चीनने कोरोनाचा व्हायरस जगभर सोडून जगातील सर्वात मोठी शहरे आहेत त्या शहरांना, महानगरांना जेरीस आणले. जगातील मोठी बाजारपेट असलेली शहरे बंद पाडून त्या देशांच्या, महासत्तांच्या अर्थव्यवस्थेवर घाला घातला आहे. त्यामुळे खरे तर चीनला जाागतीक पातळीवरून धडा शिकवायची आता गरज निर्माण झालेली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क म्हणजे केवळ अमेरिकेचीच नाही तर जगाची आर्थिक राजधानी. न्यूयॉर्कचे अनुकरण करूनच मुंबई 24 ठेवण्याची कल्पना आपल्या राज्यकर्त्यांना सुचते. कारण न्यूयॉर्क कधीच थांबत नाही तसेच मुंबई थांबता कामा नये अशी आपली इच्छा आहे. कारण भारताला महासत्ता बनायचे आहे. पण याच न्यूयॉर्कला बंद पाडण्याचे काम कोरोनाने अर्थात चीनने केले. विशेष म्हणजे श्रीमंतांचे शहर अशी जगभर या शहराची ख्याती होती. पण न्यू यॉर्कच्या सर्वात श्रीमंत भागातील 40 टक्के लोकांनी आता हे शहर सोडले आहे. अमेरिकेला कोरोनाचा तडाखा बसला. त्यात सर्वाधिक तडाखा न्यू यॉर्कला बसला आणि यातही ज्या भागात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसला त्यातील 40 टक्के लोकांनी 1 मार्च ते 1 मे या काळात न्यू यॉर्कचा तात्पुरता का होईना निरोप घेतला. बडे बडे शहरोंमें हादसे होते है, हे म्हणणे सोपे असते पण हे हादसे कोण घडवते आहे, हादरे कोण देत आहे त्याचा बंदोबस्त करण्याचीही गरज आहे. आज जगभरातील सगळ्या मोठ्या शहरांनाचाच या कोरोनाचा विळखा बसला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. कोरोनाचा 90 टक्के तडाखा श्रीमंत- प्रगत राष्ट्रांना बसला. युरोप हा जगातील सर्वात प्रगत व आधुनिक भाग मानला जातो. दक्षिण इटलीतील लोंबार्डी प्रांतातील आरोग्य सेवा ही सार्या युरोपमधील सर्वात चांगली आरोग्य सेवा मानली जाते आणि कोरोनाचा सर्वात मोठा तडाखा बसला तो याच लोंबार्डी प्रांताला! ही श्रीमंत शहरे आणि पर्यायाने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे काम चीनी कोरोनाने केलेले आहे. आज कोरोनामुळे दगावलेल्यांचे प्रमाण या श्रीमंत देशांमध्ये फार जास्त आहे. इटलीत ते 18 टक्के होते. अमेरिकेत 6 टक्के, ब्रिटन 12 टक्के, फ्रान्स 14 टक्के असे हे प्रमाण आहे अशी आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे.आज भारतात हा दर सध्या 3.3 टक्के आहे. पण तो लोकसंख्येच्या प्रमाणामुळे कमी दिसत आहे. मृतांचा आकडा वाढतोच आहे आणि बाधितांचा आकडा लाखांच्यापुढे गेला आहे. त्यामुळेच आशियाई देशांमधील कोरोना मृतांचा दर हा श्रीमंत राष्ट्रांपेक्षा कमी राहिला आहे, हे मान्य केले जात आहे पण चीनचा शेजारी असल्यामुळे भारतावर कमी परिणाम होईल याची खबरदारी चीनने घेतलेली असू शकते. पण हा आर्थिक महासत्तांवर, महानगरांवर झालेला फार मोठा हल्ला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. कोरोनाने श्रीमंत राष्ट्रांना जसा तडाखा दिला, तसाच तडाखा त्याने देशा-देशांतील आर्थिक राजधान्यांना दिला. अमेरिकेत सर्वाधिक तडाखा न्यू यॉर्कला बसला. ब्रिटनच्या पाच प्रांतांपैकी कोरोनाचा सर्वाधिक प्रसार इंग्लंडमध्ये झाला. त्यातही लंडन आघाडीवर होते. इंग्लंडच्या एकूण केसेसपैकी 25 टक्के केसेस एकट्या लंडनमध्ये आहेत. लंडन ही ब्रिटनची राजधानी व आर्थिक राजधानी दोन्ही आहे. मागील काही दिवसांत लंडनमधील दररोजच्या केसेस 30 च्या आत आल्या आहेत. युरोपियन राष्ट्रांच्या तुलनेत जपानने यावर नियंत्रण मिळवले. कारण जपानने दुसर्या महायुद्धानंतर जागतीक बाजारपेठ काबीज करून इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, कॅमेरे, ट्रांजीस्टरने जगावर राज्य केले. त्यातून जपानमध्येही अनेक प्रगत अशी शहरे निर्माण झाली होती. पण अणूबाँम्बच्या मार्यातून उभे राहिलेल्या या देशाला कोरोनाचे संकट संपवू शकणार नव्हतेच. कारण त्यांची जीद्दच आगळी असते. ते कोणावर अवलंबून रहात नाहीत. म्हणजे कोरोनाची पहिली केस आढळताच एक आठवड्याच्या आतच जपानने कोरोनाच्या विरोधात कारवाई सुरू केली. नंतर सार्या देशात आणिबाणी लावण्यात आली. आता ही आणिबाणी मागे घेण्यात आली असली, तरी राजधानी टोकियोतील आणिबाणी कायम ठेवण्यात आली आहे. कारण, कोरोनाचा सर्वाधिक फटका टोकियोला बसला. तेथील स्थिती अद्याप सामान्य झालेली नाही. टोकियो हे राजधानीचे शहर असतानाच, ते जपानचे सर्वात मोठे व्यावसायिक केंद्रही आहे. पण जगभरातील सर्वात श्रीमंत शहरांवर चीनने केलेला हा हल्ला होता हे इथेही अधोरेखीत होते. इटलीला कोरोनाचा जो तडाखा बसला त्याचा सर्वाधिक मार मिलान या शहराला बसला. रोम ही इटलीची राजधानी असली, तरी मिलान शहर हे देशाची आर्थिक व फॅशनची राजधानी मानले जाते. मिलानच्या तुलनेत रोम शहराला फार तडाखा बसलेला नाही. त्यामुळे प्रत्येक प्रगत देशातील महत्वाची शहरेच कोरोनामुळे कशी काय बाधीत झाली याचा जगाने विचार केला पाहिजे. लोकसंख्या हा एकमेव फॅक्टर मानता येणार नाही. तो पसरवण्यासाठी आणि आर्थिक कोंडी करण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत काय याचाच विचार केला पाहिजे. मॉस्को ही रशियाची राजकीय व आर्थिक राजधानी आहे. मॉस्कोत कोरोनाचा कहर सुरू आहे. एकट्या मॉस्को शहरातच दररोज काही हजार केसेस सापडत आहेत. साधारणपणे कोणत्याही रोगाची, साथीची सुरूवात किंवा प्रसार हा गरीबीत, झोपडपट्टीत, सर्वसामान्यांमध्ये होतो असे आजवरजचे चित्र. पण कोरोनाने श्रीमंतांना टार्गेट केले आहे. मोठ्यहा शहरांना काबीज केले आहे. आर्थिक राजधान्या आणि महानगरांवर लक्ष केल्याचे दिसून येते आहे. जगातील आर्थिक राजधान्यांना कोरोनाने प्रभावित करण्याचा पॅटर्न भारतातही दिसून येत आहे. मुंबई, अहमदाबाद, दिल्ली ही त्याची उदाहरणे आहेत.आंतरराष्ट्रीय प्रवासी हे त्याचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. भारतात कोरोनाची पहिली केस सापडली ती केरळमध्ये! आणि हा रुग्ण परदेशातून आला होता. सार्या जगात हे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणे युरोपमधील जर्मनी हा एक असा देश राहिला, जेथे कोरोनाने कमी बळी घेतले. जर्मनीची आरोग्यव्यवस्था अतिशय चांगली असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे तेथे मृतांचे प्रमाण कमी राहिले की याचे दुसरे काही कारण आहे हे पहावे लागेल. पण चीनचे लक्ष जर्मनी नसावा असे दिसते. जर्मनीत आलेला कोरोना चीनमधून नाही, तर रुमानियातून आल्याचे निर्दशनास आले आहे. जर्मनीत चालणार्या कत्तलखान्यांमध्ये रुमानियाचे मजूर कामास आहेत. त्यांच्यासोबत हा कोरोना तेथे आल्याचे समोर आले आहे. मात्र, रुमानियात कोरोना कसा पोहोचला, हे एक कोडे आहे. पण चीनने हस्ते परहस्त हा रोग मोठ्या श्रीमंत शहरात पोहोचवला हे नक्की.कोरोनाच्या बाबतीत, सीएफआरप्रमाणेच आणखी एक आकडा महत्त्वाचा ठरत आहे. तो आहे आर आर म्हणजे रिप्रॉडक्शन रेट! आर आर एकापेक्षा वाढणे हा चिंतेचा विषय मानले जाते. महानगरात किंवा अशा श्रीमंत शहरात रोजगार आणि अन्य कारणाने लोकसंख्या जास्त असणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच इथे प्रसार मोठ्या प्रमाणावर होईल याचे नियोजन हा रोग पसरवताना चीनने केले असण्याची शक्यताच अधिक आहे. याचे कारण जेव्हा 100 कोरोनाबाधित आणखी 100 लोकांना कोरोनाचा संसर्ग करतात तेव्हा कोरोना वाढीचा दर म्हणजे आर आर एक असल्याचे मानले जाते. आर आर 1.12 झाल्यास, याचा अर्थ 100 कोरोनाबाधित 112 लोकांना संसर्ग करीत आहेत. चीनच्या वुहानमध्ये कोरोनाची साथ सुरू असताना तेथील आर आर 5.6 टक्के होता. म्हणजे 100 कोरोना रुग्ण 560 लोकांना कोरोनाचा संसर्ग करीत होते. आर आर एकपेक्षा कमी आणणे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. हा दर 0.90 झाल्यास, 100 रुग्ण 90 लोकांना कोरोनाचा संसर्ग करीत असतात. नंतर हे प्रमाण आणखी कमी होत जाते. म्हणजे तो कसा पसरायचा, कुठे किती प्रमाणात पसरवायचा याचेही गणित चीनकडे असू शकते. चीनने हा जगातील महानगरांवर केलेला फार मोठा हल्ला आहे हे जगाने आता उघडपणे स्विकारले पाहिजे आणि चीनला धडा शिकवला पाहिजे. चीनमध्ये जन्माला आलेल्या या रोगावर चीनने तातडीने नियंत्रण मिळवले आहे. काही दिवसांपूर्वी चीनने एक सरकारी सूचना जारी करून, राजधानी बीजिंगमध्ये आता मास्क लावण्याची गरज नाही, असे जाहीर केले. अशाप्रकारे बीजिंग आता जगातील पहिले मास्कमुक्त शहर झाले आहे. वुहान शहरात कोरोनाच्या काही केसेस सापडताच, चीनने या शहरातील संपूर्ण एक कोटी 10 लाख जनतेची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील 50 लाख लोकसंख्येची चाचणी पूर्ण झाली आहे. दररोज 10 लाख चाचण्या करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. प्रत्यक्षात ही कोरोना चाचणी आहे की कोरोना लस टोचण्याचा कार्यक्रम? असा प्रश्न अनेक देशांना पडला आहे. चीन ज्या आत्मविश्वासाने वाटचाल करीत आहे, त्यावरून तरी चीनला कोरोनाचा उपचार वा लस सापडली आहे. त्यामुळे जगावर हल्ला करीत राहिलेल्या कोरोनाकडे दुर्लक्ष करून चीन आपल्या साम्राज्याकडेच आता लक्ष देणार हे नक्की.
रविवार, ३१ मे, २०२०
महानगरांना जेरीस आणले
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा