विषादप्यमृतं ग्राह्यं बालादपि सुभाषितम ।
अमित्रादपि सद्वृतं अमेध्यादपि कांचनम।।
चाणक्य
भारतात सीरम आणि आॅक्सफोर्ड यांनी तयार केलेली कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे, मात्र आता कोरोना लसीवरून राजकीय वादंग सुरू झाल्याचे दिसत आहे. हे अत्यंत घृणास्पद आहे. केवळ मोदी सरकारच्या काळात हे संशोधन केले आणि लसीकरणाला सुरुवात होत आहे, म्हणून विरोध करणारे मूर्ख म्हणावे लागतील. कारण आपल्याकडे चाणक्याचे वचन आहे ते यांना अक्कल शिकवणारे आहे. चाणक्य म्हणातात, विषामधूनसुद्धा निघाले असले, तरी ते अमृत असेल तर त्याचा स्वीकार केला पाहिजे. लहान मुलांकडून ऐकलेली चांगली वचने ही मान्य केली पाहिजेत. शत्रूमधले सद्गुण आणि घाणीमधले (सुद्धा) सोने या गोष्टी घेण्यासारख्या असतात. त्यासाठी असलेले संस्कृत वचन म्हणजे, विषादप्यमृतं ग्राह्यं बालादपि सुभाषितम । अमित्रादपि सद्वृतं अमेध्यादपि कांचनम।।
असे असतानाही कसलीही नीतीमत्ता नसलेले हे विरोधक केवळ मोदी विरोधासाठी लसीला नावे ठेवत आहेत, हे अत्यंत वाईट आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यापाठोपाठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि शशी थरूर यांनी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मान्यता देण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. कोव्हॅक्सिनवर अद्याप तिसºया टप्प्यातील चाचणी झालेली नाही. या व्हॅक्सिनला अगोदरच मान्यता दिली गेली आहे, हे धोकादायक ठरू शकते. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवे. सर्व चाचण्या होईपर्यंत याचा वापर करणे टाळायला हवं. दरम्यान भारत अॅस्ट्रॅजेनेका व्हॅक्सिनसह मोहीम सुरू करू शकतो, असं शशी थरूर यांनी म्हटले आहे, तर, जयराम रमेश यांनी देखील कोव्हॅक्सिनबद्दल आक्षेप नोंदवला असून, भारत बायोटेक प्रथम श्रेणीचा उद्योग आहे. परंतु आश्चर्यक ारक बाब ही आहे की, कोव्हॅक्सिनसाठी तिसºया टप्प्यातील चाचणी संबंधी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेल्या प्रोटोकॉलमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. या अगोदर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी व्हॅक्सिनबाबत शंका उपस्थित केली होती. तसेच, मी ही लस टोचवून घेणार नाही, भाजपच्या लसीवर आम्ही कसा काय विश्वास ठेवू? असं त्यांनी म्हटले होते. हा निव्वळ मूर्खपणा आहे.
इतके राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते बालीश कसे वागू शकतात? नका घेऊ लस, मरा तसेच असेच यांना म्हणावे लागेल. मोदी सरकार आणि भाजपला इतका टोकाचा विरोध म्हणजे हा परकीय राष्ट्राने केलेल्या विरोधासारखा आहे. राज्यकर्ते भाजप असले, तरी देशात राहणारे लोक भारतीय आहेत. त्यांच्या हिताचा कोणताही निर्णय सरकार घेत असेल, तर त्याला विरोधकांनी साथ दिलीच पाहिजे. निवडणुकीपुरते पक्ष असतात नंतर राज्यकर्ते हे सर्व देशाचे असतात आणि त्यांनी देशहितच पहायचे असते. त्यामुळे एवढ्या मोठ्या साथीवर आपल्याकडे लस तयार झालेली असताना त्यावर राजकारण करून संभ्रम निर्माण करणे हा देशद्रोह म्हणावा लागेल. हे लोक पाकिस्तानची भाषा बोलत आहेत असेच वाटते.
लस भाजपची आहे हे कसे काय म्हणू शकतात? मग आज जी सरकारी यंत्रणा आहे ती भाजपच्या मालकीची म्हणायची का? उद्या सीमेवर लढलेल्या सैनिकांनी पराक्रम केला, तर तो भाजपच्या सैन्याने पराक्रम केला असे म्हणणार का? हे विचार अत्यंत चुकीचे आणि घातक आहेत. लस घेण्यासाठी कुणी सक्ती केलेली नाही. नका घेऊ लस. काही दशकांपूर्वी आपल्याकडे पोलिओची लस आली. पोलिओचे डोस घेण्यासाठी मोठी मोहीम देशभर अवलंबली गेली आणि देश पोलिओमुक्त झाला. तरीही ही मोहीम सुरूच आहे, पण या लसीला एका विशिष्ठ धर्माच्या लोकांनी विरोध केला आणि आपल्या बालकांना ही लस देण्यास विरोध केला. आज सर्वात जास्त पोलिओग्रस्त लोक त्या धर्मात आहेत. तेव्हा कुणाचं सरकार होतं किंवा हा प्रश्न नाही, पण कोणतेही वैद्यक शास्त्र हे पक्ष पाहून उपचार करत नसते, धर्मजात पाहून उपचार करत नसते, तर मनुष्य पाहून उपचार केले जातात हे या काँग्रेस आणि समाजवादीसारख्या वैफल्यग्रस्त पक्षाच्या नेत्यांना कोण सांगणार आहे? यांना देशहित कधी समजणार आहे का? असा प्रश्न यातून निर्माण झालेला आहे. यातून ते स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेत आहेत. लस बनवणाºया कंपन्या वेगळ्या आहेत, भारतीय आहेत पण त्याला भाजपची लस म्हणून अखिलेश यादव यांनी भाजपला फुकटचे श्रेय देण्याचाच प्रकार केलेला आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. या लसीचा फायदा झाल्यानंतर अखिलेश यांचे हेच वाक्य भाजप २०२४च्या निवडणुकीत कॅश केल्याशिवाय राहणार नाही, पण हे राजकारण सोडून शत्रू आणि विरोधक यातला फरक समजून घेतला पाहिजे. शत्रूचेही चांगले असेल, तर स्वीकारण्याचे धोरण ठेवले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा