संपूर्ण जगाला भेडसावणाºया कोरोना महासंकटाच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील विविध शहरांना भेट देऊन कोरोना विरोधातील लसीकरण संशोधनाच्या कामाची पाहणी करून सर्व संशोधकांचे कौतुकही केले. भारतात लवकरच लसीकरणाचे सुरक्षाकवच उपलब्ध होण्याचे संकेतही दिले. येत्या चार डिसेंबरला ते सर्वपक्षीय बैठक घेऊन त्याबाबत काही घोषणा करण्याचीही शक्यता आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौºयामुळे एक सकारात्मक वातावरण संपूर्ण देशभरात तयार झालेले आहे. किंबहुना भारताकडून संपूर्ण जगाची फार मोठी आशा आहे असे दिसून लागले आहे, पण मोदींनी केलेल्या पाहणीने या कार्यात असलेल्या संशोधकांचे मनोबल वाढेल हे नक्की.
कोरोनावरील लसीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे या शहरातील झायडस कॅडिला, भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्युट या संस्थांची भेट घेऊन तेथील लसीकरणाची संशोधन प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आली आहे, याची सविस्तर माहिती घेतली. देशातील वैज्ञानिक समूहाने पंतप्रधानांच्या या पुढाकाराचे कौतुक केले. यामुळे देशातील जनतेला दिलासा मिळण्याचे काम होणार आहे असे म्हटले आहे, ते निश्चितच खरे आहे. लसीकरणाचे काम कोणत्या टप्प्यात आहे याची माहिती मागवून घेऊन टेबलावर त्याचा अभ्यास करणे वेगळे आणि प्रत्यक्ष त्या त्या संस्थांमध्ये जाऊन लसीकरणाबाबत सविस्तर माहिती घेणे वेगळे. तिथे प्रत्यक्ष जाऊन प्रोत्साहनाची दिलेली थाप फार महत्तची आहे, पण त्यानंतर काही विघ्नसंतोषी लोकांनी त्या पुण्यातील सीरमच्या लसीबाबत काही चुकीचे वक्तव्य केले आणि आपला खोटेपणा दाखवून दिला. ही असली राजकारणाची कामे अशा संशोधनात करायची नसतात याचे भान असायला पाहिजे, पण तरीही पंतप्रधानांनी दिलेले प्रोत्साहन फार महत्त्वाचे आहे.
पंतप्रधान मोदी यांनी जाणीवपूर्वक या संस्थांना भेट देऊन या लसीकरणाची माहिती घेतल्याने देशातील जनतेलाही या लसीकरणाच्या प्रगतीची माहिती मिळाली. मोदी यांच्या दौºयानंतर पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटचे आदर पुनावाला यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक आश्वासक आणि आशादायक गोष्टी सांगितल्याने ही निश्िचतच लोकांसाठी आनंदाची वार्ता मानावी लागेल. पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटमध्ये तयार होणाºया कोविशिल्ड या लसीमुळे चांगले सुरक्षाकवच तयार होणार असून, बाधिताला रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण एकदम ६0 टक्क्यांपर्यंत खाली येणार आहे.
सीरममध्ये तयार होणारी लस फक्त भारतासाठी आणि आफ्रिकेसाठी असल्याने त्याचाही फायदा प्राधान्याने भारतालाच होणार आहे. सध्या महिन्याला पाच ते सहा कोटी लसीची निर्मिती होत आहे. जानेवारी महिन्यापासून हे प्रमाण १0 कोटींपर्यंत वाढणार आहे. साहजिकच नजीकच्या काही महिन्यांमध्ये देशातील लोकांना कोरोनापासून एक सुरक्षित असे कवच उपलब्ध होणार आहे. दुसरीकडे अहमदाबादमधील झायडस कॅडिला या संस्थेतही कोरोना विरोधातील लसीच्या पहिल्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत आणि आॅगस्टपासून दुसºया टप्प्यातील चाचण्यांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी ही लस बाजारात येणार आहे. तिसरी गोष्ट म्हणजे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सहकार्याने विकसित केली जाणारी भारत बायोटेकची कोवॅक्सीन ही लस अंतिम टप्प्यात आहे. संपूर्णपणे स्वदेशी लसीच्या तिसºया टप्प्यातील चाचण्याही सुरू झाल्या असून, सध्या या लसीनेही ६0 टक्के प्रतिकारक्षमता गाठल्याचा दावा संस्थेतील संशोधकांनी केला आहे. हीसुद्धा आनंदायक गोष्ट आहे. जगाच्या कानाकोपºयात सर्वच देशांनी आपापल्या पातळीवर कोरोनाविरोधात लस शोधण्यासाठी संशोधन सुरू केले असले, तरी त्या बाबतीत भारताने घेतलेली आघाडी निश्िचतच कौतुकास्पद म्हणावी लागेल. या उपक्रमाला पंतप्रधानांनी आपल्या दौºयातून दिलेले प्रोत्साहन हे संशोधकांचे मनोबल वाढवणारे आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता लस उपलब्ध होणार असल्याचे संकेत मिळाल्याने नागरिकांनी कोणत्याही प्रकारे गाफील राहणे सध्या तरी परवडणारे नाही. नजीकच्या कालावधीमध्ये मास्कचा वापर, सुरक्षित अंतर ठेवणे आणि जंतुनाशक यांचा वापर, या त्रिसूत्रीचा वापर चालू ठेवावाच लागणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे. लस लवकरच उपलब्ध होण्याची आनंदवार्ता देत असतानाच सरकारला आणि प्रशासनाला दुसरीकडे नागरिकांच्या व्यवहारावरही नियंत्रण ठेवण्याचे काम करावे लागणार आहे. केंद्र सरकारने नजीकच्या कालावधीत लसीकरणाच्या योग्य वितरणासाठी एखादी सक्षम यंत्रणा उभी करून त्याबाबतचे नियोजन आतापासूनच करायला हवे. मुंबईत त्यादृष्टीने कोल्ड स्टोअरेज तयार करण्यास सुरुवात झालेली आहे ही किती आनंददायी गोष्ट आहे. गेल्या अनेक वर्षांच्या कालावधीमध्ये सरकार ज्याप्रमाणे पोलिओच्या लसीचे वितरण आणि नियोजन करीत आहे त्याचप्रकारे कोरोना विरोधातील लसीचे नियोजन आणि वितरण करण्याची गरज आहे. हा व्यापक कार्यक्रम आता लवकरच सुरू होईल याचे आता संकेत मिळत आहेत, पण पंतप्रधानांच्या या दौºयामुळे सर्वांना प्रोत्साहन मिळाले ही खूप चांगली गोष्ट आहे.
गेल्या वर्षभराच्या कालावधीत या महामारीमुळे भारतासारख्या मोठ्या देशाला मोठा फटका बसला असला, तरी आता या लसीकरणाच्या आनंदवार्तेमुळे भारताला पुन्हा एकदा सावरण्याची संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे लसीकरणाचे संशोधन करणाºया सीरम इन्स्टिट्युट, झायडस कॅडिला आणि भारत बायोटेक या सर्व संस्थांचे यावेळी मनापासून अभिनंदन करावेच लागेल. इथून पुढे आता नागरिकांनी दाखवलेली सजगता आणि आगामी काळातील नियोजनबद्ध लसीकरण यामुळे कोरोनाच्या संकटावर निश्िचतच मात करता येईल हे नक्की.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा