अयोध्येत ज्या ठिकाणी रामलल्लांची मूर्ती स्थापन करण्यात आली होती, तीच रामजन्मभूमी असल्याचे मान्य करून या जागेवरून रामलल्लांच्या मूर्ती हटवण्यात येउ नयेत असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठाने दिला. त्याचप्रमाणे वादग्रस्त जमिनीचे तीन भाग करून मूळ भाग रामजन्मभूमीसाठी, दुसरा भाग निर्मोही आखाड्याला तर तिसरा भाग सुन्नी वफ्फ बोर्डाला देण्यात यावा असेही म्हटले आहे. गेली 60 वर्ष प्रलंबित असलेल्या या खटल्याचा एकदाचा निकाल गुरूवारी लागला. अतिशय गुंतागुतीच्या केलेल्या खटल्याचा निकाल अगदी सहजपणे दिला गेला आहे. गेल्या साठ वर्षात पुलाखालून किती पाणी गेले याचा हिशोब नव्हता. पण अयोध्या प्रश्न देशातील राजकारण्यांनी विशेषत: काँग्रेसनी गुंतागुंतीचा करून देशभरातील हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण केली. ब्रिटीशांच्या काळात ब्रिटीशांचा विरोधीपक्ष म्हणून अस्तित्वात आलेल्या काँग्रेसने तहहयात ब्रिटीश नितीचाच वापर केला आहे, त्याची जाणिव पुन्हा एकदा या खटल्यात गुंतागुंत निर्माण करण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेतून दिसून आली आहे. भावाभावात, जातीजातीत, धर्माधर्मात भांडणे लावण्याची ब्रिटीशांची निती काँग्रेसकडून राबवली जात असल्यामुळे स्वातंत्र्यानंतर कायम हिंदू मुस्लिम तेढ कशी राहील हे काँग्रेसने पाहिले. प्रत्यक्षात मुस्लिम मतांवर डोळा ठेवून धर्मांध शक्ती निर्माण करण्याचे पाप काँग्रेसने केले. त्याचाच एक भाग म्हणजे अयोध्या जन्मभूमीला वादग्रस्त बनवण्याचा केलेला प्रयत्न होता. गेली साठ वर्ष हा खटला अकारण प्रलंबीत ठेेवून त्यामुळे फार मोठा गजहब होईल असे वातावरण काँग्रेसने केले. अयोध्येचा विषय म्हणजे अणूबाँम्ब आहे असे वातावरण करत तो मुद्दा दाबून ठेवला गेला. त्यामुळे जनतेमध्ये चीड निर्माण होत गेली. विरोधीपक्षांना समाजकारण आणि विकासाच्या कामांवरून हटवून स्वत:च्या भ्रष्टाचाराला झाकण्यासाठी काँग्रेसने हिदुत्ववादी होण्यास प्रवृत्त केले. त्यासाठी अयोध्येतील रामाचा वापर केला. आज साठ वर्षांनी हा लागलेला निकाल म्हणजे काँगे्रसच्या पापाचा घडा भरल्याची साक्ष आहे. हा निकाल काही दशकांपूर्वी आला असता तरी यापेक्षा वेगळा येणे शक्य नव्हते. न्यायालयाने दिलेला निर्णय हा अतीशय चांगला आहे. तोच निकाल काही वर्षांपूर्वी आला असता. पण तो निकाल टाळून, पुढे ढकलून हिंदू मुस्लिमांना भडकावण्याचे काम काँग्रेसने केले आणि आपण किती गांधीवादी आहोत, अहिंसावादी आहोत याचे खोटे पाठ केले. जो निकाल या देशातील जनतेला अभिप्रेत होता, हवा होता तोच निकाल याठिकाणी लागला आहे. दोन्ही धर्मियांकडून याचे स्वागत केले गेले आहे. पण हा निकाल लवकर बाहेर पडू नये व हा भाग वादग्रस्त व्हावा हे काँग्रेसने प्रयत्न केले आहेत. या निकालामुळे खर्या अर्थाने हिंदू मुस्लिम यांच्यात सलोखा साधला जाईल असे प्रयत्न झाले आहेत. दोन्ही धर्मियांनी या निकालाचे स्वागत केले आहे. नेमके जे काँग्रेसला नको होते ते घडले आहे. राम कोणा हिंदूंचा नव्हता किंवा मुसलमानांचा विरोधक नव्हता. तो भारतीयांचा होता. पण तो हिंदूंचा होता असे भासवून काँग्रेसने आपली साठ वर्ष पोळी भाजून घेतली. आपल्या पोळीवर तूप ओढायचे प्रयत्न केले. पण आता हे वास्तव समोर आल्यावर खर्या अर्थाने भारतीयांनी काँग्रेस चले जाव म्हणायची आता वेळ आली आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालात अयोध्या ही रामाची जन्मभूमी होती हे मान्य केले आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याच्या आधारे सापडलेल्या अवशेषावरून येथे मंदीर होते हेही मान्य केले आहे. मशिदीच्या जागी सापडलेल्या मंदीराच्या अवशेषावरून येथे राममंदीर होते असा स्पष्ट निकाल देताना न्यायालयाने म्हटले आहे की हा निकाल म्हणजे कोणाचाही पराभव नाही आणि कोणाचाही विजय नाही. हे फार महत्त्वाचे असे वाक्य आहे. आपले ईप्सित साध्य करण्यासाठी काँग्रेसने धमार्र्ध शक्ती निर्माण करण्याचे केलेेले पाप यातून उघड झाले आहे. बाबराने बांधलेली ही मशिद इस्लाम धर्माच्या नियमानुसार बांधलेली नव्हती. त्यामुळे मुस्लिम धर्मियांनाही त्याबाबत कसलेही आकर्षण नव्हते. ती मशिद म्हणून मान्य नव्हती. याच आधारावर न्यायालयाने निर्णयही दिला आहे. पण हेच म्हणणे काँग्रेसने कधी मान्य केले नव्हते. मशिद तुमची आणि मंदीर हिंदूंचे असा वाद आहे असे काँग्रेसने अकारण बिंबवल्यामुळे या खटल्यात साठ वर्ष वाया घालवली गेली. देशाची साठ वर्ष धार्मिक तेढ निर्माण करण्यात काँग्रेसने वाया घालवली. त्यामुळे या निकालातून देशाचा खरा शत्रू हा काँग्रेस आहे हे स्पष्ट झाले आहे. कोणताही आक्षेप असणारा किंवा कोणालाही नाराज न करणारा असा परिपूर्ण निकाल न्यायालयाने दिला आहे. हाच निकाल पूर्वीही लागला असता. पण तो लागू नये यासाठी काँग्रेसने केलेले प्रयत्न हा दुष्टपणाचा कळस म्हणावा लागेल. अयोध्या प्रकरण वादग्रस्त आणि काहीसे भयावह आहे यासाठी निर्माण केलेले भयावह वातावरण हे फार मोठे पाप काँग्रेसने केले आहे. गेल्या दहा दिवसात या खटल्याचा निकाल लागेल या पार्श्वभूमिवर अतिदक्षतेच्या नावाखाली जनमनावर आणलेले दडपण हा प्रकारही काँग्रेसच्या दुष्ट राजकारणाचा एक भाग आहे. पण आज खर्या अर्थाने परिपूर्ण निर्णय देउन न्यायालयाने आपले काम चोख केले आहे. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवल्यावर सगळे काही व्यवस्थित होउ शकते हे सिध्द करणारा हा निकाल म्हणून त्याचे स्वागत करायला पाहिजे. मात्र काँग्रेसच्या सरकारने न्यायव्यवस्थेत अकारण हस्तक्षेप करीत या देशातील खटले वर्षानुवर्षे आणि दशकानुदशके लांबवत ठेवले आणि वादग्रस्त म्हणून ते चर्चेत ठेवले. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न असाच रखडत ठेवून काँग्रेसने राजकारण केले आहे. ठिकठिकाणी वादग्रस्त विषय निर्माण करणे ही काँग्रेस सरकारची खासियत बनत चालली आहे. पण न्यायालयाने अयोध्या प्रकरणाचा निकाल देउन या सर्व चर्चांना लगाम लावला आहे. कसल्याही कायद्याच्या बंधनातून नव्हे किंवा वनवासातून नव्हे तर अयोध्येतील रामाची काँग्रेसी जाचातून सुटका झाली आहे. या देशाला महासत्ता बनवू न देण्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न होत आहेत. अमेरिका, चीन असे असंख्य स्पर्धक देशांना भारताने मोठे व्हावे असे वाटत नाही. त्यासाठी देशांतर्गत अशांतता माजलेली त्यांना हवी आहे. नेमके तेच काम काँग्रेसकडून होत आहे. आता शांतता अबाधीत राहून या देशात आदर्श रामराज्य येण्यासाठी धार्मिक सलोखा फार महत्त्वाचा आहे. ही काँग्रेसच्या दृष्टीने अडचणीत आणणारी बाब असली तरी काँग्रेसच्या भूलथापांना बळी न पडता सर्वांनीच आता संयमाने वागावे असेच यानिमित्ताने म्हणावेसे वाटते. अयोध्येला अवध असेही म्टटले जाते. रामायणात अयोध्येचा पराभव करू शकेल , वध करू शकेल असे कोणी नव्हते म्हणून शरयू तीरावरच्या या नगरीला अवध नगरी म्हणून ओळखले जात होते. आज दिलेला निर्णयही असाच आहे. यातून नाही हिंदूची हार झालेली आहे अथवा नाही मुसलमानांची जीत झाली आहे. इथे भारताच्या अस्मितेचा हा विजय झालेला आहे. म्हणून हा निर्णयही अवध निर्णय आहे.(1 आँक्टोबर 2010)
शनिवार, १९ एप्रिल, २०१४
अवध निर्णय
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा