राज्यात मंगळवारपासून दुधाचे आंदोलन पेटले. पेटले म्हणण्यापेक्षा ते पेटवले गेले. राजकीय अस्तित्वासाठी ते पेटवले गेले. आपण अजूनही आहोत हे राज्याला दिसण्यासाठी पेटवले गेले. यात शेतकरी आणि दुध उत्पादकांचे हित कोणतेही दिसत नाही, तर राजकीय स्वार्थच दिसून येतो. राजू शेट्टींना अशा आंदोलनाची नेहमीच गरज असते. जेंव्हा त्यांचे नाव चर्चेतून बाजूला पडते, राजकीय महत्व कमी होते तेंव्हा ते दुध उत्पादकांना वेठीस धरून सामान्यांना छळण्याचा प्रयत्न करतात हे पुन्हा एकदा दिसून आलेले आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने टँकर फोडून हजारो लीटर दूध रस्त्यावर सोडलं. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. यात नुकसान फक्त शेतकर्यांचे होते आहे, दुध उत्पादकांचे होते आहे आणि झालाच फायदा तर तो फक्त राजू शेट्टींचा होणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दूध दर मागणीसाठी 21 जुलै म्हणजेच मंगळवारी राज्यभर दूध बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्या आंदोलनाला सुरूवात झाली आणि सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट आली. राजू शेट्टी यांच्याबद्दल तीव्र स्वरूपात नाराजी आली. जे राजू शेट्टी स्वत:ला शेतकर्यांचे नेते म्हणवतात आणि शेतकरी नेते शरद जोशी यांचे शिष्य म्हणवतात त्यांना आता तो अधिकार राहिलेला नाही. कारण शेतमालाचे नुकसान करण्यापलिकडे आणि स्वत:चे महत्व वाढवण्यापलिकडे या आंदोलनाला काहीही अर्थ नाही हे स्पष्ट झालेले आहे. किंबहुना दुध उत्पादकांनाही हे मान्य नाही. दडपण आणि भिती पोटी ते या आंदोलनात सहभागी होत आहेत.
या आंदोलनाला मंगळवारी सुरूवात झाली आणि सांगलीत पहाटेच स्वाभिमानीच्या कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेला गोकुळचा टँकर कार्यकर्त्यांनी फोडला. हे अजिबात चांगले नाही. शेतमालाचे नुकसान करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? राजू शेट्टी यांनी हे दूध विकत घेउन मग ओतले का? इतका माज होता तर ते दूध गोरगरीबांना का वाटले नाही? अत्यंत संतापजनक आणि घृणास्पद अशी ही गोष्ट आहे.
मंगळवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर आंदोलनाला सांगली जिल्ह्यात सुरुवात झाली. पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाळवा तालुक्यातील येलूर फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पहाटेच्या सुमारास गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला. गोकुळ दूध संघाचा टँकर 25 हजार लिटर दूध घेऊन मुंबईला जात होता.
त्याचे रितसर चित्रिकरण करून ते वाहिन्यांकडे पाठवण्यात आले आणि आपले शक्तीप्रदर्शन केले. हे अत्यंत वाईट कृत्य आहे. दुध उत्पादन, शेतमाल तयार करायला शेतकरी घाम गाळतो आणि हे शेतकरी नेते एका मिनिटात या मालाची नासाडी करतात, त्यामुळे अशा नेत्यांचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे. किंबहुना अशा नेत्यांना जनतेने नाकारले पाहिजे. राजू शेट्टींनी सगळ्या निवडणुकात अपयश आल्यावर आता शरद पवारांच्या कृपेने विधानपरिषदेचे सदस्यत्व पदरात पाडून घेतले आहे ना? मग तिथे सभागृहात चर्चा करा. तिथे तर तुमचेच सरकार आहे. मग हे आंदोलन कशासाठी केले? शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या चढाओढीत राजू शेट्टी यांना कोणी विचारणार नाही असे वाटले म्हणून हे दुधाचे टँकर फोडण्याचे नाटक केले का? या सर्व दुधाचे बिल राजू शेट्टी यांनी चुकते करावे. ज्या शेतकर्यांचे दुधाचे नुकसान या आंदोलनाने झाले आहे त्यांना पैसे चुकते करावेत आणि मगच पुढचे आंदोलन करावे. जो दर सरकाने द्यावा, जे अनुदान सरकारने द्यावे असे राजू शेट्टी यांना वाटते त्या दराने राजू शेट्टी यांनी दूध संकलीत करून मग रस्त्यावर सोडावे. मग त्यांच्या मागण्यांचा विचार करता येईल. पण हा शेतकर्याचा माल नाश करणे हे महापाप त्यांनी केलेले आहे.
मंगळवारी स्वाभिमानीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने दुग्ध विभागाने गोकुळ दूध संघाला नोटीस पाठवली होती. या नोटीसनंतर गोकुळ दूध संघाने स्वाभिमानीच्या दूध आंदोलनाला दिलेला पाठिंबा मागे घेत सकाळचे दूध संकलन आणि दूध वाहतूक सुरु ठेवली होती. त्यानंतर स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी नेमकं गोकुळच्या टँकरला लक्ष्य केलेलं आहे. शेतकरी आणि जनतेच्या तोंडचा घास काढून घेणार्या या प्रवृत्तीला आंदोलन म्हणता येणार नाही. ही एकप्रकारची गुंडगिरी आहे. आज सगळीकडे लॉकडाउन आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवायचे आहे. कोरोनाचे महासंकट आहे. असे असताना गर्दी करून हे आंदोलन केले आणि शेतमालाचे नुकसान आणिबाणीच्या परिस्थितीतीत केले गेले आहे. यासाठी राजू शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची गरज आहे.
नेमकी चुकीची वेळ साधत केलेले हे काम अतिशय वाईट असेच ओह. म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दर वाढीसाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिली. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. पण आंदोलन करण्याची ही वेळ आहे का? राजू शेट्टी यांना विधान परिषदेत आणू पाहणार्या ज्येष्ठ नेते शरद पवारांना हे मान्य आहे का? पण तुम्ही तर आज राज्याच्या सत्तेत आहात. राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सुटला असता. पण ती चर्चा केली नाही. हे कसले राजकारण? मंगळवारी सकाळी
या आंदोलनाची सुरुवात सांगली जिल्ह्यात आक्रमक पद्धतीने झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळुरु हायवेवर येलूर फाटा इथे आंदोलन करण्यात आलं. सकाळी सहाच्या सुमारास दूध टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाचा हा टँकर मुंबईकडे निघाला असता, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने हा टँकर अडवला. यानंतर टँकरचे सील तोडून दूध रस्त्यावर सोडलं आणि जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास एकही टँकर सोडणार नाही. सर्व टँकर फोडून अशाच पद्धतीने दूध रस्त्यावर सोडण्यात येईल, असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला. पण यातून ना शेतकर्यांचे हित पाहिले ाते आहे ना सामान्यांचे हित पाहिले जाते आहे. शेतमालाचे नुकसान करून ही फक्त दहशत माजवण्याचा प्रयत्न होतो आहे. शेतकरी नेते म्हणून घेण्याचा अधिकार शेट्टींना नाही. शेतकरी आपल्या उत्पादनावर प्रेम करतो. हे आंदोलक भाडोत्री असावेत. कोणताही जन्मदाता आपल्या बाळाची हत्या करू शकत नाही. तसेच कोणताही शेतकरी आपल्या शेतमालाची, दुध उत्पादक आपल्या उत्पादनाची अशी नासाडी करू शकत नाही. त्यामुळे हे आंदोलन शेतकर्यांचे नाही तर गुंडगिरीचे आहे. त्यामुळे त्यांना जरब बसवण्याची गरज आहे. शेतकर्यांनी अशा नेत्यांचे नेतृत्व झुगारून दिले पाहिजे आणि आपले काम आपण करत बसले पाहिजे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने टँकर फोडून हजारो लीटर दूध रस्त्यावर सोडलं. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. यात नुकसान फक्त शेतकर्यांचे होते आहे, दुध उत्पादकांचे होते आहे आणि झालाच फायदा तर तो फक्त राजू शेट्टींचा होणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दूध दर मागणीसाठी 21 जुलै म्हणजेच मंगळवारी राज्यभर दूध बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्या आंदोलनाला सुरूवात झाली आणि सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट आली. राजू शेट्टी यांच्याबद्दल तीव्र स्वरूपात नाराजी आली. जे राजू शेट्टी स्वत:ला शेतकर्यांचे नेते म्हणवतात आणि शेतकरी नेते शरद जोशी यांचे शिष्य म्हणवतात त्यांना आता तो अधिकार राहिलेला नाही. कारण शेतमालाचे नुकसान करण्यापलिकडे आणि स्वत:चे महत्व वाढवण्यापलिकडे या आंदोलनाला काहीही अर्थ नाही हे स्पष्ट झालेले आहे. किंबहुना दुध उत्पादकांनाही हे मान्य नाही. दडपण आणि भिती पोटी ते या आंदोलनात सहभागी होत आहेत.
या आंदोलनाला मंगळवारी सुरूवात झाली आणि सांगलीत पहाटेच स्वाभिमानीच्या कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेला गोकुळचा टँकर कार्यकर्त्यांनी फोडला. हे अजिबात चांगले नाही. शेतमालाचे नुकसान करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? राजू शेट्टी यांनी हे दूध विकत घेउन मग ओतले का? इतका माज होता तर ते दूध गोरगरीबांना का वाटले नाही? अत्यंत संतापजनक आणि घृणास्पद अशी ही गोष्ट आहे.
मंगळवारी सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दर आंदोलनाला सांगली जिल्ह्यात सुरुवात झाली. पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाळवा तालुक्यातील येलूर फाट्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पहाटेच्या सुमारास गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला. गोकुळ दूध संघाचा टँकर 25 हजार लिटर दूध घेऊन मुंबईला जात होता.
त्याचे रितसर चित्रिकरण करून ते वाहिन्यांकडे पाठवण्यात आले आणि आपले शक्तीप्रदर्शन केले. हे अत्यंत वाईट कृत्य आहे. दुध उत्पादन, शेतमाल तयार करायला शेतकरी घाम गाळतो आणि हे शेतकरी नेते एका मिनिटात या मालाची नासाडी करतात, त्यामुळे अशा नेत्यांचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे. किंबहुना अशा नेत्यांना जनतेने नाकारले पाहिजे. राजू शेट्टींनी सगळ्या निवडणुकात अपयश आल्यावर आता शरद पवारांच्या कृपेने विधानपरिषदेचे सदस्यत्व पदरात पाडून घेतले आहे ना? मग तिथे सभागृहात चर्चा करा. तिथे तर तुमचेच सरकार आहे. मग हे आंदोलन कशासाठी केले? शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या चढाओढीत राजू शेट्टी यांना कोणी विचारणार नाही असे वाटले म्हणून हे दुधाचे टँकर फोडण्याचे नाटक केले का? या सर्व दुधाचे बिल राजू शेट्टी यांनी चुकते करावे. ज्या शेतकर्यांचे दुधाचे नुकसान या आंदोलनाने झाले आहे त्यांना पैसे चुकते करावेत आणि मगच पुढचे आंदोलन करावे. जो दर सरकाने द्यावा, जे अनुदान सरकारने द्यावे असे राजू शेट्टी यांना वाटते त्या दराने राजू शेट्टी यांनी दूध संकलीत करून मग रस्त्यावर सोडावे. मग त्यांच्या मागण्यांचा विचार करता येईल. पण हा शेतकर्याचा माल नाश करणे हे महापाप त्यांनी केलेले आहे.
मंगळवारी स्वाभिमानीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने दुग्ध विभागाने गोकुळ दूध संघाला नोटीस पाठवली होती. या नोटीसनंतर गोकुळ दूध संघाने स्वाभिमानीच्या दूध आंदोलनाला दिलेला पाठिंबा मागे घेत सकाळचे दूध संकलन आणि दूध वाहतूक सुरु ठेवली होती. त्यानंतर स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी नेमकं गोकुळच्या टँकरला लक्ष्य केलेलं आहे. शेतकरी आणि जनतेच्या तोंडचा घास काढून घेणार्या या प्रवृत्तीला आंदोलन म्हणता येणार नाही. ही एकप्रकारची गुंडगिरी आहे. आज सगळीकडे लॉकडाउन आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवायचे आहे. कोरोनाचे महासंकट आहे. असे असताना गर्दी करून हे आंदोलन केले आणि शेतमालाचे नुकसान आणिबाणीच्या परिस्थितीतीत केले गेले आहे. यासाठी राजू शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची गरज आहे.
नेमकी चुकीची वेळ साधत केलेले हे काम अतिशय वाईट असेच ओह. म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दर वाढीसाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिली. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. पण आंदोलन करण्याची ही वेळ आहे का? राजू शेट्टी यांना विधान परिषदेत आणू पाहणार्या ज्येष्ठ नेते शरद पवारांना हे मान्य आहे का? पण तुम्ही तर आज राज्याच्या सत्तेत आहात. राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सुटला असता. पण ती चर्चा केली नाही. हे कसले राजकारण? मंगळवारी सकाळी
या आंदोलनाची सुरुवात सांगली जिल्ह्यात आक्रमक पद्धतीने झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळुरु हायवेवर येलूर फाटा इथे आंदोलन करण्यात आलं. सकाळी सहाच्या सुमारास दूध टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाचा हा टँकर मुंबईकडे निघाला असता, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने हा टँकर अडवला. यानंतर टँकरचे सील तोडून दूध रस्त्यावर सोडलं आणि जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यास एकही टँकर सोडणार नाही. सर्व टँकर फोडून अशाच पद्धतीने दूध रस्त्यावर सोडण्यात येईल, असा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला. पण यातून ना शेतकर्यांचे हित पाहिले ाते आहे ना सामान्यांचे हित पाहिले जाते आहे. शेतमालाचे नुकसान करून ही फक्त दहशत माजवण्याचा प्रयत्न होतो आहे. शेतकरी नेते म्हणून घेण्याचा अधिकार शेट्टींना नाही. शेतकरी आपल्या उत्पादनावर प्रेम करतो. हे आंदोलक भाडोत्री असावेत. कोणताही जन्मदाता आपल्या बाळाची हत्या करू शकत नाही. तसेच कोणताही शेतकरी आपल्या शेतमालाची, दुध उत्पादक आपल्या उत्पादनाची अशी नासाडी करू शकत नाही. त्यामुळे हे आंदोलन शेतकर्यांचे नाही तर गुंडगिरीचे आहे. त्यामुळे त्यांना जरब बसवण्याची गरज आहे. शेतकर्यांनी अशा नेत्यांचे नेतृत्व झुगारून दिले पाहिजे आणि आपले काम आपण करत बसले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा