आजकाला जग जागतीकीकरणाच्या दिशेने जाताना देश, राष्ट्र या भावना गळून पडलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकजण स्वत:चा विचार करताना दिसतो आहे. साहजिकच कोरोनाची दहशत निर्माण करून काही उद्योग बंद पाडायचे आणि काही उद्योग वाढवायचे हे एखादे षडयंत्र तर नाही ना? हा मेडिकल किंवा औषध निर्माण कंपन्यांच्या युद्धातून निर्माण केलेला घोटाळा तर नाही ना? प्रत्येकजण लस निर्मितीचा दावा करत असताना त्यावरून संशोधन चोरले, दावा खोटा आहे असे खोडून काढण्याचे जे प्रक़ार आहेत, त्यावरून सर्वसामान्यांचे शोषण करण्याचे हे एखादे षडयंत्र नाही ना? असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.
अगोदर चीनने लस सापडल्याचा दावा केला, मग रशियाने केला आणि आता अमेरिका आणि इंग्लंड रशियाने आमचे संशोधन चोरल्याचा आरोप करून खळबळ माजवली. तुमच्याकडे जर तो फॉर्म्युला होता, संशोधन होते तर ते चोरीला जाईपर्यंत गप्प का बसलात? ते लसीचे उत्पादन बाजारात आणून जगाला वाचवण्यासाठी का पुढे आला नाहीत? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात. त्यामुळे हे संपूर्ण जगाचे शोषण करण्याचे एखादे षडयंत्र आहे का? हा आंतरराष्ट्रीय घोटाळा आहे का?
म्हणजे एका रात्रीत माणसांचे राहणीमान बदलून टाकायचे. घरातून बाहेर पडायचे नाही. वर्क फ्रॉम होम करायचे. वाहन, रहदारी, वाहतुकीची, दळणवळणाची साधने बंद करायची. बसेस बंद, लोकल बंद, रेल्वे बंद. सगळं तुम्हाला घरच्या घरी मिळेल. सगळं काही ऑनलाईन. कोणी घरातून बाहेरच पडायचे नाही. सर्वांना घरात बसून काम, शिक्षण करण्याची सवय लावण्याचे हे षडयंत्र नाही ना? खरंच काहीच कळेनासे झालेले आहे. माणसांची लूट होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना हा खरोखरचा रोग आहे की मानसिक दडपणाने निर्माण केलेला तो प्रयोग आहे असा सवाल यातून निर्माण होतो. काही औषध कंपन्यांनी आणि आयटी सेक्टरमधल्या कंपन्यांनी आपली औषधे आणि इलेक्ट्रॉनिक मार्केट तयार करण्याचा केलेला हा नवा प्रकार नाही ना? सर्वांनीच देश, राष्ट्राच्या सीमा ओलांडून पैसा संपत्ती कमवण्यासाठी हा शोषणाचा मार्ग अवलंबला आहे का? या शंकेला फारच वाव आहे.
भारतात आता समूह संसर्ग सुरू झाला आहे. अगोदर अमेरिका, अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. इथं कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 20 लाखांपेक्षाही जास्त आहे. भारतात 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे आणि येत्या चार आठ दिवसात तो वीस लाखांच्या पुढे जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत तब्बल 76 हजार 688 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही 25 हजारपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले आहेत. कोरोनाचा समूह संपर्क प्रथम अमेरिकेत मग ब्राझिल आणि आता भारतात होताना दिसतो आहे. 20 जूनला ब्राझील कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेला दुसरा देश बनला. त्यावेळी ब्राझीलच्या कोरोना रुग्णांनी 10 लाखांचा टप्पा पार केला होता. आता भारताने 10 लाखांचा टप्पा पार केला आहे आणि समूह संसर्गाला सुरूवात झालेली आहे. अतिशय भयानक अशी ही परिस्थिती आहे. या परिस्थितीत संपूर्ण जगाने एकत्र येण्याची गरज असताना मूठभर शक्ती स्वत:चा विचार करताना दिसत आहेत. परस्परांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येकजण औषधांचे, लसींचे संशोधन करत असताना परस्परांचे दावे खोडून काढत आहेत. कोणाचेही संशोधन यशस्वी झाले तरी संपूर्ण जगाला फायदा होईल याचा विचार केला जात नाही. याचा अर्थच असा आहे की औषध कंपन्या, सॉफ्टवेअर कंपन्या यांचे काही हे कारस्थान आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.
ऑनलाईन शिक्षण, वर्क फ्रॉम होम या कल्पना या दोन तीन महिन्यात विकसीत केल्या गेल्या. लोकांनी घरातून बाहेर पडू नये यासाठी प्रयत्न सुरू केले गेले. यामध्ये किती मोबाईल कंपन्या. किती लॅपटॉपचे उत्पादन वाढले, किती पीसी विकले गेले? किती इंटरनेटची नवी कनेक्शन जोडली गेली? किती नवी फोनची कार्ड विकली गेली? या सगळ्याचा तपास केला गेला पाहिजे. तसेच कोणत्या औषधांची जास्त विक्री झाली? कोरोनाची भिती घालून लोकांना लुटण्याचे काही प्रयत्न केले असतील तर ते फार मोठे भयानक प्रकरण आहे. जगण्यासाठी माणसे काय करतील आणि कोणत्या थराला जातील याचा आता पत्ताच लागेनासा झालेला आहे. पण जे काही चालले आहे ते भयानक आहे हे नक्की.
साधारणपणे माणसांना घाबरवण्याचे हे नवे तंत्र विकसीत केले आहे काय असेच आता वाटू लागले आहे. त्यामुळे औषध कंपन्या आणि आयटीमधील कंपन्यांनी मिळून केलेल्या या युद्धात सामान्यांचा गिनीपीग होतो आहे काय असा प्रश्न आहे. कोरोनाच्या नावाखाली होत असलेली ही लूट तातडीने थांबवण्याची आवश्यता आहे. जर खरोखरच ही एक जागतीक महामारी आहे, तर त्यावर होणारे औषधोपचार हे मोफतच असले पाहिजेत. पण लोकांना लाखो रूपयांचे बिल दिले जाते आहे. विविध चाचण्या, परिक्षांमधून रूग्ण आणि नातेवाईकांची लूट केली जात आहे. हा जर संसर्गजन्य रोग आहे तर त्याचे उपचार मोफतच देण्याची जबाबदारी सरकारची आहे. नाहीतर हा रोग, हे दुखणे आम्ही अंगावर काढू असा निर्धार केला पाहिजे. आमच्यापासून तुम्हाला लागण होईल अशी कोणाला भीती वाटत असेल तर त्याने यावर खर्च करून उपचार करावेत. असेच म्हणायची वेळ आलेली आहे. काही तज्ज्ञांच्या मते, कमी प्रमाणात चाचण्या होत असल्यामुळे रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते. येत्या काही महिन्यात किंवा या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनाची लस बाजारात येईल, अशी अपेक्षा आहे. अॅस्ट्रोजेनेका आणि सिनोवॅक या दोन कंपन्या याबाबत काम करत आहेत. याबाबत संशोधन शेवटच्या टप्प्यात असून लवकरच लस उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. असे अंदाज अनेक देश, अनेक कंपन्या करत आहेत. पण हे लोकांची लूट करण्याचे प्रकार आहेत असेच वाटते. त्यामुळे ऑनलाईन आणि वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात विक्री झालेल्या फोन, मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर कंपन्या आणि औषध कंपन्यांची चौकशी करावी लागेल. कारण सगळीकडे कामकाज बंद ठेवले असताना यांचे उत्पादन कसे सुरू राहिले? या वस्तू इतक्या कशा उपलब्ध झाल्या? अचानकपणे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी विविध औषधे कशी काय बाजारात आली? हे सगळेच अनाकलनीय आहे. पण यातून एखादे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असावे असे वाटायला जागा आहे.
अगोदर चीनने लस सापडल्याचा दावा केला, मग रशियाने केला आणि आता अमेरिका आणि इंग्लंड रशियाने आमचे संशोधन चोरल्याचा आरोप करून खळबळ माजवली. तुमच्याकडे जर तो फॉर्म्युला होता, संशोधन होते तर ते चोरीला जाईपर्यंत गप्प का बसलात? ते लसीचे उत्पादन बाजारात आणून जगाला वाचवण्यासाठी का पुढे आला नाहीत? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात. त्यामुळे हे संपूर्ण जगाचे शोषण करण्याचे एखादे षडयंत्र आहे का? हा आंतरराष्ट्रीय घोटाळा आहे का?
म्हणजे एका रात्रीत माणसांचे राहणीमान बदलून टाकायचे. घरातून बाहेर पडायचे नाही. वर्क फ्रॉम होम करायचे. वाहन, रहदारी, वाहतुकीची, दळणवळणाची साधने बंद करायची. बसेस बंद, लोकल बंद, रेल्वे बंद. सगळं तुम्हाला घरच्या घरी मिळेल. सगळं काही ऑनलाईन. कोणी घरातून बाहेरच पडायचे नाही. सर्वांना घरात बसून काम, शिक्षण करण्याची सवय लावण्याचे हे षडयंत्र नाही ना? खरंच काहीच कळेनासे झालेले आहे. माणसांची लूट होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना हा खरोखरचा रोग आहे की मानसिक दडपणाने निर्माण केलेला तो प्रयोग आहे असा सवाल यातून निर्माण होतो. काही औषध कंपन्यांनी आणि आयटी सेक्टरमधल्या कंपन्यांनी आपली औषधे आणि इलेक्ट्रॉनिक मार्केट तयार करण्याचा केलेला हा नवा प्रकार नाही ना? सर्वांनीच देश, राष्ट्राच्या सीमा ओलांडून पैसा संपत्ती कमवण्यासाठी हा शोषणाचा मार्ग अवलंबला आहे का? या शंकेला फारच वाव आहे.
भारतात आता समूह संसर्ग सुरू झाला आहे. अगोदर अमेरिका, अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. इथं कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 20 लाखांपेक्षाही जास्त आहे. भारतात 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे आणि येत्या चार आठ दिवसात तो वीस लाखांच्या पुढे जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत तब्बल 76 हजार 688 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही 25 हजारपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले आहेत. कोरोनाचा समूह संपर्क प्रथम अमेरिकेत मग ब्राझिल आणि आता भारतात होताना दिसतो आहे. 20 जूनला ब्राझील कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेला दुसरा देश बनला. त्यावेळी ब्राझीलच्या कोरोना रुग्णांनी 10 लाखांचा टप्पा पार केला होता. आता भारताने 10 लाखांचा टप्पा पार केला आहे आणि समूह संसर्गाला सुरूवात झालेली आहे. अतिशय भयानक अशी ही परिस्थिती आहे. या परिस्थितीत संपूर्ण जगाने एकत्र येण्याची गरज असताना मूठभर शक्ती स्वत:चा विचार करताना दिसत आहेत. परस्परांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येकजण औषधांचे, लसींचे संशोधन करत असताना परस्परांचे दावे खोडून काढत आहेत. कोणाचेही संशोधन यशस्वी झाले तरी संपूर्ण जगाला फायदा होईल याचा विचार केला जात नाही. याचा अर्थच असा आहे की औषध कंपन्या, सॉफ्टवेअर कंपन्या यांचे काही हे कारस्थान आहे का? असा प्रश्न निर्माण होतो.
ऑनलाईन शिक्षण, वर्क फ्रॉम होम या कल्पना या दोन तीन महिन्यात विकसीत केल्या गेल्या. लोकांनी घरातून बाहेर पडू नये यासाठी प्रयत्न सुरू केले गेले. यामध्ये किती मोबाईल कंपन्या. किती लॅपटॉपचे उत्पादन वाढले, किती पीसी विकले गेले? किती इंटरनेटची नवी कनेक्शन जोडली गेली? किती नवी फोनची कार्ड विकली गेली? या सगळ्याचा तपास केला गेला पाहिजे. तसेच कोणत्या औषधांची जास्त विक्री झाली? कोरोनाची भिती घालून लोकांना लुटण्याचे काही प्रयत्न केले असतील तर ते फार मोठे भयानक प्रकरण आहे. जगण्यासाठी माणसे काय करतील आणि कोणत्या थराला जातील याचा आता पत्ताच लागेनासा झालेला आहे. पण जे काही चालले आहे ते भयानक आहे हे नक्की.
साधारणपणे माणसांना घाबरवण्याचे हे नवे तंत्र विकसीत केले आहे काय असेच आता वाटू लागले आहे. त्यामुळे औषध कंपन्या आणि आयटीमधील कंपन्यांनी मिळून केलेल्या या युद्धात सामान्यांचा गिनीपीग होतो आहे काय असा प्रश्न आहे. कोरोनाच्या नावाखाली होत असलेली ही लूट तातडीने थांबवण्याची आवश्यता आहे. जर खरोखरच ही एक जागतीक महामारी आहे, तर त्यावर होणारे औषधोपचार हे मोफतच असले पाहिजेत. पण लोकांना लाखो रूपयांचे बिल दिले जाते आहे. विविध चाचण्या, परिक्षांमधून रूग्ण आणि नातेवाईकांची लूट केली जात आहे. हा जर संसर्गजन्य रोग आहे तर त्याचे उपचार मोफतच देण्याची जबाबदारी सरकारची आहे. नाहीतर हा रोग, हे दुखणे आम्ही अंगावर काढू असा निर्धार केला पाहिजे. आमच्यापासून तुम्हाला लागण होईल अशी कोणाला भीती वाटत असेल तर त्याने यावर खर्च करून उपचार करावेत. असेच म्हणायची वेळ आलेली आहे. काही तज्ज्ञांच्या मते, कमी प्रमाणात चाचण्या होत असल्यामुळे रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होऊ शकते. येत्या काही महिन्यात किंवा या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनाची लस बाजारात येईल, अशी अपेक्षा आहे. अॅस्ट्रोजेनेका आणि सिनोवॅक या दोन कंपन्या याबाबत काम करत आहेत. याबाबत संशोधन शेवटच्या टप्प्यात असून लवकरच लस उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. असे अंदाज अनेक देश, अनेक कंपन्या करत आहेत. पण हे लोकांची लूट करण्याचे प्रकार आहेत असेच वाटते. त्यामुळे ऑनलाईन आणि वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात विक्री झालेल्या फोन, मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर कंपन्या आणि औषध कंपन्यांची चौकशी करावी लागेल. कारण सगळीकडे कामकाज बंद ठेवले असताना यांचे उत्पादन कसे सुरू राहिले? या वस्तू इतक्या कशा उपलब्ध झाल्या? अचानकपणे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी विविध औषधे कशी काय बाजारात आली? हे सगळेच अनाकलनीय आहे. पण यातून एखादे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असावे असे वाटायला जागा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा