prafulla phadke mhantat

शनिवार, ११ जुलै, २०२०

दिलासादायक परिस्थिती


गेल्या दोन दिवसापासून पावसाला सुरूवात झालेली आहे. ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावल्याने आनंदाचे वातावरण आहे. लॉकडाउनमुळे आलेले औदासिन्य, नाराजी आता या पावसाच्या आगमनाने थोडी कमी झाल्याचे दिसत आहे. सध्या आपली भिस्त पूर्णपणे पावसावर आहे. पावसाने दिलासा दिल्याने शेतीचे उत्पन्न चांगले होईल असा विश्वास या महिनाभरात मिळाला आहे. साहजिकच दु:खात सुख म्हणतात तसे याठिकाणी दिसून येते आहे.
 आपल्या देशातील 80 ते 90 शेती, उद्योग, सेवा यांसह जवळपास सर्वच क्षेत्रांवर मान्सून प्रभाव टाकतो. त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मान्सून देशाच्या अर्थकारणवरही परिणाम करीत असतो. त्या अर्थी मान्सूनला देशाच्या अर्थव्यवस्थेचा वा ग्रामीण अर्थकारणाचा कणाच आहे. कधी नव्हे ते यावर्षी हवामानखात्याचा किंवा स्कायमेटचा अंदाज बरोबर आल्याचे दिसते आहे. कारण जूनमधील मान्सूनची कामगिरी पाहता नक्कीच अर्थकारणाच्या दृष्टीने फलदायी वातावरण मानता येईल. जून ते सप्टेंबर हा चार महिन्यांचा कालावधी हा मान्सून कालावधी समजला जातो. यात जून महिन्यात मान्सूनचे आगमन व सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो. या दोन महिन्यांमध्ये पावसात बरेच चढ-उतार होतात. त्यामुळे जुलै, ऑगस्ट महिन्यातील पाऊस महत्त्वपूर्ण मानला जातो. यावर्षी कोरोनाने झटका दिलेला असताना आपली अर्थव्यवस्था आज फक्त शेतीवर अवलंबून असणार आहे. कारण उद्योग आणि कामगार जगतात एकुणच लॉकडाउनमुळे मंदी आहे. त्यामुळे शेती चांगली होणे हेच आजचे स्वप्न असणार आहे. गेल्या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावली. यंदाही पाऊस सरासरीपेक्षा अधिक असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे यावर्षी कृषीक्षेत्राकडूनच आपल्याला उभारी मिळणे अपेक्षित आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नैर्त्रुत्य मोसमी वारे अर्थात मान्सून यंदा सरासरीइतका राहणार आहे. यात वायव्य भारत सरासरीच्या 107, मध्य भारत 103, दक्षिण भारत 102, तर पूर्वोत्तर भारतात 96 टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याशिवाय जुलै, ऑगस्ट महिन्यात पाऊसही जोरदार राहणार असल्याचा दुसरा दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. सरासरीच्या तुलनेन देशात यंदा 102 टक्के पाऊस राहणार असून, यात चार टक्के कमी-अधिकची शक्यता गृहित धरण्यात आली आहे, तर वायव्य भारत सरासरीच्या 107, मध्य भारत 103, दक्षिण भारत 102, तर पूर्वोत्तर भारतात 96 टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यात आठ टक्के कमी-अधिकची शक्यता आहे. याचा विचार करता संपूर्ण पावसाचा कालावधी हा चांगला असेल. त्यामुळे पावसामुळे आपल्याला कृषीक्षेत्राकडे सकारात्मकतेने आशेने पाहता येईल.
यावर्षी मान्सून 1 जूनला केरळात दाखल झाला. त्यानंतर वेगाने तो देशभर पसरला. 12 दिवस आधीच त्याने देश व्यापला. 26 जूनला तर मान्सूनने संपूर्ण देश व्यापला. 1 जून ते 30 जून या एक महिन्याचा आढावा घेतला असता देशात सरासरीच्या 17 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात तो समाधानकारक झालेला आहे. अर्थात मानसूनच आगमनाला वादळाचे ग्रहण लागले तो भाग वेगळा. पण त्याने आपली हजेरी वेळेवर लावून एकप्रकारे दिलासा दिला होता. सर्वसाधारणपणे जून महिन्यात पावसाचा खंड जास्त असतो. तसेच तो सरासरीही कमी गाठतो. यंदा मात्र पावसाचा खंडही तुलनेत कमी राहिला तसेच त्याने सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. देशात जून महिन्यात 166.9 मिमी इतका होतो, यंदा मात्र 196.2 मिमी इतका पाऊस झाला आहे.
 देशात आतापर्यंत मध्यप्रदेश, सिक्कीम तसेच बिहार राज्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे. तसेच महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मेघालय, आसाम, जम्मू काश्मीर, अंदमान-निकोबार बेटे येथे अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. स्वाभाविकच देशातील अकरा राज्यांमध्ये जादा पाऊस झाल्याची आकडेवारी सांगते. त्यामुळे आपल्यावरचे जलसंकट आता टळले आहे असे म्हणता येईल. आसामसारख्या राज्यात पावसाने दाखवलेले रौद्ररूप, ब्रम्हपुत्रेचा पूर यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. पण ते आता नित्याचेच झालेले आहे.
देशाच्या अर्थकारणात व कृषी अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात यांसारख्या राज्यांचा सहभाग मोठा आहे. मुख्य म्हणजे कृषी उत्पादनात अग्रेसर असलेल्या या राज्यांमध्ये पेरण्यांची स्थितीही चांगली आहे. चालू वर्षी पेरण्याही गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट झाल्या आहेत. त्यामुळे कृषीक्षेत्रावकडूनच यावर्षी जास्त अपेक्षा ठेवाव्या लागणार आहेत. लॉकडाउनमुळे अनेक नोकरदारवर्ग शेतीकडे वळल्याचेही दिसत आहे. त्यामुळे काही जणांना हा पाउस तारक ठरला आहे. अर्थात शेतीसाठी एकूणच पोषक स्थिती असली, तरी या ना त्या माध्यमातून अनेक अरिष्टांतून सातत्याने शेती व्यवसायाला जावे लागते. कोरडा वा ओला दुष्काळ या संकटांबरोबरच कीड वा विविध रोगांशी सामना करावा लागतो. ही संकटे यावर्षी लांबच राहोत हीच अपेक्षा आता करावी लागेल. पण पावसाने दिलेली साथ ही दिलासादायक आहे हे नक्की.
आज संपूर्ण जगाला कोरोनाने घेरलेले असताना सगळ्यांच्या अथर्ंव्यवस्था डबघाईला आलेल्या आहेत. आपली शेती ही पावसावर अवलंबून असणारी असल्याने शेतीसाठी वरदान ठरणारा पाउस पडावा हीच अपेक्षा सामान्य माणसाची आहे. त्यामुळे शेतकरी आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेचा तारक ठरणार आहे. त्याला या पावसाची चांगलीच मदत होणार आहे.







येथे जुलै ११, २०२०
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)

माझ्याबद्दल

माझा फोटो
prafulla phadke mhantat
Mumbai, Maharashtra, India
माझे पूर्ण प्रोफाइल पहा.

ब्लॉग संग्रहण

  • ►  2025 (246)
    • ►  जून (35)
    • ►  मे (51)
    • ►  एप्रिल (41)
    • ►  मार्च (38)
    • ►  फेब्रुवारी (37)
    • ►  जानेवारी (44)
  • ►  2024 (3)
    • ►  डिसेंबर (2)
    • ►  नोव्हेंबर (1)
  • ►  2022 (227)
    • ►  मे (15)
    • ►  एप्रिल (52)
    • ►  मार्च (48)
    • ►  फेब्रुवारी (54)
    • ►  जानेवारी (58)
  • ►  2021 (510)
    • ►  ऑक्टोबर (8)
    • ►  सप्टेंबर (38)
    • ►  ऑगस्ट (49)
    • ►  जुलै (62)
    • ►  जून (61)
    • ►  मे (56)
    • ►  एप्रिल (60)
    • ►  मार्च (60)
    • ►  फेब्रुवारी (56)
    • ►  जानेवारी (60)
  • ▼  2020 (427)
    • ►  डिसेंबर (59)
    • ►  नोव्हेंबर (15)
    • ►  ऑक्टोबर (16)
    • ►  सप्टेंबर (53)
    • ►  ऑगस्ट (35)
    • ▼  जुलै (59)
      • बाप्पाक काळजी रे...
      • किती बेरोजरार झाले याचा हिशोब नाही
      • आत्मनिर्भर करणारे शैक्षणिक धोरण
      • चला पाचवा महिना लागला
      • राजकीय चढाओढ
      • श्यामची आई आणि बबड्याची आई
      • फक्त खर्च, हातात काहीच नाही
      • भिक नको पण कुत्रं आवर
      • जीवनसंघर्षाचे प्रतिकाचे मंदीर
      • एक पोरकट शंका..
      • चीनचा बुरखा
      • आम्हाला आमच्या जबाबदारीवर मरू द्या
      • मृत्यूचे ढग
      • चित्रपटावर राजकारणाचा परिणाम
      • या त्रिसूत्रीची आवश्यकता
      • हा आंतरराष्ट्रीय घोटाळा नाही ना?
      • मंदीर अब बनायेंगे
      • जीवनशैली बदलणारा रोग
      • जबाबदारी झटकण्याचे राजकारण
      • हे शेतकरी नेते नव्हेत
      • राममंदीराचे राजकारण
      • उद्रेक होणारच....
      • पुतनामावशीचे प्रेम
      • मुका झाला श्रावण
      • युद्धजन्य परिस्थिती
      • लीव्ह अँड रिलेशनशीप
      • स्वच्छ, तणावमुक्त चेहरा
      • चिंता रोजगारनिर्मितीची
      • लीव्ह अँड रिलेशनशीप  सध्या राजकारणात होणार्‍या य...
      • युद्धजन्य परिस्थिती
      • गंभीरतेचा इशारा
      • सतत प्रयोग करू नका
      • शरद पवारांची काँग्रेसला चपराक
      • विद्यार्थी हिताचा निर्णय घ्या
      • महाजॉब्जचा दिलासा
      • पवारांचा इशारा शिवसेनेलाच
      • शिक्षणाचा बट्ट्याबोळ
      • अजून पर्याय खुले आहेत...
      • दुटप्पी राजकारण
      • मुलाखतीतील तत्थ्य
      • राजकारणाचा दुरूपयोग
      • आयुष्याचा जुगार
      • ‘ मराठीला सरकारी आत्मसन्मान
      • खरा राजा, लालबागचा राजा
      • पालक चिंतेत, विद्यार्थी मजेत
      • नृत्याचा ढाचा बदलणार्‍या सरोजखान
      • मूलाधार व्यास
      • लॉकडाउनमध्ये दादागिरीची आठवण
      • दिलासादायक परिस्थिती
      • नवे गिनीपीग
      • मुख्यमंत्र्यांचा बाणेदारपणा
      • एक होण्याची वेळ
      • सुशांतसिंह आणि शेतकरी
      • अंदाधुंद कारभार
      • राहुल गांधींची अपरिपक्वता
      • भयावह परिस्थिती
      • तिसर्‍याला लाभ मिळू नये यासाठी
      • दुसर्‍यासाठी खणलेला खड्डा
      • आखरी अदालत
    • ►  जून (48)
    • ►  मे (51)
    • ►  मार्च (24)
    • ►  फेब्रुवारी (34)
    • ►  जानेवारी (33)
  • ►  2019 (109)
    • ►  डिसेंबर (45)
    • ►  नोव्हेंबर (11)
    • ►  एप्रिल (2)
    • ►  मार्च (9)
    • ►  फेब्रुवारी (17)
    • ►  जानेवारी (25)
  • ►  2018 (387)
    • ►  डिसेंबर (26)
    • ►  नोव्हेंबर (30)
    • ►  ऑक्टोबर (26)
    • ►  सप्टेंबर (20)
    • ►  ऑगस्ट (27)
    • ►  जुलै (32)
    • ►  जून (36)
    • ►  मे (39)
    • ►  एप्रिल (35)
    • ►  मार्च (37)
    • ►  फेब्रुवारी (54)
    • ►  जानेवारी (25)
  • ►  2017 (31)
    • ►  नोव्हेंबर (1)
    • ►  ऑक्टोबर (1)
    • ►  ऑगस्ट (11)
    • ►  जुलै (2)
    • ►  मे (1)
    • ►  एप्रिल (1)
    • ►  मार्च (4)
    • ►  फेब्रुवारी (10)
  • ►  2016 (232)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (25)
    • ►  जुलै (19)
    • ►  जून (26)
    • ►  मे (29)
    • ►  एप्रिल (30)
    • ►  मार्च (31)
    • ►  फेब्रुवारी (29)
    • ►  जानेवारी (42)
  • ►  2015 (165)
    • ►  डिसेंबर (23)
    • ►  नोव्हेंबर (22)
    • ►  सप्टेंबर (2)
    • ►  ऑगस्ट (36)
    • ►  जुलै (33)
    • ►  जून (12)
    • ►  फेब्रुवारी (13)
    • ►  जानेवारी (24)
  • ►  2014 (206)
    • ►  डिसेंबर (27)
    • ►  नोव्हेंबर (26)
    • ►  ऑक्टोबर (9)
    • ►  सप्टेंबर (4)
    • ►  जुलै (12)
    • ►  जून (23)
    • ►  मे (20)
    • ►  एप्रिल (85)
  • ►  2013 (1)
    • ►  जून (1)
  • ►  2011 (2)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (1)
  • ►  2010 (4)
    • ►  सप्टेंबर (1)
    • ►  ऑगस्ट (1)
    • ►  मार्च (2)

लेबल

  • uttam nirnay

गैरवर्तनाची तक्रार करा

facebook

पोस्ट्स
Atom
पोस्ट्स
टिप्पण्या
Atom
टिप्पण्या

prafulla phadke mhantat: दादा, साडेबारा टक्केच्या फलाटाचे बोलाल का?

Prafulla Phadke

Create Your Badge

Facebook Badge

Prafulla Phadke

Create Your Badge

फॉलोअर

याची सदस्यत्व घ्या

पोस्ट्स
Atom
पोस्ट्स
टिप्पण्या
Atom
टिप्पण्या

हा ब्लॉग शोधा

Pages

  • Home

भारताला सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यात एआयची भूमिका महत्त्वाची

लोकप्रिय पोस्ट

  • कठीण समय येता कोण कामास येतो?
    तदितर खग भेणे वेगळाले पळाले।  उपवन-जल-केली, जे कराया मिळाले।। स्वजन गवसला जो, त्याचपाशी नसे तो।  कठिण समय येता कोण कामास येतो।। अशी एक बालभा...
  • जाते माहेराला जाते माहेराला
    वारीमध्ये भक्तीमार्ग आहे. या भक्तीमार्गाचा पाया प्रेम आहे. प्रेमाचे सर्वोत्कृष्ठ स्थान म्हणजे आई. म्हणूनच आपल्याकडे विठोबा असेल नाहीत...
  • विच्छा माझी पुरी करा
    एकेकाळी तमाशा, वगनाट्य हे ग्रामीण आणि असभ्य कलाप्रकार आहेत अशी शहरी समाजाची विचारसरणी होती. परंतु ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने ही विचार...
साधेसुधे थीम. Blogger द्वारे प्रायोजित.