शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

कोविड क्राइम


कोविड-१९ या कोरोनाच्या महामारीत सगळीकडे बंदी केली. लॉकडाऊ न झाले, पण त्याचा परिणाम गुन्हेगारी वाढण्यात झाला आहे की काय, असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. या लॉकडाऊ नच्या काळात आणि त्यानंतर सुरू झालेल्या कारभारात कमी होत असलेल्या गर्दीमुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे असे वाटते. याचे कारण मंगळवारी बेलापूर ते सीवूडदरम्यान लोकलमध्ये झालेली लूटमारीची बातमी. मुंबई लोकलमधून फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकच प्रवास करत आहेत. त्यामुळे बºयापैकी लोकलचे डबे हे रिकामेच असतात. रात्रीच्या आणि सकाळच्या वेळेत तर कित्येक वेळा डब्यात कोणीच नसते किंवा एखाददुसरी व्यक्ती असते. त्यामुळे त्या एकट्या माणसाला लुटण्याचे प्रकार होताना दिसत आहेत. मंगळवारचा प्रकार उजेडात आला. अशाप्रकारे आणखी किती जणांना अशाप्रकारे लुटमारीला सामोरे जावे लागले आहे याचाही शोध घ्यावा लागेल.

मुंबई लोकल ही गर्दीचे ठिकाण म्हणून कोरोनाच्या काळात बंद केली गेली. त्यानंतर ती टप्प्याटप्प्याने काही लोकांसाठी, अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी सुरू केली गेली, पण गर्दी नसल्याचा फायदा उठवण्यासाठी चोर, दरोडेखोरांच्या टोळ्यांनी जर प्रवाशांना लक्ष केले असेल तर ते फार भयानक आहे. म्हणूनच मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस, नवी मुंबई पोलीस आणि रेल्वेच्या सर्व मार्गांवर येणाºया पोलिसांनी याबाबत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे आहे. मंगळवारी हार्बर मार्गावर बेलापूर ते सीवूड प्रवासात एकटा पाहून टोळक्याने एकाला बेदम मारहाण केली आणि त्याला लुटले, पण अशाचप्रकारे एखाद्या महिलेची छेडछाडही होऊ शकते. त्यामुळे हे सगळे कोविडच्या काळात वाढलेले गुन्हे आहेत असेच म्हणावे लागेल.


मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यात आलेली नाही. त्यामुळे सामान्य माणसांना स्टेशनवर जाणेही शक्य नाही. असे असतानाही आजकाल स्टेशनवर किती लोक अवैधपणे वावरत असतात. गेल्या काही दिवसांपासून कळकट कपड्यातील भिकारी लोकलमध्ये घुसून लोकल साफ करण्याच्या निमित्ताने येतात आणि प्रवाशांकडे पैसे मागतात, अंगाला हात लावतात. लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी हे बहुतेक जण स्मार्टफोनमध्ये गुंतलेले असतात. त्यांच्या बेसावधपणाचा फायदा घेऊ न हे पळवापळवीचे प्रकार करणारे लोकही इथे फार वावरताना दिसत आहेत.

याशिवाय बहुतेक उपनगरी स्थानकांच्या बाहेर काही टोळ्या दाखल झालेल्या आहेत. प्रवाशांना या टोळ्या अडवतात आणि कसलीही मागणी करतात. कधी पैशांची, कधी दुकातून सामान घेऊ न देण्याची, दोन किलो आटा द्या, असल्या हाका देऊ न प्रवाशांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. या टोळ्या कुठून आलेल्या आहेत याचा तपास केला पाहिजे. या टोळ्या हार्बर मार्गावर मोठ्या प्रमाणात आहेत. यात पनवेल, कामोठे, खारघर, बेलापूर, नेरूळ या स्थानकांत तर हे लोक ठाण मांडून बसलेले दिसतात. हे कशामुळे घडते आहे?


लॉकडाऊ नच्या काळात अनेकांचे रोजगार गेले. चरितार्थ चालवण्यासाठी लोकांची धडपड चालली आहे. अनेक उद्योग बंद पडले. कामधंदे नसल्यामुळे हे चोरीचे, लुबाडण्याचे धंदे सुरू झाले असतील तर हे फार भयानक आहे. माणसं कुठल्याही थराला जाऊ शकतील अशी भीती आहे. जगण्याची चाललेली ही धडपड दुसºयाचा जीव घेण्यापर्यंत जाऊ शकते. त्यामुळे या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याचे फार मोठे आव्हान सरकारपुढे असेल. कोरोनावर लस येईल. कोविडपासून माणसं मुक्त होतीलही, पण या कोरोनामुळे रोजगार गेलेले काही लोक जर गुन्हेगारी जगताकडे वळले असतील तर त्यांना पुन्हा माणसात आणणे अवघड होईल. त्या रोगावर मात्र कुठलेली औषध असणार नाही, कसलीही लस असणार नाही हे कटू सत्य आहे.

जन्माला येताना कोणीही गुन्हेगार म्हणून जन्माला येत नसतो, पण जन्माला येणाºया प्रत्येक जीवाला माणसाला जगण्याचा हक्कही आहे हे नाकारता येत नाही, पण जगण्यासाठी लागणाºया किमान गरजा त्याला पुरवण्याची क्षमता नसेल तर ज्याच्याकडे अशा साधनांची मुबलकता आहे त्याच्याकडून हिसकावून घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागेल. काम नसणे, रोजगार बंद होणे, बेरोजगारीचे प्रमाण वाढणे याचे हे दुष्परिणाम असू शकतात. आज आपल्या शेजारी असलेल्या पाकिस्तानात लोक अन्नाला महाग झालेले आहेत. लाखो लोकांची अवस्था अन्नान्न अशी झालेली आहे. एका अंड्याची किंमत आज तिथे ३० रुपयांच्यावर आहे. खायला काही नाही. त्यामुळे या गरिबीमुळे बहुसंख्य पाकिस्तानी लोक दहशतवादी संघटनांमध्ये सामील होतात हे आपण अनेक वेळा पाहिले आहे. तसेच आपल्या देशात होता कामा नये. खायला अन्न नाही, रोजगार नाही म्हणून लोक जर गुन्हेगारी जगताकडे वळत असतील, तर हा कोविडचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम असेल. म्हणूनच आता जास्त काळ उद्योग-व्यवसाय बंद न ठेवता पुन्हा आपली घडी कशी बसेल याचा विचार करावा लागेल. एखाद्या रोगाला घाबरून आपण किती काळ घरात बसणार आहोत हाही प्रश्नच आहे. सगळं आयुष्य उद्ध्वस्त होत असताना प्रत्येक जण आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारच. त्यासाठी तो जर गुन्हेगारी मार्गाचा अवलंब करू लागला, तर ते किती धोक्याचे आहे याचा विचार करावा लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: