवता?
- आता या निवडणुकीत नरेंद्र मोदीच्या पक्षाचे जास्तीत जास्त खासदार निवडून येतील. त्यांना कमी पडणार्या संख्याबळासाठी राष्ट्रवादी पुढे येणार यात शंकाच नाही. मित्र पक्ष जोडण्याची भूमिकाही शरद पवारच करणार आहेत. याची भिती काँग्रेस बोलून दाखवत आहे. त्यामुळे या बदल्यात आपल्या लोट्यात पवारांना मोदींचेच पाणी वाहावे लागेल.
-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा