कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेकजण देशोधडीला लागले आहेत. अनेकांचा रोजगार गेला आहे. लाखो लोकांची उपासमार होत आहे, पण या दुर्दैवाच्या फेºयांचाही बाजार मांडला गेला आहे. याचे कारण अशा काळात मदतीसाठी धावून जाणारे अनेक आहेत, पण ज्यांना खºया अर्थाने मदत करायची इच्छा आहे ते लोक आपल्याला प्रसिद्धी मिळेल म्हणून मदत करत नाहीत. असे असंख्य अज्ञात हात आहेत की जे छुपी मदत करत आहेत. या मदतीचा कुठेही गवगवा करत नाहीत. ते मोठ्या प्रमाणावर लोकांना मदत करत आहेत. कुणाचा औषधपाण्याचा खर्च उचलत आहेत. कुणाला कपडालत्ता पुरवत आहेत. कुणाचा शिक्षणाचा खर्च उचलत आहेत. कुणाला धान्य, जीवनावश्यक वस्तू देत आहेत. असे असंख्य लोक समाजात प्रसिद्धीपराड़मुख आहेत. हे खरे दानी आहेत.
पण काही प्रसिद्धीसाठी हपापलेले लोक कणभर करतात आणि मणभर त्याची प्रसिद्धी करतात. कुठेतरी पाच रुपयांचे बिस्कीटचे पुडे घ्यायचे आणि रस्त्यावर वाटायचे. त्याचे फोटो काढायचे आणि आपली दानशूरता सोशल मीडियावर दाखवायची आणि लाईक मिळवायच्या. फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर या समाजमाध्यमांचा वापर अशा गोष्टींसाठी होताना दिसतो आहे. हे अत्यंत हास्यास्पद आहे.
एक कुठलीशी फुटकळ अभिनेत्री चार दिवसांपूर्वी रस्त्यावरील गरीबांना असेच पाच रुपये किमतीचे बिस्कीट पुडे देत होती. कुणाला कपडे देत होती. त्याचे फोटोसेशन करून ते फोटो समाजमाध्यमांवर टाकत होती. अत्यंत किळसवाणे असे हे दृश्य होते. स्वत: अर्ध्या कपड्यात, मांडीपर्यंत घातलेली चड्डी आणि जेमतेम शरीराचा कसाबसा झाकला जाईल असा टी-शर्ट घालून गरीबांना कपडे वाटत असल्याचे फोटो समाजमाध्यमांवर टाकत होती. त्या बार्इंना सांगायची वेळ आली आहे की, तुझं ते कमी कपड्यातलं दारिद्र्य अगोदर झाक आणि मग लोकांना मदत करायला जा. तू लोकांना मदत करते आहेस याचा बाजार मांडला आहेस का?
खरं तर प्रत्येक देशात गरीब असतात. अडीअडचणीला त्यांना मदत केली जाते, पण आपल्याकडे जसा त्याचा बाजार मांडला जातो तसा कुठे मांडला जात नाही. केलेल्या मदतीची कुठेही वाच्यता झाली नाही पाहिजे. कर्ण हा कसाही असला तरी त्याला दानशूर म्हटले जाते याचे कारण त्याने आपल्या दानधर्माची कुठे वाच्यता केलेली नव्हती. या त्याच्या एका गुणामुळे त्याचे सगळे दुर्गुण झाकले गेले होते, पण आपले सगळे दुर्गुण झाकण्यासाठी आजकाल दानशूरपणाचा आव आणला जातो हे फार मोठे विडंबन म्हणावे लागेल. असल्या दिखाऊपणाला कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे.
विविध पक्षांचे, विविध संघटनांचे अनेक नेते, पुढारी, संघटक असतात. त्यांना आपल्या कामाची प्रसिद्धी हवी असते, पण कौतुक हे लोकांनी करायचे असते. आमचे कौतुक करा, आमच्या कार्याला प्रसिद्धी द्या, त्याचा गवगवा करा, असे जेव्हा वाटते तेव्हा त्यांना राजकारणात प्रवेश करायचा आहे. सामाजिक कार्यकर्ता आहे, महापालिका, नगरपालिका असे कुठले तरी निवडणुकीचे तिकीट हवे आहे असा संशय येतो. त्यामुळे जे खºया अर्थाने निरपेक्ष विचाराने दान करत आहेत, मदत करत आहेत ते खरे लोक आहेत. बाकीचे सगळे भोंदू आहेत. मदतीचा बाजार मांडणारे संधीसाधू आहेत असेच म्हणावे लागेल. अशा लोकांसाठी एखादे संकट, मदतीची मिळणारी संधी ही पर्वणी असते. त्या संधीचा गैरफायदा घेण्यासाठी हे लोक रस्त्यावर आलेले आहेत असेच दिसून येते. अशा दिखाऊ लोकांपासून सामान्यांनी सावध राहिले पाहिजे. कारे भुललासी वरलीया रंगा, ऊस डोंगापरी रस नोहे डोंगा हे लक्षात घेतले पाहिजे. अशा लोकांनी केलेली मदत ही खरी मदत नसते. त्यामागे काही स्वार्थी भाव असतो.
अनेकांना दानधर्म करायचा असतो तो पुण्यसंचयासाठी करायचा असतो. आपल्या नावावर एखादा बँक बॅलन्स असावा तसा पुण्याचा बॅलन्स असावा असे वाटते, पण पुण्याचा संचय करावासा वाटणे म्हणजे आपल्या पापाचा बॅलन्स करण्यासाठी केलेला तो प्रयत्न आहे. पापी लोकांना आपली प्रतिमा सुधारण्यासाठी अशा कर्माची गरज भासत असावी असे वाटते. हा दिखाऊपणा चांगला नाही.
अमुक एका व्यक्तीने पंतप्रधान निधीसाठी तमुक इतके रुपये दिले, त्याचा फोटो काढून वर्तमानपत्रांतून बातमी लावण्यासाठी हिंडायचे. तमुक एकाने मुख्यमंत्री निधीसाठी तमुक इतके रुपये दिले. त्याची प्रसिद्धी कशासाठी हवी आहे? या देशातील अनेक कार्यालयांतील कर्मचाºयांनी आपले कुणी एक दिवसाचे, कुणी पंधरा दिवसांचे वेतन असे दिलेले आहे. त्याची कुठे प्रसिद्धी केली जात नाही. त्या प्रसिद्धीची अपेक्षाही नाही. ते एक आपले कर्तव्य आहे. आपण आपल्या नित्यकर्माची कधी प्रसिद्धी करतो का? पाऊस आला की छत्री उघडणार, ऊन लागले तर डोक्यावर टोपी घालणार, थंडी पडली की अंगात स्वेटर घालणार. हे जसे नैसर्गिक आहे, तसेच कोणतेही संकट आल्यावर आपण मदतीला धावून जाणे हे नैसर्गिकच आहे. त्यासाठी दिखाऊपणाची गरज नाही. नैसर्गिक संकट, महामारी आल्यावर मदतीसाठी जाणे हे माणसांचे कर्तव्य आहे. त्याचा डांगोरा पिटायचा नसतो. त्याचा दिखाऊपणा करायचा नसतो. म्हणूनच हे पाच-दोन रुपयांचे बिस्कीटचे पुडे वाटून दानशूर बनणारे खरे दानशूर नाहीत, तर आपण केलेली मदत आणि त्याची वाच्यता न करणारे खरे दानशूर आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा