गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

मुठभरांची शिक्षा सर्वांना नको

महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, अहमदनगर, अमरावती, अकोला-बुलडाणा यांसारख्या शहरांमध्ये कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा दिलेला आहे. रविवारी कदाचित ते अनेकांशी चर्चा करून याबाबत निर्णयही घेतील; पण ही परिस्थितीत वारंवार येणे हे काही चांगले नाही. लॉकडाऊनमुळे लोक देशोधडीला लागतील; पण तरीही नागरिक जागृतपणे वागत नाहीत. सध्या मुंबई लोकलमध्ये यूपी बिहारचे भय्ये लोक इतक्या बेजबाबदारपणे वागताना दिसतात की, त्यांना इथून खरोखरच हाकलले पाहिजे असे वाटू लागते. सतत तंबाखू, गुटखा, पान खाऊन लोकलमधून पचापचा थुंकत असतात. त्यांना कोणी विरोध केला, तर ते अंगावर येतात अशी परिस्थिती आहे. इतकी दादागिरी आज मराठी माणसाला लोकल प्रवासात सहन करावी लागते आहे. नुसती सतत कॅसेट वाजत असते की, हे आहे मध्य रेल्वेचे थुंकण्यास मनाई आहे अभियान; पण हे परप्रांतीय मुद्दाम दरवाजात उभे राहून थुंकत असतात, तोंडावर मास्क नसतो आणि अतिशय गलिच्छ वागत असतात. याविरोधात दाद मागायची रेल्वे प्रशासन, पोलीस प्रशासनाकडून किंवा राज्य सरकारकडून कसलीही सोय नाही. मग हा रोगाचा प्रसार थांबेल कसा? कारण नसताना लहान मुले, महिला लोकलमधून प्रवास करत असतात. १२ ते ४ ही वेळ दिलेली असतानाही हे प्रवासी सकाळपासून स्टेशनवर गर्दी करतात आणि संपूर्ण मुंबईला वेठीस धरतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची सरकार हालचाल का करत नाही? या लोकांमुळे सर्वसामान्य आणि प्रामाणिक माणसांना त्रास होत आहे. सरकार नुसते नियम, निर्बंध घालत आहे; पण त्याचे पालन न करणाºयांवर कारवाई करत नाही, तोपर्यंत त्या निर्बंधांना काहीही अर्थ नाही. ठिकठिकाणी बुथ ठेवा आणि नियमांचे पालन न करणाºयांविरोधात तक्रार करण्याची सोय करण्याची गरज आहे. मंदिरे, व्यायामशाळा बंद ठेवल्या आहेत त्यापेक्षा जर तंबाखुची दुकाने, गुटखा, पान, जर्दा याची दुकाने बंद केली, तर लोकांना पचापचा थुंकायची संधी मिळणार नाही. सर्वात प्रथम तंबाखुवर बंदी घातली पाहिजे. त्याचप्रमाणे पक्षीमित्र म्हणून जे संपूर्ण शहरात घाण करतात त्या कबुतरखान्यांवर बंदी घातली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी हजारोंच्या संख्येने हे कबुतरांचे थवे उडतात आणि घाण पसरवतात. त्यामुळे रोगराई पसरते, तसेच काही भूमित्र म्हणजे कुत्र्यांना बिस्कीटे घालणारे गलिच्छ लोक स्टेशन आणि सर्वत्र फिरत असतात. ती कुत्री खा-खा बिस्किटे खातात आणि सगळीकडे सांडगे घालत फिरतात. त्यातून रोगराई पसरते. या प्रकारांना आळा घातला तर रोगराईला आळा बसेल.


आज सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्येही रुग्णशय्या कमी पडताहेत. आॅक्सीजनचा तुटवडा भासत आहे. औषधे कमी पडत आहेत. लसीकरणाने अजून पाहिजे तसा वेग घेतलेला नाही. असे असतानाही आम्ही बेशिस्त वागून स्वत:वरील आणि प्रशासनावरील ताण वाढवत आहोत, ही लाजिरवाणी बाब होय. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात कोरोनाने अमेरिका, इटलीत घातला तसा गोंधळ घातला नव्हता, त्याचेही कारण होते. केंद्र सरकार आणि सगळ्या राज्य सरकारांनी प्रारंभापासूनच जी काळजी घेतली, सतर्कता बाळगली, उपाय केलेत त्यामुळे आपल्याकडे कोरोनाने एका विशिष्ट प्रमाणाबाहेर हातपाय पसरले नव्हते. ज्याप्रमाणे सरकारांनी प्रयत्न केलेत, त्याप्रमाणेच आपल्याकडच्या आरोग्य यंत्रणेने, यंत्रणेत सहभागी असलेल्या डॉक्टरांनी आणि अन्य कर्मचाºयांनीही कोरोनाला एका मर्यादेत रोखले, परंतु गेल्या महिनाभरात स्थिती पुन्हा बिघडली आहे. त्याचे कारण स्पष्ट आहे. काही लोकांचा बेजबाबदारपणा. या बेजबाबदार लोकांना वठणीवर आणायची हीच ती वेळ आहे. राज ठाकरेंसारखे नेते मी मास्क वापरणार नाही म्हणत असतील, तर त्यांचे अनुयायी त्याचे अनुकरण करणार. हे चुकीचे आहे. कायदा आणि नियम सर्वांसाठी सारखाच असतो; पण ज्यांचे फॅन, फॉलोअर्स खूप आहेत. त्यांनी कायदे मोडण्याची शिकवण देणे हे चुकीचे आहे.

आज टाळेबंदी पूर्णपणे उठली आहे. त्यामुळे कसेही वागण्याची आपल्याला मोकळीक मिळाली आहे, या भ्रमात नागरिक सर्व व्यवहार बिनधास्तपणे करू लागले आहेत. सार्वजनिक ठिकाणी घ्यावयाची काळजी घेताना दिसत नाहीत. कोरोनाग्रस्तांचा आकडा जसजसा वाढत आहे, तसतसे मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. ही जास्त चिंतेची बाब आहे. एकाच घरातील चौघा-चौघांचे मृत्यू होत आहेत. आपल्या आसपास अशा घटना घडत असतानाही आपण बेफिकीर वृत्तीने वागत आहोत, हे आत्यंतिक दुर्दैवी होय. त्यामुळे आज जर लॉकडाऊन जाहीर झाला आणि आपल्या हातातले सर्वस्व गेले, तर आपण जबाबदार आहोत हे लक्षात घेतले पाहिजे. मुठभरांच्या बेशिस्तीचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे, हे नक्की. त्यासाठी सरकारने नियमभंग करणाºयांविरोधात तक्रार करण्याची सोय केली पाहिजे. म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशीचा प्रकार होणार नाही.


कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात पसरू नये, यासाठी डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाºया परिचारिका, अन्य कर्मचारी यांनी त्यांचा जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्त नागरिकांची, समाजाची सेवा केली, त्यांचे परिश्रम वाया जातात की काय, अशी भीती आता वाटायला लागली आहे. जिवावर उदार होत त्यांनी सेवा दिली. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात पीपीई किट घालून उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करून त्यांनी जी सेवा दिली आणि आताही उन्हाची तीव्रता वाढत असताना ही मंडळी सेवा देत आहेत, तिला सलाम ठोकला पाहिजे! इतरांप्रमाणे डॉक्टर्स आणि अन्य कर्मचारी घाबरून घरी बसले तर काय होईल, याची कल्पनाही न केलेली बरी! जगातल्या अनेक देशांमध्ये कोरोनाची लस टोचण्यास प्रारंभ झाला आहे. भारतातही आता लसीकरणाने वेग घेतला आहे; पण १३० कोटी लोकांना लस द्यायला भरपूर वेळ लागणार आहे. त्याला काही इलाज नाही. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात १३० कोटी लोकांना ही लस वेळेत टोचली जाणे तसे अवघडच आहे. त्यामुळे प्रत्येकाला लस टोचली जात नाही, तोपर्यंत आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: