रविवार, ३१ मे, २०२०
खबरदारीची आवश्यकता
कोरोनाविरुद्धच्या लढाईतील चौथा टप्पा सुरू आहे. हा टप्पा अखेरचा असल्याचे मानायला हरकत नाही. 31 मे पर्यंत सरकारने लॉकडाऊन चारची घोषणा केली आहे. हे करताना सरकारने बर्याच बाबतीत शिथिलता दिली आहे. 22 तारखेपासून तर अनेकजण मोकाट सुटले आहेत आणि पुन्हा गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळेच जरी सवलत मिळाली असली, मोकळीक मिळाली असली तरी थोडा संयम बाळगला पाहिजे आणि गरज असेल तरच बाहेर पडले पाहिजे हे समजले पाहिजे. नाहीतर पुन्हा लॉकडाउन होण्याची वेळ येईल. 1 जूनपासून सगळे सुरू होईल अशी अपेक्षा करायची असेल तर आज संयम फार महत्वाचा आहे. लॉकडाऊन एक आणि लॉकडाऊन दोनच्या तुलनेत आता बर्यापैकी व्यवहार सुरळीत व्हायला हरकत नाही. ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्येच नाही, तर रेड झोनमधील दैनंदिन कामकाज सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. आता रेड आणि नॉनरेड झोन असे प्रकार केल्यामुळे सवलती वाढल्या आहेत. अर्थात याचा अर्थ, कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकली वा कोरोनावर मात केली, असे अजिबात नाही. कोरोनाची लढाई दीर्घकाळ चालणारी आहे. जोपर्यंत कोरोनावर प्रभावी औषध वा लस येत नाही, तोपर्यंत आपण कोरोनावर मात करू शकत नाही. जोवर आपण कोरोनावर मात करू शकणार नाही, तोवर कोरोना आपल्यावर निर्णायक मात करणार नाही, याची काळजी सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आपल्यावरची जबाबदारी वाढली आहे.लॉकडाऊन मध्ये सरकारने काही बाबतीत शिथिलता दिली असली, तरी ती अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प होऊ नये म्हणून. लॉकडाऊन एक आणि लॉकडाऊन दोनमुळे देशातील अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. जवळपास 40 दिवस देशातील आर्थिक घडामोडी पूर्णपणे बंद होत्या. एवढा काळ आर्थिक चक्र पूर्णपणे ठप्प होणे कोणत्याच देशाला परवडण्यासारखे नाही. त्यामुळे किमान ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेच्या चक्राला किंचित गती देण्यासाठी सरकारने काही प्रमाणात व्यापार आणि उद्योग सुरू करायला परवानगी दिली आहे. अत्यावश्यक सरकारी सेवांची कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासोबत अत्यावश्यक नसलेल्या सरकारी सेवांसोबत खाजगी क्षेत्रातील कार्यालये 33 टक्के उपस्थितीसह सुरू करण्याची अनुमती सरकारने दिली आहे. याशिवाय अत्यावश्यक आणि अत्यावश्यक नसलेली दुकानेही काही मर्यादांसह सुरू करण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊन तीनच्या पहिल्याच दिवशी लोकांनी रस्त्यांवर गर्दी केली. जनतेच्या सोयीसाठी हा निर्णय सरकारने घेतला आहे. जनतेने याचा फायदा घ्यायला हरकत नाही, पण गैरफायदा घेऊ नये. रस्त्यावर येताना सर्वांनीच भौतिक दूरता ठेवण्याची गरज आहे. पण, गेल्या दोन दिवसात देशाच्या सर्वच भागात रस्त्यावर झालेली गर्दी आणि त्यात भौतिक दूरतेचा उडवण्यात आलेला फज्जा, हा चिंतेचा विषय आहे. कदाचित रमजान ईदमुळेे लोक बाहेरड पडत असतील पण गर्दी करताना भान जपणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळी पोलिसांनी दंडा उगारल्यावरच नियम पाळण्याची लागलेली सवय लोकांनी सोडण्याची गरज आहे. सामाजिक जाणिवेतून स्वत:हून नेहमीच नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे, कोरोनासारख्या संकटाच्या काळात तर त्याची नितान्त गरज आहे. देशाची अर्थव्यवस्था वाचवणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच वा त्यापेक्षाही जास्त देशातील जनतेचा जीव वाचवणे आवश्यक आहे. त्यामुळे लॉकडाऊन तीनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देताना सरकारने घाई तर केली नाही, असे वाटू शकते. आधीच्या लॉकडाऊनमध्ये कडक निर्बंध असतानाही लोक रस्त्यावर येत होते. आता तर शिथिलता म्हटल्यावर लोकांचा उत्साह ओसंडून वाहू शकतो. सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत कामाच्या निमित्ताने बाहेर जाण्याची परवानगी सरकारने दिली असली, तरी बाहेर जाण्याची आपल्यावर कोणतीच सक्ती नाही, याची जाणीव जनतेने ठेवण्याची गरज आहे. खूप आवश्यक असेल तरच जनतेने घराबाहेर पडावे, आवश्यक नसेल तर घराबाहेर पडणे टाळले पाहिजे. यात सरकारचे नाही, तर जनतेचेच हित आहे. सुदैवाने अन्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे कोरोनाच्या संक्रमितांची तसेच कोरोनामुळे मृत्यमुखी पडलेल्यांची संख्या खूप कमी आहे. ही बाब आपल्यासाठी दिलासादायक असली, तरी आता कोरोना आपले काही बिघडवू शकत नाही, असा समज करून लॉकडाऊनमधील निर्देशांचे पालन न करणे सगळ्यांसाठीच धोकादायक ठरू शकते. शिथिलता देण्याच्या आपल्या निर्णयाचा सरकारला पश्चात्ताप होणार नाही, याची काळजी जनतेनेच घेतली पाहिजे. कोरोना हा जात-पात-पंथ-भाषा-स्त्री-पुरुष-
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा