मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०२१

अभ्यासाचा अभाव


लोकसभेत अर्थसंकल्प आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधी यांनी आपली अपरिपक्वता पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली. कसलाही अभ्यास न करता वेड्यासारखे आरोप करत ‘हम दो हमारे दो’वरून जे भाषण केले ते अक्षरश: हास्यास्पद होते. अर्थसंकल्पावर बोला असे वारंवार अध्यक्ष सांगत असताना मी फौंडेशन करतो आहे. नंतर अर्थसंकल्पावर येणार आहे. असे म्हणत मोदींवर टीका केली आणि मी अर्थसंकल्पावर बोलणार नाही, असे बोलून भाषण थांबवले. यातून कसलाही अभ्यास न करता राहुल गांधी कोणीतरी लिहून दिलेली टीप वाचतात हे दिसून आले. अर्थसंकल्पावर बोलायला सांगितलं जाईल हे त्या स्क्रीफ्ट रायटरला माहीत नसल्याने त्याने फक्त ‘हम दो हमारे दो’चा मु्द्दा दिला आणि राहुल गांधी त्यातच फसले.

मग शेतकरी कायदे रद्द करा म्हणताना हे शेतकरी कायदे केले तर व्यापारी मरतील, छोटे दुकानदार मरतील, दलाल, कामगार मरतील असे सांगितले, पण कुठेही शेतकºयांचे याने नुकसान होईल हे त्यांना सांगता आले नाही. यातच स्पष्ट होते आहे की या कायद्याने शेतकºयांचे नुकसान होणार नाही, हीच काँग्रेसची कबुली आहे. पण अर्थसंकल्प आणि कृषी कायदे यावर न बोलता पुन्हा नोटबंदी, जीएसटी यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली. अत्यंत असंबद्ध असलेले हे भाषण काँग्रेसला कधीच वाचवू शकणार नाही याची साक्ष होती.


पंतप्रधानांच्या भाषणाला उत्तर देण्याची हिंमत नव्हती. काँग्रेस पक्षाने चिडण्याचे काही कारण नव्हते. कारण, मोदी जे बोलले त्यात शंभर टक्के सत्य आहे. कृषी कायद्यांच्या संदर्भात पंतप्रधान जे बोलले, त्यामुळे काँग्रेसचे पितळ उघडे पडले आहे. कृषी कायद्यांबाबत काँग्रेसची दुटप्पी भूमिका जनतेपुढे उघडी पडल्याने लोक तसेही काँग्रेसवर नाराज आहेत. देशात सर्वाधिक काळ म्हणजे जवळपास सहा दशके काँग्रेसचीच सत्ता होती. या सहा दशकांमध्ये काँग्रेसने शेतक‍ºयांसाठी काहीही केले नाही. दलालांच्या झोळ्या कशा भरतील आणि त्या झोळ्यांमधील पैसा आपल्याला कसा मिळेल, यासाठीच कायम प्रयत्नरत राहिलेल्या काँग्रेसी नेत्यांना, खरे पाहता शेतकरी आणि त्यांच्या हिताबद्दल काहीही बोलण्याचा नैतिक अधिकारच राहिलेला नाही. शिवाय, आज मोदी सरकारने जे कृषी कायदे केले आहेत, ते कायदे करण्याची तयारी तर काँग्रेसचे सरकार असतानाही झाली होती, पण काँग्रेस हिंमत दाखवू शकली नाही. कारण, काँग्रेसला स्वत:चे हितसंबंध जपायचे होते. शेतकरी समृ्द्ध झाला, शहाणा झाला, तर तो आपल्याला स्वीकारणार नाही, या भीतीपोटी चर्चा न करण्याचा डाव काँग्रेस आखत आहे, पण शेतकºयांपेक्षा राहुल गांधी फक्त जीएसटी, नोटबंदी, अदानी, अंबानी यावर बोलले. त्यापेक्षा या कायद्यात काय त्रुटी आहेत हे त्यांनी सांगितले असते, तर त्यांची अभ्यासपूर्णता दिसली असती, पण ते सांगण्याची हिंमत झाली नाही. त्यामुळे ते बरळत राहिले. यामुळे काँग्रेस कार्यकर्ते, नेतेही वैतागले. अजून किती पक्षाचे नुकसान राहुल गांधी करणार आहेत असा विचार या नेत्यांच्या मनात डोकावला नसेल तरच आश्चर्य म्हणावे लागेल.

एक मोठी लॉबी नाराज झाली तर आपल्याला परवडणार नाही, हा काँग्रेसचा होरा होता. मतपेटीवर डोळा ठेवूनच काँग्रेस पक्षाने आजवरचे सगळे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे इच्छा असूनही काँग्रेसने शेतक‍ºयांसाठी काही केले नाही. काँग्रेसने तर देशावर अनिर्बंध सत्ता केली आहे. सुरुवातीच्या २५-३० वर्षांमध्ये तर काँग्रेसला विरोध करण्यासाठी प्रबळ विरोधी पक्षही नव्हता! त्यामुळे मनात येईल तसे निर्णय काँग्रेसच्या सरकारांनी घेतलेत आणि ते अंमलातही आणलेत. आज भाजपच्या नेतृत्वातील सरकार केंद्रात असताना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी धडाकेबाज निर्णय घेत असताना, काँग्रेस पक्ष त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहे, हे दुर्दैवी आहे. परवा पंतप्रधान लोकसभेत बोलत असताना काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी हे वारंवार अडथळे आणत होते. पंतप्रधान हा सभागृहाचा नेता असतो आणि नेता बोलत असताना खरे म्हणजे कुणीही त्यात व्यत्यय आणू नये, असा संकेत आहे. पण, सत्ता गेल्याने पिसाळलेले काँग्रेसचे नेते असे सगळे संकेत पायदळी तुडवून वागत आहेत आणि मोदी सरकारला शेतकरीविरोधी दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. पंतप्रधानांचे भाषण थेट प्रक्षेपणातून जनता, शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचले तर आपला रडीचा डाव उघडा होईल या भीतीने काँग्रेसने मोदींच्या भाषणात अडथळे आणले, पण मोदींनी आपले भाषण केले आणि काँग्रेसचा बुरखा फाडला. मोदींनी भाषण केल्यामुळे बिथरलेल्या राहुल गांधींना नेमके काय बोलावे, काय करावे हे सुचेनासे झाले. शेतकºयांबद्दल काँग्रेसचे असलेले प्रेम खोटे आहे हे समोर आले, तर जनता काँग्रेसला दारात उभी करणार नाही याची भीती त्यांना वाटली. त्यामुळे आंदोलनात मृत पावलेल्या शेतकºयांना सरकारने श्रद्धांजली का वाहिली नाही, असा सवाल केला आणि लगेच सभागृहात श्रद्धांजली सुरू केली. हा काय त्यांना पोरखेळ वाटला की नौटंकी? कोणालाही श्रद्धांजली वाहताना काही रीत, नियम असतात. मनात आले की श्रद्धांजली वाहिली जात नाही, पण लोकशाहीचे, सभागृहाचे कसलेही संकेत माहिती नसलेल्या या पोरकट नेत्याचे प्रताप संपूर्ण देशाने पाहून कीव केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: