भारतातील कोरोना महामारीचा अंत जवळ आला आहे असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी बुधवारी वर्तवला. ही तशी समाधानाची बाब असली, तरी कोरोनाची महामारी, येणाºया लाटा, आकडेवारीत होत असलेला चढउतार, वेगवेगळ्या येणाºया बातम्या, लसीकरणाबाबत येणारी वक्तव्ये पाहता नक्की काहीच अंदाज काढता येत नाही. एकप्रकारचा हा खेळ चालवला आहे का, असे वाटल्याशिवाय राहात नाही.
एकीकडे देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी समाधानाची बातमी होती. ती म्हणजे सोमवारी गेल्या १६० दिवसांतील सर्वांत कमी रुग्ण देशात आढळले. रविवारच्या तुलनेत हे प्रमाण १९ टक्क्यांनी कमी होते, परंतु तरीही येत्या आॅक्टोबरपर्यंत देशात कोरोनाची तिसरी लाट धडकेल, असा इशारा देण्यात येत आहे. हा इशारा दुसºया-तिसºया कोणी नव्हे, तर केंद्र सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीनेच दिला आहे. या इशाºयाचे कारण आहे सध्याचा कोरोनाचा आर व्हॅल्यू किंवा रिप्रॉडक्शन रेट. कोणत्याही विषाणूच्या संसर्गाच्या गतीचे हे मोजमाप आहे. एक व्यक्ती किती लोकांना संसर्ग देऊ शकेल त्याचे अनुमान त्यावरून करता येते. देशातील काही राज्यांत जरी सध्या कोरोनाचे प्रमाण घटले असले, तरी केरळसारख्या राज्यांमध्ये विषाणू संसर्गाचे हे प्रमाण वाढतेच आहे. त्यामुळेच येत्या आॅक्टोबरपर्यंत तिसरी लाट धडकेल असा इशारा देत तज्ज्ञांनी सरकारला सावध केलेले आहे. त्याचवेळी सौम्या स्वामीनाथन यांनी महामारी संपत आल्याचे संकेत दिले आहेत.
पण आरोग्य विभागाने दिलेल्या इशाºयानुसार, येणाºया तिसºया लाटेचा धोका मुलांना अधिक संभवतो हे सरकारने यापूर्वीच सूचित केलेले आहे. याचे मुख्य कारण मुलांचे लसीकरण अद्याप झालेले नाही, परंतु याचा अर्थ तिसºया लाटेत केवळ मुलेच बाधित होतील असे बिल्कूल नाही, परंतु लसीकरण न झालेल्या मुलांचे आपल्या देशातील प्रमाण मोठे असल्याने त्यांना होऊ शकणाºया संभाव्य संसर्गाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक पूर्वतयारी करण्यास केंद्राने सर्व राज्यांना सांगितले आहे. देशातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत बालरोग तज्ज्ञांची ८३ टक्के, तर सामाजिक आरोग्य केंद्रांत ६३ टक्के कमी असल्याची सरकारचीच आकडेवारी आहे. या परिस्थितीत मुलांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज करणे आव्हानात्मक राहणार आहे. त्यामुळेच सरकारने त्यासंदर्भात युद्धपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. आकडेवारी कमी होत असताना जोरदार प्रयत्न केले, तर महामारीचा अंत होणे शक्य आहे. त्याचबरोबर चिंतेची बाब म्हणजे अफगाणिस्तानातून आलेल्या नागरिकांपैकी १६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा स्थलांतरित नागरिकांपासून होणारा प्रसार रोखणे हे फार मोठे आव्हान आहे. त्याचबरोबर बुधवारी काही वृत्तवाहिन्यांवर कोव्हिशिल्ड या लसीबाबत वृत्त प्रसारित केले. अशी वृत्तं का प्रसारित केली जातात याचे संशोधन करण्याची गरज आहे. ते वृत्त म्हणजे कोव्हिशिल्ड लसीचा परिणाम सहा महिन्यांपेक्षा जास्त राहात नाही, असे इंग्लंडमधील शास्त्रज्ञांनी म्हटले होते. म्हणजे दुसºया देशाच्या कंपनीच्या लसींना मार्केट मिळवण्यासाठी जनतेला घाबरवून टाकण्यासाठी हे नवे लसींचे वॉर निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का? अशी वृत्ते का दिली जातात? त्यामुळे गैरसमज निर्माण होऊन कोव्हिशिल्ड लसींकडे जनतेने पाठ फिरवली, तर लसीकरणाचा कार्यक्रम आणखी लांबेल आणि ही महामारी रोखणे अवघड होईल. त्यामुळे वृत्तवाहिन्यांवर अशा वृत्तांना बंदी घालून गैरसमज पसरवणारी वृत्ते पसरवण्यास बंदी घातली, तर या रोगाचा प्रसारही कमी होईल.
केंद्राने तिसºया लाटेसाठी सज्ज रहा, आॅक्सिजन बेडची सुसज्जता ठेवा, असे आदेश मागच्याच आठवड्यात दिलेले आहेत. लाट येवो अथवा न येवो आपल्याला सज्ज राहावेच लागेल, पण त्याचवेळी गैरसमज पसरवणाºया बातम्या बाहेर येणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे. मुलांसाठी रुग्णवाहिका, डॉक्टर, व्हेंटिलेटर आदींची सज्जता करण्याबरोबरच कोविड वॉर्डांत मुलांना भरती करावे लागले, तर त्यांच्यासोबत राहण्यासाठी पालकांची व्यवस्था करण्यापर्यंत असंख्य सूचना केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने केलेल्या आहेत. त्यादृष्टीने राज्य सरकारनेही तयारी केलेली आहे, पण लसीकरणाचा वेग आता वाढवला पाहिजे आणि कोव्हिशिल्डच्या दुसºया लसींचे अंतर कमी केले पाहिजे.
लसीकरणाच्या बाबतीत भारत अजूनही जगापेक्षा खूप मागे आहे. केवळ नऊ टक्के लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. अमेरिकेत हे प्रमाण ५२ टक्के आहे. मुलांच्या लसीकरणासंदर्भात सध्या केवळ झायडस कॅडिलाची लस वगळता मुलांसाठी अन्य लसी उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत तिसरी लाट धडकली, तर काय हाहाकार उडेल याची कल्पनाही करवत नाही.
सध्या कोरोनाच्या वुहानमधून आलेल्या मूळ विषाणूपेक्षा डेल्टा विषाणूच जगभरात धुमाकूळ घालत असल्याचे दिसते. वुहान विषाणूच्या संसर्गापेक्षा डेल्टाच्या संसर्गाचे प्रमाण दुप्पट आहे. तिसºया लाटेमध्ये हा विषाणू आणखी कोणते नवे रूप घेऊन येईल हे सांगता येत नाही. त्यात मुलांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला, तर तो इतर मुलांत फैलावण्याचे प्रमाण फार मोठे असेल, कारण मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझर वगैरेंबाबत मुले अनभिज्ञ असतात. त्यामुळे तिसºया लाटेचे हे आव्हान किती मोठे असेल त्याचा अंदाज सरकारने बांधला पाहिजे आणि त्या दृष्टीने सज्जता केली पाहिजे.
राज्य सरकारने केंद्राच्या तज्ज्ञ समितीचा इशारा गांभीर्याने घेऊन युद्धपातळीवर कोणकोणते प्रयत्न केले आहेत आणि येणाºया काळात केले जातील त्याचा तपशील द्यावा आणि जनतेला आश्वस्त करावे. तिसरी लाट आली, तर रुग्णालये अपुरी पडतील, असा इशारा केंद्रानेच दिलेला आहे. त्यासाठी होलिस्टिक होम केअर मॉडेल म्हणजे घरच्या घरी उपचार व्यवस्था निर्माण करा, असे तज्ज्ञांनी सुचवले आहे. त्यासाठी नेमके काय केले पाहिजे याचेही मार्गदर्शन होणे गरजेचे आहे, पण परस्परविरोधी बातम्या, अफवा, वेगळी भूमिका या नादात कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे.