रविवारची सर्वात सुन्न करणारी, संताप आणणारी आणि कीव करावीशी वाटेल अशी घटना म्हणजे शिवसेनेच्या ठेकेदाराने एका कचरा गोळा करर्णाया कंत्राटदाराला कर्चयाने आंघोळ घातली. दिवसभर ती बातमी टिव्हीवर दाखवली जात होती. घाण, ओला कचरा बादलीने त्या ठेकेदाराच्या अंगावर टाकताना बघून अंगावर काटा येत होता. काय ही कृरता? यात फक्त त्या ठेकेदाराचीच चूक होती का? हे संपूर्णपणे महापालिकेचे अपयश आहे. महापालिकेची सत्ता शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेच्या निष्क्रियतेवर खापर फोडता येत नाही म्हणून शिवसेनेच्या आमदारांनी ठेकेदारावर राग काढला का? ही अंतर्गत खदखद यातून बाहेर आली का हा प्रश्न निर्माण होतो आहे.
मुंबईतील नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेने आणि सत्ताधारी शिवसेनेने केलेला असला तरी कुर्ल्यामध्ये शिवसेनेच्या आमदारांना मात्र नालेसफाई न झाल्याचा प्रत्यय आला आहे.संजय नगर नाल्यामध्ये गाळ साचून पाणी रस्त्यावर आल्यामुळे आमदारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराला कर्चयातच बसवल्याची ध्वनिचित्रफीत रविवारी समाजमाध्यमांवर फिरत होती. टीव्ही चॅनेलवर सतत ती हॅमर केली जात होती. कंत्राटदाराच्या अंगावर नाल्यातील कचरा टाकल्यामुळे या कृत्याविषयी समाजमाध्यमावरून संताप व्यक्त होऊ लागला आहे. मुंबईतील नागरिकही सुन्न झालेले आहेत. ही एक प्रकारची दहशतच म्हणावी लागेल. पण सत्ता तुमच्याकडे असताना तुम्ही असे कसे काय करू शकता?
चांदिवली येथील शिवसेनेचे नगरसेवक व आमदार दिलीप लांडे हे कार्यकर्त्यांसह एका व्यक्तीला नाल्याच्या बाजूला बसवून त्याच्यावर ओरडत असतानाची ध्वनिचित्रफीत रविवारी समाजमाध्यमावर फिरत होती. त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते या व्यक्तीच्या अंगावर डोक्यावर नाल्यातून काढलेला गाळ टाकताना दिसत होते. अरेरे किती वाईट दृष्य होते ते? विशेष म्हणजे आमदार दिलीप लांडे यांनी टीव्हीवर येउन याबाबत आपली प्रतिक्रियाही व्यक्त केली. ते म्हणाले की त्यांच्या मतदारसंघातील संजय नगर नाला गेल्या काही दिवसांपासून तुंबला होता. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच मी कं त्राटदाराला फोन करून हा नाला साफ करून देण्याबाबत सांगत होतो. पण तो दाद देत नव्हता. नागरिकांना होणारा त्रास कळावा म्हणून हे पाऊल उचलावे लागले. पण केवळ हीच एक प्रतिक्रीया होती का? हाच एकमेव उपाय होता का? ठेकेदाराचे बिल थांबवता आले असते, त्याला काळ्या यादीत टाकता आले असते, त्याच्या विरोधात पोलीसात तक्रार करता आली असती. पण हे काहीही न करता त्याला करच्याचे स्रान घातले? माणुसकीला काळीमा फासणारे हे काम आहे. बिले आधीच काढून झालेली असतात, त्यात टक्केवारीही असते त्यामुळे बिल थांबवता येत नाही. महापालिकेत सत्ता असूनही निष्क्रियता समोर आल्यामुळे आपल्याच पक्षातील नेते कार्यकर्ते यांच्यावरचा हा राग वेगळ्या मार्गाने आमदारांकडून व्यक्त झालेला आहे.
गेले सहा महिने महापौर किशोरीताई पेडणेकर या सकाळ झाली की पत्रकारांना, टीव्ही कॅर्मेयांना बोलावयचे आणि लाईव्ह होउन आपला मोठेपणा सांगायचा हे काम करत आहेत. काम खूप करत आहोत हे दाखवत आहेत. कोरोना विरोधात लढाई करत आहेत. या दरम्यान नालेसफाई झाली पाहिजे याचे भान त्यांनी का ठेवले नाही? मुंबईत दरवर्षी किती पाउस पडतो, कुठे पाणी साचते याची माहिती त्यांना निश्चितच असायला पाहिजे. महापौर असल्यामुळे किमान मुंबईत पाउस पडतो, पाणी साचते, त्याचा निचरा झाला पाहिजे, नालेसफाई झाली पाहिजे, ती वेळच्यावेळी झाली पाहिजे याचे भान असणारच. मग त्यांनी हे का केले नाही? प्रसारमाध्यमांपुढे सतत दररोज सकाळी यायचे आणि केंद्रावर, भाजपवर, मोदींवर, विरोधकांवर टीका करत बसायचे, त्यापेक्षा त्यांनी नालेसफाईचे आदेश दिले असते, ती कामे वेळेत करून घेतली असती, महापालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता तर आज ही वेळ आली नसती. हे काहीही न करता त्यांनी 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता. हा दावा हास्यास्पद असाच आहे. याचे कारण 100 टक्के नालेसफाई झाली असती तर सगळा कचरा गेला असता. वरचे चार टक्के त्यांनी काय नालेखुदाई केली का? असल्या पोकळ दावे आणि राजकारणाने, दुर्सयांवर टीका करून मोठे होण्याचे, प्रसिद्धीसाठी हपापल्याप्रमाणे दररोज सतत टीव्हीवर झळकल्याने काही होत नसते. खरा चेहरा या कर्चयाच्या स्रानामुळे समोर आलेला आहे. महापालिकेचा तो चेहरा आज खरा आहे हे जनतेला समजले आहे.
ठेकेदार निष्क्रिय म्हणून त्याला कर्चयाने स्रान घातले. मग नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांच्या निष्क्रियतेबाबत काय कारवाई करावी लागेल? याचे उत्तर कोणी देईल का?
एकुणच या संपूर्ण कोरोना प्रकरणात,लॉकडाउन, लसीकरण यात कुठेही नगरसेवक दिसले नाहीत. लसीकरणाचा गोंधळ झालाच नसता, पण नगरसेवक घराबाहेर पडलेच नाहीत. आज खाजगी रूग्णालयांमध्ये लसींचा साठा भरपूर आणि महापालिकेकडे टंचाई होते याचे गणित काय आहे? एकुणच प्रत्येकजण दुर्लक्ष करण्यात गुंतलेला आहे. हा कचरा कोण साफ करणार आहे?
शिवसेनेच्या नगरसेवक, आमदाराच्या प्रभागातीलच नालेसफाई होत नसेल तर शिवसेनेचे आमदार संतापणारच. आपली खदखद बाहेर काढणारच. तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी त्यांची अवस्था झाली. आपल्याच पक्षाच्या हातात महापालिकेची सत्ता असल्याने टीका करता येत नाही या नैराश्यातून त्यांनी महापालिकेवरचा राग ठेकेदारावर काढला आणि हे अमानवी कृत्य केले. आता या कर्चयात असंख्य प्रकारचे घाण, जंतू असतील. त्याच्या संपर्कातून त्या ठेकेदाराला कुठला रोग जडला, कोरोनाची लागण झाली तर त्याचा खर्च महापालिका करणार, आमदार करणार की शिवसेना करणार? माझी जबाबदारी फक्त कोरोनाबाबतच आहे का? मुख्यमंर्त्यांनी थोडे आपल्या नगरसेवक, महापालिकेकडेही लक्ष दिले पाहिजे. शिवसेनेच्या सत्तेचा पाया महापालिका आहे, त्यालाच धक्का बसत नाही ना हे पहावे लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा