कोरोना आणि चीन यासंदर्भात एक धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. अर्थात तसा संशय अनेक जणांनी व्यक्त केला होता; पण संशय आणि प्रत्यक्ष पुरावे यात फरक असतो. हा दावा पुराव्यानिशी सिद्ध होत असेल, तर लक्षात घेतले पाहिजे हे तिसरे जागतिक महायुद्ध सुरू झालेले आहे. त्या युद्धात आपण सापडलो आहोत. बाहेर आलेल्या माहितीनुसार काही गुप्त कागदपत्रांची तपासणी केल्यावर चीन वैज्ञानिकांनी २०१५ मध्येच कोरोनाचा वापर एक जैविक हत्यार म्हणून करता येईल याविषयी चर्चा केल्याची माहिती उघड झाली आहे. चिनी वैज्ञानिक आणि आरोग्य अधिकाºयांनी ‘अनुवांशिक हत्यारांचे नवे युग’ या विषयावर केलेल्या चर्चेत कोरोना विषाणूला एक कृत्रिम रूप देऊन त्याचा वापर जैविक हत्यार म्हणून करता येईल यावर चर्चा केली होती. त्यामुळे शस्त्र अस्त्र, बॉम्ब याच्या जोरावर नाही, तर जैविक विषाणूंच्या जोरावर जगाला त्रास देण्याचे तंत्रज्ञान चिनी ड्रॅगनने विकसित केले होते हे नक्की. म्हणूनच आता या तिसºया महायुद्धाचा आपण सर्व जण भाग असू, तर आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे.
या संदर्भात द आॅस्ट्रेलियनमध्ये एका लेखातून असा दावा केला गेला आहे. त्यानुसार काही महत्त्वाची कागदपत्रे लिक झाली आहेत. ‘द अननॅचरल ओरिजिन आॅफ सार्स अँड न्यू स्पीसीज आॅफ मॅनमेड बायोवेपन’ या पेपर मधली ही माहिती आहे. तिसरे जागतिक युद्ध जैविक हत्यारांनी लढले जाईल, असे चीन पूर्वीपासून सांगत आला आहे. सार्स विषाणूचाच वापर हत्यार म्हणून कसा करता येऊ शकतो यावर ही चर्चा झाली होती, असा दावा केला जात आहे. सध्या जगभर कोरोनाचा प्रकोप जारी आहे. चीन मधूनच हा विषाणू जगभर फैलावल्याचे आरोप सातत्याने केले जात आहेत; मात्र चीनने हे आरोप सतत फेटाळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही कागदपत्रे लिक झाल्याने त्याला वेगळे महत्त्व आले आहे. आॅस्ट्रेलियन रणनीतिक संस्थान म्हणजे एएसपीआय मधील अधिकारी सांगतात सायबर सिक्युरिटी विशेष तज्ज्ञाने या चिनी कागदपत्राचे विश्लेषण केले आहे. ही कागदपत्रे अस्सल असल्याचे मत त्यांनी नोंदविले आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगाने एकत्रित येऊन चीनला धडा शिकवायची वेळ आलेली आहे.
चीनमधून प्रसार झाला असला, तरी चीनमध्ये या रोगावर पूर्णपणे नियंत्रण मिळवलेले आहे. चीनमध्ये सध्या फक्त ३०० रुग्ण आहेत. इतकेच नाही, तर चीनच्या सीमेजवळ असलेल्या भारतातील तीन राज्यांत एकही कोरोना रुग्ण नाही. अरुणाचल प्रदेश हा आपला आहे असा वांरवार दावा करण्याचा प्रयत्न चीनने केला होता. आपल्या नकाशातही तो दाखवण्याचा प्रकार चीनने केला होता; पण या अरुणाचलमध्ये आता कोरोना रुग्ण नाहीत. तिथे रुग्ण वाढले, तर त्याचा धोका चीनला असणार आहे. त्यामुळे चीनने हा व्हायरस चीनला धक्का लागणार नाही अशाप्रकारे पसरवला आहे. जगभरातील शेकडो देशांत अत्यंत वेगाने हा रोग पसरत असताना चीनमध्ये या रोगाचा प्रसार थांबला आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेवर झालेला कालचा सायबर हल्ला हे पण चीनशी संबंधित कृत्य असल्याने हे विश्व युद्ध आहे, असा संशय अधिक दृढ होत आहे.
कोणतेही युद्ध प्राचीनकाळापासून भूमीसाठी, भूमीअधिग्रहणासाठी किंवा साम्राज्यवादासाठी होत आलेले आहे; पण आता हा विचार बदलला आहे. आता साम्राज्यवाद हा बाजारपेठेशी निगडीत आहे. बाजारपेठेतील वर्चस्व आणि आपली उत्पादने जगभरात पोहोचवणे हे नवे साम्राज्य आहे. चीन, जपान, कोरिया, अमेरिका हे देश आपली उत्पादने जगभर पसरवत बाजारपेठा काबीज करण्याचे प्रयत्न करत असतात. यातील सर्वात मोठी ग्राहकसंख्या ही भारतासारख्या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या देशात आहे. त्यामुळेच भारतावर पर्यायाने भारतीय बाजारपेठेवर कब्जा मिळवण्यासाठी हे युद्ध आहे. त्यात लढण्यासाठी रासायनिक अथवा जैविक हत्यारांचा वापर कोणत्याही देशाने केला, तरी त्याचा मार, त्याची झळ आपल्याला सोसावी लागणार आहे, हे नक्की. म्हणूनच यातून सावरताना आपल्याला काळजी घेतली पाहिजे. इतकेच नाही, तर यासाठी सामाजिक, राजकीय एकजूट फार महत्त्वाची असणार आहे.
चीन गेल्या पाच वर्षांपासून ही तयारी करत असल्याचे अहवालात म्हटले असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती फार वेगळी आहे. गेल्या २५ वर्षांपासून ही तयारी सुरू असल्याचे लक्षात घेतले पाहिजे. यामध्ये चीनने भारतावर केलेले सांस्कृतिक आक्रमण फार मोठे होते. गेल्या २५ वर्षात फेंगशुई आणि वास्तुशास्त्राचा जो चायना बाजार मांडला आणि त्याने सामान्यांना भावनिक अंधश्रद्धा करून टाकले आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आमच्या देवांवर, वास्तुशास्त्रावरही चिनी आक्रमण झाले आहे. लक्ष्मी, पैसा येण्यासाठी, समृद्धीसाठी चिनी वस्तू वापरा, असला जो प्रसार सुरू झाला तो या युद्धाचाच एक भाग होता. त्या फेंगशुईने कासव, शंख, घंटा, हसरा बुद्ध असले काही विक्रीचे धंदे सुरू झाले. एकप्रकारचे मीठ, कसली फुले असे काहीपण विकले जाऊ लागले. लोक त्याचे बळी पडले. त्याचप्रमाणे चिनी खाद्य संस्कृती मोठ्या प्रमाणावर रुजवली गेली. चायनिजचे स्टॉल ठिकठिकाणी लागले. नुडल्स, शेजवान आणि कसले काही पदार्थ उधसणारी फोडणी देऊन विकायला सुरुवात झाली. माल बनवणारा चिनी आहे की नाही हे माहिती नाही; पण नकटा दिसला की चायनीज डिशचा धंदा टाकू लागला. खाद्य आणि सांस्कृतिक आक्रमणातून चीन भारतात घुसला ती या युद्धाची पार्श्वभूमी आहे, हे लक्षात घेऊन आता सावधपणे वागणे गरजेचे आहे. स्वदेशीच्या मंत्राचे त्यावर अस्त्र टाकावे लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा