शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

मराठी माणसांचा हक्क


बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभ नुकताच मुंबईत झाला. एका जंगी समारंभात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री, महापौर असे सगळे दिग्गज होते. यावेळी बीडीडी चाळीचा इतिहास, इथे कोण थोर माणसं राहून गेली हे पण शरद पवारांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे, क्रिकेटर सुनील गावस्कर असे दिग्गज याठिकाणी वास्तव्य करून राहिले होते. अशा या बीडीडी चाळीचे पुनर्वसन, पुनर्विकास होत असताना, यावर फक्त मराठी माणसांचा अधिकार राहील याकडे लक्ष दिले पाहिजे. आज मुंबईतील बहुतेक जागा या परप्रांतीय गिळंकृत करत असताना, मुंबईचे महत्त्वाचे ठिकाण हे फक्त मराठी माणसाचे वैभव बनावे, ही अपेक्षा आहे. नाही तर राजकारणासाठी कोणी या ठिकाणी भय्ये, परप्रांतीय, लुंगीवाले, पगडीवाले घुसवले, तर मुंबई आमची म्हणण्यात काहीच अर्थ राहणार नाही. मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडणार नाही हे फक्त भाषणात म्हणायचे आणि परप्रांतीयांना आपल्या घरात घुसवायचे असले प्रकार थांबले पाहिजेत. त्यासाठी बीडीडी चाळ ही मराठी माणसांची मक्तेदारी असली पाहिजे. इथे होणाºया सदनिका, कार्यालये, दुकाने जे काही असेल, तर मराठी माणसांचे असेल, यासाठी प्रयत्न केला पाहिजे.


आपल्याकडे अन्य प्रकल्पात मराठी माणसांची अवस्था फार वाईट असते. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरे कित्येक लाखांना विकली जात असल्याने मराठी माणसांनी ती घरे विकून मुंबईबाहेर स्थलांतरित होणे पसंत केले. त्यामुळे आता मुंबईत मराठी माणसांचा टक्का टिकवण्याचे आवाहन करण्यात येत असले, तरी ते टिकवणे मोठे आव्हान आहे. यासाठी बीडीडी चाळीच्या विकासात मराठी माणसांना डावलले जाणार नाही याचा विचार केला पाहिजे.

शरद पवारांनी मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे, त्याला मिळालेली घरे त्याने विकून न टाकता जपली पाहिजेत, असे आवाहन मराठी माणसांना केले असले, तरी मराठी माणसांची मुंबईतील आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याने मुंबईत मराठी टक्का टिकवणे ही फार कठीण परिस्थिती आहे. अर्थात मराठी माणसांची ही अवस्था शरद पवारांनाही जाणवू लागली हे एक प्रकारे बरेच झाले, कारण इतके वर्ष मराठी माणसांचा पुळका फक्त शिवसेना, मनसे यांनीच घ्यायचा बाकीच्यांनी परप्रांतीयांना कवटाळायचे असे चालले होते; पण मराठी माणसाची किंमत त्यांनाही कळली हे ठिकच. मराठी माणसांसाठी लढणाºया शिवसेनेवर सतत प्रादेशिक संकुचितपणाचा आरोप होत होता, परंतु आता खुद्द शरद पवार यांनीच मराठी माणसांचा मुंबईतील टक्का टिकला पाहिजे, असे आवाहन केले हे बरेच झाले. त्यामुळे बीडीडी चाळ ही मराठी माणसांना पुन्हा वैभव आणून देणारी योजना असेल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. भार्इंदरसारख्या भागात ज्याप्रमाणे जैन, गुजराती लोक आपल्या सोसायटीत मांसाहारी माणसांनी इथे रहायचे नाही हे ठामपणे सांगतात. आपण त्यांचे ऐकतो. त्याप्रमाणे बीडीडी चाळ आणि येथील पुनर्विकास हा फक्त आणि फक्त मराठी माणसांसाठीच आहे हे ठामपणे सांगायची हीच ती वेळ आहे. मुंबई टिकवण्यासाठी बीडीडी चाळीत मराठी माणूस शंभर टक्के असला पाहिजे. मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील बांधकामाचा आरंभ करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठी माणसाच्या मुद्यावरून सुरात सूर मिसळला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सूर मिसळले असावेत, हे वेगळे सांगायला नको.


अर्थात हे फक्त येत्या पाच-सहा महिन्यांनी होणाºया महापालिका निवडणुकीपुरते असता कामा नये. मुंबई परप्रांतीयांच्या हातात गेलेली आहेच. आज लोकलचा प्रवास फक्त परप्रांतीय भय्ये बिनदिक्कतपणे करत आहेत. सामान्य मराठी माणूस सामान्यच राहत आहे. दिसलाच एखादा मराठी माणूस, तर त्याला तत्परतेने भय्ये टीसी, परप्रांतीय रेल्वे कर्मचारी पकडतात आणि दंड करतात. व्यापार, बाजारपेठा सगळं परप्रांतीयांच्या हातात गेले आहे. बटाटावडा, कांदे-पोहे हे खास मराठी पदार्थ; पण तेही विकण्याचे आणि बनवण्याचे काम परप्रांतीय करत आहेत, यांसारखे दुर्दैव कुठले? पूर्वी फक्त भेळ विकणारे भय्ये, आज प्रत्येक गोष्ट विकत आहेत आणि आमच्या खिशातला पैसाच नाही, तर आमचा रोजगार घेत आहेत. रोजगार घेता-घेता आमचे घरही काढून घेत आहेत. अशा परिस्थितीत बीडीडी चाळीत, जर असे परप्रांतीय घुसवले तर त्यासारखे कोणतेही पाप नसेल, याची जाणिव ठेवून या भागात पुनर्विकासानंतर शंभर टक्के मराठी माणूस राहील याचा विचार केला पाहिजे.

मुंबईत उत्तर भारतीय, गुजराती, दाक्षिणात्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मुंबईची खरी ओळख ही मराठी भाषा आणि मराठी माणसे हीच आहे. असे असले, तरी विविध जाती-धर्मांच्या लोकांमुळे मुंबई आणि मराठी माणूस हे समीकरण बदलत गेले. रोजगारासाठी मुंबईत आलेल्या मराठीतेर लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे मुंबईतील मराठीचा टक्का घसरत चालला आहे. मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे, भूमिपुत्र असलेल्या मराठी माणसाचे अस्तित्व टिकवण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला. दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीयांमुळे मराठी माणसांच्या नोक‍ºया गेल्या, त्या पुन्हा मिळाव्यात. मराठी माणसांनी व्यवसाय करावा, तो टिकवावा, अशी भूमिका घेऊन अनेक वर्षे शिवसेना लढली, तर गिरणी कामगारांच्या संपाने मुंबईतील कापड गिरण्यांमधील मराठी माणूस पुरता कोलमडला गेला. तो बेरोजगार झाला. १९९१ मध्ये भारताने जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर मुंबईतील जागांचे भाव वाढले. वाढत्या जागांच्या भावामुळे मुंबईतील मराठी माणूस ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि त्यानंतर काही वर्षांनी तर कर्जत, कसारा, पुढे तर गोरेगाव, कांदिवली, बोरिवलीनंतर मीरा-भार्इंदर, वसई-विरारकडे स्थलांतरित झाला, तर अमराठी माणसांनी नोकºयांमध्ये, व्यवसायात उत्तम जम बसवत मुंबईत आपले बस्तान बसवले. हे चित्र बदलण्यासाठी बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा क्रांतिकारी ठरावा. तो फक्त मराठी माणसांचा हक्क असावा.


...................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: