मंगळवारी आणि बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले होते. ते आल्यानंतर राज्यातील राजकारणाला एकदम उत आला होता. काय तर म्हणे उत्तर प्रदेशात फिल्म सिटी वसवण्यासाठी ते आले होते. यावेळी अनेक दिग्गज कलाकार आणि निर्मात्यांना त्यांनी बोलावले आणि चर्चा केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आम्ही नव्याने फिल्म सिटी बनवत आहोत, असे योगींनी सांगितले. त्यावर बरीच चर्चा चर्वीचरण झाले हा भाग वेगळा, पण राज्यातील अनेक राजकीय पक्षांना वाटले की, मुंबईतील फिल्म सिटी उचलून तिकडे नेणार आहेत आणि तिकडे वसवणार आहेत, पण हे कदापिही शक्य होणार नाही. मुख्य म्हणजे चित्रपटसृष्टीशी निगडीत सगळी माणसे मुंबईत असताना ती नोएडात कशाला येतील? त्यातून उत्तर प्रदेशातील अंदाधुंद वातावरण पाहता आमिर खान, सलमान खान, शाहरूख खान अशी खान दानी माणसे, जावेद अख्तर, शबाना आझमी यांच्यासारखे विचारवंत कलाकार, नसरुद्दीन शाहसारखे असंख्य लोक मुंबईशी निगडीत आहेत, ते उत्तर प्रदेशात येतील का? फिल्म सिटी म्हणजे द्रोणागिरी पर्वत नाही, जो हनुमानाने उचलला आणि लंकेत नेला. मग परत आणून ठेवला. हा एक फार मोठा उद्योग आहे जो फक्त मुंबईतच होऊ शकतो. केवळ चित्रीकरण करणे म्हणजे फिल्म इंडस्ट्री नव्हे. चित्रीकरणासाठी कुठेही कथेच्या गरजेप्रमाणे जाता येते, पण चित्रपटाचे प्रमोशन हे मुंबईतूनच होत असते. त्यामुळे योगी तिथे फिल्म सिटी वसवतील म्हणजे शूटिंगसाठी एखादा स्टुडीओ उभा करतील, पण स्टुडीओ किंवा चित्रीकरणाचे स्थळ म्हणजे फिल्म उद्योग नव्हे. अशीही कथेची गरज असली, तर आपल्याकडचे कितीतरी चित्रपट दिल्लीत चित्रीत झालेले आहेत. रेखा विनोद मेहराचा घर, अमिताभचा त्रिशूल, असे कितीतरी चित्रपट किंबहुना यश चोप्रांनी आपले अनेक चित्रपट दिल्लीतच शूट केलेले आहेत. दिल्ली नोएडा यात काहीच फरक नाही, पण हे सर्व चित्रपट मुंबईतून गाजले होते. त्याची व्यावसायिक गणिते मुंबईतून तयार झालेली होती. त्यामुळे फिल्म सिटीच्या गप्पा मारण्याऐवजी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी तिथल्या लोकांना तिथेच स्थानिक रोजगार कसा मिळेल याची तयारी करावी.
म्हणजे आज मुंबईत दूधवाला भय्या यूपीचा आहे, त्यांना सगळ्या म्हशी घेऊन तिकडे दूध घालायला जाऊ दे, आम्ही मराठी म्हशी आणि मराठी तरुणांना दुधाचा व्यवसाय देऊ. ठिकठिकाणी घाण करणारे खैके पान बनारसवाले इथे आहेत, त्यांना तिकडे नेऊन आपल्या पानांची विक्री करू देत. आज बहुतेक सलून, स्पा आणि पार्लरमध्ये यूपी बिहारचे कारागीर आहेत, त्यांना तिकडे दुकाने थाटून द्या आणि स्थानिक रोजगार देऊन टाका. मुंबईत कानाकोपºयात इस्त्रीवाले आहेत, ते यूपीचे आहेत. त्यांना सगळ्यांना तिकडे घेऊन जा. म्हणजे आमच्याकडचे धोबी, नाभिक, गवळी यांना चांगले दिवस येतील. इथे जे पाणीपुरी, भेलपुरी विकायला चौपाटीवर आणि कानाकोपºयात आहेत, त्यांना यूपीच्या २४ कोटी जनतेची सेवा करायला योगींनी घेऊन जाऊ दे. मूठभर श्रीमंत अशा चित्रपटसृष्टीतील कलाकारांना पळवण्यापेक्षा आणि वळवण्यापेक्षा हा जो मुंबईवर यूपीचा बोजा पडलेला आहे तो सगळा तिकडे नेलात तर तहहयात तुमचे सरकार तिकडे राहील, यात शंकाच नाही. त्यामुळेच आपण इथे आलात आम्हाला आनंद आहे, पण केवळ फिल्म सिटीच नको तर इथे जो रोजगार यूपीच्या लोकांना मिळत आहे तो तिकडे देण्यासाठी हातपाय हालवा आणि मग काय ते बोला. आज मुंबईतील हजारो टॅक्सींमध्ये ७० टक्के टॅक्सीचालक हे उत्तर प्रदेशचे आहेत, त्या सगळ्या टॅक्सीचालकांना तिकडेच रोजगार दिला आणि एवढ्या मोठ्या आपल्या राज्यात त्यांना वाहने चालवायची संधी दिली, तर हा महाराष्ट्रही स्वच्छ होईल आणि यूपीचा उद्धार होईल.
उत्तर प्रदेशातील शेतकºयांचे प्रश्न सोडवा, तिथे अन्य उद्योजकांना आमंत्रित करून तिथली कारखानदारी वाढवा आणि महाराष्ट्रात जे तुमचे लोंढे येत आहेत ते थोपवा. केवळ चित्रपटातील कलाकारांना आमंत्रित करून काहीच साध्य होणार नाही. उत्तर प्रदेशाचा विकास हा तिथल्या स्थानिकांना तिथेच रोजगार देऊन होणार आहे. महाराष्ट्रातून फिल्म सिटी नेऊन काहीही साध्य होणार नाही. किंबहुना उत्तर प्रदेशातील जी विचारसरणी आहे ती चित्रपटसृष्टीला योग्य नाहीच आहे. कारण महाराष्ट्र हा पुरोगामी विचारसरणीचा आहे. इथे राजकारणापुरता फक्त जातीपातीचा विचार केला जातो. निवडणुकीपुरती इथे आरक्षण, जाती आणि धर्मांची परिस्थिती असते. पण एरवी सगळेजण एकच असतात. कसलाही भेदभाव न करता गुण्यागोविंदाने राहत असतात, पण उत्तर प्रदेशात सतत जाती आणि धर्मावरच सगळे चालत असते. चित्रपटसृष्टीचे जगच वेगळे आहे. भेदभाव विरहीत आहे. त्यामुळे ज्या राज्यात लव्ह जिहादसारखे कायदे केले जातात त्या राज्यात मुसलमान हीरो आणि हिंदू हिरोईनचा चित्रपट बनवता येईल का? हम आप के हैं कौनसारखे कौटुंबिक चित्रपटही तिथे तयार होणार नाहीत, कारण हीरो सलमान असेल आणि हिरोईन माधुरी असेल. म्हणून आपण आलात आनंद वाटला, पण खºया अर्थाने रोजगारासाठी काही करा इतकीच अपेक्षा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा