मृत्यू कधीही झोपत नाही, तो नेहमी जागृत असतो, म्हणून मृत्यूला कधीही विसरू नका : चाणक्य
धोकादायक कठड्यावर उभे राहून सेल्फी घेण्याच्या मोहामुळे अनेकांनी जीव गमावल्याच्या धक्कादायक घटना घडलेल्या आहेत़ अशा घटनांमधून नागरिकांनी कोणताच धडा घेतला नसल्याचे पुन्हा एकदा गुहागरमधील हेदवी येथील घटनेने सिद्ध झाले आहे. सेल्फी घेण्याच्या नादात तोल जाऊन समुद्रात पडलेल्या बायकोला वाचवायला गेलेल्या नवºयाचादेखील बुडून मृत्यू झाला आहे. अनंत माणगावकर आणि सुचेता माणगावकर हे ठाण्यातील दाम्पत्य सेल्फीच्या मोहात अडकून जीव गमावून बसले. कशासाठी हवा होता हा सेल्फी? अर्थात ही ताजी घटना म्हणून त्यांची नावे घेता येतील, पण सेल्फीने होणाºया अपघातांचे आज ते प्रतिनिधी आहेत. ती प्रतीकात्मक नावे आहेत, पण तिथे कोणतेही नाव असले तरी अशाप्रकारे सेल्फी काढताना होणारे अपघात हे अत्यंत वाईट आहेत. ते टाळता आले पाहिजेत. आपण आनदासाठी पर्यटनाला आलो आहोत, इथे आपल्याला मृत्यू पकडणार नाही अशा भ्रमात कोणी काढू नये. यासाठी चाणक्याचे वचन लक्षा त घेतले पाहिजे. मृत्यू कधीही झोपत नाही, तो नेहमी जागृत असतो, म्हणून मृत्यूला कधीही विसरू नका.
हेदवी येथील बामणघळ या ठिकाणी दोन्ही बाजूला उंच कडा आणि मध्येच समुद्राच्या येणाºया लाटांचा अनोखा देखावा पाहण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात. उंच उसळणाºया फेसाळ लाटांचा कठड्यावर उभे राहून सेल्फी घेण्याचा मोह येथे आलेल्या प्रत्येकाला आवरता येत नाही, मात्र अनेकजण अतिरेक करण्याच्या नादात खाली कोसळल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. केवळ इथेच नाही, तर अनेक ठिकाणी तरुण मुले-मुली सेल्फीच्या नादात जीव गमावून बसतात. त्यामुळे कशासाठी हवा असतो हा सेल्फी?
सेल्फी काढायचा आणि तो फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्यूटर किंवा व्हॉट्सअॅपवर पोस्ट करायचा. किती लाइक मिळाल्या यावर दिवसभर लक्ष देत बसायचे. केवळ या अट्टाहासासाठी हे असले प्रकार केले जातात. निसर्गाचे, समुद्राचे, पाण्याचे सौंदर्य दाखवायचेच तर साधा फोटा काढून करा ना तो पोस्ट. एकमेकांनी एकमेकांचे फोटो काढा. सेल्फीच कशाला पाहिजे? तुम्ही त्या ठिकाणी गेला होतात हे तुमच्या मित्रमंडळींना समजले आणि तुमचे कौतुक केले की संपले ना सगळे? मग सेल्फी न काढता साधा फोटो काढलात तर काय हरकत आहे?
आपल्याकडे म्हण आहे की, 'मोर नाचतो म्हणून लांडोरीने नाचू नये'. तसे या सेल्फीबाबत आहे. सेल्फी काढणं ही एक कला आहे. ती सगळ्यांनाच जमते असे नाही, पण उगीचच आपल्याकडे मोबाइल, स्मार्टफोन आहे हे दाखवण्यासाठी काढला जातो असा फोटो. तो जमलेला पण नसतो, पण केवळ दिखाऊ पणा. या दिखाऊ पणाच्या नादात देशभरात विविध डोंगर, दºया, टेकड्या, समुद्रकिनारे, उंच इमारती, टॉवर, गच्ची यावरून अनेकजण कोसळून पडतात आणि आपला जीव गमावतात.
फोटो ही एक सुखद आठवण असते. मनुष्य जिवंत असताना त्याने केलेल्या करामतींचे, पराक्रमांचे ते आनंदाचे क्षण असतात, पण ते जर नीट काढले नाहीत तर आपल्यालाच असे फोटोत जाऊ न बसण्याची आणि आपल्या फोटोला अकाली हार घालण्याची वेळ येते.
डिजिटल कॅमेरा आला आणि ही थेरं वाढली. पूर्वी जेव्हा कॅमेºयाचे रोल असायचे तेव्हा फोटोग्राफर एक क्लिक काढताना किती विचार करायचा. कारण रोल वाया जाणे परवडणारे नसते, पण हे डिजिटल कॅमेºयाचे युग आले आणि कलात्मकताच संपली. कोणीही छायाचित्रकार होऊ लागला आणि सेल्फी काढू लागला. इथे छायाचित्रणाची कलाही मेली आणि सेल्फीच्या नादात माणसंही मेली, पण हे प्रकार थांबले पाहिजेत. आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांना जर भान सांभाळता येत नसेल तर त्याला काय अर्थ आहे? म्हणूनच खरोखरच सेल्फीची गरज आहे का? कुटुंबातील सर्वांचा फोटो हवा असेल, तर तिथे असलेल्या कोणालाही सांगितला तर तो समोरचा अनोखळी माणूसही आनंदाने फोटो काढतो. सेल्फीची गरजच नसते, पण हे समजून घेतले पाहिजे. तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर टेबलवर, लग्नकार्यात सेल्फी काढलात तर ठिक आहे, पण पर्यटनाच्या ठिकाणी, दरीखोरे, समुद्र पाणी याठिकाणी मात्र सेल्फीला बंदी घालावी लागेल. तरच हे प्रकार थांबतील.
सेल्फीच्या नादात जीव गमावणारे लोक सुशिक्षितच नाहीत, तर उच्चशिक्षित असतात. सधन घरचे असतात. तरीही ते असे का वागतात. समाजात ते करत असलेला व्यवसाय पाहता ते प्रतिष्ठित असतात. असे असूनही अशा चुका ते का टाळू शकत नाहीत? आजपर्यंत ज्यांचे सेल्फी काढताना जीव गेले आहेत ते चांगल्या पदावर काम करणारे असेच होते. किंबहुना चांगल्या कुटुंबातून आलेल्यांचे प्रमाण यात जास्त आहे. मग या लोकांची पर्यटनस्थळावर गेल्यावर डोळ्यांच्या कॅमेºयात आनंदाचे क्षण साठवून घेण्याऐवजी सेल्फी कॅमेºयात काढून दुसºयांना दाखवण्यासाठी घाई का चाललेली असते? ट्रिपवरून आल्यावर मित्रमंडळींना फोटो दाखवले तर काय बिघडते? लगेच लाइव्ह लोकेशन पाठवून, सेल्फी काढून, तो सोशल मीडियावर पाठवण्याचे लागलेले हे व्यसन अत्यंत घातक आहे. त्यावर सरकारने किंवा कायद्याने बंधन आणता येणार नाही, पण ते नैतिक बंधन म्हणून पाळले गेले पाहिजे. कुठे असली पाहिजे ही सेल्फी स्टीक आणि हा सेल्फी फोटो हे समजले पाहिजे, तरच जीवनाचा आनंद मिळणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा