कोरोनाच्या नावाखाली सध्या देशात फक्त अराजक माजले आहे. लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांच्या नावाखाली 'कोरोना म्हणजे भ्रष्टाचार करो ना' असे समीकरण झाले आहे. ज्याला शोषण करणे जमते त्याने जगायचे. 'बळी तो कान पिळी' या न्यायाने जगायचे. जगण्याची हिंमत असेल तर जगा, नाहीतर घरात कोंडून घेऊन मरा, अशी स्थिती झाली आहे.
भ्रष्टाचार आणि काळाबाजार याला इतका ऊत आला आहे की, या कडक निर्बंधनामक लॉकडाऊनने सामान्यांची पिळवणूक होताना दिसते आहे. ज्या अत्यावश्यक गोष्टींवर निर्बंध लावणे गरजेचे नाही त्या अत्यावश्यक गोष्टींवर निर्बंध लावल्याने सामान्य माणसांची इतकी गळचेपी होते आहे की, या भ्रष्ट कारभाराला सामान्य माणूस कंटाळला आहे. त्याच्यात वैफल्य आल्याचे दिसते आहे. नैराश्याने अनेकजण डिप्रेशनमध्ये जाताना दिसत आहेत. बहुतेक ठिकाणी कौटुंबिक वातावरण हे गढूळ झालेले दिसते आहे. कारण आर्थिक मार्ग बंद पडले आहेत आणि दुसरीकडे काळाबाजार चालला आहे.
लोकल प्रवास हा अत्यावश्यक सेवेतील जनतेसाठी आहे, पण अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना तिकीट देताना रेल्वे कर्मचारी इतका त्रास देतात की, हा माणूस चोर आहे अशाप्रकारे त्याची झडती घेतात, पण त्याचवेळी फेरीवाले, भिकमंगे, किरकोळ विक्रेते, गर्दुल्ले हे बिनधास्त लोकलने प्रवास करत असतात. नेरूळच्या रेल्वे स्थानकात तर रात्रपाळीच्या तिकीट काऊंटरच्या क्लार्कने दुकानदारी सुरू केली आहे. सेकंड क्लासचा पास हवा असेल, तर शंभर रुपये जादा द्यायचे आणि फर्स्ट क्लाससाठी तीनशे रुपये जादा देण्याची भाषा तो करतो. हे सगळे परप्रांतातून आलेले महाराष्ट्रात मराठी माणसाची लूट करत आहेत. रेल्वेच्या तिकिटाला जादा पैस का द्यायचे? जादा पैसे देऊन तिकीट काढले की तो अत्यावश्यक सेवेतला माणूस होतो. यासाठी हा रेल्वेचा क्लार्क सुपरवायझरची परवानगी घ्यावी लागेल, त्यासाठी हे पैसे आहेत असे सांगतो. सुपरवायझरच्या नावावर पैसे गोळा करून हा रेल्वेचा व्हायरस करो ना भ्रष्टाचार म्हणतो आहे.
सलून, पार्लर चालू ठेवायची नाहीत असे राज्य सरकारने कडक निर्बंधात म्हटले आहे. त्यामुळे आमचा मराठी नाभिक समाज, कारागीर दुकाने बंद ठेवून उपासमारीचे जीवन जगत आहे, तर दुसरीकडे परप्रांतीय बिहारींची जी दुकाने आहेत ती राजरोसपणे चालू ठेवली आहेत. दुकानच्या चार कर्मचाºयांपैकी दोन कर्मचारी आत आणि दोन बाहेर. शटर खाली करून आतून जादा दराने सेवा चालू आहे. हे जादा घेतलेले पैसे राऊंड मारणाºया पोलीस, स्थानिक कार्यकर्ते यांना देऊन त्यांची शांती केले जाते. त्यामुळे सर्वाधिक पार्लर ही या यूपी-बिहारच्या कारागिरांची चालू आहेत. आमचा मराठी माणूस मात्र असा पैसा कमवू शकत नाही, म्हणून डोक्याला हात लावून बसला आहे, पण आजकाल कोरोना म्हणजे भ्रष्टाचार करो ना असे सूत्र या कडक निर्बंधात सुरू आहे.
दारूची दुकाने, वाइन शॉप मागल्या दाराने सुरू ठेवली आहेत. बार आणि रेस्टॉरंटमधून चढ्या दराने सर्रास विक्री सुरू आहे. दुप्पट दराने विक्री होत असल्याने हा लॉकडाऊन या दुकानदारांच्या पत्थ्यावर पडला आहे. या काळाबाजाराला त्यामुळे चांगलेच बाळसे धरलेले दिसते.
सगळ्यात तेजीचा धंदा चालला आहे तो मेडिकल दुकानांचा. दुकानांची नावे मेडिकल आणि जनरल स्टोअर्स. मेडिकलच्या नावाखाली जनरल माल २४ तास विकला जातो. मेडिकलच्या दुकानात कुरकुरे, वेफर्स, दुधाच्या पिशव्या, कोल्ड्रिंक्स सगळं मिळतं. काही काही मेडिकल दुकानांतून तर वाइनही मिळते आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून औषधे मिळत नाहीत. एखादे दुर्मिळ औषध, रेमडेसिवीर यांच्याकडे मिळत नाही, पण बाकीचे सगळे मिळते. हा सगळा भ्रष्टाचाराचा मामला आहे. मेडिकल स्टोअर्सच्या आसपास जर एखादे वाइन शॉप असेल, तर त्याचा सगळा माल मेडिकलच्या दुकानात येतो. लोक दारू न पिता औषध मागू लागले आहेत. हा भ्रष्टाचाराचा व्हायरस कसा थांबणार आहे? औषधांच्या किमती तर इतक्या भरमसाट झालेल्या आहेत की, एक वर्षापूर्वी जी औषधे शंभर रुपयांना येत होती ती आता चारशे-पाचशे रुपयांना मिळतात. डोडोकॉईन किंवा कोणतीही पेनकिलर घेण्यासाठी आपण गेलो तर पूर्वी दहा रुपयांना जी स्ट्रीप असायची ती साठ ते सत्तर रुपयांना मिळायला लागली आहे. हे ब्लॅकमार्केटिंग एमआरपी वाढवून चालवले आहे. त्यामुळे कोरोनाच्या नावावर, लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांच्या नावावर भ्रष्टाचार करा आणि जगा, असे सरकार सुचवते आहे.
कोरोनामुळे आज देशात अराजक माजले आहे. नेते जनतेच्या समोर येण्यास तयार नाहीत. नगरसेवक, कार्यकर्ते तोंड लपवून बसले आहेत. सोशल डिस्टन्स या गोंडस शब्दामागे सगळे लपून बसले आहेत. तोंड असून बोलायचे नाही, कान असून ऐकायचे नाही आणि डोळे असून पहायचे नाही, अशी सामान्यांची अवस्था झालेली आहे. मुंबई आणि उपनगरात सर्वात गळचेपी ही मराठी माणसाची झालेली आहे. मराठी माणसाची अमृततुल्य, येवले अशी जी चहाची दुकाने होती ती बंद करायला लावली. कधी नव्हे तो मराठी माणूस चहाच्या धंद्यातून मोठा होत होता त्याला संपवण्याचे काम केले, पण यूपीच्या लोकांच्या चहाच्या टपºया मात्र सुरळीत आहेत. येवले, अमृततुल्य चहा प्यायल्याने कोरोना होतो का? पण हप्तेबाजी, काळाबाजार करून जो धंदा करू शकतो त्यानेच आता इथून पुढे जगायचे, हेच या कोरोनाने शिकवले आहे. त्याचा मंत्रच आहे 'कोरोना भ्रष्टाचार करो ना'.
5 may
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा