शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

खबरदारी

 


सध्या अफगाणिस्तानातील असलेली परिस्थिती ही जगाच्या आणि भारताच्या दृष्टीने चिंतेची बाब बनत चालली आहे. तालिबानने ताबा मिळविल्यानंतर अफगाणिस्तानमधील नागरिकांच्या स्वातंत्र्यावर आता काळे ढग दाटून आले आहेत. शरियत लागू करण्याचे तालिबानचे इरादेही लपून राहिलेले नाहीत. त्यामुळे आतापर्यंत सार्वजनिक जीवनात बिनधास्त वावरणाºया महिलांनाही बंदिस्त राहावे लागणार आहे. महिलांना सत्तेत सहभागी होण्याचे आवाहन जरी तालिबानने केले असले, तरी प्रत्यक्षात तसे काही होईल, अशी अपेक्षा करणे शक्य नाही, परंतु त्याचे पडसाद अन्यत्र आणि भारतात उमटू न देणे हे फार महत्त्वाचे आहे. चांगल्या गोष्टींचे अनुकरण होत नाही; पण वाईट प्रवृत्तीचे अनुकरण केले जाते. त्यामुळे त्या धर्मातील समाजाने जर तालिबानची री ओढण्याचा प्रकार जगातील अन्य देशांत व भारतात केला, तर त्याला रोखणे फार महत्त्वाचे असेल. या समाजातील लोक काही शास्त्रीय गोष्टींनाही विरोध करत असतात. पोलिओचा डोस घेण्यास या धर्मियांचा विरोध असतो. त्याचप्रमाणे सध्या कोरोना लसीबाबतही हे लोक अंधश्रद्धेपोटी विरोध करताना दिसतात. त्यामुळे ही प्रवृत्तीच पुढे तालिबानी वृत्तीला खतपाणी घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारतासारख्या संवेदनशील देशात आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे.


तालिबान्यांची मानसिकता ही बुरसटलेली आहे. जुन्या कबिल्यांमध्ये राहणाºया लोकांची जी मानसिकता होती, तिचेच प्रदर्शन आताच्या तालिबान्यांनी मांडले आहे आणि त्याचा फटका अफगाणिस्तानात आतापर्यंत मुक्तपणे संचार करणाºया सगळ्यांनाच बसणार आहे. मुलींना शाळेत जाण्यास आणि महिलांना एकटीने फिरण्यास तालिबानी राजवटीत बंदी असणार आहे. सरकारी कार्यालयांमध्ये महिला काम करू शकतील, याचीही शक्यता मावळली आहे. ज्या महिला सार्वजनिक जीवनात काम करायच्या, स्वत:चे व्यवसाय करायच्या, त्यांच्यावरही तालिबानने कडक निर्बंध आणले आहेत. टीव्हीवर ज्या महिला ‘अँकर’, म्हणून काम करायच्या, त्यांनाही बुरखे घालण्यास बाध्य करण्यात आले आहे. ज्या विदेशी महिला पत्रकार काम करीत आहेत, त्यांनीही बुरखा परिधान केल्याचे दिसत आहे. कारण, त्यांच्यापुढे वेगळा पर्यायही नव्हता. हे फार घातक आहे. त्याचे अनुकरण तालिबान समर्थक देश पाकिस्तान, बांगलादेश करतील आणि त्याचे फॅड आपल्या देशात सोडण्याचे प्रकार झाले, तर ते धोकादायक असेल. यासाठी देशाची एकजूट महत्त्वाची आहे. ती प्रवृत्ती इथे शिरता कामा नये, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अफगाणिस्तान तालिबानला रोखू शकले नाही. तालिबानी प्रवृत्ती जगभर फोफावत चालली आहे, म्हणूनच ती घातक आहे. त्याचा प्रसार आपल्याकडे होणार नाही यासाठी पावले उचलावीच लागतील.

महिलांना सरकारमध्ये भागीदारी देऊ, असे सांगत असतानाच तालिबान्यांकडून महिलांवर कडक प्रतिबंध लादले जात आहेत. त्यामुळे जे काही घडत आहे, ते भयंकर आहे. मानवी मूल्ये पायदळी तुडविणारी तालिबानी राजवट अफगाणिस्तानला पाषाणयुगात घेऊन जाणार, असेच दिसते. पण ती लाट तिथवरच रोखली पाहिजे. सगळ्यांना माफ केले आहे, असे एकीकडे सांगायचे आणि दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना छळायचे, हा दुटप्पीपणा तालिबान्यांकडून होताना दिसतो आहे. टीव्हीवर जे दाखवले जात आहे, जबरदस्तीने मुंडण, हातपाय बांधून गुडघ्यावर सरपटणारे सामान्य नागरिक हे पाहून खूप वाईट वाटते. त्यामुळे तालिबानच्या मनात काय दडले आहे, हे समजायला वेळ लागत नाही. फार पूर्वी अफगाणिस्तानवर भारतीय शासकांची राजवट होती. ज्या महाराजा रणजीत सिंगांचा पुतळा लाहोर येथे तोडण्यात आला, ते महाराजा रणजीत सिंग तिथले शेवटचे भारतीय शासक होते, हे लक्षात घेतले पाहिजे. अफगाणिस्तानातील मुली पाश्चिमात्य कपडे परिधान करून शाळा-महाविद्यालयांमध्ये जात होत्या. पाकिस्तानातील मलालाला विरोध करणारी प्रवृत्ती, रणजीत सिंगांचा पुतळा तोडणारी प्रवृत्ती पाहता आपल्या जवळच्या पाकिस्तानातही तालिबानी प्रवृत्ती फोफावली आहे, हे स्पष्ट झाले आहे. तिला भारतात कुठे शिरकाव करता येणार नाही, यासाठी प्रयत्न करणे हे सरकार पुढे फार मोठे आव्हान आहे.


एकेकाळी भारतीय चित्रपटांचे चित्रीकरण तिथे होत होते. अमिताभ बच्चन यांचा अभिनय असलेला ‘खुदा गवाह’ हा शेवटचा चित्रपट तिथे तयार झाला; पण त्यापूर्वी धर्मात्मा हा फिरोज खानचा चित्रपट अफगाणिस्तानातीलच होता. अनेक चित्रपट तिथे बनले आहेत; पण तालिबानचा क्रूर चेहरा अफगाणी लोकांनी पाहिला आहे. त्यामुळे तालिबानी नेते कितीही आश्वासने देत असले, तरी जनतेचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही आणि म्हणूनच मिळेल त्या साधनांचा वापर करून लोक देशाबाहेर जाण्यासाठी धडपड करीत आहेत. तालिबानी राजवटीतल्या अफगाणिस्तानात तिथल्या सामान्य लोकांना भविष्य अंधकारमय दिसत आहे. पूर्वी पुराण कथात राक्षस, क्रूर राजे आक्रमण करून एखादे राज्य हिसकावून घेत होते. तोच प्रकार आपल्याला इथे घडताना दिसतो आहे. इथल्या महिला तर जास्तच भयभीत झाल्या आहेत, कारण ज्या पद्धतीने तालिबानने निर्बंध लागू करायला सुरुवात केली आहे, ते पाहता महिलांवर प्रचंड दबावही आहे. महिलांची अब्रू सुरक्षित राहील किंवा नाही, याबाबत कोणतीही शाश्वती राहिलेली नाही. महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे, त्यांना गुलाम बनवून ठेवले जाईल की काय, अशी भीती आताच सतावत आहे. राक्षसी प्रवृत्ती यापेक्षा वेगळी नसते. त्यामुळे या आक्रमणाच्या प्रवृत्तीतून सावरण्यासाठी आपल्याला आता खंबीर बनले पाहिजे. देशहिताच्या, संरक्षणाच्या आड कोणतेही राजकारण येता कामा नये. तालिबानी, पाकिस्तानी प्रवृत्तीला पोषक, अशी कोणतीही वक्तव्ये विरोधकांकडून होणार नाहीत याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: