गेले दोन दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील परिस्थिती पाहिली आणि प्रत्यक्ष जाऊन तेथील पूरग्रस्तांना जो दिलासा दिला आहे ती अत्यंत कौतुकास्पद कामगिरी म्हणावी लागेल. शनिवारी तळीये रायगडचा दौरा केला, तर रविवारी चिपळूणचा दौरा करून प्रत्यक्ष संपर्कातून सामान्य नागरिकांना दिलेला दिलासा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचवेळी कोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही घटनास्थळाला रविवारी भेट दिली. या सर्व पिडीतांना केंद्राकडून योग्य ती मदत दिली जाईल, याचा अहवाल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना देणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. पंतप्रधानांनी खास आपल्याला इकडे पाहणी करण्यासाठी पाठवले आहे हे सांगितले. यातून केंद्र आणि राज्य ही दोन्ही सरकारे जनतेला दिलासा देण्यासाठी, जनता संकटात असताना मदतीला धावून आली हे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारची ही कौतुकास्पद कामगिरी आहे हे निश्चितच.
विशेषत: परिस्थितीचे भान किंवा तारतम्य कशाला म्हणतात याचे उत्तम उदाहरण देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांनी दाखवून दिले. काही वाहिन्यांचे पत्रकार विनाकारण टीका करण्यास भाग पाडत होते. प्रश्न विचारून नारायण राणे, फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका करण्यास भाग पाडत होते; पण त्यावेळी फडणवीस आणि नारायण राणे यांनी स्पष्टपणे सांगितले की, ही ती वेळ नव्हे. आधी लोकांना मदत देणे महत्त्वाचे आहे. उगाच टीका वगैरे करायची नाहीये. राज्य सरकार, प्रशासन मदतीला धावून आले आहे. केंद्रानेही मदतीसाठी लष्करापासून सर्व दले पाठवली आहेत. त्यामुळे टीका करण्याची, राजकारण करण्याची ही वेळ नाही, माध्यमांनीही ती करू नये. अगोदर या लोकांच्या मदतीला, पुनर्वसनाला प्राधान्य दिले पाहिजे हे ठणकावून सांगितलेही फारच कौतुकास्पद अशी कामगिरी आहे.
कोरोनाची परिस्थिती असतानाही, गर्दी करण्यास प्रतिबंध असतानाही कसलीही पर्वा न करता रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिपळूणच्या दौºयावर आले. त्यांच्यासमवेत मंत्री उदय सामंत, भास्कर जाधव असे नेते होते. पोलीस फाटा, शासकीय अधिकारी, नागरिक अशी प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीत सर्व नागरिकांशी त्यांनी संवाद साधला आणि जनतेला दिलासा दिला हे फार महत्वाचे आहे.
शनिवारीही तळीये या गावात गेल्यावर बाधितांना दिलेला दिलासा अत्यंत महत्त्वाचा आहे. आधी तुम्ही स्वत:ला सावरा बाकीचं सगळं सरकारवर सोडा. सर्वांचंच पुनर्वसन आम्ही करणार आहोत हा दिलेला दिलासा फार म्हणजे फार महत्त्वाचा होता. त्यात आत्मविश्वास होता. आपण पुनर्वसन करू शकतो, या नागरिकांना मदतीसाठी धावू शकतो हा विश्वास मुख्यमंत्र्यांमध्ये दिसत होता. तो विश्वास आतून आलेला होता. प्रत्यक्षात ही परिस्थिती पाहिल्यावर त्यांना गहिवरून आलं होतं. लोकांचं दु:ख पाहून ते अत्यंत गहिवरले होते; पण चेहºयावर दु:ख न दाखवता त्यांनी जो आत्मविश्वास दाखवला तो फार महत्त्वाचा होता. आम्ही पुनर्वसन करणारच आहोत, तुम्ही फक्त सावरा आता. आपलं दु:ख गिळा आणि नव्याने जगण्याचा निर्धार करा हा विश्वास फार महत्त्वाचा होता. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जो विचार आहे तो उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अक्षरश: सत्यात उतरवलेला दिसला. आता रडायचं नाही, लढायचं. असं म्हणत तुमचा कणा मोडलेला नाही, आम्ही तुमच्या पाठीवर थाप मारणार आहोत, तुम्हाला उभे करणार आहोत, लढण्याचे बळ देणार आहोत, त्यासाठी तुम्हाला सावरले पाहिजे हा विश्वास त्यांनी अत्यंत ठामपणे दिला. त्याचा परिणाम इतका जोरदार झाला की, पाच तासांच्या आत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या गावाचे पुनर्वसन म्हाडाच्या माध्यमातून केले जाईल हे जाहीरही करून टाकले. ही तत्परता फार महत्त्वाची होती. या कामगिरीत संपूर्ण ठाकरे सरकारने बाजी मारली आणि या दु:खद परिस्थितीत जनतेची मने जिंकली. मते जिंकणे सोपे असते; पण मने जिंकणे महत्त्वाचे असते; पण ती कौतुकास्पद कामगिरी उद्धव ठाकरे यांनी करून दाखवली.
बºयाचवेळा विविध वाहिन्या नेत्यांकडून न बोललेली वक्तव्ये दाखवून चुकीचा संदेश पोहोचवतात. चुकीचे बोलण्यास भाग पाडतात; पण अशा वाहिन्यांना चुकीचे काम करू न देता त्यांना वठणीवर आणण्याचे कामही केंद्र आणि राज्य सरकारने केले आहे. पाऊस, नैसर्गिक आपत्ती ही काही सरकारने लादलेली संकटे नसतात. पाऊस जास्त पडला, अतिवृष्टी झाली, नैसर्गिक आपत्ती आली की, सरकारवर टीका करून मोकळे व्हायचे आणि शासन कसे दुर्लक्ष करत आहे, कसे बेजबाबदार आहे, अशा बातम्या दाखवत कुठेतरी घाबरवून सोडणारे कॅमेरे फिरवत रहायचे. आता कोणतीही दरड कोसळली, पाऊस पडला, तर त्याला सरकार जबाबदार नसते; पण संकटानंतर तातडीने मदत पोहोचणे, नागरिकांची दखल घेणे महत्त्वाचे असते. सरकारने ते केले आणि विनाकारण टीका करणाºयांची तोंडंही बंद केली. ही कामगिरी कौतुकास्पद आहे. केंद्रातील आणि राज्यातील राज्यकर्ते परस्पर विरोधी असले, तरी या परिस्थितीत दोघांनी दाखवलेला समंजसपणा, मदतीला धावून येण्याची केलेली कमाल ही कौतुकास्पद कामगिरी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा