मराठीत ग्रामीण भाषेत म्हणी खूप सूचक असतात. त्यापैकीच एक म्हण म्हणजे, अती झालं अन हसू आलं. ही म्हण साधारणपणे प्लेगच्या साथीत आली. गावोगावी लोकांना पत्र यायची. तारा यायच्या. तार आल्यावर माणसं आधीच रडायला लागाचयी. कारण तार आली म्हणजे कोणीतरी गेला असाच समज होता. त्या काळात प्लेगचा आणि त्यामुळे होणार्या मृत्यूचा इतका अतिरेक झाला होता की एखाद्या घरात बातमी यायची, आजोबा गेले. पाठोपाठ आजी गेली. मग, मावशी गेली, काका गेल, अमुक गेला, तमूक गेला. या बातम्या इतक्या पाठोपाठ यायच्या की माणसला रडायलाही डोळ्यात पाणी शिल्लक रहायचं नाही. त्यामुळे दु:ख हे अती झालं की त्याचेही हसू यायला लागते. मग त्याचे थट्टेत रूपांतर होते. मग पोस्टमन आला की आता कोण गेलं? असाच प्रश्न मनात येउन माणसं हसायला लागायची. हा त्या म्हणीचा जन्म आहे म्हणे.हे सांगायचे कारण म्हणजे, आजही तशीच परिस्थिती झालेली आहे. लॉकडाउन, कॉरंटाईन, सोशल डिस्टन्स या शब्दांमुळे माणसांनी इतका चमत्कार घ डवला आहे की ती काहीही करायला लागली आहेत. सण, समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम करू नयेत असे सरकारी आवाहन आहे. मग टीव्हीवर रोज किमान एकदोन तरी बातम्या दाखवल्या जातात. त्यात एक बातमी हमखास असते, ती म्हणजे अमुक एका गावात, कमीत कमी माणसात विवाह समारंभ संपन्न झाला. नवरा बायकोने तोंडाला मास्क बांधून, सोशल डिस्टन्स पाळून लग्न केले. मग त्यांचे ते कसरतीचे फोटो किंवा क्लीप दाखवल्या जातात. कित्येकांनी काठीला हार अडकवून एकमेकांच्या गळ्यात घातले आहेत. कुठल्या ना कुठल्या गावात ही बातमी रोज विविध चॅनेलवर दाखवली जाते. अर्थात वृत्त वाहिन्या या मनोरंजनाचेच काम करत असल्यामुळे त्याकडे तितकेच गांभिर्याने पाहिले जाते. पण यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि हसू येते. ते म्हणजे, सोशल डिस्टन्स ठेवून लग्न करायचे तर इतकी घाई का? हे जोडपे हनीमूनला जाणार नाही ना? घरातही एकांत पाळणार नाही का? मधु इथे तर चंद्र तिथे असे या नूतन परिणीत दांपत्याला ठेवले जाणार आहे का? असं असेल तर बिचार्यांचा कोंडमारा करून त्यांचा मानसिक छळ करण्यात काय अर्थ आहे? लग्न करून काहीच करायचे नसेल आणि सोशल डिस्टन्स पाळायचा असेल तर लॉकडाउनच्या काळात लग्न करण्याचे कारणच काय? लॉकडाउन उठल्यावर करायचे लग्न. पण हे अनाकलनीय असे प्रकार आहेत आणि अती झालं अन हसू आलं असेच प्रकार आहेत. दुसरा प्रकार म्हणजे एका गावात लॉकडाउनच्या काळात एक मयत झाले. पोलीसांनी आदेश दिला, की सोशला डिस्नस्निग महत्वाचे आहे. चार माणसांपेक्षा कोणालाही जाता येणार नाही. आता मयत झालेल्या माणसाचा मुलगा बरोबर येणे आवश्यक आहे. तो हातात मडकं धरेल, पण मग चार खांदेकरी नकोत का? पण वॉच ठेवायला पोलीस लांबवर. तिरडी उचलायला चार आणि पुढे मडकं धरायला वारसदार असणे स्वाभाविक आहे. पण पोलीसांनी अडवले, गाडीत घाला प्रेत, अंत्ययात्रा काढू नका. चौघानीच जायचे. मग त्यातले काही लोक हिकमती होते. त्यांनी लावले पोलीसांनाच कामाला. तिघांना उचलत नाही हो, हे.. तिरडी जड झालीय. जरा लावता का हात? मग काय शासकीय इतमामात प्रेत स्मशानात पोहोचते केले गेले. करणार काय? कोरोना आहे.. लॉकडाउन आहे... सोशल डिस्टन्सिंग आहे. मग घ्या पोलीसांची मदत. मग त्या गावात प्रथाच पडली. त्या दोन महिन्यात जी कोणी गेली त्यांना पोहोचवायला आता पोलीसच बोलवायचे त्यांनाच खांदा द्यायला बोलवायचे. कुणी म्हातारपणामुळे, वृद्धापकाळाने, अपघाताने गेले होते तर कोणी कोरोनामुळेही गेले होते. पण सगळ्यांना खांदा देण्याची वेळ पोलीसांवर आली. कारण सोशला डिस्टन्सींग. खांदा द्यायलाही माणसं नाहीत. करा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. पोलीसांवर अनावश्यक बोजा पडला ना कामाचा. सगळे मनातल्या मनात चडफडत होते. कुठुन हा शिस्तीचा बडगा दाखवायला गेलो अन नसतं लचांड गळ्यात पडलं? त्यामुळे गावातल्या अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळाकडे वर्दी न देता मर्तिकाचे काम करायला लोक पोलीसांनाचा बोलावू लागले. पोलीसांना समजेना आपण नक्की आहोत कोण? याला म्हणतात अती झालं अन हसू आलं. लग्न समारंभ हे सोशल डिस्टस्न ठेउन असले तरी महिलांना नटामुरडायची आवड काही कमी नव्हती. घरातच बसायचे आहे म्हणून महिलावर्ग काही गचाळ राहु शकत नव्हता. ब्युटीपार्लर बंद झाली म्हणून काही नट्टापट्टा करायला कोणालाच बंदी नव्हती. त्यामुळे मॅचिंगच्या साडी, ब्लाउजप्रमाणे मॅचिंगचे मास्कही महिला वापरू लागल्या. सोशल डिस्टन्स असले तरी अनेकांनी चोरून लिमीटेड महिलांना बोलावून चैत्रगौरीची हळदीकुंकवेही केली म्हणे. मग काय, नटून बाहेर पडायची संधी मिळाली. एका सधन घरातल्या महिलेने आमचं घर, वाडा मोठा आहे. त्यामुळे 15 बायकांना एकावेळी हळदीकुंकू देणे आम्हाला अवघड नाही असा तोरा मिरवला. सोशल डिस्टन्स ठेवून महिलाही आल्या. अर्थात त्यामुळे महिलांना कुजबुजणे या जन्मसिद्ध हक्काला तिलांजली द्यावी लागली. पण आपण कसं परफेक्ट मॅचिंग केले आहे हे दाखवताना महिला साडील, पदराला मॅच होणारे मास्क वापरले होते. त्यासाठी जुन्या साड्यांचे काठ, फॉल, खण, ब्लाउज पीस, साडीतील इंटरलॉक करताना कापलेला कोसातला भाग असे तुकडे त्यासाठी वापरून अनेक महिलांनी मॅचिंग केले होते. पण यातून मनुष्य हा समाजप्रिय आहे, सोशल डिस्टन्सिंग ठेवूनही तो सामाजिक एकता राखू शकतो आणि समारंभ साजरे करू शकतो हे दिसून आले. पण यातून अनेक गमती जमती घडत गेल्या आहेत. त्यालाच अती झालं अन हसू आलं म्हणावे लागेल.
मंगळवार, १९ मे, २०२०
अती झालं अन हसु आलं....
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा