चित्रपट आणि राजकारण हे फार जवळचे संबंध आहेत. म्हणजे जसे राजकारण आणि गुन्हेगारी जगत, बॉलीवूड आणि गुन्हेगारी जगत यांचे जसे संबंध असतात तसेच राजकारण आणि चित्रपटाचा संबंध जवळचा असतो. आपल्या राजकारणाच्या यशासाठी नामांकीत निर्माता, दिग्दर्शक, लेखकांचा वापर आपल्या छुप्या प्रचारासाठी करायचा हे तंत्र सातत्याने राजकारणात वापरले गेलेले आहे. त्यामुळे जेंव्हा सोशल मिडीया विकसीत नव्हता, इंटरनेट माहितीही नव्हते तेंव्हा प्रचाराचे मोठे काम चित्रपटांनीच केलेले आहे. त्यासाठी राजकीय नेत्यांनी अनेकांना हाताशी धरलेले होते.
हे फक्त हिंदीतच नाही तर मराठीतही त्याचा चांगला वापर होत होता. याचा सर्वाधिक फायदा दादा कोंडकेंनी उठवला होता. दादा कोंडकेंचे चित्रपट जेवढे द्वयर्थी विनोद आणि लावण्यांसाठी पाहिले जात तेंवढेच ते राजकीय टीका काय करणार यासाठी पहायला मजा यायची.
दादांचा राम राम गंगाराम हा चित्रपट निर्माण करण्याची प्रेरणा तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी दिलेली होती. त्यांच्या आग्रहाखातर तो चित्रपट निर्माण केला होता. पण त्यातील दादांचा टच न आवडल्याने वसंतदादांनी तो नाकारला आणि त्याचा कथा विस्तार करून तो चित्रपट केला होता. दादांकडून काँग्रेसवर केलेली टीका पहायला हमखास प्रेक्षकांना आवडायची. काँग्रेस सातत्याने त्या काळात सत्ता सांभाळलेली असल्यामुळे चित्रपटातून काँग्रेसवर टीका ऐकायला लोक पुन्हा पुन्हा जात असत. काँग्रेसच्या त्याकाळातल्या प्रवृत्तीमुळे उघडपणे कोणी त्यांच्यावर टीका करायला धजावत नसत. त्यामुळे लोकांच्या मनातील काँग्रेसचा राग हा चित्रपटातून व्यक्त झाला की त्यावर थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्टया वाजत असत.
इंदिरा गांधींचे आय काँग्रेस म्हणजे सर्व राजकीय पक्षांना आव्हान करणारे युनीट असायचे. आजकाल जसा प्रत्येकजण भाजपत जातो तसा तेंव्हा आय काँग्रेसमध्ये जायचा आणि त्याचा उद्धार व्हायचा. त्यामुळे दादा कोंडकेंचा ज्याला आय नाय त्याला काय नाय असे म्हणत रत्नमाला या आयेला मारलेली हाक खूपच गाजलेली होती.
बोट लावीन तिथं गुदगुल्यामध्ये मेहुणीबाईला हाकलायला म्हणजे पद्मा चव्हाणची भीती घालवायला आमची आय नको, दिल्लीतील बाईला हलवायचं असेल तर आई लागेल म्हणून रत्नमालाचा चांगला वापर दादांनी केला होता. दादांनीच आडला नारायण धरी गाढवाचे पाय हो या गाण्यात, पुरषाच्या जागेवर बसली ती बाय हो... असे म्हणत इंदिरा गांधींवर कटाक्ष टाकला होता. हे प्रकार प्रेक्षकांना खूप आवडायचे. त्यामुळे चित्रपट हे तेव्हा राजकारणी लोकांसाठी प्रभावी माध्यम होते. प्रत्येक राजकीय पक्ष आपला असा एखादा निर्माता सांभाळून ठेवत असत.
खुद्द दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या जय जवान जय किसान या घोषणेचे महत्व पटवण्यासाठी चित्रपटाची निर्मिती करावी अशी इच्छा मनोजकुमारकडे व्यक्त केली होती. त्यातून उपकार या चित्रपटाची निर्मिती झाली होती.
देशाची राजकीय, सामाजिक परिस्थिती ही चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न सातत्याने राजकपूर, बी आर चोप्रा, देवानंद अशा सर्वच आघाडीच्या निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी केला होता. राजकपूरचे चित्रपट थोडे डाव्या विचारसरणीशी मिळते जुळते वाटत होते. अगदी 1986 मध्ये राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील राजकारण राजकपूरने समोर आणले होते. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर गंगा शुद्धीकरणाचा विषय आला होता. त्यावर गंगा शुद्धीकरणाचे राजकारण हा विषय घेउन तो चित्रपट आला. अर्थात त्यातील गंगा बाजूला राहिली आणि त्यापेक्षा मंदीकीनीच लोकांच्या जास्त लक्षात राहिली. त्यामुळे त्यातील राजकारणाकडे दुर्लक्ष झाले. पण सत्यघटना आणि राजकारण त्यातूनही काँग्रेसच्या राजकारणावर रूपकात्मक टीका करण्याचे धाडस तेंव्हा चित्रपटाच्या माध्यमातून होत होत. त्यामुळेच आंधी हा चित्रपट त्या काळात गाजला होता तो त्यावरच्या बंदीमुळे. इंदिरा गांधींची आणीबाणी आणि दहशत इतकी भयानक होती की कोणी थेट टिका करण्याचे धाडस करत नव्हते. आजकाल आपण पंतप्रधान मोदींवर सहजपणे टीका करणारे पाहतो, पण काँग्रेसच्या राजवटीत हे कधी शक्य नव्हते. ती हौस चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण होत होती.
मनमोहन देसाई हा मसालेदार चित्रपट काढणारा निर्माता दिग्दर्शक. अमर अकबर अँथनी, धरमवीर, चाचा भतीजा, परवरीश, नसिब असे मल्टीस्टारकास्ट चित्रपट देणारा हा निर्माता, दिग्दर्शक होता. कधी वादात अडकायला नको आणि सरकारशी पंगा घ्यायला नको अशा प्रकारे चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. पण आणीबाणीनंतर इंदिरा गांधींची राजवट संपुष्टात आणून जेंव्हा जनता पक्षाचे सरकार आले तेंव्हा त्यालाही राजकीय टिपण्णी करणारे गाणे देण्याचा मोह आवरला नव्हता.
पाकीटमार असणार्या नीतू सिंग आणि शबाना आझमी यांना दिलेले एक गाणे हे हरलेल्या काँग्रेसला डिवचणारे होते. ते गाणे म्हणजे, सब जनता का है।
जनता पक्षाचे सरकार आल्यामुळे त्या काळात हे गाणे खूप गाजले होते. आता लॉकडाउनमुळे तेच तेच चित्रपट पुन्हा पहायला मिळाल्यावर यातील बारकावे पुन्हा ठळकपणे जाणवतात. ये उंचे महल सुहाने सब जनता का है। या गाण्यातून काँग्रेसची मक्तेदारी संपली, सत्ता फक्त काँग्रेसचीच नाही तर जनतेची पण असू शकते हे या गाण्यातून बिंबवण्याचा प्रयत्न होता. त्या गाण्याला तितकाच प्रतिसाद मिळत होता. पण गाणे गाणार्या म्हणजे नीतू आणि शबाना या पाकीटमार होत्या, त्यामुळे काँग्रेसला डिवचताना जनता पक्षाचीही बदनामी झाली होती, हा भाग वेगळा. पण ये रुपये, पैसे आणे सब जनता का है, उंचे महल पुराने सब जनता का है यातून काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांनी काळा बाजार करून मिळवलेल्या संपत्तीवर टाच येणार हा संदेश दिला होता. त्या काळात तो यशस्वी झाला नाही पण आता ईडीच्या ससेमिर्यात अडकलेल्या काँग्रेस नेत्यांकडे पाहिल्यावर तेंव्हा दिलेला तो इशारा होता हे नक्की.
पण प्रत्यक्षात मराठी, हिंदी चित्रपटांनी राजकीय टिपण्णी करण्याची मिळेल तेवढी संधी साधली होती हे नक्की. माध्यमं बदलतात पण माणसांना व्यक्त होण्याची संधी हवी असते. आज फेसबुक, व्हॉटसअप आहे, ट्विटर आहे पण तेंव्हा नाटक, सिनेमा, तमाशा किंवा लोकनाट्यांनी ते काम मोठ्या प्रमाणात केलेले होते.
हे फक्त हिंदीतच नाही तर मराठीतही त्याचा चांगला वापर होत होता. याचा सर्वाधिक फायदा दादा कोंडकेंनी उठवला होता. दादा कोंडकेंचे चित्रपट जेवढे द्वयर्थी विनोद आणि लावण्यांसाठी पाहिले जात तेंवढेच ते राजकीय टीका काय करणार यासाठी पहायला मजा यायची.
दादांचा राम राम गंगाराम हा चित्रपट निर्माण करण्याची प्रेरणा तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी दिलेली होती. त्यांच्या आग्रहाखातर तो चित्रपट निर्माण केला होता. पण त्यातील दादांचा टच न आवडल्याने वसंतदादांनी तो नाकारला आणि त्याचा कथा विस्तार करून तो चित्रपट केला होता. दादांकडून काँग्रेसवर केलेली टीका पहायला हमखास प्रेक्षकांना आवडायची. काँग्रेस सातत्याने त्या काळात सत्ता सांभाळलेली असल्यामुळे चित्रपटातून काँग्रेसवर टीका ऐकायला लोक पुन्हा पुन्हा जात असत. काँग्रेसच्या त्याकाळातल्या प्रवृत्तीमुळे उघडपणे कोणी त्यांच्यावर टीका करायला धजावत नसत. त्यामुळे लोकांच्या मनातील काँग्रेसचा राग हा चित्रपटातून व्यक्त झाला की त्यावर थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्टया वाजत असत.
इंदिरा गांधींचे आय काँग्रेस म्हणजे सर्व राजकीय पक्षांना आव्हान करणारे युनीट असायचे. आजकाल जसा प्रत्येकजण भाजपत जातो तसा तेंव्हा आय काँग्रेसमध्ये जायचा आणि त्याचा उद्धार व्हायचा. त्यामुळे दादा कोंडकेंचा ज्याला आय नाय त्याला काय नाय असे म्हणत रत्नमाला या आयेला मारलेली हाक खूपच गाजलेली होती.
बोट लावीन तिथं गुदगुल्यामध्ये मेहुणीबाईला हाकलायला म्हणजे पद्मा चव्हाणची भीती घालवायला आमची आय नको, दिल्लीतील बाईला हलवायचं असेल तर आई लागेल म्हणून रत्नमालाचा चांगला वापर दादांनी केला होता. दादांनीच आडला नारायण धरी गाढवाचे पाय हो या गाण्यात, पुरषाच्या जागेवर बसली ती बाय हो... असे म्हणत इंदिरा गांधींवर कटाक्ष टाकला होता. हे प्रकार प्रेक्षकांना खूप आवडायचे. त्यामुळे चित्रपट हे तेव्हा राजकारणी लोकांसाठी प्रभावी माध्यम होते. प्रत्येक राजकीय पक्ष आपला असा एखादा निर्माता सांभाळून ठेवत असत.
खुद्द दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या जय जवान जय किसान या घोषणेचे महत्व पटवण्यासाठी चित्रपटाची निर्मिती करावी अशी इच्छा मनोजकुमारकडे व्यक्त केली होती. त्यातून उपकार या चित्रपटाची निर्मिती झाली होती.
देशाची राजकीय, सामाजिक परिस्थिती ही चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न सातत्याने राजकपूर, बी आर चोप्रा, देवानंद अशा सर्वच आघाडीच्या निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी केला होता. राजकपूरचे चित्रपट थोडे डाव्या विचारसरणीशी मिळते जुळते वाटत होते. अगदी 1986 मध्ये राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील राजकारण राजकपूरने समोर आणले होते. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर गंगा शुद्धीकरणाचा विषय आला होता. त्यावर गंगा शुद्धीकरणाचे राजकारण हा विषय घेउन तो चित्रपट आला. अर्थात त्यातील गंगा बाजूला राहिली आणि त्यापेक्षा मंदीकीनीच लोकांच्या जास्त लक्षात राहिली. त्यामुळे त्यातील राजकारणाकडे दुर्लक्ष झाले. पण सत्यघटना आणि राजकारण त्यातूनही काँग्रेसच्या राजकारणावर रूपकात्मक टीका करण्याचे धाडस तेंव्हा चित्रपटाच्या माध्यमातून होत होत. त्यामुळेच आंधी हा चित्रपट त्या काळात गाजला होता तो त्यावरच्या बंदीमुळे. इंदिरा गांधींची आणीबाणी आणि दहशत इतकी भयानक होती की कोणी थेट टिका करण्याचे धाडस करत नव्हते. आजकाल आपण पंतप्रधान मोदींवर सहजपणे टीका करणारे पाहतो, पण काँग्रेसच्या राजवटीत हे कधी शक्य नव्हते. ती हौस चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण होत होती.
मनमोहन देसाई हा मसालेदार चित्रपट काढणारा निर्माता दिग्दर्शक. अमर अकबर अँथनी, धरमवीर, चाचा भतीजा, परवरीश, नसिब असे मल्टीस्टारकास्ट चित्रपट देणारा हा निर्माता, दिग्दर्शक होता. कधी वादात अडकायला नको आणि सरकारशी पंगा घ्यायला नको अशा प्रकारे चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. पण आणीबाणीनंतर इंदिरा गांधींची राजवट संपुष्टात आणून जेंव्हा जनता पक्षाचे सरकार आले तेंव्हा त्यालाही राजकीय टिपण्णी करणारे गाणे देण्याचा मोह आवरला नव्हता.
पाकीटमार असणार्या नीतू सिंग आणि शबाना आझमी यांना दिलेले एक गाणे हे हरलेल्या काँग्रेसला डिवचणारे होते. ते गाणे म्हणजे, सब जनता का है।
जनता पक्षाचे सरकार आल्यामुळे त्या काळात हे गाणे खूप गाजले होते. आता लॉकडाउनमुळे तेच तेच चित्रपट पुन्हा पहायला मिळाल्यावर यातील बारकावे पुन्हा ठळकपणे जाणवतात. ये उंचे महल सुहाने सब जनता का है। या गाण्यातून काँग्रेसची मक्तेदारी संपली, सत्ता फक्त काँग्रेसचीच नाही तर जनतेची पण असू शकते हे या गाण्यातून बिंबवण्याचा प्रयत्न होता. त्या गाण्याला तितकाच प्रतिसाद मिळत होता. पण गाणे गाणार्या म्हणजे नीतू आणि शबाना या पाकीटमार होत्या, त्यामुळे काँग्रेसला डिवचताना जनता पक्षाचीही बदनामी झाली होती, हा भाग वेगळा. पण ये रुपये, पैसे आणे सब जनता का है, उंचे महल पुराने सब जनता का है यातून काँग्रेसच्या तत्कालीन नेत्यांनी काळा बाजार करून मिळवलेल्या संपत्तीवर टाच येणार हा संदेश दिला होता. त्या काळात तो यशस्वी झाला नाही पण आता ईडीच्या ससेमिर्यात अडकलेल्या काँग्रेस नेत्यांकडे पाहिल्यावर तेंव्हा दिलेला तो इशारा होता हे नक्की.
पण प्रत्यक्षात मराठी, हिंदी चित्रपटांनी राजकीय टिपण्णी करण्याची मिळेल तेवढी संधी साधली होती हे नक्की. माध्यमं बदलतात पण माणसांना व्यक्त होण्याची संधी हवी असते. आज फेसबुक, व्हॉटसअप आहे, ट्विटर आहे पण तेंव्हा नाटक, सिनेमा, तमाशा किंवा लोकनाट्यांनी ते काम मोठ्या प्रमाणात केलेले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा