गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

ऐतिहासिक यशाने मरगळ झटकली


गुरुवारचा दिवस सर्व भारतीयांसाठी अपूर्व आनंदाचा ठरला. जवळजवळ ४१ वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने गुरुवारी टोकियो आॅलिम्पिकमध्ये एका अत्यंत चित्तथरारक सामन्यात कांस्यपदक हस्तगत केले. एकेकाळी हॉकी ही भारताची मक्तेदारी होती. यापूर्वी आॅलिम्पिकमध्ये भारताने हॉकीमध्ये ८ वेळा सुवर्णपदक मिळवले आहे. परंतु १९८० च्या मॉस्को आॅलिम्पिकनंतर जे भारतीय हॉकीचे खच्चीकरण झाले त्यातून त्याला चाळीस वर्षं सावरता आले नव्हते. त्यामुळे ४१ वर्षांनी भारताने हॉकीचे पदक मिळवले ही आनंदाची बाब आहे. भले कांस्यपदक असेल, पण हॉकीमध्ये आपले नाव राखले हे महत्त्वाचे आहे. पुढच्या स्पर्धेत सुवर्णपदकाची आशा ठेवून कामगिरी करायला हे वातावरण फार महत्त्वाचे असेल. त्यामुळे भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन करायलाच हवे. त्यामुळे या ऐतिहासिक कामगिरीने भारतीय हॉकीने आलेली मरगळ झटकली आहे हे मान्य करावे लागेल.


खरे तर बेल्जियमविरुद्धची उपांत्यफेरी हरल्यानंतर कोणत्याही संघाचे मनोधैर्य खच्ची झाले असते, परंतु ज्या प्रकारे या कांस्यपदकासाठी भारतीय संघाने जर्मनीशी प्रबळ झुंज दिली ती थरारक तर होतीच, परंतु क्रीडाजगतामध्ये एका नव्या ऊर्जेची पेरणी करणारीही होती. सदैव क्रिकेट, क्रिकेट, क्रिकेट करणा‍ºया आणि क्रिकेटपलीकडे इतर खेळांना नाके मुरडणा‍ºया आजच्या तरुणाईला हॉकीसारखा खेळही त्याहून थरारक आणि रोमांचकारी असू शकतो याचा प्रत्ययच या आॅलिम्पिक स्पर्धेतील भारतीय पुरुष व महिला हॉकी संघांच्या सामन्यांनी दिला आहे. केवळ पुरुष संघाचीच नव्हे, तर महिला संघाची कामगिरीही तोडीस तोड आहे. अर्थात महिला संघही कांस्यपदकासाठी ग्रेट ब्रिटनशी झुंजला, पण ते पदक मिळवू शकले नाहीत. थोडक्यात महिला हॉकी संघाचे हे पदक हुकले, पण तरीही त्यांनी ईथपर्यंत केलेली कामगिरी मोलाची होती हे मान्य करावे लागेल. ज्या कोविडच्या वातावरणात या स्पर्धा झाल्या आहेत ते पाहता ईथपर्यंत यश ठिक आहे, पुढच्या आॅलिम्पिकमध्ये महिला व पुरुष हॉकी संघ नक्कीच चांगली कामगिरी करतील यात शंका नाही.

गुरुवारचा पुरुष हॉकीचा सामना सुरू होताच दुस‍ºयाच मिनिटाला जर्मनीने फिल्ड गोल करून भारताला १-० ने पिछाडीवर टाकले होते. पहिली पंधरा मिनिटे जर्मनीची ही आघाडी कायम राहिली, परंतु दुस‍ºया पंधरा मिनिटांत सिमरनजीत सिंगनेही फिल्ड गोल करून १-१ ची बरोबरी साधली. तेव्हा भारतीय क्रीडारसिकांच्या अपेक्षा उंचावल्या, परंतु चोविसाव्या मिनिटाला जेव्हा निकलस मेलेनने गोल डागला आणि त्यापाठोपाठ दुस‍ºया मिनिटाला बेनेडिक्टने तिसरा गोल केला तेव्हा जर्मनीच्या ३-१ च्या आघाडीने सामना पाहणा‍ºया कोट्यवधी भारतीयांना निराशेच्या गर्तेत ढकलले होते. परंतु भारतीय हॉकी संघाचे कौतुक करावे लागेल ते या पिछेहाटीनंतरही निराश न होता आणि धैर्य न सोडता त्यांनी केलेल्या दमदार पुनरागमनाबद्दल. हार्दिकसिंगने पेनल्टी कॉर्नरची संधी साधत दुसरा गोल केला आणि दोन मिनिटांत पुन्हा दुस‍ºया पेनल्टी कॉर्नरला हरमनप्रीत सिंगने तिसरा गोल डागून जर्मनीशी बरोबरी साधली आणि हाफ टाइमपर्यंत भारतीय क्रीडारसिकांच्या जीवात जीव तर आलाच, परंतु पुढील कामगिरीबाबतची उत्सुकताही प्रचंड ताणली गेली. हीच जिद्द फार महत्त्वाची होती. भारताचा खेळ अशी ओळख असलेल्या हॉकीत गेल्या चार दशकांत भारत मागे पडत चालला होता. तो नावलौकीक पुन्हा मिळवण्यासाठी होत असलेली ही कामगिरी अभिनंदनास्पद अशीच आहे.


सामन्याच्या उत्तरार्धाची सुरुवात होताच भारताच्या रुपिंदरपाल सिंग आणि सिमरनजीतने आणखी दोन गोल डागून भक्कम वर्चस्व प्रस्थापित केले तेव्हा कोट्यवधी भारतीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही, परंतु जर्मनीला लागोपाठ मिळत गेलेल्या पेनल्टी कॉर्नर्सनिशी प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकतच राहिला. जर्मनीच्या लुकसने पेनल्टी कॉर्नरला एका गोलची परतफेड केली, तेव्हा मागील पराभवाची पुनरावृत्ती होणार की काय, अशी भीती निर्माण झाली होती. पण सामना संपता संपता जर्मनीला मिळालेले पेनल्टी कॉर्नर रोखण्यात भारतीय गोलरक्षक श्रीजेशला मिळालेले यश भारताला ऐतिहासिक विजयाकडे घेऊन गेले. निराशेच्या गर्तेत जाऊन आत्मविश्वास न गमावता ज्या त‍ºहेने ही विजयश्री भारतीय संघाने अक्षरश: खेचून आणली ती या विजयाला अधिक मोल मिळवून देणारी आहे. या स्पर्धेच्या उपांत्यफेरीत बेल्जियमला वारंवार लाभलेल्या पेनल्टी कॉर्नरमुळे हार पत्करावी लागली नसती, तर भारतीय संघाने कदाचित थेट सुवर्णपदकापर्यंतही मजल मारली असती. त्यामुळे ही कांस्यपदकासाठी दिलेली लढतही सुवर्णपदकापेक्षा आजघडीला कमी नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

शुक्रवारी महिला हॉकी संघाचा सामना कांस्यपदकासाठी ग्रेट ब्रिटनशी झाला. त्यात महिला संघाला यश मिळाले नाही. उपांत्यफेरीत त्या संघालाही अर्जेंटिनाकडून अवघ्या एका गोलने पराभव सोसावा लागला असला, तरी महिला हॉकी संघाचा खेळही निश्‍िचतच दमदार आणि नेत्रदीपक राहिला आहे. गुरुवारचा एकूणच दिवस भारतासाठी समाधानकारक होता. रवी दहिया कुस्तीच्या अंतिम सामन्यात पराभूत झाला, तरी त्याने भारताला रौप्यपदक मिळवून दिले आहे. भारताची पदकतालिका इतर देशांच्या तुलनेत कमी असेल, परंतु किमान या कोरोनाकाळातील आॅलिम्पिक स्पर्धेने क्रिकेटेतर खेळांबाबत भारतीय युवापिढीमध्ये जी उत्सुकता आणि उत्साह निर्माण केला आहे तो खरोखर अभूतपूर्व आहे. कुस्ती असो, बॅडमिंटन असो अथवा हॉकी, या सगळ्या खेळांविषयी आजची तरुणाई भरभरून बोलताना आणि टीव्हीवर आवर्जून सामने पाहताना दिसत आहे. यापूर्वीच्या आॅलिम्पिकला असे चित्र सहसा दिसत नव्हते. त्यामुळे हा जो काही नवउत्साह भारतीयांच्या नव्या पिढीमध्ये निर्माण झालेला आहे, तो या सगळ्या खेळांमधील भारताचा भावी सहभाग आणि कामगिरी याबद्दलच्या अपेक्षा नक्कीच उंचावतो. विविध क्रीडाप्रकारांना योग्य उत्तेजन मिळाले तर पुढील आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये भारत याहूनही सरस कामगिरी नक्कीच करून दाखवील! हॉकी या मूळच्या भारतीय खेळात आपले वर्चस्व पुन्हा निर्माण करण्यासाठी भारत आता पुन्हा सिद्ध झालेला आहे हे यानिमित्ताने दाखवून दिले आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: