कोरोनाचा भारतात शिरकाव होऊन एक वर्ष पूर्ण होऊन गेले. आता पुढच्या आठवड्यात लॉकडाऊनची वर्षपूर्ती होईल, पण यामुळे फार मोठा रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज लोकांना रोजगार देण्याची, रोजगार निर्माण करण्याची गरज असताना अनेक व्यवसाय, उद्योग, छोटे रोजगार बुडाले. अगदी फार मोठ्या उद्योग, व्यवसायाची चर्चा नाही केली तरी सामान्य दिसणाºया किती व्यवसायांना फटका बसला आणि त्यामुळे किती जणांचा रोजगार गेला हे लक्षात घेतले पाहिजे.
आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचा उत्सव करायची संस्कृती आहे. भारतीय मनुष्य हा समाजप्रिय आणि उत्सवप्रिय आहे. त्यामुळे सणवार, समारंभ, उत्सव हे त्याच्या जीवनाचा भाग आहे. कोणताही उत्सव म्हटले की, जेवणावळी आल्या, पण कोरोना काळात या समारंभावरच बंदी आली आणि हा एक फार मोठा व्यवसाय डबघाईला आला. यात अनेकांचे रोजगार गेले. कॅटरिंग, मंडप डेकोरेटर्स या व्यवसायाला फार मोठा फटका बसला. २५ ते ५० माणसांत लग्नसमारंभ उरकावे लागल्याने मंडप नाही, डीजे नाही, वरात नाही, जेवण नाही. यात किती यंत्रणा ठप्प झाली. बँडवाल्यांना जेमतेम वर्षात ४० ते ५० तारखा मिळतात. त्या दिवशी बँडवाल्यांचा आठ-दहा जणांचा संच काम करून कमावत असतो, पण त्यांचा पुरता बँडबाजा वाजला आणि रोजगार गेला. स्वयंपाक बनवणारे आचारी, वाढपी, आचाºयाच्या हाताखाली काम करणारे कामगार यांचा रोजगार गेला. मंगल कार्यालये ओस पडली. त्यामुळे तिथल्या कर्मचाºयांचा रोजगार गेला.
आपल्याकडे लग्नसमारंभ म्हणजे बस्ते मोठे असतात. देण्या-घेण्यासाठी म्हणून शेकडो साड्या खरेदी केल्या जातात. या कालावधीत लग्न साधेपणाने झाल्यामुळे देणी-घेणी बंद झाली. कापड व्यापाºयांना फटका बसला. कापड दुकानातून काम करणारे कर्मचारी बेरोजगार झाले. ही अत्यंत सामान्य उदाहरणे आहेत. निमंत्रण पत्रिका हा एक व्यवसाय असतो. प्रिंटर्स, स्क्रीन प्रिंटर्स यांना याचा फटका बसला. कारण लग्नपत्रिका छापणेच बंद झाले. हे लोक रस्त्यावर आले.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असे अर्थव्यवस्थेला चालना देणारे उत्सव यावर्षी झाले नाहीत. पुढील वर्षीही होतील याची शाश्वती नाही. कारण आता सगळे उत्सव जर मर्यादित झाले, तर त्यावर जगणारी यंत्रणा ही बेरोजगारच होणार हे नक्की. अनेक कलाकार विविध कलाकृती या काळात बाजारात आणतात. सजावटीच्या वस्तूंची उलाढाल होते. यासाठी लागणाºया वस्तू या हस्त व्यवसाय, कुटीर किंवा घरगुती स्वरूपातून केले जात असतात, पण ही उलाढाल झाली नाही. अर्थव्यवस्था ठप्प झाली, कारण अनेकांचे यातून रोजगार गेले. त्यामुळे कोरोनाच्या लाटेचा सर्वात मोठा हल्ला हा रोजगारावर झाला. सामान्यांच्या रोजगारावर झाला. केशकर्तनकारांचे जवळपास पाच महिने नुकसान झाले. अर्थात त्यांनी नंतर दर दुप्पट करून त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फटका मध्यमवर्गीयांना बसला. म्हणजे क्रांती घडते, अचानक सगळे बदलून जाते, तसेच काहीसे इथे घडलेले दिसते.
जसा रोजगार गेला तसा नवा रोजगारही निर्माण झाला, पण तो ज्यांनी प्राप्त केला त्यांचे उखळ पांढरे झाले. या काळात सॅनिटायझर बनवणारे उत्पादक वाढले. यातून नवा रोजगार निर्माण झाला. ब्रँडेड कंपन्यांच्या सॅनिटायझरबरोबरच स्थानिक पातळीवरील रोजगार वाढले. स्थानिक उत्पादने तयार होऊ लागली. स्थानिक पातळीवर मास्क बनवणारे कामाला लागले. नवनवीन डिझाईनचे, रंगीत, चित्रविचित्र असे मास्क तयार झाले. रस्तोरस्ती मास्क विकणारे विक्रेते दिसू लागले. या रोजगाराला यातून चालना मिळाली. मास्क हे पुन्हा पुन्हा वापरले जाणारे असल्याने त्याची मागणी आता कायम असणार आहे. साहजिकच चिंधी बाजाराला ऊत आला. व्यापारी, कापड उत्पादक यांच्याकडून वाया जाणारे कापडाचे तुकडे किलोवर खरेदी करणारी यंत्रणा तयार झाली. सहा मीटरच्या साडी आणि कापडाच्या ताग्यांपेक्षा हे तुकडे विकून कापड व्यापारी चिल्लर जमवू लागले. इलेस्टिकच्या उत्पादनाला चालना मिळाली. पूर्वी इलेस्टिकचा वापर फक्त अंतर्वस्त्रांपुरता होता, पण आता मास्कच्या मागणीमुळे इलेस्टिकला मागणी वाढली. त्यातून रोजगार निर्माण झाला.
या काळात सेवा उद्योग कार्यरत झाला. यात सफाई कामगारांची मागणी वाढली. सफाई कामातून रोजगार वाढला. पाण्याच्या व्यवसायाला चालना मिळाली. शुद्ध पाण्याच्या बाटल्या विकण्याचा व्यवसाय तेजीत आला. त्यातून नवा रोजगार निर्माण झाला. परंतु कोरोनाने एकूणच रोजगारावर चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम झालेले पहायला मिळाले.
मराठी माणूस हा नाटकप्रिय आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने नवनवीन नाटके येत असतात, पण थिएटर आणि नाट्यगृहांवर बंदी आल्याने अनेक कलाकारांचा रोजगार गेला. दररोज प्रयोग करणारे कलाकार घरी बसले. नाट्यगृहातील कर्मचारी घरी बसले. छोटेछोटे कार्यक्रम करून मानधनावर जगणारे कलाकार रोजगारापासून वंचित झाले. नाटक, तमाशा किंवा लोकनाट्य कलाकार यांना घरी बसावे लागले. विविध जत्रांमधून होणारी उलाढाल थांबली. या बाजारपेठांना फटका बसला. कोणतीही जत्रा म्हटले की, चणे फुटाण्यापासून मिठाईपर्यंत आणि खेळणी, फुगे विकणाºयांपर्यंत अनेक लोकांची उलाढाल चांगली होते. मेळे, फेअर नसल्यामुळे व्यापारी उलाढाल थांबली. आपल्याकडे दरवर्षी कितीतरी उत्सव साजरे केले जातात. व्यवसायी पद्धतीने त्याचा वापर होत असतो. कोकण महोत्सव, कोल्हापूर महोत्सव, मिसळ महोत्सव, अशातून तेथील खाद्यपदार्थांची चव मोठ्या शहरात दिली जाते. यात लोणची, पापड, मसाले अशा अनेक पदार्थांची उलाढाल चांगली होत असते, पण यावर्षी त्याला फार मोठा फटका बसला.
दुसरीकडे कुरिअर, डिलिव्हरी बॉइज यांचा रोजगार वाढला. अनेक हॉटेल, रेस्टॉरंट, बार होम डिलिव्हरी देण्यास तयार झाले. त्यातून स्वीगीसारख्या कंपन्यांचा फायदा झाला. स्थानिक पातळीवरही अशा डिलिव्हरी बॉइजची भरती झाली. हे सगळे सामान्यांचे चित्र आपण पाहिले आहे. अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला यांचा विचार इथे केलेलाच नाही. दररोज दिसणारे समोरचे चित्र हे सामान्यांच्या रोजगारावर परिणाम करणारे असेच होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा