गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

सकारात्मकतेची गरज


संपूर्ण जगाला त्रस्त करून सोडणाºया कोरोना महामारीच्या संकटाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता तर भारतात रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे. जगात सर्वात जास्त रुग्ण वाढ आता भारताच्या नावावर नोंदवली गेली आहे. गेल्या दोन दिवसांपासून दररोज साडेतीन लाखांच्या घरात नवीन रुग्णांची वाढ होताना दिसत आहे.

भीतीदायक आकडेवारी समोर येत असतानाच दुसरीकडे आॅक्सिजनची टंचाई, लसींची टंचाई आणि रुग्णालयामधील बेडची टंचाई या नकारात्मक गोष्टी समोर येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीती पसरली आहे. हे किती दिवस चालायचे?


सर्वोच्च न्यायालयालाही आता या प्रकरणाची दखल घ्यावी लागली आहे. रविवारच्या मन की बातमधून मुंबईचे डॉक्टर शशांक जोशी यांनी पंतप्रधानांशी बोलताना भारताची परिस्थिती अमेरिकेपेक्षा चांगली असल्याचे स्पष्ट केले आहे, ही समाधानाची बाब आहे; पण तरीही आपल्याला अधिक सतर्कतेने आणि सकारात्मकतेने काम करावे लागणार आहे हे नक्की.

गेल्या काही दिवसांपासून वृत्त वाहिन्यांवरून टीआरपी वाढवण्यासाठी नकारात्मक बातम्या देण्याचे प्रमाण वाढले आहे. लोक कसे बेजबाबदार आहेत, शासन कसे मुर्ख आहे, आरोग्यसेवा कशी ढासळली आहे हे दाखवण्यात गर्क आहे. त्यात चुकीची आकडेवारी देण्याचे प्रकारही होत आहेत. त्यामुळे करोनाबाबतची अधिकृत माहिती फक्त सरकारकडूनच जारी केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. परंतु सरकारी यंत्रणांना कॅमे‍ºयापुढे येण्याची इतकी घाई झालेली असती की, प्रत्येक वाहिनी मी सर्वात अगोदर ही बातमी दिली, ब्रेकिंग न्यूज दिली हे सांगण्यासाठी आतल्या गोटातून अधिका‍ºयांकडून अर्धवट माहिती घेतात, असे प्रकार होतात. त्यामुळे ब्रेक द चेन मोहिमेत ही ब्रेकिंग न्यूज संस्कृती बाधा ठरते आहे. हे प्रकार सध्याच्या काळात टाळले गेले पाहिजेत. त्यादृष्टीने या वाहिन्यांवर काही बंधने लादली गेली पाहिजेत, असे वाटते.


गेल्या काही दिवसांच्या कालावधीमध्ये एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत असतानाच कुठे आॅक्सिजनची गळती होऊन रुग्णांचा झालेला मृत्यू असो किंवा मुंबईमध्ये हॉस्पिटलला आग लागून रुग्णांचा झालेला मृत्यू असो किंवा राजधानी दिल्लीमध्ये आॅक्सिजन उपलब्ध न झाल्याने २५ पेक्षा जास्त रुग्णांचा झालेला मृत्यू असो अशा प्रकारच्या बातम्यांचे प्रमाणच जास्त प्रमाणात समोर आल्याने सामान्य नागरिकांची मानसिकता नकारात्मक झाली आहे. नागरिकांमधील ही नकारात्मकता दूर करण्यासाठी सरकारी यंत्रणा कशी काम करते आहे, याची माहिती दिली पाहिजे. रोज साडेतीन लाख रुग्ण नव्याने येत आहेत याचबरोबर अडीच लाख बरे होऊन घरी गेले आहेत, हे सांगण्याचे औचित्य कोणी दाखवत नाही.

सध्या वृत्त वाहिन्यांपेक्षा दूरदर्शनच्या शांत भाषेतल्या स्पष्ट बातम्या पाहिल्या, तर नागरिकांना सत्यस्थिती समजेल. अधिकृत प्रसारमाध्यमे सर्व प्रकारची काळजी घेऊन वृत्तांकन करत असतात; पण सर्वसामान्य नागरिकांच्या हातात जो स्मार्टफोन आहे त्या स्मार्टफोनवर जो सोशल मीडिया नावाचा प्लॅटफॉर्म सक्रिय झाला आहे त्या प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होणाºया सर्वच बातम्या ख‍ºया आणि बरोबर किंवा अचूक असतात असे नाही. तरीही समाज माध्यमांवर प्रसिद्ध होणाºया या बातम्या, विविध प्रकारचे व्हिडीओ, विविध तज्ज्ञांचे मत यावर लोक विश्वास ठेवतात आणि ही सर्व माहिती आहे तशी इतर समाज माध्यमांमध्ये फॉरवर्ड केली जाते. दोन दिवसांपूर्वी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे निधन झाल्याची बातमी अशीच पसरवली गेली. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनीही श्रद्दांजली वाहिली. नंतर ते वृत्त खोटे असल्याचे समजल्यावर सगळ्यांची फेफे उडाली, माफी मागावी लागली. हे प्रकार सभ्यतेचे नाहीत. त्यामुळे सोशल मीडिया आणि वृत्त वाहिन्यांवर काही निर्बंध आणावे लागतील.


या माध्यमांनी पसरवलेली ही माहिती किती अचूक किंवा उपयुक्त आहे याचा विचार न करता त्यावर विश्वास ठेवला गेल्यानेच घबराट जास्तच वाढते हे विसरून चालणार नाही. ज्याप्रमाणे अधिकृत प्रसारमाध्यमात सर्व गोष्टींचा विचार करून आणि खातरजमा करून बातम्या प्रसिद्ध करतात. यात वृत्तपत्रांची भूमिका स्पष्ट असते. अशाच वृत्तपत्रांची गळचेपी करण्याचे सरकारी धोरण आहे. कारण अफवा पसरवून हवा तयार करण्याचे वेड नेत्यांना लागले आहे. त्यात या वाहिन्या तिखट मीठ लावण्याचे काम करतात. त्यांना वृत्तांमध्ये रंजकता आणायची आहे, प्रेक्षकांच्या भावनांशी खेळायचे आहे. त्या नादात सत्य कथन बाजूला राहते. आज कोरोनाची स्थिती भयानक आहे; पण त्यातून निर्माण होणा‍ºया चांगल्या बाबीही समोर आणल्या पाहिजेत. सर्वात जास्त लसीकरण भारतात झाले. १४ कोटी लोकांचे लसीकरण झाले. महाराष्ट्रातही २ कोटींपेक्षा जास्त लोकांनी लसीकरण केले याला कोणी महत्त्व देत नाही. लोकांना सकारात्मक बनवण्यासाठी प्रवृत्त करणा‍ºया माध्यमांची आज गरज आहे. अनेक जण आम्हाला लस नको आहे, असे म्हणत असतात. तीथे खूप गर्दी आहे, तुटवडा आहे हे ऐकवत असतात; पण तिथपर्यंत पोहोचण्याचे कष्ट तरी घेतले पाहिजेत. काही नेतेमंडळी केंद्र सरकार आम्हाला पुरेसा साठा देत नाहीत, म्हणून दररोज कॅमे‍ºयापुढे येतात आणि माहिती देत असतात. ३७ केंद्र बंद झाल्याची माहिती देतात; पण त्याचवेळी महापालिका किती छान सुविधा लसीकरणासाठी देते हे का सांगत नाहीत? इथे राजकारण न आणता कोण्याही नेत्याने काम करायची गरज आहे. कोरोना विरोधातील लढा हा काही भाजपचा नाही, शिवसेनेचा नाही की, काँग्रेस-राष्ट्रवादीचा वैयक्तीक नाही. हा लढा संपूर्ण जगाचा आहे. त्यात टीकाटिप्पणी सोडून सकारात्मक वातावरण तयार करण्याची गरज आहे. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार किंवा स्थानिक पातळीवरील महानगरपालिका अथवा नगरपालिका असोत सर्वांनीच आता राजकारण बाजूला ठेवून या परिस्थितीकडे गांभीर्याने बघावे लागणार आहे. देशाचे पंतप्रधान किंवा संबंधित राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा जेव्हा आपल्या जनतेशी संवाद साधतात, तेव्हा जनतेच्या मनात कोणत्या प्रकारची नकारात्मक भावना निर्माण होणार नाही याची काळजी त्यांना घ्यावीच लागेल. कोरोनाची वाढ ही नकारात्मकतेनून होत आहे हे नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: