उठसूट केंद्र सरकारकडून अपेक्षा करायच्या, केंद्राने मदत द्यावी म्हणून याचना करायची आणि दुसरीकडे आपले अपयश झाकत सगळा दोष केंद्रालाच द्यायचा, हा महाविकास आघाडीचा जो एककलमी कार्यक्रम चालला आहे तो अत्यंत हिन दिन असा आहे. फक्त केंद्राच्या नावाने शंख करायचा इतकेच काम काँग्रेसचे नेते करत आहेत. काय ते नवाब मलिक, सचिन सावंत काय बरळत असतात, त्यांचे त्यांना तरी समजते का? तिकडे संजय निरूपम काय बरळत असतात आणि आपण काय वागतो हे त्यांना समजतही नाही. त्यामुळे विचारांपासून भरकटलेले नेते अशी काँग्रेसच्या नेत्यांची अवस्था झालेली आहे. अर्थात केवळ व्यक्तीपूजक, घराणेपूजक असलेल्या या लोचट नेत्यांकडून चांगली अपेक्षा करणेच चुकीचे आहे.
पंतप्रधान मोदींनी कुंभमेळा आटोपता घेण्यास सांगितले. योग्य केले. त्याचे कौतुक करायचे सोडून हेच काम दुसºया कोणी केले असते, तर ते हिंदूद्रोही ठरले असते, असे वक्तव्य त्या संजय निरूपम नामक अतृप्त आत्म्याने केले. सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातलेली असताना, कुंभमेळा आटोपता घेण्यास सांगणे यात चुकीचे काय? पण काहीतरी टीका करायची म्हणून या बिनकामाच्या काँग्रेस नेत्यांना सवय लागलेली आहे. अत्यंत फालतूगिरी करत आहेत हे लोक. आपण महाविकास आघाडी सरकारमध्ये आहोत याचाही या काँग्रेसच्या नेत्यांना विसर पडलेला दिसतो. मुख्यमंत्र्यांनी कडक निर्बंधांचा निर्णय घेतला, तर त्यावरही हे संजय निरूपम टीका करतात. आपण काँग्रेसचे नेते आहोत याचा त्यांना विसर पडला आहे की, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे याचा विसर पडला आहे? उगाच आपलं बरळत रहायचं?
हाफकिनसारख्या इन्स्टिट्यूटला लस निर्मितीची परवानगी दिली म्हणून आणि केंद्राकडून वेळोवेळी मिळणाºया सहकार्याबद्दल मुख्यमंत्री जाहीरपणे पंतप्रधानांचे आभार मानतात. त्याचवेळी काँग्रेसचे नेते त्यावर टीका करतात. काही एकवाक्यता आहे की नाही?
दातात अडकलेले चार दोन शब्द उच्चारले पुरोगामी महाराष्ट्र, संघ परिवारावर टीका केली म्हणजे आपले काम झाले, एवढाच धंदा सध्या काँग्रेस नेत्यांना आहे; पण तिकडे त्यांचे काय काम चालले आहे हे जरा पाहिले तर डोळे फाटतील. विनाकारण टीका करायची म्हणून टीका करू नका. हिंमत असेल, तर नवाब मलिक यांनी रमजानचे उत्सव, इफ्तार पार्टीला होणारी गर्दी करू नका, असे आवाहन करून दाखवावे. पुरोगामी म्हणवणाºया या काँग्रेसच्या भोंदू नेत्यांचा बुरखा फाटल्याशिवाय राहणार नाही. मोदींनी जर कुंभमेळ्यावर बंदी घालण्याचे औचित्य दाखवले आहे, तर नवाब मलिकांनी मुसलमान बांधवांना कोरोनाच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन करण्याचे धाडस करावे. सतत तोंडाला मास्क न लावता पचापचा थुंकणे बंद करा, असे आवाहन करा, लसीच्या तुटवड्यावरून बोंब मारणाºया नवाब मलिक यांनी मुसलमान बांधवांनी लसीकरण करावे असे आवाहन करून दाखवावे. या समाजाचा लसीला विरोध आहे तो मोडून काढावा. कसले तुमचे पुरोगामीत्व घेऊन बसला आहात? केवळ टीकेसाठी टीका करू नका.
सध्या राज्य संकटात सापडले असताना आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याची क्षमता स्वत:मध्ये नसताना त्यांनी आपल्या अकार्यक्षमतेची कबुली देतकेंद्र सरकारपुढे लोटांगण घालायला काय हरकत होती? स्वत:मध्ये क्षमता नाही, काही करण्याची इच्छा नाही. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. अशा परिस्थितीत जे काम करत आहेत त्यांना काम करून द्यायचे नाही, आपल्याच आघाडीत असलेल्या शिवसेनेच्या विरोधी भूमिका मांडायची आणि सरकार आमचे आहे असे म्हणायचे. ज्या पक्षाला साधा नेता निवडता येत नाही, कसलेही धोरण नाही त्यांनी केंद्राच्या चुका काढण्यात फालतुगिरी करू नये. आज काँग्रेसच्या नेत्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झालेली आहे. केंद्रात कुणी विचारत नाही, राज्यात सरकारमध्ये असून फारशी किंमत नाही. त्यामुळे फक्त बरळत राहणे यासाठी नवाब मलिक, संजय निरूपम, सचिन सावंत ही मंडळी काहीतरी बरळत राहतात. द्वेषाच्या भावनेने वागत असतात, बाकी त्यात काही तथ्य नसते.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे. सामान्य जनता भयभीत आहे. संभ्रमात सापडली आहे. जिकडे तिकडे गोंधळ आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालये अपुरी पडत आहेत. प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध नाहीत. औषधांचा काळाबाजार होत आहे. देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता एकट्या महाराष्ट्रात दररोज सत्तर टक्के रुग्ण सापडत आहेत. असे सगळे भयावह चित्र असताना आणि गोंधळ निर्माण झाला असताना केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वयाची भूमिका घेण्याची गरज असताना काँग्रेस नेते अत्यंत द्वेषाने वागत आहेत. आपण जर हे कोरोना विरोधातील युद्ध आहे असे म्हणत आहोत, तर युद्ध लढत असताना सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे; पण काँग्रेस नेते अजूनही ब्रिटिशकालीन प्रवृत्तीतच वावरत आहेत. सर्वांनी एकत्र येऊन हा लढा लढायचा असताना काँग्रेस नवी राजकीय अस्पृश्यता निर्माण करत आहेत. भाजप आणि मोदी सरकार, केंद्राचा तिरस्कार करत आहे. ही राजकीय अस्पृश्यता म्हणजे एक प्रकारचा भरकटलेपणा आहे. या भरकटलेल्या लोकांकडे दुर्लक्ष करण्यातच सामान्य जनतेचे हित आहे.
19/04/2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा