मंगळवार, ८ एप्रिल, २०१४

अब की बार...

सध्या देशात परिवर्तनाची लाट आहे. आत्ता नाही तर कधीच नाही अशा अवस्थेत देश येवून ठेपला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला हटवू शकणार्‍या नरेंद्र मोदींची साथ हा देश करणार नसेल तर आपल्याला कसलीही अपेक्षा ठेवता येणार नाही. कारण गेल्या सात दशकात काँग्रेसने या देशाची एवढी वाट लावली आहे की देश एका प्रगतीपथावर आणायचा असेल तर ‘अब की बार, मोदी सरकार ’असेच म्हणावे लागेल.
प्रत्येकाने विचार केला पाहिजे की, या देशात सुरवातीपासून जेवढ्या वाईट गोष्टी झाल्या आहेत तेव्हा काँग्रेसचेच सरकार होते. अगदी या देशाचे तुकडे पडले, भारत पाकीस्तान हे दोन वेगळे देश निर्माण केले तेही काँग्रेसमुळेच. अंखड भारताचे स्वप्न संपुष्टात आणले ते या देशविघातक काँग्रेसमुळेच, हे लक्षात घेतले पाहिजे.
स्वातंत्र्यानंतर या देशातील मुलांना इतिहासाच्या पुस्तकात शिकवले जायचे की काश्मिर हे भारताचे नंदनवन आहे. पण या स्वर्गाप्रमाणे सुंदर असलेल्या काश्मिरची वाट लावली ती या काँग्रेसने, नेहरू गांधी या घराण्यांनी. सुंदर काश्मिरला पाकव्याप्त काश्मिर करून भारताचा तुकडा पाडण्याचे काम केले ते या काँग्रेस सरकारनेच केले हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे स्वातंत्र्यापासून जेवढ्या म्हणून वाईट गोष्टी, संकटे या देशावर आलेली आहेत तेव्हा तेव्हा काँग्रेसचेच सरकार होते. त्यांच्या नाकर्तेपणामुळे हे झालेले आहे म्हणून हे सरकार आपल्याला हटवायचे आहे. त्यासाठी मनामनात घुमले पाहिजे, ‘अब की बार, मोदी सरकार.’
26/11 चा मुंबईवर हल्ला झाला तेव्हा केंद्रात आणि राज्यातही काँग्रेसचेच सरकार होते. हे सरळसरळ पाकीस्तानने मुंबईत घुसून केलेले युद्ध होते. काय करत होते काँग्रेस सरकार? कुठे होती सरकारची गुप्तहेर यंत्रणा? कशी घुसखोरी होवू दिली? हा प्रश्‍न प्रत्येकाने काँग्रेसला विचाराचा आहे. प्रत्येकाने आपल्या मनाला विचारायचा आहे. अशा सरकारला आम्ही निवडून देणार आहोत काय? प्रत्येकाचे अंतर्मन जागृत होईल आणि सांगेल, नाही, अब की बार मोदी सरकार. हे काँग्रेसचे गद्दार सरकार आपल्याला नकोच.
गेल्यावर्षी भारतीय सीमेत चीनी सैन्याची घुसखोरी झाली. भारतीय जमिन चीनने हडप केली. यापूर्वीही असाच प्रकार पंडित नेहरूंच्या काळात झाला होता. तरीही हे सरकार गप्प बसले. कारण हे रड्यांचे, नपुंसकांचे सरकार होते. चीनला आपल्या हद्दीत घुसून, भारतीय भूभाग बळकावू देणारे सरकार काँग्रेसचे होते. असे सरकार आम्हाला नको आहे. यासाठी आपल्याला निर्धार करायचा आहे, ‘अब की बार मोदी सरकार.’
आमचा सैनिक सीमेवर लढतो. त्यामुळे आपण देशात सुरक्षित असतो. पण त्याच सैनिकांची मुंडकी कापून पाकीस्तान नेते तेव्हा पाकीस्तानची पाठराखण करण्याचे काम काँग्रेसचे सरकार करते. हे काम पाकीस्तानने केलेले नाही तर पाकीस्तानी सैन्याच्या वेशात आलेले दहशतवादी होते अशी सारवासारव देशाचे काँग्रेसचे संरक्षणमंत्री करतात. यासारखे दुर्दैव आणखी कोणते असेल? पाकीस्तानची पाठराखण करणारे आणि देशाच्या सैन्याचे अहित चिंतणारे काँग्रेस सरकार आपल्याला नाकारायचे आहे. त्यासाठी एकच पर्याय आहे, तो महणजेे‘ अब की बार, मोदी सरकार.’
भारतीय लष्कराची चेष्टा करण्याचे काम, थट्टा करण्याचे काम काँग्रेसने सतत केलेले आहे. सैन्यासाठी लागणार्‍या बोफोर्स तोफा खरेदीतही काँग्रेसने भ्रष्टाचार केलेला होता. दलाली घेवून या देशाला लुटले आणि सैन्याची फसवणूक केली. हे करणारे लोक कोण होते? तर विद्यमान काँग्रसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे पती राजीव गांधी. काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी. देेशाची फसवणूक करणारे सरकार होते ते काँग्रेसचे होते. म्हणून निर्धार करायचा आहे असे सरकार नको, ‘अब की बार मोदी सरकार.’
कुठे घोटाळा आणि भ्रष्टाचार केला नाही काँग्रेसने? तर असे एकही क्षेत्र सापडणार नाही. भारतीय सैन्याच्या गणवेषाचा पैसा खाण्याचे कामही काँग्रेसने केले. तिथेही भ्रष्टाचार केला. भारतीय लष्कराची छळवणूक करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. समोर शत्रू हल्ला करत असतानाही तो हल्ला परतवून लावण्याचे बळ आणि मानसिकता  सैनिकांमध्ये शिल्लक राहू नये यासाठी काँग्रेसने हरामखोरी केली. त्यांच्या पोषाखाच्या खरेदीत भ्रष्टाचार केला. असले हे बदमाश सरकार उलथवून लावायचे आहे. हा नवा स्वातंत्र्य लढा आहे. सुराज्यासाठी चाललेला हा संघर्ष आहे. या लढाईचा एकच निकाल असला पाहिजे तो म्हणजे ‘अब की बार मोदी सरकार.’
पंजाब हा लढवय्यांचा देश. पंजाब म्हटले की पंजाबचा सिंह लाला लजपतराय आठवतात. पंजाब म्हटले की शहीद भगतसिंग आठवतात. पंजाबी माणसाचे रक्तात देशाभिमान सळसळत असतो. अशा पंजाबी लोकांचे सरदारांचे हत्याकांड काँग्रेसने केले. हजारो निरपराध शीख बांधवांची कत्तल केली. अत्यंत निर्दयपणे त्यांना भोसकून, जाळून मारण्यात आले. हे करणारे लोक काँग्रेसचे होते. देशाचा तुकडा पाडण्याचे प्रयत्न काँग्रेसने केले होते. त्या प्रयत्नाचाच एक भाग हा शीखांचे हत्याकांड होता. अशा देशात फूट पाडणार्‍या, नरसंहार करणार्‍या सरकारला देशाच्या अखंडतेसाठी बाजूला ठेवले पाहिजे. त्याजागी नवे सरकार आले पाहिजे. ते सरकार असेल ‘अब की बार मोदी सरकार.’
भारतीय सीमेवरील युद्धानंतर सीमला करार झाला. आमच्या हजारो सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देवून युद्धात विजय मिळवून दिला. त्यानंतर झालेल्या समझोत्यामध्ये भारताने मिळवलेली जमिन पाकीस्तानला परत करण्याचा अधमपणा याच काँग्रेसने केला. तेव्हा जर समझोता केला नसता आणि सैन्याने मिळवून दिलेल्या त्या विजयाची शान राखली असती तर आज पाकीस्तान भारताला दबून राहिले असते. पण काँग्रेसने साठ वर्षात आमही किती दुबळे आहोत हेच दाखवून दिले. स्वातंत्र्यानंतरचा पहिला पंतप्रधान पंडित नेहरू हा एक रडया आणि आत्ताचे मनमोहनसिंग हे एक दुबळे नेतृत्त्व. या दोन्हींच्या मध्ये जेवढे काँग्रेसचे पंतप्रधान झाले ते सगळे फदे निघाले.
इशान्य भारताचा भाग हा कायम अशांत राहिला आहे. कोणामुळे? कारण या देशात काँग्रेसचे सरकार आहे. आसाममध्ये हिंदू लोकांची सातत्याने  कत्तल होते. हा दहशतवाद निपटून काढण्यासाठी या देशाला समर्थ, बलवान अशा सरकारची गरज आहे. गेली सात दशके ज्यांनी राज्य केले ते दुबळे आणि देशघातक ठरले. म्हणूनच अब की बार, मोदी सरकार हा मंत्र जपायचा आहे. तो सिद्ध करून दाखवायचा आहे. मोदींना देशाचे पंतप्रधान करायचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. देशप्रेमापोटी या देशात काँग्रेस विरोधी लढणार्‍या छोट्या छोट्या शकतीसुद्धा अखेर नरेंद्र मोदींच्याच पाठिशी राहणार आहेत. अगदी शिवसेनेच्या विरोधात लढत असलेले राज ठाकरे यांनीही स्पष्ट केले आहे की माझे निवडून आलेले खासदार मोदींनाच  पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देतील. त्यामुळे छोट्या ताकदींचाही विचार फार महत्त्वाचा असणार आहे. आघाडीतील आहे की युतीतील आहे असा विचार न करता उमेदवार योग्य आहे. मोदींच्या समर्थनार्थ जाणार आहे याचा विचार करून सगळ्या मोदी समर्थकांचा विचार मतदारांनी केला पाहिजे. कारण ही काँग्रेसची घाण या देशातून बाहेर काढायची आहे.
काश्मिरमधून पंडितांना देशोधडीला लावले ते काँग्रेस सरकारच्या काळातच. सीमेवर चहुबाजूंनी आक्रमण होताना शांत बसणारे आणि दहशतवाद्यांना पायघडया घालणारे सरकार हे काँग्रेसचेच. अशा सरकारला हाकलून काढण्यासाठी आता सज्ज व्हायचे आहे. महाराष्ट्र हा मर्दांचा देश आहे. महाराष्ट्रातून या काँग्रेसला इतकया जोरात पेकाटात लाथ घातली पाहिजे की ती काँग्रेस इटालीत जावून पडली पाहिजे. अगदी फूटबॉलप्रमाणे काँग्रेसला उडवायची आहे, कारण अब की बार मोदी सरकार.
राष्ट्रकूल घोटाळ्यात भ्रष्टाचार करून जगभरात भारताची बदनामी करणारे सरकार हे काँग्रेसचे आहे. टू जी स्पेक्ट्रम घोटाळा करणारे आणि देशाला लुटणारे सरकार हे काँग्रेसचे आहे. भारतातील दूरदर्शन हे घराघरात पोहोचलेले माध्यम. या माध्यमाचा जो लोगो होता त्यात सत्यम शिवम सुंदरम हे वाकय होते. ते काढून टाकण्याचा अधमपणा केला तो काँग्रेसनेच. सत्यमेव जयते ला विरोध करण्याचे कामही काँग्रेसनेच केले. कारण सत्य दडपून टाकण्याची निती काँग्रेसची आहे. अशा सत्य दडपून अधर्माचे राज्य आणू पाहणार्‍या काँग्रेसला हाकलून काढण्यासाठी प्रतयेकाने तयार असले पाहिजे. मोठ्या संख्येने मतदान करून अब की बार मोदी सरकार असा नारा द्यायचा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: