मंगळवार, १३ जुलै, २०२१

अजब तुझे सरकार.

 अग्रलेख


आपल्याकडे चित्रपटक्षेत्रात काम करणारे काही कलावंत हे अत्यंत दूरदृष्टीचे होते. अजून चाळीस-पन्नास वर्षांनंतर काय परिस्थिती असेल, अशा काळाच्या पुढच्या कथानकांवर चित्रपट काढणारे अनेक कलाकार होते. त्यात देवानंद, फिरोज खान, मनोज कुमार आणि मराठीत राजा परांजपे, दादा कोंडके अशी काही नावे होती. स्मगलिंग, गैरव्यवहार, ड्रग्जमाफिया यांच्यावर या लोकांनी चित्रपट काढले, तेव्हा ते प्रेक्षकांना नवीन होते; पण आता त्यातील गंभीरता कळायला लागली आहे. तोच प्रकार मराठीत राजा परांजपे यांनी जगाच्या पाठीवर या चित्रपटात दाखवला आहे. १९६० च्या दशकातली मुंबई आणि आजची मुंबईची परिस्थिती बदललेली नाही. इन्फ्रास्ट्रक्चर बदलले पण गुंडगिरी बदलली नाही. त्यामुळे त्या काळात गदिमांनी लिहिलेले, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले आणि गायलेले ‘उद्धवा अजब तुझे सरकार...’ हे गीत आजच्या परिस्थितीतही तितकेच लागू पडते.


या चित्रपटातून गरीब, पापभिरू माणसाला कसे सोसावे लागते ते वास्तव चित्रण दाखवले आहे. त्यामुळेच ‘पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार’ असे वर्णन करत या अजब सरकारच्या अजब परिस्थितीचे वर्णन या अजरामर गितातून होते. आज २०२१ सालात राज्यातील सरकारकडून, झोपलेल्या सरकारकडून सामान्य जनतेचे जे शोषण होत आहे, जी छळवणूक होत आहे ती अतिशय भयानक आहे. त्यामुळे सामान्य माणसांना टाचा घासून मरण्याशिवाय, या सरकारला शिव्याशाप देण्याशिवाय आणि आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, अशी परिस्थिती या राज्य सरकारने केलेली आहे.

आज शिक्षकांची छळवणूक होत आहे, डॉक्टरांची छळवणूक होत आहे, शेतकरी, वारकरी यांचे तर बोलायलाच नको. एकीकडे भ्रष्टाचाराच्या, खंडणीच्या आरोपामुळे मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागत आहेत, ते पळापळ करत आहेत, तर सामान्य माणसांना कामापासून वंचित ठेवले जात आहे. कर्जत ते सीएसएमटी, पनवेल ते सीएसएमटी, विरार ते चर्चगेट अशा मुंबईच्या उपनगरीय लोकल प्रवासापासून ज्यांना प्रवास करणे गरजेचे आहे, अशा सामान्य मराठी माणसांना या निष्क्रिय सरकारने वंचित ठेवून देशोधडीला लावण्याचे षड्यंत्र चालवले आहे. चोरटे, भुरटे, हिजडे, भय्ये, यांना मुबलक सेवा या लोकलची दिली जाते. महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या लोकल प्रवासापासून मराठी माणसांना वंचित ठेवले जाते, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक यांना वंचित ठेवले जाते आणि चोरट्या भुरट्यांना पायघड्या घालणाºया या सरकारचे नेमके चित्र म्हणजे ‘पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार’ असेच आहे. राजा परांजपेंना साक्षात्कार झाल्याप्रमाणे २०१९ला असे घाणेरडे सरकार, मराठी माणसाला छळणारे सरकार येणार आहे असे चित्र त्यांनी रंगवले होते. ते आज खरे घडताना दिसत आहे. सरकारमध्ये भ्रष्ट लोकांची भरती. चौकशीच्या फेºयात अडकलेले मंत्री. काही लोक अत्यंत निष्किय असे आहेत, तर सामान्य माणसांना भिकेला लावण्याचे काम केले जात आहे. कोणी आवाज उठवला की, त्याची मुस्कटदाबी केली जात आहे. अशा वाईट प्रवृत्तीच्या सरकारच्या अत्याचारापासून मराठी माणसांना वाचवायचे असेल, तर आगामी निवडणुकीत या निष्क्रिय लोकांना हाकलण्यासाठी माणसांनी जगले पाहिजे.


१९६०च्या दशकात मराठी माणसांचा कैवारी असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी आपले जीवन खर्ची घातले; पण त्यांच्याच माघारी त्यांचेच वारसदार म्हणवणारे आज मराठी माणसांचे वैरी ठरत आहेत. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जीवंत ठेवण्यासाठी त्यांचे वैचारीक वारसदार निर्माण झाले पाहिजेत तरच या मुंबईत मराठी माणसांना जगता येईल. आज मुंबई लोकलवर सगळा कब्जा या यूपी बिहारी पांडे, भय्ये यांनी मिळवला आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांना पास दिला जात नाही, तिकीट दिले जात नाही. हे मात्र मोकाट आहेत. याला कारण हे सरकार या भय्ये लोकांच्या जीवावर चालले आहे. मराठी माणूस मेला तरी चालेल, असे या सरकारला वाटते. म्हणूनच आता मराठी माणसाने पेटून उठण्याची गरज आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम त्यांचेच वारसदार करत आहेत यासारखे दुर्दैव काय? आज त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री असताना मराठी माणूस सुखी नाही. त्याला कसल्याही सुविधा नाहीत. तो जगण्यासाठी धडपडतो आहे, त्याला जगू दिले जात नाही; पण भय्ये लोक, अमराठी लोक मुंबई लोकलचा वापर करत आहेत. त्यांचे धंदे चालू आहेत. आमचे मुख्यमंत्री काही करता येत नाही, म्हणून रडत बसले आहेत यासारखे दुर्दैव काय? आज शिवसेनाप्रमुख असते तर म्हटले असते आता रडायचं नाही लढायचं. म्हणूनच आता मराठी माणसाने पेटून उठले पाहिजे. मुंबई लोकलचे तिकीट तुम्हाला दिलं जाणार नाही, पास तुम्हाला दिला जाणार नाही. त्यासाठी राज्य सरकारने मराठी माणसांना तिकीट देण्यास बंदी केली आहे; पण प्रवासास बंदी केलेली नाही. रेल्वेचे तिकीट देण्यास या सरकारने बंदी घातलेली आहे. रेल्वे प्रवासास बंदी नाही. त्यामुळे तुम्हाला जगायचं असेल, आपलं कुटुंब पोसायचे असेल, मुलाबाळांना जगवायचं असेल आणि त्यासाठी कामाच्या ठिकाणी जाणं आवश्यक असेल, तर विनातिकीट प्रवास करा. भय्ये फुकटात प्रवास करत आहेत. परप्रांतिय बिनधास्त प्रवास करत आहेत. मग मुंबई लोकल मराठी माणसांना का नाही? आज ही मुंबई परप्रांतियांच्या हातात घालवण्याचे हे या सरकारचे कारस्थान हाणून पाडण्यासाठी मराठी माणसाने रस्त्यावर उतरले पाहिजे.

4 july

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: