गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

सखाराम बाइंडर


विजय तेंडुलकरांची नाटके म्हणजे वेगळ्या विचारांची नाटके. बºयाच वेळा वादग्रस्त नाटके म्हणूनच त्यांच्या नाटकांची चर्चा झालेली आहे. अशाच एका बोल्ड आणि धाडसी नाटकाचा उल्लेख करावा लागेल ते नाटक म्हणजे ‘सखाराम बार्इंडर’ हे नाटक. ‘सखाराम बार्इंडर’ हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले स्त्री-पुरुष संबंधांवरचे एक मराठी नाटक आहे. हे नाटक ज्या काळात आले तो काळ म्हणजे ताई-माईच्या कौटुंबिक नाटकांचा बहर असणारा बॉक्स सेटमधल्या नाटकांचा सुवर्णकाळ होता. त्या काळात हे नाटक येणे कौतुकाचेच होते. खरं तर हे नाटक स्त्रीवादी दृष्टिकोनातून आहे. ‘सखाराम बार्इंडर’मध्ये हाताळलेला विषय स्फोटक होता. पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध तेंडुलकरांच्या प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली. त्यापैकीच एक नाटक म्हणजे ‘सखाराम बार्इंडर’.


निळू फुले, लालन सारंग या कलाकारांनी या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. पहिला प्रयोग १९७२ मध्ये झाला. पुढे वाद-विवादांमुळे हे नाटक समाजात सतत गाजत राहिले. इंग्रजी भाषेत याचे भाषांतरही झाले. न्यूयॉर्क शहरात दीर्घकाळपर्यंत या नाटकाचे प्रयोग होत राहिले, पण या नाटकातील लालन सारंग यांचा अभिनय आणि धाडसीपणा प्रेक्षकांना खुप भावला. त्यांनी ज्या ताकदीने ही भूमिका करण्याचे धाडस केले होते ते पाहून एक ताकदीची अभिनेत्री प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिली. निळू फुले यांच्याबद्दल तर काही बोलायलाच नको. अफलातून अशीच त्यांनी ही भूमिका केली होती. त्यांचा तो धाक आणि नशेतला अविर्भाव रंगमंच व्यापून टाकत होता.

हे नाटक एका सत्य घटनेवर आधारित होते. म्हणजे या नाटकाचा विषय असलेला बाईंडर हा खरोखरच वाईला राहायचा. तिथे खाणावळ चालवायचा. म्हणजे त्याने त्यावेळी ठेवलेली बाई ती खाणावळ चालवायची. तेंडुलकर या बार्इंडराला भेटले होते. त्यांना तो चांगलाच लक्षात राहिला होता. तो त‍ºहेवाईक होता म्हणून नव्हे, तर तो ‘खरा’ होता म्हणून. ते त्याच्याविषयी बोलायचे, विचार करायचे. या तुकड्या तुकड्यांतील विचारांतून ती व्यक्तिरेखा त्यांच्या मनात आकार घेत होती. तेंडुलकरांना त्या खानावळवालीत सखाराम बार्इंडर सापडला. त्यातील सच्चेपणा भावला आणि यात नाट्यमयता आहे हे जाणवले.


एके दिवशी संध्याकाळी डॉ. श्रीराम लागू यांच्याशी बोलताना तेंडुलकरांना वाईचा हा बार्इंडर आठवला. त्याच्याबद्दल लागूंशी बोलताना कल्पनेत असलेले, नसलेले अनेक तपशील स्पष्ट झाले. त्या बोलण्यातून ‘सखाराम बाईंडर’ ही व्यक्तिरेखा जन्माला आली. तो नाटकात बोलणार असलेली अनेक वाक्ये तेंडुलकरांना ऐकू येऊ लागली. त्याच रात्री तेंडुलकरांनी नाटकाचा पहिला अंक एकटाकी लिहून काढला.

तेंडुलकरांचे हे नाटक कमलाकर सारंग यांनी दिग्दर्शित केले. नाटक रंगमंचावर आले आणि एकच गदारोळ झाला. नाटक पाहिलेल्यांनी आणि त्याहीपेक्षा न पाहिलेल्यांनी ‘या नाटकात अश्लिलता आहे’, ‘या नाटकामुळे विवाहसंस्था धोक्यात आली आहे’, ‘हे नाटक भारतीय संस्कृतीला काळिमा फासणारे आहे’, असा ओरडा करायला सुरुवात केली. विजय तेंडुलकरांच्या विचारांना असलेला काहींचा आधीपासूनचा विरोध यावेळी उफाळून आला. अर्थात एखादे नाटक, चित्रपटाविरोधात ज्यावेळी आपल्याकडे आंदोलन केले जाते तेव्हा ते न पाहता केले जाते. कोणीतरी भडकावून देतो आणि आंदोलन होते. तोच प्रकार त्यावेळीही झाला होता. त्याचा तेंडुलकरांवर काही परिणाम होणार नव्हता. कलाकारही खंबीर होते.


विशेष म्हणजे या नाटकाचे तेरा प्रयोग झाल्यानंतर सेन्सॉरने या नाटकावर बंदी आणली. या बंदीविरुद्ध नाटकाचे दिग्दर्शक कमलाकर सारंग कोर्टात गेले आणि आठ महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर केस जिंकले. ‘सखाराम बार्इंडर’चे प्रयोग पूर्ववत सुरू झाले असे वाटत असतानाच, काही राजकीय पक्षांनी झुंडशाहीच्या जोरावर प्रयोग बंद पाडले, पण अशा संकटाच्या काळात मराठी नाटककार कलाकारांना संकटमोचक ठरत होते ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हे नाटक संमत करून घेतल्यावर त्याचे पुढचे प्रयोग होऊ शकले.

निळू फुले आणि लालन सारंग यांनी १९७२ साली या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. त्यानंतर सयाजी शिंदे आणि सोनाली कुलकर्णी यांनी या नाटकाचे व्हिडीओनाट्य केले होते.


‘सखाराम बार्इंडर’ या नाटकाचा हा भन्नाट प्रवास कमलाकर सारंग यांनी ‘बार्इंडरचे दिवस’ या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. हे तत्कालीन वादग्रस्त असले तरी समाजातील एका विकृतीचा, मानसिकतेचा यात छान वेध घेतलेला आहे. यात एक सच्चेपणा आहे. अलीकडेच म्हणजे वीस वर्षांपूर्वी २००१ साली ललित कला केंद्रामध्ये शिकत असताना तेथील २०-२२ वर्षांच्या मुलांनी स्टुडंट्स प्रॉडक्शन अंतर्गत सखाराम बार्इंडर हे नाटक बसविले होते. या नाटकाचे त्यावेळी दोनच प्रयोग झाले होते. एक पुण्यात आणि दुसरा दिल्लीमध्ये. पुन्हा त्याच टीमसोबत २०१७ साली, हे स्त्री-पुरुष संबंधांचे करकरीत वास्तव मांडत समाजाला धक्का देणारे, विख्यात नाटककार विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बार्इंडर’ हे नाटक परत रंगभूमीवर आले होते. या नाटकात मुक्ता बर्वे, संदीप पाठक, सुहास शिरसाट यांनी भूमिका केल्या होत्या, पण कोणत्याही अभिनेत्याला आणि दिग्दर्शकाला आव्हान वाटावे, असे हे नाटक होते. या नाटकाचे काही प्रयोग सयाजी शिंदे, सोनाली कुलकर्णी आणि चिन्मयी सुर्वे यांनी केले. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता, पण जी बोल्ड आणि वादग्रस्त नाटके मराठी रंगभूमीवर आली त्यापैकी ‘सखाराम बार्इंडर’ नावाचे एक पर्व मराठी रंगभूमीवर आहे.

प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा


9152448055

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: