दिल्ली उच्च न्यायालयाच्या बाहेर बुधवारी स्फोट झाल्यानंतर स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेण्यासाठी म्हणून राममनोहर लोहिया रूग्णालयात काँग्रेसचे बोलघेवडे युवराज राहूल गांधी गेले. त्यावेळी नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागून राहूल गांधींना अक्षरशा पळून जायला भाग पाडले. जखमींची विचारपूस करण्यासाठी आलेल्या राहूल गांधींना जखमींच्या नातेवाईंकांनी एक शब्दही बोलू दिले नाही तर बाहेरचा रस्ता दाखवला. देशाच्या राजधानीत स्फोट होतो ही एक गंभीर बाब असताना सरकारचा नाकर्तेपणाच समोर आला आहे. राहूल गांधींना जखमींच्या नातेवाईकांनी जवळ येउनही दिले नाही. दिखाउपणासाठी स्टंटबाज राहूल गांधी कुठे स्फोट झाला याची पाहणी करायला गेले. त्यावेळी स्फोटानंतर विविध रूग्णालयांत भेटी देण्यासाठी गेले. ही राहूलची नौटंकी सर्वानाच आता समजू लागली आहे. त्यामुळे जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांनी राहूल गांधींना अक्षरश: हाकलून लावले. ही तर काँग्रेसला या देशातून हाकलून लावायची सुरूवात झाली आहे असेच म्हणावे लागेल. आता जनतेला समजू लागले आहे की या स्फोटाला कोणतीही दहशतवादी संघटना अथवा अन्य बाहेरचे कोणी जबाबदार नाही तर ही काँग्रेसची यंत्रणा जबाबदार आहे. काँग्रेसवाल्यांच्या इच्छेनेच या देशात बाँम्बस्फोट, दहशतवादी हल्ले होत असतात, हे जनतेला समजू लागले आहे. एकाही दहशतवादी हल्ल्यात, बाँम्बस्फोटात काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते कधी सापडत नाहीत. मरतात ते सामान्य नागरिकच मरतात. हे नियोजन कसे घडू शकते? त्यामुळे पुतनामावशीचे प्रेम घेउन आलेल्या राहूल गांधींना नागरिकांनी हाकलून लावले. खरे दहशतवादी काँग्रेसचे नेतेच आहेत हे जनतेने ओळखले आहे. काय ते पी. चिदंबरम? गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडे कसला दरारा आहे की कोणती योजना आहे? लुंगी आणि त्यांच्या धोतरासारखा सुळसुळीत कारभार गृहखात्याचा त्यांनी करून ठेवला आहे. त्यांच्या लुंगीत बाँम्ब लावला तरी त्यांना कळणार नाही इतके ते जागृत आहेत. अशा काँग्रेसच्या दुर्लक्षामुळेच वारंवार या देशात बाँम्बस्फोट होत आहेत. या देशातून दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई केली जाउ शकणार नाही, कारण इथले राज्यकर्ते हे अत्यंत दुबळे आहेत. भित्रे आहेत आणि लाचार आहेत. आपल्यावर कारवाई करण्याची हिम्मत त्यांच्यात नाही हे दहशतवाद्यांनी चांगलेच ओळखले आहे. दिल्लीतील बाँम्बस्फोटानंतर कोणा हुजी नामक संघटनेने त्या स्फोटाची जबाबदारी घेउन अफझल गुरूला फाशी देउ नये अशी मागणी केली गेली. हे सगळे काँग्रेेसचेच नाटक आहे याची जनतेला साक्ष पटल्यामुळेच राहूल गांधींना हाकलून देण्याचे काम जनतेने केले. असे नालायक आणि नामर्द राज्यकर्ते नकोत म्हणून जनतेने राहूल गांधींना हाकलून दिले हे लक्षात घेतले पाहिजे. अफझल गुरूचा हुजी या संघटनेला कालच पुळका का आला? अफझल गुरूला फाशी शिक्षा सुनावून सात वर्ष झाली आहेत. सात वर्ष त्यांच्या फाशीवर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केलेले नाही, म्हणून जनता संतप्त आहे. राष्ट्रपतींकडे शिफारस करण्यासाठी काँग्रेस सरकारने कायम टाळाटाळ केली. या सात वर्षाच्या काळात जोपर्यंत काँग्रेस सरकार अफझल गुरूचे रक्षण करत होती तोपर्यंत हुजीने तोंडही उघडले नाही. पण अफझल गुरूच्या फाशीचा विषय विरोधकांकडून वारंवार येउ लागला. काँग्रेस विरोधी वातावरण झाले. राष्ट्रपतींकडे हा अर्ज पेंडींग आहे. त्यावर निर्णय घेण्याची शक्यता निर्माण होताच लगेच दिल्लीत असा स्फोट होतो. पाठोपाठ अफझल गुरूची फाशी रद्द करावी अशी मागणी करून हा स्फोट आम्ही केला आहे अशी जबाबदारी घेतली जाते. यामागे कुठेतरी काँग्रेसचे राजकारण आहे हेच दिसून येते. याबाबत काँग्रेसने कितीही गुप्तता राखण्याचा प्रयत्न केला तरी जनतेने हा खोटेपणा ओळखला आहे. या बाँम्बस्फोटांमागे अफझल गुरूला वाचवण्याची काँग्रेसची धडपड चाललेली आहे याची जाणिव जखमी लोकांच्या नातेवाईकांना झाली म्हणूनच राहूल गांधींना नागरिकांनी हाकलून दिले. त्यांचे नशिब चांगले म्हणून नाहीतर धक्के मारूनच राहूल गांधींना नागरिकांनी संतापाच्या भरात बाहेर काढले असते. सात वर्षात इतके बाँम्बस्फोट झाले. पण त्या कोणत्याही बाँम्बस्फोटात हुजी या संघटनेने जबाबदारी स्वीकारली नाही किंवा कोणत्याही संघटनेने अफझल गुरूची फाशी रद्द करा अशी मागणी केली नाही. कारण काँग्रेस अफझल गुरूचे रक्षण करण्यासाठी समर्थ आहे याची दहशतवाद्यांना पक्की खात्री होती. पण आता अण्णा हजारेंनी काँग्रेस विरोधात निर्माण केलेले वातावरण पाहता या देशाच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचे दहशतवाद्यांच्या लक्षात आले. त्यामुळे दहशतवाद्यांची पाठराखण करणारे, दहशतवाद्यांचे आणि भांडवलदारांचे दलाल असलेले काँग्रेस सरकार आता समूळ नष्ट होणार याची भिती दहशतवादी संघटनांना वाटू लागली. त्यामुळे दिल्लीतील स्फोटानंतर आता काँग्रेस आपल्याला वाचवू शकणार नाही या भितीने हुजी या संघटनेने धमकीचा प्रकार केला. या सगळ्या स्फोटाला आणि देशांतर्गत दहशतवादाला केवळ आणि केवळ काँग्रेसच जबाबदार आहे हे लक्षात आल्यानेच काँग्रेसचे युवराज राहूल गांधींना जखमींच्या नातेवाईकांनी हाकलून लावले. आपल्या बापाचा खून करणार्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. ती फाशीची शिक्षा 9 सप्टेंबरला दिली जाणार होती. ती होउ नये म्हणून या राहूल, सोनिया, प्रियांका आणि काँग्रेसच्या मंडळींनी केवढा आटापिटा केला होता. परीणामी ती फाशीची शिक्षा दहा आठवडे पुढे ढकलली गेली. ते गांधी कुटुंबिय सामान्य जनतेच्या मरणाचे दु:ख काय समजू शकणार? याची जाणिव होउन जनतेने राहूल गांधींना हाकलून दिले. राहूल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेसचे सर्वच लाचार आणि भ्रष्ट नेते हे इंदिरा गांधी, राहूल गांधी यांच्या मृत्यूचे भांडवल करून त्यागाची परंपरा असल्याचे सांगत होते. पण दहशतवाद्यांना फाशी देउ नये म्हणून या देशात दहशतवादी हल्ले चढवले जाण्याची ही यंत्रणाही काँग्रेसकडून राबवली जात आहे त्यात कसला विचार आहे? त्यागाचा की भोगाचा हे आता काँग्रेसने समजावे. पण एकंदरीत राहूल गांधींना जनतेने तेही दिल्लीतल्या जनतेने हाकलून दिले आहे याचा अर्थ आता धक्के मारून काँग्रेसला गल्ली ते दिल्ली हाकलून देण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे येत्या काही काळात गल्लीबोळातील काँग्रेसची कुत्रीही असेच दहशतीचे प्रकार करू लागले तर त्यात नवल नाही. आपले स्थान अस्थिर झाल्यावर न घर का ना घाट का अशी अवस्था येत्या काही दिवसात गल्लीतल्या कार्यकर्त्यांची होणार आहे. काँग्रेसची समूळ नष्ट होण्याची प्रक्रीया आता सुरू झाली आहे. काँग्रेस ही एक दहशतवाद्यांना पाठीशी घालणारी संघटना असून देशाला लुटायला आलेल्या लोकांचा तो पक्ष आहे याची जाणिव झाल्यानेच राहूल गांधींची हकालपट्टी झाली आहे. भविष्यात हाच कौल मतपेटीतून येणार यात शंकाच नाही. पण आता जनतेने सावध राहिले पाहिजे. कारण काँग्रेसवाले आता मोकाट सुटतील आणि अनेक दहशतवादी हल्ले, दंगली घडवतील यात शंकाच नाही.
- सप्टेंबर 2011
शनिवार, १२ एप्रिल, २०१४
राहूल गांधींना का हाकलून दिले?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा