रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

अपेक्षित निर्णय


राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांत पहिला टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. या संवादात त्यांनी दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास करता येईल, असे सांगितले आणि खूप बरे वाटले. हा एक अपेक्षित निर्णय होता तो त्यांनी घेतला ही समाधानाची बाब आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची त्यांची ख्याती आहेच; पण कोणताही आततायीपणा न करता किंवा आततायीपणाला फारसा प्रतिसाद न देता आपल्या संयमी शैलीत त्यांनी हा निर्णय घेतला हे अत्यंत योग्य झाले.


कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. २२ एप्रिल, २०२१पासून सर्वसामान्य लोकांना मुंबई आणि परिसरात लोकल प्रवास बंद झाला होता. आता दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना १५ आॅगस्टपासून लोकल प्रवास करता येणार आहे. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील, तसेच दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असतील, त्यांना १५ आॅगस्टपासून लोकलमधून प्रवास करता येईल. अ­ॅपद्वारे किंवा पालिकेच्या कार्यालयात पास उपलब्ध होणार आहेत. यामुळे एक आणखी चांगला संदेश गेला आहे. तो म्हणजे लसीकरणाला पर्याय नाही. लसीकरण केल्याशिवाय लोकल प्रवास करताच येणार नाही. त्यामुळे जे लोक लसीकरण करून घेण्यास टाळाटाळ करत होते, नंतर बघू म्हणून वेळ मारून नेत होते, अशा लोकांना आता लस ही घ्यावीच लागेल. त्यामुळे लसीकरणाचा वेगही आता वाढेल आणि ही लाट थोपवण्यास आपण हातभार लावू शकू. राज्यात आणि मुंबईत एक डोस घेणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकांचा दुसरा डोस प्रलंबित आहे. त्यामुळे १५ आॅगस्टपासून लगेच गर्दी होईल, अशा भ्रमात कोणी रहायचे कारण नाही. त्यामुळे हा काढलेला तोडगा म्हणजे एक सुवर्णमध्य आहे. प्रत्येकाने दोन डोस तातडीने घेणे आवश्यक आहे, त्यासाठी आवश्यक तो कालावधी प्रतीक्षा करणे आवश्यक आहे, याची जाणीव सर्वांना झालेली असेल. कोरोनावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सर्वांना लोकल प्रवास सुरू होण्यासाठी किमान सत्तर टक्के लसीकरण होणे अपेक्षित आहे, अशी सरकारची प्रथमपासूनच भूमिका होती; पण तरीही लसींचा तुटवडा आणि अनेक नागरिकांमध्ये कोणती लस घेऊ याबाबत असलेला संभ्रम यामुळे लसीकरणाचा वेग कमीच होता. आता यामुळे जागरूकता निर्माण होऊन जास्तीत जास्त लोक लसीकरण करून घेतील ही अपेक्षा आहे. त्यामुळे दोन डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवास ही घातलेली अट अत्यंत योग्य आहे, त्यामुळे चांगले नियोजन करता येईल, सरकारला वेळ मिळेल आणि गर्दीवर नियंत्रणही ठेवता येईल.

कोविड काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना, तसेच नागरिक वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करत होते. अद्याप आपण दुसº­या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही. संभाव्य तिसºया लाटेचा धोकादेखील आहे. केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे; मात्र तरीदेखील अर्थचक्र सुरू ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आणि सामान्य नागरिक सुखावला. गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाचा वेगही वाढला आहे. मुंबईसारख्या महापालिकेने घरोघर लसीकरण करण्याची मोहीम हातात घेतली आहे, लसींचा साठाही वाढवला आहे. त्यामुळे आता कोणाची कोंडी होणार नाही हे नक्की.


सामान्य माणसांना लोकल सुरू नव्हती, तेव्हा फक्त भय्ये, परप्रांतिय बेकायदेशीरपणे लोकलने प्रवास करत सर्वत्र घाण करत होते. तोंडात गुटखा, तंबाखू, पान खाऊन सर्वत्र थुंकून घाण करत होते. त्यावर ना महापालिका नियंत्रण ठेवू शकत होती, ना पोलीस, ना रेल्वेची यंत्रणा. हे भय्ये, परप्रांतिय लोक मास्क लावण्याचे सौजन्यही दाखवत नव्हते; पण आता दोन डोस घेतले आहेत की नाही, याचे चेकिंग केले तर हे अवैधपणे प्रवास करणारे परप्रांतिय शांत होतील. अत्यंत अस्वच्छ अशा या लोकांमुळे मुंबई घाण केली जात होती. त्यालाही कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे. मुंबई लोकलमधून फिरणारे विके्रते, परप्रांतिय, अल्पवयीन मुले, मोठ्या संख्येने कुटुंबच्या कुटुंब फिरून भीक मागणारे यांची संख्या गेल्या वर्ष सहा महिन्यांत खूपच वाढलेली आहे. या कोणीही लस घेतली असण्याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळे आता रेल्वेचा पास पाहण्यापेक्षा, रेल्वेचे तिकीट पाहण्यापेक्षा लसीकरण केले का याचे प्रमाणपत्र दाखवा, अशी भूमिका घेतली, तर हे अवैध प्रवास करणारे प्रवासी पकडले जातील आणि कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल. आगामी काळात मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीतही ज्यांनी लसीकरण केले आहे, त्यांनाच मतदानाचा अधिकार दिला पाहिजे. त्याचप्रमाणे प्रचारसभा, प्रचाराच्या गर्दीतही कोणीही बिगरलसीकरण असलेला माणूस दिसता कामा नये याची खबरदारी घेतली, तर आपण कोरोनावर विजय मिळवू शकू. मुख्यमंत्री म्हणाले की, १५ आॅगस्टला आपण ब्रिटिशांची सत्ता जशी उलथवून टाकू तशी ही कोरोनाची दहशत उलथवून टाकायची आहे. त्यासाठी लसीकरणाचा रामबाण उपाय त्यांनी योजला आहे. महापालिका आणि कोणत्याही निवडणुकीत प्रचारापासून प्रत्येक कामात लसीकरणाचे दोन डोस झाले असतील त्यांनाच परवानगी दिली गेली पाहिजे. याशिवाय आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असे कोणतेही सार्वजनिक उत्सव, समारंभ साजरे करायचे असतील, तर त्यात फक्त लसीकरण केलेल्यांनाच भाग घेता येईल, अशी सरकारने भूमिका घ्यावी. नाट्यगृह, चित्रपटगृह, हॉटेल, रेस्टॉरंट बार सगळं सुरू करा; पण लसीकरण केलेल्यांनाच तिथे प्रवेश देण्याचा नियम केला आणि त्याची जबाबदारी आयोजकांवर टाकली, तर आपण विजय मिळवू शकू.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: