पावसाळा आला की मुंबईतील इमारती कोसळणार हे ठरलेले असतेच. पण त्याची काळजी का घेतली जात नाही? याला रहिवाशी दोषी की महापालिका दोषी याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे सातत्याने मुंबई, ठाणे महापालिकेचा आपतकालीन विभाग हा जुन्या इमारती,चाळींचे वर्गीकरण करत असतो. धोकादायक इमारतीतींची यादी नेहमी जाहीर होत असते. पण तरीही इमारती कोसळतात आणि माणसे मरतात. हे का होते? आपली इमारत सुरक्षित आहे, मोडकळीस आलेली नाही असे रहिवाशांना वाटत असते. त्याचबरोबर कित्येक वर्षांपासून मुंबईत असलेली बिल्डर लॉबी अनेक मोक्याच्या इमारतींवर नजर ठेवून असते. त्यामुळे अनेक चांगल्या सुस्थितीतील इमारतीही महापालिकेच्या अधिकार्यांच्या मदतीने धोकादायक यादीत टाकली जातात. या भ्रष्ट कारभारामुळे रहिवाशी,चाळकरी आणि महापालिका यांच्यात वाद निर्माण होतात. त्यातून असे अपघात घडत असतात. त्यामुळे असे मृत्यू दरवर्षी घडतात. यावर्षीही मुंबईतील फोर्ट भागातील भानुशाली इमारत कोसळली आणि त्यात काही लोकांचा मृत्यू झाला. तशीच घटना मालाडमध्येही घडली. म्हणजे नेमेचि येतो पावसाळा आणि उद्ध्वस्त होतो कोसळणार्या इमारतींमधील मुंबईकर हाच अनुभव दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईकरांनी घेतला. मुंबईत गुरुवारी एकाच दिवशी दोन इमारती कोसळल्या आणि 9 जणांचा मृत्यू, तर 20 हून अधिक लोक जखमी झाले. अनेकांना पडलेल्या इमारतीची आणि उद्ध्वस्त झालेल्या संसाराची माती हातात घेवूनच घराबाहेर पडावे लागले.
मुंबईत पावसाळ्याआधी मुंबईतील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांची यादी तयार करण्यात येते. त्यानुसार अशा धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना इशारा देऊन इमारत खाली करण्याबाबत सूचना केली जाते. मात्र अनेक वेळा डोक्यावरील छप्पर जाण्याच्या भीतीने नागरिक धोकादायक इमारतीमध्येच जीव मुठीत घेऊन राहत असतात. या इमारतींची आवश्यक डागडुजी पावसाळ्यापूर्वी न झाल्यास दुर्घटनेची शक्यता असते. मात्र या गंभीर विषयाकडे दरवर्षी दुर्लक्ष केले जाते. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात इमारत अथवा इमारतीचा भाग कोसळून लोकांना नाहक जीव गमवावा लागतो.
गुरूवारी फोर्ट परिसरात जीपीओसमोर पाच मजली भानुशाली इमारतीचा काही भाग लगतच्या लकी हाऊस, गणेश चाळीवर कोसळला. दुर्घटनाग्रस्त इमारत उपकरप्राप्त इमारत होती. जर्जर झालेल्या या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ‘म्हाडा’कडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेण्यात आले होते. पालिकेकडूनही आवश्यक ती परवानगी देण्यात आली होती. या इमारतीचे 1 एप्रिलपासून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार होते. परंतु लॉकडाऊनमुळे हे काम सुरू होऊ शकले नाही. दुसरीकडे मालाड, मालवणीमध्ये दुमजली चाळ कोसळून दोघांचा मृत्यू ओढवला आहे. मालक - रहिवाशांमधील वाद, विकासकाकडून होणारी फसवणूक, संक्रमण शिबिरांमधील सोयी-सुविधांचा अभाव, सरकारी यंत्रणांकडून वेळीच घेतली न जाणारी दखल आदी विविध कारणांमुळे जर्जर झालेल्या इमारती पूर्णत: अथवा काही भाग कोसळण्याच्या घटना आजही घडत आहेत.
ठाण्यातील कळवा भागात, मुंबईमधील दक्षिण मुंबईसह विविध भागांमध्ये दाटीवाटीने असंख्य जुन्या चाळी उभ्या आहेत. जर्जर झालेल्या या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून ऐरणीवर आला आहे. मालक आणि रहिवाशांमधील वादामध्ये अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. काही ठिकाणी विकासक - मालक - रहिवाशांमधील वाटाघाटी फिस्कटल्या आहेत. एकदा इमारत रिकामी केल्यानंतर नवी इमारत कधी उभी राहील, याची शाश्वती नसल्याने रहिवासी संक्रमण शिबिरात वास्तव्यास जाण्यास तयार होत नाहीत. त्याचबरोबर संक्रमण शिबिरांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव असल्याने रहिवासी तेथे जात नाहीत.
राजकारणी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले की शहरी निवासी नियोजन कसे कोसळते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईच्या अत्यंत गजबजलेल्या आणि जुन्या वसाहतींमधील दरवर्षी कोसळणार्या या इमारती आणि जाणारे जीव. मागच्या वर्षीही डोंगरी परिसरातील चार मजली इमारत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हाही मुंबई महापालिकेने आपली जबाबदारी झटकण्यासाठी थेट ‘म्हाडा’कडे बोट दाखवले. केसरबाई मेन्शन ही इमारत आपल्या कार्यक्षेत्रात नाही म्हणून महापालिकेने हात झटकले. काही तासातच ‘म्हाडा’ने खुलासा केला की, कोसळलेली इमारत बेकायदेशीर उभी होती. याचा आमचा काहीही संबंधी नाही. चार मजले कोसळून आणि पंधरा जणांचे मृतदेह मिळूनही सरकारी कामासाठी असलेल्या म्हाडा व महापालिका या दोन्ही यंत्रणा आपल्यावर जबाबदारी घेण्यास तयार झाले नाहीत. जो जबाबदारी घेईल, त्याला शिक्षा होणार आणि त्याला नुकसान भरपाई द्यावी लागणार, हे ओघानेच आले. पन्नास वर्षांपूर्वी वपुंच्या गाजलेल्या तूच माझी वहिदा या कथेत त्यांनी याचे नेमके वर्णन केले आहे. गेले अनेकवर्ष जीव मुठीत धरून या इमारतीत मी राहतो आहे. ही इमारत ओळखणे अतिशय सोपे आहे. कारण कोणत्या तरी पावसाळ्यात ही बया कोसळणार आहे. ती कोसळू नये म्हणून म्युनिसीपालीटीने तिला आधाराचा खांब लावला आहे. या आधाराच्या खांबांची संख्या इतकी आहे की तीचा मुळचा खांब कोणता हे ओळखता येत नाही.
हे मार्मिक वर्णन ऐकल्यावर महापालिकेचा कारभार गेल्या पन्नास वर्षांपासून तसाच आहे हे लक्षात घेतले पाहिजे. सत्तांतर झाले, काँग्रेसकडून सेनेकडे महापालिका आली पण कारभार जैसे थे. हे चित्र बदलत नाही तो पर्यंत दरवर्षी पावसाळा आला की आम्हाला कोसळणार्या इमारती पहाव्याच लागतील. या कोसळणार्या इमारतींचा आकडा भयानक आहे. सातत्याने घडणार्या घटना हे इथले वैशिष्ठ्य आहे. 1971 ते 2018 या कालावधीत मुंबईत 3528 इमारती कोसळल्या. त्यामुळे पन्नास वर्षांपूर्वीचे वपुंचे वर्णन किती रास्त होते हे लक्षात घेतले पाहिजे. त्या कथेतील हे हसरे दु:खच होते. पण हे चित्र बदलणारी यंत्रणा आमच्याकडे तयार होत नाही तोपर्यंत दरवर्षी पावसाचे ढग येणार त्याप्रमाणे मृत्यूचे येणारे ढगही आम्हाला पाहावेच लागतील.
मुंबईत पावसाळ्याआधी मुंबईतील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांची यादी तयार करण्यात येते. त्यानुसार अशा धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना इशारा देऊन इमारत खाली करण्याबाबत सूचना केली जाते. मात्र अनेक वेळा डोक्यावरील छप्पर जाण्याच्या भीतीने नागरिक धोकादायक इमारतीमध्येच जीव मुठीत घेऊन राहत असतात. या इमारतींची आवश्यक डागडुजी पावसाळ्यापूर्वी न झाल्यास दुर्घटनेची शक्यता असते. मात्र या गंभीर विषयाकडे दरवर्षी दुर्लक्ष केले जाते. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात इमारत अथवा इमारतीचा भाग कोसळून लोकांना नाहक जीव गमवावा लागतो.
गुरूवारी फोर्ट परिसरात जीपीओसमोर पाच मजली भानुशाली इमारतीचा काही भाग लगतच्या लकी हाऊस, गणेश चाळीवर कोसळला. दुर्घटनाग्रस्त इमारत उपकरप्राप्त इमारत होती. जर्जर झालेल्या या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ‘म्हाडा’कडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेण्यात आले होते. पालिकेकडूनही आवश्यक ती परवानगी देण्यात आली होती. या इमारतीचे 1 एप्रिलपासून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार होते. परंतु लॉकडाऊनमुळे हे काम सुरू होऊ शकले नाही. दुसरीकडे मालाड, मालवणीमध्ये दुमजली चाळ कोसळून दोघांचा मृत्यू ओढवला आहे. मालक - रहिवाशांमधील वाद, विकासकाकडून होणारी फसवणूक, संक्रमण शिबिरांमधील सोयी-सुविधांचा अभाव, सरकारी यंत्रणांकडून वेळीच घेतली न जाणारी दखल आदी विविध कारणांमुळे जर्जर झालेल्या इमारती पूर्णत: अथवा काही भाग कोसळण्याच्या घटना आजही घडत आहेत.
ठाण्यातील कळवा भागात, मुंबईमधील दक्षिण मुंबईसह विविध भागांमध्ये दाटीवाटीने असंख्य जुन्या चाळी उभ्या आहेत. जर्जर झालेल्या या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून ऐरणीवर आला आहे. मालक आणि रहिवाशांमधील वादामध्ये अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. काही ठिकाणी विकासक - मालक - रहिवाशांमधील वाटाघाटी फिस्कटल्या आहेत. एकदा इमारत रिकामी केल्यानंतर नवी इमारत कधी उभी राहील, याची शाश्वती नसल्याने रहिवासी संक्रमण शिबिरात वास्तव्यास जाण्यास तयार होत नाहीत. त्याचबरोबर संक्रमण शिबिरांमध्ये सोयी-सुविधांचा अभाव असल्याने रहिवासी तेथे जात नाहीत.
राजकारणी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले की शहरी निवासी नियोजन कसे कोसळते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईच्या अत्यंत गजबजलेल्या आणि जुन्या वसाहतींमधील दरवर्षी कोसळणार्या या इमारती आणि जाणारे जीव. मागच्या वर्षीही डोंगरी परिसरातील चार मजली इमारत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हाही मुंबई महापालिकेने आपली जबाबदारी झटकण्यासाठी थेट ‘म्हाडा’कडे बोट दाखवले. केसरबाई मेन्शन ही इमारत आपल्या कार्यक्षेत्रात नाही म्हणून महापालिकेने हात झटकले. काही तासातच ‘म्हाडा’ने खुलासा केला की, कोसळलेली इमारत बेकायदेशीर उभी होती. याचा आमचा काहीही संबंधी नाही. चार मजले कोसळून आणि पंधरा जणांचे मृतदेह मिळूनही सरकारी कामासाठी असलेल्या म्हाडा व महापालिका या दोन्ही यंत्रणा आपल्यावर जबाबदारी घेण्यास तयार झाले नाहीत. जो जबाबदारी घेईल, त्याला शिक्षा होणार आणि त्याला नुकसान भरपाई द्यावी लागणार, हे ओघानेच आले. पन्नास वर्षांपूर्वी वपुंच्या गाजलेल्या तूच माझी वहिदा या कथेत त्यांनी याचे नेमके वर्णन केले आहे. गेले अनेकवर्ष जीव मुठीत धरून या इमारतीत मी राहतो आहे. ही इमारत ओळखणे अतिशय सोपे आहे. कारण कोणत्या तरी पावसाळ्यात ही बया कोसळणार आहे. ती कोसळू नये म्हणून म्युनिसीपालीटीने तिला आधाराचा खांब लावला आहे. या आधाराच्या खांबांची संख्या इतकी आहे की तीचा मुळचा खांब कोणता हे ओळखता येत नाही.
हे मार्मिक वर्णन ऐकल्यावर महापालिकेचा कारभार गेल्या पन्नास वर्षांपासून तसाच आहे हे लक्षात घेतले पाहिजे. सत्तांतर झाले, काँग्रेसकडून सेनेकडे महापालिका आली पण कारभार जैसे थे. हे चित्र बदलत नाही तो पर्यंत दरवर्षी पावसाळा आला की आम्हाला कोसळणार्या इमारती पहाव्याच लागतील. या कोसळणार्या इमारतींचा आकडा भयानक आहे. सातत्याने घडणार्या घटना हे इथले वैशिष्ठ्य आहे. 1971 ते 2018 या कालावधीत मुंबईत 3528 इमारती कोसळल्या. त्यामुळे पन्नास वर्षांपूर्वीचे वपुंचे वर्णन किती रास्त होते हे लक्षात घेतले पाहिजे. त्या कथेतील हे हसरे दु:खच होते. पण हे चित्र बदलणारी यंत्रणा आमच्याकडे तयार होत नाही तोपर्यंत दरवर्षी पावसाचे ढग येणार त्याप्रमाणे मृत्यूचे येणारे ढगही आम्हाला पाहावेच लागतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा