बुधवार, ३ फेब्रुवारी, २०२१

चिथावणीखोरांना आवरा



दोन दिवसांपूर्वी पुण्यात एल्गार परिषद झाली. त्यांच्या ठरलेल्या अजेंड्याप्रमाणे भडकावू भाषणे केली आणि जातीय, धार्मिक तेढ निर्माण करायचा प्रयत्न या परिषदेतून झाला. या परिषदेत सीएए कायद्याविरोधात दिल्लीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी अटक झालेला अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजील उस्मानी भडकावू भाषणे देण्यासाठी आला होता. हिंदू धर्माबद्दल अतिशय वाईट भाषेत तो बोलला. हिंदू लोक सडलेले आहेत म्हणताना त्याला लाज वाटली नाही आणि तिथे उपस्थित असणारे पुरोगामी लोक त्याला टाळ्या वाजवून दाद देत होते. आज अशीच टीका जर मुस्लिम धर्मावर केली असती, तर मुस्लिम समाज पेटून उठला असता. कोणताही समाज पेटून उठला असता; पण आपण हिंदू सहिष्णू आहोत म्हणूनच तुम्हाला बोलता येते ते हे त्या शरजील उस्मानीने लक्षात घेतले पाहिजे. केवळ हिंदूंचा द्वेष करण्यासाठी जमणे हाच एल्गार परिषदेचा उद्देश होता का? हिंदू द्वेष करणे, जातीय तेढ निर्माण करणे यासाठीच ही एल्गार परिषद असेल, तर त्यावर बंदी घालावी लागेल.

हा शरजील उस्मानी हिंदू लोकांना सडलेले म्हणतो; पण त्याचा मेंदू सडला आहे, म्हणूनच तो असे बोलत आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्याला जे वाटते तसे महाराष्ट्रात काही घडत नाही. त्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामीपण शिकवायला या बदमाश शरजील उस्मानीची गरज नाही. महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम ऐक्य आहे. इथे सगळे एकोप्याने राहतात. त्यामुळे दंगली घडवण्यासाठी या एल्गार परिषदेच्या माध्यमातून शरजील उस्मानीने येण्याची गरज नाही. खरं तर मुसलमान भारतात जेवढा सुरक्षित आणि सुखी आहे तेवढा पाकिस्तानात किंवा कोणत्याही मुस्लिम राष्ट्रात नाही. पण इथं राहून हिंदूंवर घाणेरडी टीका करण्याचे या शरजीलचे काम म्हणजे खाल्ल्या ताटात घाण करण्याचा प्रकार आहे. अर्थात या लोकांची तीच परंपरा आहे, हा भाग वेगळा. पण परकीय शक्तींच्या जोरावर जगणाºयांनी भारताला शहाणपण शिकवू नये. विशेष म्हणजे त्याचे भाषण थेट प्रक्षेपित होत असताना, सगळ्या वाहिन्या दाखवत असताना आमच्या सरकारला त्याचे वैषम्य वाटत नाही. एका धर्माबद्दल खुलेआम वाईट बोलत असताना गृहमंत्री अज्ञान असल्यासारखे वागतात. तो काय बोलला हे तपासून पहावे लागेल, त्याशिवाय कारवाई करता येणार नाही म्हणतात. टीव्हीवर दाखवले, त्याच्या क्लिपही व्हायरल झाल्या. आता काय गृहमंत्री पाहणार आहेत? हिंदू समाज शांत आहे, सभ्य आहे म्हणून कोणीही काहीही गरळ ओकावी? कसले पुरावे हवे आहेत गृहमंत्र्यांना? हिंदू धर्माबद्दल अपशब्द वापरले त्याचाही गृहमंत्र्यांना अभिमान वाटला का? शिवसेनेकडून सध्या तरी अपेक्षा करता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. कारण दोन पक्षांच्या कुबड्या घेऊन सरकार टिकवताना कसरत करताना हिंदू धर्माचा कितीही अपमान झाला, तरी सहन करण्याची ताकद शिवसेनेत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आपली सहिष्णूता जपतील आणि त्यात धन्यता मानतील; पण आज महाराष्ट्रात मुसलमान समाज सन्मानाने जगतो आहे, प्रत्येक क्षेत्रात तो आहे, इथे मोठा रोजगार, व्यापार तो समाज करत आहे. इथल्या संस्कृतीचा तो भाग बनलेला असताना मुसलमानांचा हिंदू द्वेष करतात, असे खोटे वक्तव्य करून हिंदू समाजाला सडलेला म्हणणे हे कितपत योग्य आहे? मंदिरासारख्या पवित्र स्थळावर पूजेचे साहित्य विकण्यापासून ते मदिरालयापर्यंत सगळे धंदे मुसलमान हिंदूंच्या मांडीला मांडी लावून इथे करतो. मोबाइल शॉप, सलून पार्लर असे अत्यावश्यक सेवांचे व्यवसाय, भाजी मंडई सर्व काही त्यांच्या हातात असताना हिंदूंकडून मुसलमानांना त्रास होतो, असे बोलण्याचा खोटारडेपणा एल्गार परिषदेच्या व्यासपीठावरून कसा काय केला जातो? ही द्वेषाची भावना काढून टाकण्याची गरज आहे. अशा द्वेष पसरवणाºया अतिरेक्यांवर कारवाई झालीच पाहिजे. माथी भडकवणारे हेच खरे दहशतवादी आहेत. छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन महाराष्ट्रात सरकार चालवणाºयांनी लक्षात घेतले पाहिजे की, महाराजांनी सर्वात प्रथम स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त केला होता. या सरकारने ते करून दाखवले पाहिजे. माथी भडकवणारी, दंगल करणारी, चिथावणीखोर वक्तव्ये करणाºयांवर कारवाई झालीच पाहिजे.


अर्थात या एल्गार परिषदेत जमलेले सगळेच लोक पुरोगामीपणाचा बुरखा घातलेले ढोंगी आहेत. एल्गार परिषदेचा उद्देशच दंगली घडवणे हा असल्याने त्यांचा उद्देश साध्य झाला आहे. लोकांना भडकवण्याचे काम या परिषदेने केले आहे; पण तरीही महाराष्ट्र अशा चिथावणीखोर लोकांच्या वक्तव्यावर फसला नाही. सर्वांनी शांतपणे ते ऐकून घेतले. कारण इथल्या मुसलमानांना माहिती आहे की, इथे आम्ही सुरक्षित आहोत. उस्मानीने लक्षात घेतले पाहिजे की, हेच वक्तव्य पाकिस्तानात बोलून दाखव. तिथे हिंदूंवर होत अससलेल्या अन्यायाबाबत बोल. तर तुला मानवता समजली म्हणता येईल. शरजील हा एक अत्यंत धर्मांध असून, अजमल कसाबपेक्षाही हा खतरनाक आहे. अजमल कसाबने गोळीबार करून माणसांना थेट मारले; पण या विषारी सापाने स्लो पॉयझनिंग करायला सुरुवात केली आहे. विष पेरण्याचे काम सुरू केले आहे. त्या विषारी सापाला वेळीच ठेचण्याची गरज आहे; पण आमचे सरकारच हातपाय गळून बसले असेल, तर काय करणार? गृहमंत्र्यांना एवढे मोठे वक्तव्य दिसत नाही. त्यामुळे या एल्गार परिषदेच्या माध्यमातून, त्या परिषदेला परवानगी देऊन सरकारनेच हिंदू धर्मियांचा अपमान केला आहे. त्यामुळे सडलेल्या समस्त हिंदू बांधवांनी हिंदुत्व सोडलेल्यांपासून सावध राहण्याची हीच ती वेळ आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: