गुरुवार, २० मे, २०२१

गाफीलपणा नक्की कोणाचा?


कोरोनाची पहिली लाट ओसरली त्यानंतर सारा देश गाफील राहिल्याने दुसºया लाटेचे संकट उभे राहिले. सध्या तिसºया लाटेची चर्चा सुरू आहे; पण या संकटाला भिडून तिला परत फिरावे लागेल, अशी तयारी आपल्याला करायला हवी, असे मत व्यक्‍त करत सरसंघचालक मोहन भागवत यांनी नामोल्लेख टाळत कानपिचक्‍या दिल्या. पुण्याप्रमाणे सर्वांनी कोरोनाविरोधात एकत्रित लढायला हवे, असे ते म्हणाले. आता हा गाफिलपणा नक्की कोणाचा हा खरा प्रश्न आहे. सरसंघचालकांनी पोटातलं स्पष्टपणे ओठावर आणलं असतं, तर बरं झालं असतं. सरकारच्या मातृसंस्थेचे प्रमुखत्व आपल्याकडे असल्यामुळे असे नुसते चिमटे न काढता किंवा टोमणे न मारता जे गाफील राहिले त्यांचे कान का उपटले नाहीत, असा देश प्रश्न विचारतो आहे.


सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात की, धैर्यवान लोक कायम प्रयत्न सुरू ठेवतात. भारताला एक समाज म्हणून सर्व भेदभाव विसरून, गुणदोषांच्या चर्चांमध्ये न अडकता एकसंध बनून काम करावे लागणार आहे. एकमेकांच्या गुण-दोषांची चर्चा करण्यासाठी नंतर वेळ मिळणारच आहे. अजीम प्रेमजींनी सांगितलं त्यानुसार वेगाने काम करावं लागणार आहे. पुणे शहराचे उद्योजक, प्रशासक, रुग्णालय, जनतेचे प्रतिनिधी या सगळ्यांनी एक टीम म्हणून प्रयत्न केला. तसे सामूहिक प्रयत्न आवश्‍यक आहेत, असे ते म्हणाले; पण हे केंद्रीय नेतृत्वाला मान्य आहे का? गेल्या काही दिवसांत केंद्रीय नेतृत्व व्हिडीओ कान्फरन्सिंगने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत; पण सवावर्षापूर्वी तशी परिस्थिती होती का? थेट टीव्हीवर आले आणि लॉकडाऊन केला. जनता कोंडून घरात बसली. सुरुवातीला जनतेने पोलिसांचे दंडुकेही खाल्ले. आजही दंडुके खात आहेत. म्हणजे सर्वसामान्य जनता बाहेर पडली, तर त्याला दंडुक्यांचा प्रसाद मिळतो; पण निवडणुकीच्या निमित्ताने गाफील राहून गर्दी जमवणाºयांना कसला प्रसाद दिला पाहिजे?

सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात तो गाफीलपणा नक्की कोणात होता? कोणी गर्दीचे नियम मोडले? कोणी हजारोंच्या सभा घेतल्या? सर्वसामान्य माणसांनी घरातील लग्न कार्य केले, तर मोठा दंड आकारला जातो; पण हजारो-लाखोंच्या सभा घेऊन ज्यांनी गाफिलपणा दाखवला त्यांना काय शिक्षा करणार आहात? आज या बंदमुळे आणि यांच्या गाफीलपणामुळे आलेल्या दुसºया लाटेमुळे सर्वसामान्यांचा रोजगार बंद आहे. लोकांची खाण्या-पिण्याची सोय होत नाही. सगळीकडे अनागोंदी माजली आहे. नोकरदारांना रोजगार बुडवून घरात बसावं लागत आहे. घरात बसल्याने पगार थांबला आहे. रोजगार गेला आहे, रोटीचा प्रश्न आहे. भविष्याचा प्रश्न आहे. कामावर काही करून आलंच पाहिजे असे सांगितले, तर जायचे कसे हा प्रश्न आहे. बस आणि लोकलने सामान्यांना प्रवास करता येत नाही. ज्यांना प्रवासाची मुभा दिली पाहिजे त्यांना नाकारले जाते आणि अनावश्यक फिरणाºयांना लोकलमध्ये मुभा आहे. असला गझनीच्या मोहमदासारखा कारभार चालू आहे. ही वेळ कशामुळे आली? तर गाफीलपणामुळे. मग हा गाफीलपणा नेमका कुणाचा? आणि त्याची शिक्षा सामान्यांना कशासाठी दिली जात आहे?


पाच राज्यांतल्या महानिवडणुका झाल्या. महाराष्ट्रात १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. सगळीकडे प्रचाराच्या सभांची जोरदार गर्दी झाली. सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले. हा गाफीलपणा राज्यकर्त्यांनी, राजकीय पक्षांनी दाखवला होता. घरोघर जाऊन राजकीय नेत्यांनी निवडणुकीचा प्रचार केला की, कोरोनाचा प्रसार केला? याला जबाबदार कोण आहेत आणि शिक्षा कोणाला दिली जात आहे?

मोहन भागवत म्हणतात की, सर्वांनीच वैज्ञानिकतेचा आधार घ्यावा. कोणतीही चर्चा ही वैज्ञानिकतेच्या आधारावरच तपासून कराव्यात. कुणी सांगते म्हणून ते योग्य किंवा नवीन अथवा जुनी गोष्ट म्हणून योग्य आहे, असे माहितीच्या बाबत करू नका; पण भाजपचेच अनेक नेते गोमुत्र आणि यज्ञ याची भाषा करतात त्याचे काय? कुणी गोशाळेत कोव्हीड सेंटर उभे करतो, तर कुणी गोमुत्र प्या म्हणतो. यातील नेमकी वैज्ञानिकता पटवून देण्याचे काम कोणी करायचे? वायफळ चर्चा आणि प्रसिद्धीसाठी काहीही बरळून सामान्यांमध्ये संभ्रम निर्माण करणाºयांमुळेही गाफीलता वाढीस लागते त्याचे काय? सरसंघचालकांनी या गोष्टींवर ठामपणे स्पष्टपणे बोलले पाहिजे.


सरसंघचालक म्हणतात की, आपल्याकडून कोणतीही निराधार बाब समाजात जाऊ नये याची काळजी घ्यायला हवी. आयुर्वेदाच्या नावावर अनेक चर्चा अशा सुरू असतात. पण वैज्ञानिकतेच्या तर्कावर जोपर्यंत त्या गोष्टी सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत अशा गोष्टींबाबत सावध राहणे आवश्‍यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. गोमुत्र आणि यज्ञवाल्यांचे अप्रत्यक्ष कान उपटले हे चांगले झाले; पण याबाबत त्यांनी पंतप्रधानांना स्पष्ट सूचना देऊन अशी वक्तव्ये करणाºयांवर अंकुश ठेवण्याचे काम केले पाहिजे. पक्षातला, सरकारमधला गाफीलपणा वाढत असेल, तर रिमोट आपल्या हातात आहे याची जाणीव करून देण्यास मोहन भागवतांनी मागेपुढे पाहू नये असे वाटते.

सरसंघचालकांनी म्हटले आहे की, या जागतिक संकटासमोर कठीण संघर्ष होईल; पण तो आपण जिंकू, आपण जिंकायलाच हवा. ही परिस्थिती आपल्यातले दोष दाखवेल. दोष दूर करून सद्‌गुणांना वाढवून ही परिस्थिती आपल्याला शिकवेल. ही आपल्या धैर्याची परीक्षा आहे. यश-अपयशाचा खेळ चालतच राहणार. सतत लढत राहण्याची हिंमत महत्त्वाची आहे. प्रयत्न करत राहा, निराश होण्याचे कारण नाही, अशा शब्दांत मोहन भागवत यांनी आवाहन केले आहे; पण जो गाफीलपणा राहिला त्यावर स्पष्टपणे बोलण्याची गरज आहे. आत्मनिर्भर होण्यासाठी आत्मचिंतन करा, असा सल्ला दिला पाहिजे. प्रत्येक निवडणुकीत पंतप्रधानांनी प्रचारासाठी उतरलेच पाहिजे असे नाही. पंतप्रधान प्रचाराला उतरले की गर्दी होणार, त्यांचा लवाजमा आला, सुरक्षा आली. या गर्दीत कितीतरी सुपरस्प्रेडर असू शकतात. आपले सुरक्षाकवच भेदून कोणी येणार नाही हा गाफीलपणा सर्वांनाच धोकादायक आहे. म्हणूनच जनता गाफील राहिली नाही, जनतेने आपले जास्तीत जास्त हाल करून घेतले आहेत. आपलं खूप नुकसान करून घेतले आहे. अनेक जण आपल्या माणसांपासून दूर गेले आहेत. ना कोणाच्या अंत्यसंस्काराला, ना समाचाराला ना लग्नकार्याला जाता आले. सामान्य जनतेनेच हाल सोसले आहेत. त्यामुळे गाफील राहिले ते नेते आणि राजकीय पक्ष हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे ही दुसरी लाट कुणी आणली असेल, तर ती राजकीय नेत्यांनी आणली आहे हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आलेली आहे.


प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: